पानं

Monday, November 25, 2019

रवी दीक्षित

श्री दिक्षित यांनी मागील आठवड्यात 34 वर्ष पूर्ण झाल्याची पोस्ट टाकली होती नी काल रवी दिक्षित AGM झाल्याची पोस्ट आली  . दोघांचेही खुप खुप अभिनंदन !
       दोघांनी स्टेट बैंक ऑफ हैदराबाद त्या वेळी जॉइन केली होती . पुण्य नगरीतून थेट अम्बड़ ,लासुर सारख्या कोरडया, शुष्क जागी आनंदाने जॉब स्वीकारते झाले . आणि बैंकेला समर्पित झाले . ऑफिस मध्ये दोन चार दिवस मुक्कामी राहणारा बैंकर रवि ..आज या मुक्कामी पोहोचला!!! याचा आंनद त्यांच्या बँकेतील मित्रांना अधिक असेल . रवि दिक्षित म्हणजे बैंकेसाठीचा वेडा माणुस अस त्यांचे औरंगाबादकर मित्र म्हणतात .अन त्यात चूक नाही. आमच्या छोटी नी है वेडेपण भोगलय आनंदाने !
      या दोघांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे .SBH चे SBI मध्ये विलीनीकरण झाल्यावर बहुतांश SBH कर्मचारी  निवृत्ती मार्गाला गेले VRS घेते झाले  , मात्र (श्री + रवि )कांत दिक्षित SBI मध्येही स्वत:ला फिट करवते झाले .
      रवींचा बैंक कंप्यूटर प्रोग्रामिंग क्षेत्रातील, त्यांच्या समर्पित कामाबद्दल मागे राष्ट्रीय स्तरावर गौरव झालेला .
ज्या ठिकाणी त्यांना बँकेने पाठवले त्या त्या जबाबदरयांना त्यांनी न्याय दिला . मागे अठरा वर्षपूर्वी  ग्रामीण भागात अडुळ ला पोस्टिंग असताना त्यांनी काही तासात कर्ज मिळू शकते हे अडुळकरांना दाखवून दिले होते .आज कंप्यूटर युगात हे शक्य आहे, त्याकाळी कठिन होते .
       एकूणच दीक्षित परिवारामध्ये एक उद्योजक लपलेला आहे. अन त्याचा फायदा यांच्या बैंक ग्राहकाना मिळाला नसता तर नवल .ज्या ज्या ठिकाणी यांची पोस्टिंग झाली तेथील उद्योजक व्यापारी खुश .
        "एक उद्योजक लपलेला 'अस मी का म्हणू शकतो .. बैंकेची स्टेटस वाली नोकरी असताना सुद्धा यांनी आपापल्या " सौ 'ना स्क्रीन प्रिंटिंग असेल, ब्यूटी पार्लर असेल, कार्यरत केलेले मी पहिले !
      रवीकांत दिक्षित आज आज AGM झाले आम्ही आनंदलो . कामधेनु पशुऔषधालय,आज अक्षय तृतीयेला 24व्या वर्षपुर्ती करत आहे,   आधी स्थानिक देवगिरी बैंकेकड़े होती ,  रविंमुळे SBH मध्ये गेलो .आणि जी काही भरभराट कामधेनु नी केली त्याला SBH साक्षीदार राहिली . श्री दीक्षित ,रवि दीक्षितांच्या नुसत्या नामस्मरणाने काम फत्ते होत असे,  बँक स्टाफला मी कामाला लावत असे !!! अर्थात सगळी बँक माझी मित्र झाली होती रविमुळेच  ..... उद्या आमचे  मित्रवर्य,  वडील बंधु संगारेड्डीकर रागवतील, त्यानीही तितकेच प्रेम दिले  !
        या दीक्षित परिवारतील सर्व कांत (श्यामकांत पासून निशिकांत पर्यन्त ) लळा लावणारे  आहेत . यांच्यात कुणीही सिंघम मधला  जयकांत शिकरे  नाही...  सर्वाना या निमित्ते नमस्कार !
     पुन्हा एकदा रविकांत दीक्षित यांचे अनेकानेक अभिनंदन  आणि छोटी चेही कारण घर तिनीच सम्भाळलेले....
            - सौ  मिनल , अगस्ती

Monday, November 18, 2019

18 नोव्हेंबर 2019 अंनिव्हर्सरी

सर्व मामामामी  , मावश्या काकालोक ज्यांनी मन लावून माझे लग्न जुळवून दिले अन इथं पर्यंत निभावण्यासाठी मदत केली . दर वर्षी न चुकता आशीर्वाद पाठीशी ठेवतात अन मला उर्मी देतात पुढच्या लगीन गाठी दिनाच्या उत्सवासाठी त्या सगळ्यांना मनापासून शीर साष्टांग नमस्कार !

दैव योग ते किती ?

मी देवेन्द्र आई जबलपूर ला जाणार होतो मावशीकडे चार दिवस राहायला .देवेन्द्र काही कारणाने रद्द झाला , आईचे जाणे रद्द झाले .मी मंथ क्लोजिंग साठी नागपुरला ..अचानक बॉसने पाठवले .तिथून मित्र सौदागर मला घेऊन त्याच्या गावी म्हणजे जबलपूरला चल म्हणाला ....

मावशी कडे आनंद मनवत होतो . बाबासाहेबांना भाजी महत्वाची होती आम्ही भाजी बाजार पहात निघालो ...

      मनमोहनसिंग आपला पहिला अर्थ संकल्प सादर करणार होते ...मिनूच्या गढा मधल्या घरी ! बाबासाहेब आपल्या भाजीच्या शोधात तिथं पर्यंत पोहोचले अन मी मनमोहनसिंग यांचा अर्थ संकल्प मनापासून पहिला ... अनर्थ मनानी केला.. .मनानं मिनूकडेच लक्ष दिलं ! ! !
       
         मोठ्यामामीनी मनानी मिनूला माझ्यासाठी पाहून ठेवले होते ....

     नानामामा त्यावेळी मिनूचा औट घटकेचा सख्खा मामा झाला अन मिनूच्या आईबाबांचा त्यांनी मामा केला 😜 संध्यामामी या कार्यात पुढे न येणेच नवल .

नानामामाला AG ऑफिसात नागपुरात काम निघाले पण तो नागपूरची गाडी चुकवून जबळपुरात गेला ...

   हेरंब तातडीने मला घेऊन दर्यापूरला गेला . मला उंचीचे वैषम्य होते , हेरंबनी आता मागे नाही हटायचे म्हणत बरीच उंची गाठली होती ...मिनूनी त्याकाळी त्याला बरेच चांगले चुंगले पदार्थ खाऊ घातलेले  .तो हि मनोमन तिला वहिनी मानत होता ...(आता लग्नानंतर ते पदार्थ अन त्याची नावं मिनू विसरली बहुदा ) .. अनिलमामा,  दादामामा, बारिकमामी (त्याकाळची) , जयामामी (ईच्याबद्दल काही कमेंट टाकली तर हिचा नवरा मिल्टरया  लई डेंजर )  , जितू सगळे सपोर्टिंग ऍक्टर चे काम करत होते !! आताही सगळे मिनूच्याच पाठीशी असतात त्यामुळं मला निभवावे लागते मुकाट्यानं 😄

अन आता मेन रोल ....क्या करे मौसीजी मेरा तो दिल ही कुछ ऐसा है ... मावशी ,  बाबासाहेब , पदी ,  वैभव !! मिनूच्या बाबांकडून होकार मिळवणं , अजुन तिच्या आईलाही कुठल्याही विषयासाठी , इतक्या वेळात शक्य होत नाही ..इतक्या तत्परतेने मावशीनी कार्य सिद्धीस नेलं कि बाबानी आज आशीर्वाद दिले ,केक आणला , ओवाळणे झाले ... जावई माझा भला ? याविषयी आजही ते सांशक असावेत नव्हे आहेतच  !!!😄  केवढी शिला बाबासाहेबांची गडबड !!!
     मला मात्र मिनूच्या आई बाबांच्या बाबतीत नशीब मिळाले .सर्व गोष्टी ते दोघं सांभाळून घेतात ..पदरी पडलं पवित्र केलं त्यांनी मला !!!

  आज आठवण भाऊसाहेबांची होणे साहजिक आहे . आईभाऊंचे म्हणणे मुलीचे आधी ठरलेलं असतांना आम्ही हा उपद्व्याप करू नये . त्यांच्यावर भाऊसाहेबच प्रभावी उतारा होता बहुदा त्यांनीच आई भाऊंना पटविले .कारण मी तर फार दूर होतो औरंगाबादला ! अन आई भाऊ 1 बाबी 2 भाऊसाहेबांचाच सल्ला अण्णा आजोबांच्या पश्चात घेत असत मुख्यतः .
   
      मिनूच्या बाबांचे पुन्हा विशेष आभार ! त्यांनी लग्न नोव्हेंबरमध्ये काढले .त्यामुळे मी पत्र लेखनात प्राविण्य मिळवले .आधी फक्त आईला पत्र टाकायचो रोज . ती जागा मिनूनी घेतली .एकही दिवस चुकला नाही !  अजूनही पत्र जपून ठेवली तिनी पण वाचायला कंटाळवाणे वाटतात बहुदा  ! कधीच काढत नाही ...

मिनूनी काहीतरी लिहा म्हणून सांगितले .न ऐकून कसे चालेल निभावायचे तर आहे ना ...

मामा मावाश्यां प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यकच ! म्हणून सगळ्यांना त्रास दिला ."अहो झोपा आता बंद करा तो मोबाईल ' असा आदेश मिळण्यापूर्वी संपवलेलं बरं !! आजच घरी आणली ब्यांनवात तेव्हा मुकाट होती !!!

        -  साठा उत्तरी ही कहाणी इथेच थांबवतो . खूप खूप धन्यवाद
                  - अगस्ती

Wednesday, November 13, 2019

सचिन करोडे



"सर आज चहा पिल्याशिवाय जायचे नाही '
मी चहाला घाबरून आणखीनच वेगानं पळ काढला महालक्ष्मी चौकातून .
" सर चहा' म्हणत सचिन नी हात घट्ट पकडला खरा मी सोडवत निघालो गाडीकडे !
" सर आज माझा वाढदिवस आहे !' मला खरे वाटले नाही
" मला चहावर कटवतो का ? संध्याकाळी वाढदिवसाच सेलेब्रेशन सचिनला कापल्या शिवाय करणार नाही , कुठल्या हॉटेलला टेबल बुक करतो सांग '  म्हणत मी पसार झालो .आज एकच ध्यास होता मतदार नोंदणीचा !
रात्री नवाला फेसबुक उघडले तो सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होता !  मला सचिनचा गुन्हेगार झाल्यासारखे वाटले . फेसबुक वर किती अवलंबून असतो आपण ..
        शुभेच्छा दिल्या " आता सचिनला बाहेर जाऊ माझ्या खर्चाने म्हटले ' . त्याने सौ सोबत प्लॅनिंग सांगितले ...
     
         सचिन करोडे .. एक स्वयंसेवक , हुरहुन्नरी वॉर्ड अध्यक्ष ! त्याच्या तोंडी नाही हा शब्द नाही .  सचिन कुठल्याही वर्गात सहज वावरणारा ,  पटकन जिवाभावाचा कसा होतो कुणाचाही कळत नाही  ! मैत्र जपणे त्याला छान जमते .

        एक कलासक्त माणूस ,  कलाकार . सामाजिक कार्याची तळमळ असलेला ! " जाणिवा ' जपणारा ! स्वस्त धान्य दुकानदार  कसे असावे तर सचिन सारखे .
           शासकीय अन्न सुरक्षा समाजाच्या शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचव सचीन खूप शुभेच्छा मिळवशील . खूप मोठा हो , खूप यश मिळव . सगळ्यांना मित्र बनव .
           "  फूल होंगे शूल सारे,
              मित्र होंगे सब विरोधक '  आदर्श स्थिती आण !
हेच मागणं मातृभूच्या वेदना कमी करण्यासाठी !
            आईची तर तू चॅन सेवा करतोस ! तिला काही कमी पडता कामा नाही याची काळजी घे !
                 अनगीनत शुभेच्छांसह -मंगलमुर्ती शास्त्री

       

कामधेनु


        दुकान टाकल्या वर मराठवाड़ा विदर्भ फिरतांना ती. भाऊनी (आमच्या पिताश्रीनीं) खुप सोबत देवुन मोठेच काम केले . सुरुवातीला मारुती ओमनी घेऊन हिंडत असे . गाडीत माझ्यासोबत यायला शक्यतो कुणी तयार नसायचे फक्त भाऊ एकट्याला जाऊ देत नसत , कुठेतरी मंदिर पहायचे शिदोरी काढायाची अन मजा करायची . घरून निघातांना शिदोरी मात्र सोबतच असायची . भाऊंनी बहुदा सर्व भाग पायाखालून घातलेला , त्यामुळे  भौगोलिक राजकीय माहिती खुप द्यायचे . भूगोलाच्या त्यांच्याईतका अभ्यास जवळपास कुणाचाच नसावा !!!
       आईला कामधेनु ची फळं चाखायला मिळाली नाहीत है दुर्दैव ! अजुन पाचेक वर्ष तिने द्यायला हावी होती !  माऊलीच्या नशीबात हा जन्म कष्ट खाती लिहलेला असावा ! फक्त कष्ट उपसले तिनी मुलाच्या हट्टा पायी ! नोकरी केली असती तर ...पगार चांगला होता , वेळ ही खुप असायचा . ....
      बंधुद्वय देवेन्द्र , डॉ हेरंब यांची चिड़चिड़त का होईना प्रामाणिक अन  मनापासून साथ मिळाली . दोघानाही आर्थिक दृष्टया अगस्तीला झेलावेच लागले  , माझी किती त्यांना मदत झांली हा संशोधनाचा विषय . परवा हैशटैग मैन्स वेअर गुलमंडी वर सुरु केले तेव्हाचे देवेन्द्र चे वाक्य " आपण हे करायचे राहुनच गेले असे वैषम्य जीवनाच्या अंताला राहु नए ' त्या त्या सर्व गोष्टी करून टाक म्हणाला !!  उद्वेगाने निश्चित म्हणाला नाही कारण त्याला पैसे मागितले नाहीत !!!!!

            मागे वळून पहातांना , आज नाही म्हणता कामधेनु 14 कुटुंबियांचे संसार खेचत आहे हा आनंद आहे . औरंगाबाद सारख्या अनोळखी गावात "मंगलमुर्ती शास्त्री 'ला ओळख दिली . शहरभर नव्हे तो मराठवाड़ा भर  स्नेही मिळवून दिले !
               22 व्या वर्धापनाला ईश्वर चरणी कामधेनु शी निगडित प्रत्येकाची, ग्राहकांची, कर्मचारयाची , स्नेही जनांची सर्वांगीण  भरभराट होऊ दे हिच प्रार्थना !
                   आतापर्यंत सर्व जेष्ठ श्रेष्ठ मंडळीनी  जे आशिष वर्षवले   ते वाढते राहो या मागणी सह आपला               - मंगलमुर्ती शास्त्री , में कामधेनु पशु औषधालय खड़केश्वर औरंगाबाद
        

 पशुपक्ष्यांशी नाते जुळवी ..........................................कामधेनु !

गोवा निवडणूक प्रभारी बैठक मा संतोषकुमारजी

प्रदेश कार्यालय गोवा प्रदेश

प्रमुख उपस्थिति : मा संतोष कुमारजी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री
मा डॉ राजेंद्र फडके , मा मनोहर पर्रिकर केंद्रीय मंत्री ,

37 मतदार संघ
उत्तरगोवा
Total 20 लढवतोय
प्रिपरेशन-
मंडल समिति तैयार आहे 35 महामेळावे विजय संकल्प रैली
बूथ सशक्तिकरण अभियान 37 मतदार संघ
वोटर लिस्ट वाचन झालेले आहे ELECTION Management Committy .
Independent social media karyakarta .
Everyday press briefing by party
Door to door campaigning
Booklet of earlier schemes
Yuwa team mahila team
Booth jito . 16 to 22 nomination date local leaders corner meeting 100 to 200 voters
Booth पालक
20 घर संपर्क




हर बूथ कमिटी को घर घर जाना कम्पलसरी ।
बूथ लेवल कॉन्फ्लिक्ट क्लियर करना
Conduct resolvation

Karyalay Active rakhana

Office में 2 घंटा बिताना

राज्याबाहेर के लोग ढूंढना कोणसे एरिया देखना

नॉन official hours  कमिटी की बैठक daily



बूथ वर करावयाची कामे

1) बूथ कमिटी तयार करणे . बूथ पालक,बूथ प्रमुख व 10 सदस्यांची कमिटी असावी . कमिटी मध्ये के कमी 3 महिला 3 युवक असतील असे पहाणे .
2) कमिटी कडून मतदार यादी वाचन करून घेणे
3) घर संख्या निश्चित करणे .
4)  कमिटी सदस्यांना संख्येनुसार मतदार विभागुन देणे.
5) बूथ कमिटी चे उमेद्वारासह , तसेच उमेदवाराविना डोअर टू डोअर प्रचार किमान तीन वेळा करून घेणें
6) वैयक्तिक बूथ सदस्यांनी स्वतः चे मतदाराना one to one भेट घेणें पक्षासंबंधी जनते पर्यन्त माहिती देवुन मत मागण्यास सांगणे
7) बूथ लेवल मतभेद दूर करणे , कार्यकर्ते सांभाळून त्यांना प्रोत्साहन देणे
8) कोपरा बैठका आयोजित करणे
9) बाहेरगावी तसेच मृत असणारे मतदार लिस्ट तयार करने
10) जास्तीत जास्त मतदान करून घेणे .
11) अपेक्षित forms भरून कार्यालयात तत्परतेने जमा करणे .

       वेळोवेळी दिलेल्या सूचने नुसार कार्यरत रहाणे .

सत्यविजय सुब्राय नाईक जाहीरनामा

मतदार बंधुभागिनिंनो
   
       मी सत्यविजय तुमचा सत्तू गेल्या सात वर्षापासून मी आपल्या सेवेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहे . कुठलीही संवैधानिक पदावर नसतांना मी जनसेवेत वेळ दिला . भाजपा च्या माध्यमातून समाजकारण करतांना कुठलेही  राजकारण मी केले नाही .
      मागच्या निवडनुकीनंतर पुन्हा हां खेळ मला मानवणारा नाही निदान  या मतदारसंघात तरी , असे वाटून मी बाजूला राहायचे ठरवले मात्र कार्यकर्त्यांच्या एकमुखी आग्रहानंतर पक्षाच्या पाठबळावर पुन्हा एकवार आपल्या दारी मत मागायला आलो .
     मी कुठल्याही "खाशे  वा सरदार ' घरान्यातुन आलेला नसून , एक टाकीज वर तिकीट फाड़नारा मी अत्यन्त गरीबी तुन वर आलेला असल्याने गरीबांचे प्रश्न मला नवीन नाहीत .
                      खरतर    या मतदारसंघात धनशक्ति विरुद्ध उभे राहणे हे एक आव्हान आहे हे माझ्यासारख्या सामान्यासाठी , मात्र सहाशे कार्यकर्त्यांच्या बळावर मी हे अवघड शिवधनुष्य उचलले . भाजपा एकमात्र पक्ष आहे जेथे कार्यकर्ते कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रचार करतात .
     मी आपणाला आश्वस्त करतो क़ी मला भेटान्यासाठी उसगावात माझे घर , तिस्क येथे तसेच वाळपई येथे भाजपा कार्यालयात उपलब्ध असेन . माझ्याकडे पोहचन्यासाठी आपणाला कुठल्याही मध्यस्था कड़े जाण्याची आवशक्ता नसेल .
            फक्त पैशाच्या बळावर निवडणुका जिंकता येतात असे समजणाऱ्या धनदांडग्या , शौक म्हणून आमदारकी मिरवाणाऱ्या , निवडून आल्यानंतर मतदारसंघ सोडुन दुबई लंडन फिरणाऱ्या विरोधी उमेदवारांना त्यांची जागा दाखवुन मला निवडून द्यावे
                आवाहन करतो की चार तारखेला कमळ बटन दाबुन सत्याचा विजय करन आपल्या सत्तुला विधानसभेत पाठवावे .


  आपला विनम्र
   सत्यविजय सुब्राय नाईक 

वळपोई मतदारसंघ प्रभारी

" आपली सीट निघणे कठीण आहे '
" वालपै मतदारसंघ भाजप दृष्टया "c' ग्रेड आहे  '
इथपासून ते "कार्यकर्ते नाराज आहेत कामच करणार नाहीत , सत्तुचे नातेवाईकच काम करणार नाहीत ' इथपर्यंत !
"पैसा फेकल्याशिवाय कार्यकर्ते काम करणार नाहीत ' हे ही ऐकले !!!


सर सीट निघाली '
मुनिसिपलिटीत 1800 वार पल्ला गाठु '
रात्री 12 वाजता  देमु गावकर बोल्ले " सीट प्राथमिक अंदाजानुसार निघाली 600 च्या फरकान '
" आमची पंचायत 100 + लीड घेईल ' प्रेमानंद सर
" आमची पंचायत चांगली लीड देईल ' राजेश गावकर
" उसगाव 2000 वर लीड देईल यावेळी ' नरेश म्हणाला !  ( नरेश सर्वाधिक निराश होते मात्र कामाला लागले की  ... )

निकाल लागेल तो लागेल ,आता पेटीबंद झालाय . मात्र अमेय,  जुबेन, अॅशला, सोमनाथला मिळालेला विश्वास आज आनंद दायीं आहे .  घरचे खावुन कामाला झटणारे कार्यकर्ते हीच भाजपची श्रीमंती आहे .
       प्रदेशाकडूनही मतदार संघ निघतो अशा संभावना व्यक्त होताना दिसतात तेव्हा आनंद होतो . कदाचित संपूर्ण गौयात कुठल्याही मतदारसंघात  एवढी मोठी सक्रीय कार्यकर्त्यांची फ़ौज नसेल अशी फ़ौज  वाळपै   मतदार संघात आहे . दोन शब्द नेत्यांनी बोलावे इतक्याच माफक अपेक्षेत आपले कार्यकर्ते कामाला लागतात ! तुम्हा सर्वांचे करावे तितके कौतुक कमीच आहे ! !
              दत्ताकाका बर्वे , अनिरुद्धजी जोशी या वयात  काम करतांना पाहिले की स्फूर्ति मिळते .

      अमेय कोपरा बैठकांत चांगला बोलला . ऋषि ,गोविन्द, सर्वेश , उगम  गौरव ...  मेहनती आहेत , राजेश गावकारांकड़ून संघटन कौशल्य घ्यावे तर देमु ,बाळा सखाराम , लक्ष्मण  यांनी पक्षासाठी  दिलेला वेळ ! सुनील,  जितु काटकर , अतुल , प्रसाद ,शाबा, रमेश , यांची पक्षासाठीची तळमळ सुख देवुन जाते ! "उसगाव' कर मंडळीचे हे घरचेच कार्य होते , चंद्रलेखा ताईचे  महिला मंडल , सेल्फ हेल्प ग्रुप खूपच कामाचे आहे . केळुस्कर ताई चे आशीर्वाद वाया जाणार नाहीत !

विशेष उल्लेख करावा तो म्हाळशेकर वाहिनीचे बेळगावी आतिथ्याचा , सौ गावकर वाहिनींचा , बर्वे काकू (ऋषीची आई ) , केळकर आजी (संजय विद्याधर यांच्या मातोश्री ), सौ जोशी काकू (कार्यालयावरच्या) या अज्ञात असलेल्या भाजपच्या मातृशक्तिचा ! सौ दिपा सत्यविजय नाईक यांनाही अनुल्लेखुन कैसे चालेल . त्यांच्या कष्टाला सैलूट ! 
       

     मिलिंद गाडगीळ,वामनराव यांचे शिस्तबद्ध कार्यक्रम , आम्हाला शिस्तित कार्यरत करातात !  यश प्रामाणिक प्रयत्नांना कधी हुलकावणी देत नाही ! तेव्हा श्री भालचंद्र  भाव्यान्च्या महागणपतीवर श्रद्धा अन आपल्या असंख्य ज्ञातअज्ञात कार्यकर्त्यांच्या यत्नाना यश मिळेलच या आशावादासह - 
                                                         -आपला मंगलमुर्ती शास्त्री

मानिषदादा चिरायू होवो

एक "उम्र" के बाद "उस उम्र" की बातें "उम्र भर" याद आती हैं..
                           पर "वह उम्र"  फिर "उम्र भर"  नहीं आती..।

इतके सगळे "उम्र ' डोक्याला तापच ,नाही ?
सकाळी सकाळी एका " उम्रा' रलेल्या , वयस्कर झाल्याचा साक्षात्कार झालेल्या मित्राने मला ताप दिला आणि मी " मधुघट 'ला !!

" आता रिटायरमेंट चे दिवस जवळ आले चिरंजीव ! ' इति " अब तक पचपन ' आजच गाठलेल्या आमच्या आदरणीय मनिषदादानी म्हणाव ? ..

     दादांना खुप खुप शुभेच्छया द्यायला फोन केला तर आत्ताच त्यांनीही
" उम्र ' ची जाणीव करून दिली !
         दादा तसा फार नशीबावान , नाही तर आम्ही " उम्ने दराज मांग कर लाये थे चार दिन , दो आरजू में कट गए , दो इंतज़ार में '  अशी समस्त समवयस्क भावांची कथा असतांना ..." वर्षा 'नी मानसी बनत दादाला इंतजार वगैरे करू न देता समर्थ अशी साथ दिली !!

     तसे पाहिले तर मनीषदादा " देशपांडे ' कमी शास्त्रीच जास्त , इतके एकरूप झालेले !  आत्ये भाऊ वगैरे नाते आमच्या साठी,समस्त शास्त्री भावां साठी प्रसंगी अतिशय दुरचे वाटावे  ,  आमच्या सर्व प्रकारच्या सुखः दुःखात आपल्या स्वतःच्या वेदना प्रसंगी बाजूला ठेवून सहभागी होणे सगळ्यानाच जमेल असे नाही . दादांनी 55 वर्ष आम्हाला झेललं . आणी आमचा स्वभाव बघता त्यांना पुढेही झेलावच लागेल .

         घरातील वडीलधारयान्चे सर्वाधिक आशीर्वाद सर्व नातेवाईकांमध्ये  मनीष दादांनाच जाणार . त्याबाबातीत त्यांचा हात कुणी पकड़ू शकणार नाही  .

आपल्या ग्रुप वर

        स्वा सावरकर प्रेमी दादा  सामाजिक कामात  नेहमी अग्रेसर
 असतात . चार लोकांमध्ये मिळुन राहणे , त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे , आणी घराच्या कटकटी सांभाळत हि दादांची आतापर्यंतची कहाणी अशीच वर्षोनुवर्षे चालत राहो !!  त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होवो !! उदंड , निरामय आयुष्य लाभो या प्रार्थनेसह
                                                              - अगस्ती
        

Tuesday, October 29, 2019

नलु ताई 30 ऑक्टोम्बर2019

साधारणता नव्वदची गोष्ट असावी मी भुसावळला जात असे. जळगावला हेडक्वार्टर (घर ) होते . रोजचाच दीडशे किमी चा टूर असायचा ... छान चार रूमचा ऐस पैस ब्लॉक भाड़याने घेतलेला ! टूर वरून आल्यावर फ्रेश झाल्यावर गाडीला किक मारायची अन उशिरा पण भुसावळ गाठायचे .... पंचायत वाड्या तल्या त्या घरी मुक्काम पडायचा ! सहा बाय दहाच्या त्या छोट्या  खोल्यात जीव रमायचा .. आडवे उभे का होईना निवांत झोप व्हायची , तब्येतीने , आग्रहाने वास्तपुस्त व्हायची ओलावा अलौकिक होता , सकाळी दहाबाय दहाच्या खोलीत ..वन रूम .. किचन, बेडरूम ,लिविंग रूम , सर्व काही एकाच खोलीत,  बालाजी मंदिराच्या आणि वर माझ्या सारखा पाहुणा कलाकार हजेरी लावणारच !!
       दोन खोल्या शालूताईच्या अन एक खोली नलू ताइची ! या दोघींची श्रीमंती उम्बरठया बाहेरच्या खेटरांवरच  मोजावी . स्व भाऊ साठी शाली नली म्हणजे फारच कौतुकाचा विषय !
    
      सकाळीच गुड्डीला " मिठाई वा चमचमित खायला दयायचेच तर काही तरी वेगळे दे जसे  लाल भोपळयाच्या वड्या शीरे दोडक्याच्या शीरांपासून बनवलेले पदार्थ '' असा सल्ला देवून झाला . भाऊबिजेला या जेष्ठ ताई लोकांची आठवण काढ़ने सहज आहे ...त्यांनी दिलेले निर्व्याज प्रेम ! मी भटका अन विमुक्त असल्याने मला जास्तच मिळाले !!

       या तायांची पुढची पिढीहि हा ठेवा  जपण्याचा प्रयत्न करतेय,  आनंद आहे .या सगळ्या आठवणीचे कारण आज नलू ताईनी देह ठेवला .अतुलनी अगस्ती मामाला कळवा म्हणून सांगितले .आणि लगेच  दूसरी सूचना रात्री दहापर्यंत कुणाला कळवू नको . आपल्या मुळे कुणाला त्रास होता कामा नए सगळ्याची भाऊ बीज होऊन जाऊ देत .... ! आजची भाऊ बीज खरेच किती दुर्दैवी आहे आमच्या या बहिनीला बीजेच्या कोरीपासून दूर तर नेलेच अन या दुःखद वार्तेला सुद्धा , अर्थात इतरांच्या आनंदासाठी !! अक्का आत्याचे संस्कार ...

        सौ नलुताईचे कष्टप्रद आयुष्य सुफळ पूर्णत्वाकड़े गेले . सर्व मुलं चांगली निघाली , अतुलनी आईची खुप सेवा केली  . हे दुःख पेलण्याची अतुल ,प्रशांत,सौ  वर्षाला, एकूणच  डोखले परिवाराला ताकद देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !!

          

Tuesday, October 15, 2019

बालाजी मुंढे जयभावणींनगर

कधी स्टेजवर राहाण्यासाठी धड़पडणार नाही ,
नेत्यांच्या समोर समोर उगीचच करणार नाही ,
उगीच  धुंडघूस घालत फोटोसाठी "मरमर'णार नाही ,
उगीच अनावश्यक " बडबड' णार नाही ,
उगीच नेतागिरिचा आव आणणार नाही ,
मात्र प्रत्येक नेत्याला दखल घ्यायलाच लागेल ,

कारण कार्यक्षेत्रतल्या

प्रत्येक गल्लीत संपर्क
प्रत्येक घरात संपर्क
प्रत्येक प्रश्न स्वतःचा
प्रत्येक कार्यकर्ता दोस्त
प्रत्येक अभियान राबवणार
प्रत्येकाच्या हाकेला " ओ ' देणार
प्रत्येकाच्या सुखदुःखात धावणार
प्रत्येकाच्या मनात जागा करणार असा हा

प्रत्येकाचा आपला माणूस ,
दिलदार दोस्त ,
मितभाषी
स्मितभाषी
हसतमुख ,
जयभवानीनगरचा
सच्चा प्रतिनिधि ,
नेता

बालाजी मुंडे

आपणास उदंड निरामय आयुष्य लाभो

प्रार्थना - मंगलमुर्ती शास्त्री







आईचा स्व सुलभा आजीचा वाढदिवस

 शुभांगीनी आठवण दिली 7 ऑक्टोबर आजीचा स्व सुलभाआजीचा सुध्दा वाढदिवस आहे .
       आई चा वाढ दिवस कधी साजरा झाल्याचे आठवत नाही . त्यामुळे असेल कदाचित तारीख ही आठवणीत नव्हती . दादामामानी दुजोरा दिला अन आई च्या आठवणीत रंगलो . आई ती आईच ! आमच्या साठी आई म्हणजे भाऊं पासूनचे प्रोटेकशन होते .अर्थात सगळ्यांची तीच कहाणी असते , आईच्या पदराखाली लपणे अन गुन्हे लपवणे यात गैर काही नाही . सांभाळून घेणे हे आईचे कामच त्या प्रेमापोटीहि क्रित्येक मुलं बिघडलेली असतात ! आई वर्गाची लोकप्रियता बाबा वर्गापेक्षा जास्त असते ते यामुळेच असावी
        वाढदिवसानिमित्त स्व आईला नमस्कार ! तिच्या आठवणी आठवायचा प्रयत्न करावा तो चकल्या , धपाटे , खायचे पदार्थच आठवतात . खादाड सुद्धा तिनीच बनवलं न ! स्व भाऊंची  आवड , चव तिनीच निभवावी . तिचं रूप आठवावे तो स्वयंपाक घरातलेच आठवते . दुसरे ते पत्ते टाकतानाचे ! हा गुण अस्मादिकांनी मनापासून सांभाळला . वेळ मिळो न मिळो एक डाव झालाच पाहिजे !!
          नोकरी लागल्यावर आई साठी बंगलोर हुन साडी आणल्याचे स्मरते आजही रंग आठवतो . बाकी तिच्यासाठी आम्ही काही केल्याचं आठवत नाही . रोज एक पत्र अडीच वर्षे सांगलीतून पाठवत असे ख्याल खुशाली कळवण्यासाठी . आजच्या मोबाईल युगात तो पत्रानंद गायब झाला . आजच्या पिढीला असे आनंदी क्षण दुर्मिळ झाले आता !
       शुभांगी आजी शिवाय राहात नव्हती .आम्ही जितूच्या साखरपुड्याला वडोद्याला घेऊन गेलो तर लवकर परतावे लागले होते . ती आजी जवळ आमच्याशिवाय चांगली रहायची .. आजही तिलाच आठवण आली !
       आईचं सुखं आम्हा चौघात मलाच जास्त मिळाल ! मी खरच नशीब घेऊन जन्माला आलो . हेरंब देवेन्द्र बाबी घराबाहेर जास्त असल्याने मलाच जास्त लाभ झाला आईभाऊंचा  .
      अवघ पंचावन्न वर्षाचं आयुष्य तिला मिळालं . जरा लवकरच गेली , चटका आजही जाणवतो . अजून पाच वर्षे मिळते तो बरे झाले असते . अगस्ती सेटल झाल्याचे तिला पाहायला मिळाले असते ! ! योग नव्हते आणिक काय . लक्ष ठेव ,  आनंदी ठेव , आशीर्वाद असू दे या लेकरांवर एवढंच मागणं तिच्याकडे 7 ऑक्टोबर निमित्त ! साष्टांग दंडवत .

Monday, October 7, 2019

शुभांगी वाढ दिवस 2019 ऑक्टोबर 7

आज चि शुभांगी
" अब तक छब्बीस ' होणार ! एवढीशी छकुली इतकी मोठी झाली ...
       लहानपणी छकुली आजोबांच्याच पालकत्वात वाढली .आधी आजीशिवाय जमायचे नाही ..आजी नी साथ सोडली नी आजोबांनी बोट पकडले .
      तिच्या कडे लक्ष देण्याच्या काळात आम्ही दोघं "कामधेनु' कडे लक्ष द्यायचो ते ही बाळच होते ! अन आवडो न आवडो त्याचे लाड करणेच होते . तेव्हा जबाबदारी ती स्व भाऊंनी झेलली .आणि आजी आजोबा आई वडील सगळ्या भूमिका निभावल्या .
        त्यामुळे संस्कार वगैरे आजोबांनीच केलेले ....शुभांगीला मन मिळावू बनवण्याचे महत्वाचे  काम आजोबांनी केले त्यावेळी मला सुचलेले .... वास्तविक  टोटल क्रेडिट गोज टू भाऊ ! पण ...

, MARCH 24, 2003

छकुली

एक एकुली माझी छकुली
गुण बापाचे तारीफ कसली ?

चुलत चुलती ,सर्व ती असती
सर्वांसाठी ही, सख्खी सोबती !

मिळून मिळून राही ती कशी ,
'इकलौती ' ची असे मागणी!

मनी मोठे पण, प्रगल्भ असता .....
सख्ख्यांची नसे आवश्यकता !

आभाळ मनाची , मन मिलावू
एवढासा खाऊ , मिळून मिळून खाऊ !

जिवापाड जरी आई जपते
बाबांना ही माया लावते!!!

चकुली बहुली ,एकटी तानुली
आईबाबांचा विश्वास जागली!!!

पप्पी खूप मोठी हो ...खूप माणसं जमव आता जालन्यात का होईना !

वाढदिवस शुभ शुभ !

आईचा वाढदिवस 7 oct1943

 शुभांगीनी आठवण दिली 7 ऑक्टोबर आजीचा स्व सुलभाआजीचा सुध्दा वाढदिवस आहे .
       आई चा वाढ दिवस कधी साजरा झाल्याचे आठवत नाही . त्यामुळे असेल कदाचित तारीख ही आठवणीत नव्हती . दादामामानी दुजोरा दिला अन आई च्या आठवणीत रंगलो . आई ती आईच ! आमच्या साठी आई म्हणजे भाऊं पासूनचे प्रोटेकशन होते .अर्थात सगळ्यांची तीच कहाणी असते , आईच्या पदराखाली लपणे अन गुन्हे लपवणे यात गैर काही नाही . सांभाळून घेणे हे आईचे कामच त्या प्रेमापोटीहि क्रित्येक मुलं बिघडलेली असतात ! आई वर्गाची लोकप्रियता बाबा वर्गापेक्षा जास्त असते ते यामुळेच असावी
        वाढदिवसानिमित्त स्व आईला नमस्कार ! तिच्या आठवणी आठवायचा प्रयत्न करावा तो चकल्या , धपाटे , खायचे पदार्थच आठवतात . खादाड सुद्धा तिनीच बनवलं न ! स्व भाऊंची  आवड , चव तिनीच निभवावी . तिचं रूप आठवावे तो स्वयंपाक घरातलेच आठवते . दुसरे ते पत्ते टाकतानाचे ! हा गुण अस्मादिकांनी मनापासून सांभाळला . वेळ मिळो न मिळो एक डाव झालाच पाहिजे !!
          नोकरी लागल्यावर आई साठी बंगलोर हुन साडी आणल्याचे स्मरते आजही रंग आठवतो . बाकी तिच्यासाठी आम्ही काही केल्याचं आठवत नाही . रोज एक पत्र अडीच वर्षे सांगलीतून पाठवत असे ख्याल खुशाली कळवण्यासाठी . आजच्या मोबाईल युगात तो पत्रानंद गायब झाला . आजच्या पिढीला असे आनंदी क्षण दुर्मिळ झाले आता !
       शुभांगी आजी शिवाय राहात नव्हती .आम्ही जितूच्या साखरपुड्याला वडोद्याला घेऊन गेलो तर लवकर परतावे लागले होते . ती आजी जवळ आमच्याशिवाय चांगली रहायची .. आजही तिलाच आठवण आली !
       आईचं सुखं आम्हा चौघात मलाच जास्त मिळाल ! मी खरच नशीब घेऊन जन्माला आलो . हेरंब देवेन्द्र बाबी घराबाहेर जास्त असल्याने मलाच जास्त लाभ झाला आईभाऊंचा  .
      अवघ पंचावन्न वर्षाचं आयुष्य तिला मिळालं . जरा लवकरच गेली , चटका आजही जाणवतो . अजून पाच वर्षे मिळते तो बरे झाले असते . अगस्ती सेटल झाल्याचे तिला पाहायला मिळाले असते ! ! योग नव्हते आणिक काय . लक्ष ठेव ,  आनंदी ठेव , आशीर्वाद असू दे या लेकरांवर एवढंच मागणं तिच्याकडे 7 ऑक्टोबर निमित्त ! साष्टांग दंडवत .

Monday, September 30, 2019

मित्र सतीश नारखेडे

विपन्नावस्थेतही
हसतमुख कसे राहायचे !
भ्रांत वगैरे शब्दाचा एव्हाना
सराव झाल्यासारखा वास्तविक
अन तरीही
किंचितही इतरांना आपल्या प्रश्नांची
जाणीवही होऊ न देणे ,
माझे प्रश्न माझे आहेत,
त्यांची उत्तरं मलाच द्यायची आहेत .
माझे कष्ट मलाच निभावायचे आहेत ,
संपवायचे आहेत !
सोबत सामाजिक अधिष्ठान ठेवायचे आहेच
"जाणीवा ' मरू द्यायच्या नाहीये ,
अन मुलांनाही विसरू द्यायच्या नाहीत !
अन विनाखर्च  छान राहणीमानात कमीही नकोय ,

सेल्फीचा आनंदही लुटायचाच आहे ,
शास्त्रींना भुसावळी टेस्टची शेवभाजी
अन कळणाच्या भाकरी खाऊ घालायच्याच आहेत !

याचे नाव सतिश नारखेडे !
वडील बंधू ,
नपेक्षा " दोस्त ' म्हणणे संयुक्तिक ठरावे .
आज आपला वाढदिवस ओलांडत आहेत .
पुढच्या सर्व समस्या आता
सुटण्याच्याच मार्गावर आहेत !
समस्या विरहित जीवनानंद त्यांना लाभो .
निरामय जीवन कसे जगावे हे तर त्यांना माहीतच आहे ..
हसत खेळत न की मागे वळत !

सतीश सर शुभ शुभ !







मंगलमुर्ती शास्त्री
सौ मीनल शास्त्री
अजित वझरकर
सौ शुभांगी  वझरकर

                           26सप्टेंबर2019

सतीश नारखेडे 9423959990 वर उपलब्ध असतील !

पराग शास्त्री वाढदिवस

एक असा पदार्थ ज्यात
 साखरेची गोडी आहे ,

ज्याची निर्मिती फुलात होते

ज्याला फुलपाखरुखाद्य म्हणता येईल ,

हमिंग बर्ड खूप लांब भराऱ्या मारतात आकाशात
मात्र यांच्यासाठी जमिनीवर पोहोचतात
 मोठी लांब चोच फुलात घालून ज्याला शोषतात ,

आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा माझ्यादृष्टीने कारण....
 मधमाशा त्या पासून मध बनवतात !

काही कीटकभक्षण करणारे पक्षी याचा उपयोग
किड्यांना आपल्या कडे आकर्षित करण्यासाठी करतात !

अतिशय सूक्ष्म पदार्थ आहे पण भुरळ घालणारा प्रत्येकाला ....
असं आमच्या विकिपेंडिया सौ मीनल माहिती देतात !





याला   *पराग*  म्हणतात !!

परागचा वाढदिवस म्हणून परागचा अर्थ विचारला
समर्पक उत्तरही मिळाले

घरात सर्वात बारका / सूक्ष्म ...

लांब लांबच्या सगळ्यांचा लाडकाही ,

पगार चांगला आणतो खर्चही चांगला करतो

मधाळ आहेच !

आपल्याभोवती माणसं गोळा ही करतो

अच्छे अच्छेकांना ज्ञान पाजतो !

तरीही लळा लावतो .






त्याच्या सर्व कामना पूर्ण होवोत
उदंड निरामय आयुष्य त्याच्या बडबडी सह चिरायू होवो !
हेच आज आई रेणुकेला , पहिल्या माळेला मागणं

सौ मीनल
अगस्ती
(शुभांगीनी आज फोटो पाठवला नाही म्हणून तिचं अजितच नाव पोस्ट मधून वगळतो 😄)


पराग एवढं लिहिलं निवडणुकीच्या गडबडीत , घरी सवाष्ण ब्राह्मण यांची वाट पहात......  मध्येच काकड्या, दही, खवा वगैरेची व्यवस्था लावत .....किमान गुळपट्टी तरी पाठव प्रशांतच्या हाती !!!

Monday, August 5, 2019

अतुल सावे वाढदिवस

मित्र कुणास म्हणावं ?
ज्याच्याजवळ व्यक्त होताना संकोच होत नाही,
खोटं बोलावसं वाटत नाही फसवणे तर दूरचे.
मनातली पाप पुण्य आपोआप बाहेर पडतात .
त्याच्याजवळ आपले आंनद आणि दुःख , शल्य पटकन मोकळे करता येतात तो मित्र !
मित्राजवळ आपण मोकळे-ढाकळे असतोत .
             एव्हढे मित्र पुराण ऐकवण्याचे कारण ....परवा मित्रवर्य विश्वासचा फोन आला ."आमदार साहेबांना भेटायचे आहे  .तू वेळ घेऊन दे ' मी सुचवले "अरे तूच फोन कर त्यांना '
अरे शास्त्री तुझे त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत ... विश्वास बोलला .
विश्वास तूच फोन कर , वेळ घे  you will feel friendly ,nothing less ! 
          सायंकाळी त्याचा फोन आला , "अतुलदादाचं कामच वेगळे आहे रे '' बोलला , एव्हाना तो फ्रेंडली झाला होता त्याची भेट झाल्याचे त्यानं सांगितले . त्याचे प्रॉब्लेम सुटण्याची चिन्ह त्याला दिसली . हेच वैशिष्ट्य अतुलजी सावे या व्यक्तीविशेषाचे ! लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सगळ्यांना " दोस्त ' बनवण्यात हातखंडा असलेले अतुलजी !

            आमदार म्हणून दमदार कामगिरी करायला ,मला नाही वाटत अतुलजींनी कुण्या अधिकाऱ्याला , कर्मचाऱ्याला उगीच सूनावत कामं करवली असतील .सगळे आनंदाने कार्यरत करत,  दोस्त बनवत उद्दिष्ट्य साध्य केलेली !
            मी अनेक पदाधिकारी , लोकनेते उगीचच कार्यकर्त्यांसमोर अधवातध्वा बोलतांना पाहिले , इम्प्रेशन मारायला ! अतुलजीना असं इम्प्रेस करावं लागतं नाही . त्यांना चिडून बोलतांना एकदोनदा पाहिले त्यावेळी खरेच डोक्यात तिडीक उत्पन्न करणारी स्थिती होती .

            "  असं आहे शास्त्रीजी त्याचा पक्ष विरोधात , तो " विरोधी ' निवडणुकीच्या पंधरवड्यात ! त्याच्यापासून सावध राहा पण शत्रु समजू नका ' असे इतर पक्षातल्या लोकांबद्दलचे विचार मला कवी संदीप खरेच्या ओळी आठवून जातात

"चालती माझ्याविरोधी माझि ही संगनमते
           शत्रू माझे जे , तयांचे मित्र व्हावे वाटते ! '

              अतुलजी एक " जाणिवा ' जपणारा माणूस म्हणूनही मला आवडतात . पुलवामा हल्ला झाल्यावर स्वागत पुष्प नाकारणारा , आपल्या वाढदिवसाचे सगळे उत्सवी कार्यक्रम रद्द करत फक्त सामाजिक उपक्रमांना परवानगी देणारे अतुलजी  आम्हा कार्यकर्त्यांना संस्कारित करत असतात . 
               आज अभिष्ट्यचिंतन करताना दीर्घायुष्य चिंतीताना इतकंच मागणं ,अतुलजींच्या प्रिय दैवत श्री गणेशाकडे, अजुन खूप मोठ्ठ्या जबाबदाऱ्या पार पाडू दे , जन-सेवारत राहू दे .
                
        पुण्य कर्मणा कीर्तिमार्जय
                       जीवनम् तव भवतु सार्थकम्

                    "  अतुलजी ' नावाच्या लोकमित्रास  मनःपूर्वक शुभेच्छा -मंगलमुर्ती शास्त्री .



              

कविमित्र पोहणेरकर सर

आम्हाकरिता दुर्धर चिंता ।
नाना दु:खे हाल सभोवता ,
पुरे ! नको नरतनु आतां।
दुखांची राशी !
           नकोशा झालेल्या या जगण्याला ,भौतिक सुखसुविधांच्या आजच्या  या "सुनामी'तह़ी दुःख  दुःख अन दुःख डोईवर घेवून हिडंणारे आम्ही बापुडे अन...
 सदैव सस्मित ,
सदैव अपुला
डोलत तु असतोस;
दुःख सृष्टि कधी
स्पर्शली नाही
तव (मन) चित्तास !
....अशा या तृण पुष्पाची आठव होते न होते तो ...
ही मोहकता ,
तुझी फुला ही
प्रेम निर्भरा वृत्ती ;
सदानंद हां
 उदभवेल का ?
या भू पृ ष्टा व र ती
....... ही चिंता की परत परत आम्हाला हां सदानंद मिळेल का ?  मोहकता प्रेम वगैरे जाऊ देत दुःख तर पाचविलाच पुजली आहेत ना ! मग ..

हासवितो लतिकाकुंजाना ।
प्रेमे काढी सुन्दर ताना ;
आनंदाच्या गाउन गाना ।
 आनंदे रमतो .
            असा आनंदी पक्षी आम्हास भेटतो ....
तो आमचे दुःख
लपवतो ,घालवतो,पळवतो !
तो आमचे जगणे...
सुसह्य,सुसज्ज,सुहास्य करतो
तो आमचे मनास ...
हसवतो,खेळवतो,रमवतो

तो साधकांना प्रोत्साहित करतो ,पाठ मानेचा ताण घालवतो

तो विद्यार्थ्यांना सूत्रे देतो ,जटिल ऑर्गनिक शिथिल करतो

तो आम्हाला टिप्स देतो ,कुटुंब "जल्लाद' असेल तरी अल्लद कसे निभवायचे हे शिकवतो

तो आम्हाला गमक देतो  कौतुक ओतून बेचव जेवणाला चविष्ट कसे बनवायचे हे सांगतो

तो क्रित्येकानां क्षणात हसवतो क्षणात रडवतो  "हसू आसु ' ने जगणे फुलवतो


 अशा या आमच्या मित्राच्या  "आनंदी पक्षाच्या '  कवीवर्य प्रा.  विजय पोहनेरकर सरांच्या वाढ दिवसाला, हा शुभ दिवस वारं वार येवो  हे रेणुकाआईकडे मागनं मागत , लाख लाख शुभेच्छा !

अन पुन्हा सरांकडे बालकविंच्याच शब्दात मागणं .....
 उंच भरारया मारित जाणे ।
     रूप तुझे हे गोजिरवाणे
गुंगुंन जाईल चित्त जयाने
     दे दे ते गाणे !!
     दे दे ती कवणे !!!!

--------मंगलमूर्ती शास्त्री





(ता क : कवीमित्राला शुभेच्छा द्यायला कै त्र्यम्बक बापूजी ठोम्बरे उर्फ बालकवींचे शब्द वापरल्याबद्दल ते ही मला आनंदाने क्षमा करतील हा विश्वास आहे !!!! )

परिवाराचे कुळगीत



मधुघट

Monday, March 15, 2010

परिवाराचे कुळगीत

असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील
गोत्रांची किर्ती सातासमुद्रा जावो
कुलवंत घडविणे हीच मनीषा राहो
संस्कार टिकविणे हेच आमचे ध्येय
असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील

'एकी'च आमुची व्हावी जनाविशेष
सर्वोच्च परंपरा ,राहाव्या कायम खास
औदार्य निभाविणे हेच आमचे व्रत
असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील

गंगेचे सुपुत्र अम्ही ,शुद्धताच मनी भावो
पावित्र्य जपाविणे हेच आमुच्या ठावो
पूजा अर्चना.. असावा स्थायीभाव .
असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील

सद्भाव मान्यता वाड वडीलान प्रती राहो
आशिष जमविणे हीच आमुची आस .
असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील.!!!

केतकी वाढदिवस

बारीक

खारीक

किडुक

मिडुक

चवन्नी

अठन्नी

चवळी

मटकी

तुराटी

पराटी

चुणचुणीत

टणटणीत

शिडशिडीत

अशी कुठलीही विशेषणं वापरुन मी आज  शुभेच्छा देणार नाही .

आणि

डेरी मिल्क

सिल्क

Bournville

5-स्टार

ऐक्लेअर

Nutties

पर्क

किटकॅट

पोपिन्स

अलपेंलिबे



सुद्धा देणार नाही



कारण ....

आज  बाबा-बाबी च्या  संसारातील

बाहुला- बाहुलीतील बाहुली  केतकी आता मोठी होत आहे ...

 काय माहीत बाहुला कधी वाढणार ?  बाहुली

ती आज वाढणार आहे , वाढत राहणार आहे अनेकानेक वर्ष !

कधी पुण्यात इंडियात तर कधी फ्रँकफूर्ट जर्मनीमध्ये !!

कुठेही का होई ना ती वाढती राहो , खुश राहो, चुस्त राहो,

 मस्त  राहो , सहर्ष राहो, शत वर्ष राहो , चिरायू राहो

या आशीर्वादासह   -  अगस्ती मामा






दिपकदादा वाढदिवस

                कुठलाही उत्सव , मंगल कार्य साजरे करण्यासाठी घरातले काहीच लोकं शंभर टक्के देतात . ते कार्य माझे  आहे असं समजुन तन मनाने कार्यरत होतात . कार्यक्रमाच्या दिवशी त्यांच्या डोक्यात दुसरा विषय नसतो , कार्य पार पडेपर्यंत .
           सिलेंडर डोक्यावर वाहण्यापासून , ताटं वाढण्यापासुन,  स्वागतापर्यंत सर्व कामात  स्वतः ला कुणाचीही तक्रार न करता लीलया सामावून घेतात . अशी काही मंडळी आपल्याही कुटुंबात आहेत त्यापैकी एक मोठं नाव  दिपक दादा ! सगळ्या भावा बहिणींचा अभिमानाचा लाडका   ....कवतीक्या सगळ्यात पहिला म्हणून .

            हाती घेतलेले कार्य उत्साहाने पूर्णत्वाला नेणार , मग चिखलदरयाला भाऊ भाऊ पर्यटन असो का शुभु चे लग्न ! शुभांगी च्या लग्नात डोली उचलणारे दोन अधिकारी होते , एक चीफ इंजिनिअर दुसरा बँक मॅनेजर ! वय , प्रकृती, मान यांचे  भान विसरून , हरपून जाऊन कार्य सिद्धीस नेणारे ते दोघं ....
          मी तर लग्न निर्विघ्न पार पडेल याबाबत निःशंक होतो अन निर्धास्तही ,  कारण  समेवर होते आमचे हे दादा ताई  लोकं ! 
            लासुरला जुन्या घरात जेष्ठ दादांनी पाठीत धपाटा घातल्याने मी आणी कुलदीपकदादा  दोघांनी चिंचोक्यांनी सुद्धा तिर्रट खेळल्याचे आठवत नाही मात्र " रमी ' ला आम्हीच प्रतिष्ठा दिली ती आजतागायत ! रात्रीच 11 वाजता वहिनीच्या धाकाने भर  पावसात दादा मार्गस्थ झाले मात्र चार डाव खेळुनच ... महिनाभराच्या दीर्घ गॅप नंतर !! जुग जुग जियो दादा .
  
      व्यसनांबद्दल दादाला भयंकर तिटकारा . तंबाखू,  बिडीकाडी ,  अजिबात सहन होत नाही . सगळे काही शिस्तीत असते , बेशिस्त फक्त 104 दोस्तांसोबत !
        निसर्गोपचार बऱेच वर्ष दादांनी अमलात आणला .आम्ही चार सहा महिन्यात,  त्याचे फायदे लोकांना सांगण्यापूरते  आठवणीत ठेवले !!
           बँकेत आकडेमोड , हिशेब करण्यात जबरी माणूस !! मोठ्ठ्या टोटला क्षणात करून टाकतो .
      कुटुंब वत्सल तर आहेच किंचित मुसोलिनीच्या तिथीवर जन्माला आल्याने थोडी हिटलर शाही ,  दादागिरी घरी करतो ! पण लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची क्षमता ठेवत असल्याने जवळच्यांना दुष्काळाचे चटके बसत नाहीत !
        
       इ गो चा अन त्याचा दूरपर्यंत संबंध नाही असे प्रशांतला दिशानी मॉर्निंग वॉकला दुपारी जातांना सांगितले म्हणून ते खरे म्हणायचे !! (प्रशांत सकाळी कधी उठत नाही झोपेतून )

         वाढदिवस चिरायू होवो . "अब तक छप्पन ' मध्ये जातांना गुडघे , शुगर, बीपी  असे श्रीमंती दुखणे दूर राहो . दीर्घ निरामय आनंदी आयुष्याच्या शुभकामना .




ता क : जाता जाता सांगणे एकच आता केसांसाठीचा खर्च कमी करा , कंगव्याचाही खर्च वाचेल (  सल्लागार  ?)
     

       

Saturday, August 3, 2019

छोटी विदुला पदे वाढदिवस

जीवन-पथ जो कंटकमय हो
विपदाओं का घोर वलय हो
किन्तु कामना एक यही बस
प्रतिपल पग गतिमान चाहिए

माँ बस यह वरदान चाहीये ....

संघाचं हे सुंदर अर्थपूर्ण गीत " मधूघट ' साठी कॉपी पेस्ट करणारच होतो ...मधूघट उघडले अन छोटीचा वाढदिवस असल्याचे कळले .पुढची कडवी कट केली अन छोटी आठवली ..

         छोटीसाठी  (सौ विदुला पदे मॅडम) गेली दोन तीन वर्षे खरेच परीक्षा पाहणारी गेली . संसाराचं रहाटगाडगं ओढतांना सगळ्यांनाच मागे पुढे व्हावे लागते,  जीवनपथ कंटकमय आहेच , संकटांचा मुकाबला करावा लागतो मात्र अचानक गणेश च्या तब्येतीनी छोटीला दोन वर्षांपूर्वी " विपदाओ का घोर वलय ' कशाला म्हणतात ते दाखवून दिले !
           तीनी एकटीनं सगळं झेललं ! " तुला एकटीला सगळं सांभाळायचं आहे छोटी बाकी आम्ही आहोच ' असा भरवसा देत तिचं मनोधैर्य तेवढं वाढवण्याचं काम अस्मादिक करत होते .  प्रत्येकाला स्वतःलाच स्वतःशी  संघर्ष करावा लागत असतो , मन खंबीर ठेवावं लागतं  !  जे तीनी उत्तम ठेवले ....
              दुर्धर आजारातून नवऱ्याला बाहेर काढलं अन पुढ्यात मुलगी लग्नाची ! लग्न छान केलं एकहाती . सगळे छान छान झाले . चिरंजीव स्वतः स्वयंपूर्ण आहे "अभ्यास आता बस कर ' म्हणून सांगावे लागते !
               छोटी गुडडी नानांच्या लाडक्या ! अर्थात गुडडी ,  पहिले पासून स्वतःच लाड करवून घेणारी त्यामुळे तिचे कौतुक जास्त  सगळ्यांना ! माझ्या सगळ्यात जवळ रहाणारी  म्हणूनही गुड्डीच भाव जास्त घेऊन जाते ! त्यामुळे छोटी अन बबडी कडे थोडे दुर्लक्ष होते याला संपूर्णपणे मीच दोषी आहे . ...
                आता छोटीचा वाढ दिवस , विसरलो !
थँक्स " मधूघट ' (गुडडीला 14 ऑगस्ट ला नक्की भेटेन ! )  ! शुभंकर होवो , सुखदायी,आरोग्यमयी,  चिरायु होवो !

   छोटी आम्ही कुणी तुझ्या कामात पडो न पडो ...
" प्रतिपल पग गतिमान चाहिए ..
             माँ बस यह वरदान चाहीये ! एव्हढीच प्रार्थना - अगस्ती

   


                
    
          

Friday, July 26, 2019

सचिन करोडे शुभेच्छा



"सर आज चहा पिल्याशिवाय जायचे नाही '
मी चहाला घाबरून आणखीनच वेगानं पळ काढला महालक्ष्मी चौकातून .
" सर चहा' म्हणत सचिन नी हात घट्ट पकडला खरा मी सोडवत निघालो गाडीकडे !
" सर आज माझा वाढदिवस आहे !' मला खरे वाटले नाही
" मला चहावर कटवतो का ? संध्याकाळी वाढदिवसाच सेलेब्रेशन सचिनला कापल्या शिवाय करणार नाही , कुठल्या हॉटेलला टेबल बुक करतो सांग '  म्हणत मी पसार झालो .आज एकच ध्यास होता मतदार नोंदणीचा !
रात्री नवाला फेसबुक उघडले तो सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होता !  मला सचिनचा गुन्हेगार झाल्यासारखे वाटले . फेसबुक वर किती अवलंबून असतो आपण ..
        शुभेच्छा दिल्या " आता सचिनला बाहेर जाऊ माझ्या खर्चाने म्हटले ' . त्याने सौ सोबत प्लॅनिंग सांगितले ...
     
         सचिन करोडे .. एक स्वयंसेवक , हुरहुन्नरी वॉर्ड अध्यक्ष ! त्याच्या तोंडी नाही हा शब्द नाही .  सचिन कुठल्याही वर्गात सहज वावरणारा ,  पटकन जिवाभावाचा कसा होतो कुणाचाही कळत नाही  ! मैत्र जपणे त्याला छान जमते .

        एक कलासक्त माणूस ,  कलाकार . सामाजिक कार्याची तळमळ असलेला ! " जाणिवा ' जपणारा ! स्वस्त धान्य दुकानदार  कसे असावे तर सचिन सारखे .
           शासकीय अन्न सुरक्षा समाजाच्या शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचव सचीन खूप शुभेच्छा मिळवशील . खूप मोठा हो , खूप यश मिळव . सगळ्यांना मित्र बनव .
           "  फूल होंगे शूल सारे,
              मित्र होंगे सब विरोधक '  आदर्श स्थिती आण !
हेच मागणं मातृभूच्या वेदना कमी करण्यासाठी !
            आईची तर तू चॅन सेवा करतोस ! तिला काही कमी पडता कामा नाही याची काळजी घे !
                 अनगीनत शुभेच्छांसह -मंगलमुर्ती शास्त्री

       

Tuesday, July 2, 2019

Sunilmama माजी सैनिक वाढदिवस शुभ शुभ

सगळी नावं घरकुल मधली आली अन अगस्ती त्यात नाही ! शुभेच्छा दे म्हणून हेरंब नी आठवण करून दिली मात्र राहूनच गेले ! आज 1 जुलैला 7 वाढदिवस अन एक साखरपुडा अटेंड केला ! वाढदिवसांनी नाकात दम आणलेला ! सगळ्यांना 1 जुलैच मिळावा ...
    पु लं च्या भाषेत अर्धा महाराष्ट्र 1जूनला जन्माला आलाय ! सगळ्या शाळा मास्तरांनी 1जूनला अर्ध्या अधिक महाराष्ट्राला जन्माला घातलंय ... तसे 1 जुलैचे झाले नसेल ना ? आज खूप birthday होते हे मात्र खरे अन सुनीलमामा नी प्रूफच जोडलेले ! त्याला तर शुभ शुभ म्हणायलाच हवं . ..
         कारण ? तसं पाहिलं तर तो अधला मधलाच  आहे , जेष्ठ कनिष्ठ महत्वाचे !!  तर तो *एकमात्र* आहे .अन त्याच्यावर लिहिले नाही तर देशावर , राष्ट्राप्रती अन्याय्य होईल !
       आपल्या मध्ये एकमात्र *सैनिक* असलेल्या सुनील मामाला शी सा नमस्कार ! अन मनःपूर्वक शुभेच्छा . 
        एका सैनिकाची खंत मी वाचली होती ,सुनीलमामा सुद्धा त्याला अपवाद नव्हता .ऐन तारुण्यात घाम गाळत सीमा सांभाळत त्यालाही कष्ट उपसावे लागलेले .त्याला सलाम ! जय हिंद . मा अटलजी- मोदींजींच्या कार्य काळात सैनिकांना सन्मान मिळायला सुरवात झालीय आनंद आहे .
     कविता मा तरुण विजय यांनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये उदघृत केली होती त्याचे स्वैर भाषांतर नेट वर मायबोली वर  उपलब्ध आहे ते मी माजी सैनिक सत्कार प्रसंगी भाषणात ऐकवली होती ,  सोबत देतोय *प्रत्येकाने वाचावी* अन मग सगळ्या अमरावतीकर लहानग्यांनी माजी सैनिक सुनील पांडे यांना साष्टांग दंडवत घालावे . मोठ्यांनी मनापासून आशिष ......


*भारतमाते, मी तुझी अजूनही सेवा कां करतो?*(एका सैनिकाची खंत!)

तू आमच्याशी कशी खेळतेस ते कधी पाहिले आहेस?
सातव्या वर्षी मी ठरविले होते...
कीं मी तुझी शेवटपर्यंत सेवा करेन
तुझ्या सार्‍या सीमांचे रक्षण करेन
अन् आता मी मूर्खासारखा आहे हे दाखवितेस
सतरा वर्षांचा झालो आणि शाळेबाहेर पडलो
’मुलांना पुरूष’ बनविणार्‍या शाळेत गेलो
खडतर आयुष्य जगलो अनेक सुखांना मुकलो

तेंव्हां मी माझ्या मुलकी मित्रांना भेटायचो
कॉलेजकुमारांच्या सोनेरी दिवसात
ते छानछोकीत रहायचे, मजा करायचे आणि
मी उन्हात आणि धुक्यात घाम अन् रक्त गाळायचो,
पण मी कधीही "कां, कुठे आणि काय" विचारले नाहीं
वेळ आली कीं मरायला सिद्ध एवढेच मला माहीत होते
एकवीस झालो आणि मला कमीशन मिळाले
बँडच्या तालात आणि परेड करत
जमीनीवर, हवेत आणि समुद्रात रक्षण करायची
वेळ येताच अंतिम त्याग करायची शपथ घेतली

मी तिथे ऐटीत उभा होतो पण
त्यादिवशी धोक्याची घंटी ऐकायला नाहीं मिळाली.
कारण जेंव्हां मी प्राणर्पण करेन
तेंव्हां तूच म्हणशील, "त्यात काय मोठा तीर मारलास?"

खूप पूर्वी तू मला आरामशीर आयुष्याची खात्री दिली होतीस
मी आसपास नसताना माझ्या कुटुंबाची काळजी घेणार होतीस
तू येऊन आमच्या अडचणी पाहिल्या होत्यास
आणि मी तुला डायरीत लिहितानाही पाहिले
आशा होती कीं तुला माझी किंमत कळली असेल
आता मला कळले आहे कीं तुला कधीच दिसणार नाहींय्
कारण तुला आमचे दैदिप्यमान रूपच दिसते
तुला कधी मरण टपून बसलेले दिसले आहे?
तुला कधी हिमवृष्टीत पहारा करणारा दिसलाय्?
त्याने अद्याप न पाहिलेल्या त्याच्या अर्भकाचे नाव माहीत आहे?
विशाल समुद्रावर गस्त घालताना ज्याचे
वडील वारले त्या नौसैनिकाला तू भेटली आहेस?
तू जाणतेस कीं मी कधी आवाज चढवणार नाहीं
मी खडा राहीन आणि सगळीकडे तुझे रक्षण करेन
आणि तुझ्यासाठी मीच आहे उन्हातान्हात उभा!
आणि आता चोविसाव्या वर्षी मी नवा विचार करतोय्
माझ्या सात वर्षापूर्वीच्या जुन्या निर्णयांचा
मी दुसरे कुठले कार्यक्षेत्र निवडायला हवे होते?
माझ्या मुलाला मी सैन्यात घालेन?
त्याला सांगेन की सैन्यात सार्‍या गरजा भागतात?
या देशाची सेवा तू करशील आणि हा देश
तुला त्या (उच्च) योग्यतेनुसार सारे कांही देईल?
"भारत चमकतोय्" असे जगाला सांगितलेले मी ऐकले
मग मी जवानांना सांगितले की आपला देश महान होतोय्
य़ाच महान देशाचे आपण रक्षण करणार आहोत
पण माते हे सांग कीं कधीपर्यंत हे सोंग मी वठवू शकेन?
तू तुझ्या मनात येतील ती सारी आश्वासने देत रहा
पण तू तुझ्याच सैनिकांच्या आत्म्याशी प्रतारणा करतेस
आपले कांहीं यशस्वी नागरिक आमच्याबद्दल कसे
तुच्छतेने लिहितात आणि टर उडवतात ते ऐकलेस?
तू ये इथे आणि पहा मी काय करतोय् ते
ये इथे आणि मी काय-काय सोसतो आहे ते पहा
एक दिवस माझे आयुष्य तू जगून पहा
मग कदाचित् तुझ्या तोंडून कांहीं बरे बाहेर पडेल?


मी अजूनही माझे प्राण पणाला लावीन
कारण तुझा ध्वज दिमाखात फडकला पाहिजे
पण तरी आता मनात येतच रहाते.....
हे भारतमाते, मी तुझी सेवा अजून कां करतोय्?

Monday, July 1, 2019

लालाजी गुलमण्डी वाले

"गुलमण्डी ' मुळच्या औरंगाबादकरांना अतिशय कौतुक असलेले ठिकाण . गुलमंडी म्हणजे मूळ औरंगाबाद , बाकी विस्तारित औरंगाबादला कुणी विचारत नाही !
    कितीही मोठे मॉल येऊ देत गुलमंडी वर खरेदी केली नाही तर मराठवाड्यातील जनतेला  सण साजरा केल्यासारखा वाटत नसे किंबहूना आजही तसेच आहे !
       गुलमंडी पे पहचान है तो औरंगाबाद मे आप जाने जाते हो !
जिल्ह्याचे राजकारण , जिल्ह्याचे सगळे सण , कार्यक्रम गुलमंडी शहागंज वरच ! आणि त्याठिकाणी तुमची ओळखीचा कुणी जुना गुलमंडी वाला हो , अपनी वट चलाता हो तो सोने पे सुहागा तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही .  सब कामा घर बैठे बैठे हो जाते रे बाप ...
    अशा गुलमंडीवर अपना वट चलाने वाला , सब बेपारी से प्यार के रीशते मेंटेन करणे वाला कोई हो तो हमारा लालाजी !  सुपारी हनुमान के बाजूमें आप समस्या लेके जाओ तो हल निकलेगा ही निकलेगा !
        जेव्हा येथे आलो अन बेपारी झालो तो लालाजी से पहचान बनी .लाला alais सुनील जैस्वाल कुत्र्यांचे भारी मित्र अन आम्ही पेट शॉप वाले ! दोस्ताना चांगला झाला नंतर शेजारी राहायला आल्याने दोस्ती पली बढि .
            खास औरंगाबादकर लाला ,आम्हाला  शहराचे हृदय असलेल्या गुलमंडीवर आधार वाटतात . आम्हीही अधिकाराने तिकडचे कामं लालाजीना हक्काने सांगतो अन ते आनंदाने करतातही ! रंग खेळावा तो लालाजीसोबत गुलमंडीवर ! विसर्जन मिरवणुका तिकडेच मजा आणतात .
          असे आमचे परम मित्र तडक फडक लालाजी (जो भी बोलना है मूह पे बोलो,  पीठ पिछे कुछ नहीं चलेगा, खुल्ला आदमी !  मला भावतात ) आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत . लालाजी आप को खूब आयु मिले , खुशी कि आयु मिले, और आपकी आयु खुल्ली  किताब हो इसी शुभकामनाओ के साथ !   - मंगलमुर्ती शास्त्री 

Thursday, May 30, 2019

पितृदिन 10सेप्टेंबर आईव भाऊन्ना विनम्र अभिवादन

        पिठोरी अमावास्येला अमरावतीला होतो .यश अन चिनू (मावस भाऊ ) भावांच्या पाठीवर बहिणीनं (डो पूर्वा )काकडी फोडत भावासाठी इडा पीडा टळो अशी अर्चना केली .
     आज मातृदिन सुद्धा होताच . आईनं आम्हाला पोरकं करण्याला आता वीस वर्षे झाली . उण्यापुऱ्या54 वर्षाच्या तिच्या आयुष्यात 35 वर्ष तिनं आई म्हणून पोट्ट्यांना सर्विस दिली .पोरांना आईच्या सेवेची थोडीही  उतराई करायची संधी न देता अचानक निघून गेली .
             मातृदिन कधी साजरा केला नाही ,त्याबद्दल माहितीही नव्हती ! मात्र आजकालच्या "दिन ' प्रथेनुसार खरेच सगळ्यानी आपल्या आईला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक सेलेब्रशन करायला हवे . त्यानिमित्ताने कृतज्ञतेची जाणिव निर्माण होईल , नसेल तर ! आणि असलीच तर व्यक्त करायला संधी ! कधी कुणी दरवर्षी एकदा तरी  आई "मी तुझा आभारी'  आहे असे म्हटल्याचे ऐकिवात नाही , ते होईल !  आई म्हणजे मुलांनी  अधिकाराने राबवण्यासाठीच दिलेली , अन तीही अपत्यप्रेमाने राबत असते !

    असो आईने ती संधी आम्हा भावंडाना दिली नाही , जेव्हा होती तेव्हा हि अक्कल नव्हती ! एकशष्टी , 75रीची वेळ येऊच दिली नाही . तिला अभिवादन

      आज आपल्या साठी हा पितृदिन आहे स्व भाऊंनी 10 सप्टेंबरलाच  देह ठेवला होता !
            भाऊंनी आम्हाला काय दिले ? एक दृष्टी दिली समाजा कडे पाहण्याची !
        भाऊंना आठवताना मन खूप मागे यवतमाळला गेले . ते मणदेव देवस्थान , खरद तलाव ! मी दुसरीत असताना भाऊंनी खरद तलाव साईट वर सायकलवर नेले होते . पंधरा सतरा किमी वर सायकलने गेलो कोजागिरी साठी .लाल कोहळ्याच्या भाजी , ठेचा वगैरे जेवण . सायबाचा मुलगा म्हणून खुप भाव होता . तेव्हा सायेब सायकलवर पण भाव खूप !! आता मासिरडीज मधून आलेल्या सायबाचा भाव zero असतो . अर्थात मजुरांसोबत कोजागिरी भाऊच करू जाणे .

            भाऊंनी साईटवरच्या एका दलित मुलाला शिकायला यवतमाळला आणले होते तो MA पर्यंत शिकला चांगला अधिकारी झाला असे भाऊंचे मित्र  सांगत होते . रामदास खुरसुंगे त्याचे नाव !
     यवतमाळ सोडल्यावर सुध्दा त्याला भाऊ मदत पाठवायचे .
                 काही गोष्टी कृतीतुनही भाऊंनी उतरवल्या . सकाळी लवकर उठायचे अन आम्हलाही . जी काही थोडी फार शिस्त आमच्यात आली त्यामागे भाऊ कारणीभुत . जेवणाच्या ताटात अन्न टाकून देणं त्यांना जमत नव्हते . डोक्यावर केस वाढलेले आवडत नसे .
             खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र सगळा बेशिस्त कारभार ! प्रचंड आग्रह ! लहानपणीच्या गरिबीची देणगी असलेल्या स्वतः च्या संकोची वृत्तीचे ते परिणाम असावेत . "अहो भाऊ आता जमाना बदललाय , आता खाऊ नको म्हणून सांगायची वेळ आली आहे ...आग्रह कुठचा करता ?' आमचे वाद व्हायचे ! 'आजोबा आत्ता आंबे नक्को ' अशी शुभु कंटाळायाची .

आठवणी खूप आहेत प्रवरासंगम मंदिरासाठी मी एकदा देणगी मागितली एका उद्योजकाकडून . माझ्या मुळे त्याचं एक अडलेल काम मार्गी लागलं होतं . आमच्या मंदिराला कंपाऊंड द्या म्हटलं बांधून ! तर तुझ्या घामाच्या पैशांन काय करायचे ते कर .अशा मार्गानं मंदिर उभाविण्या पेक्षा नसलेलं बरं म्हणाले .
           एक अत्युच्च पापभिरुता अंगात भिणवली ! याला हिम्मत लागते नको म्हणायला ! त्याआधी  " माझा बाप डरपोक इंजिनिअर यार ,रिटायर होईस्तोवर एक घर बांधू नाही शकला !!दुसरा कुणी असता तर चार पोट्ट्याना चार बंगले दिले असते " या सहज मानसिकतेत वावरणारा पुन्हा लाईन सोडत नाही .त्यांचेच जोडे पायात घालतो आणि वाट धरतो , राजकारणात हिच हिम्मत येण्याची वाट बघत बघत !!
 *विनम्र अभिवादन आई भाऊना*
         

सुधाकाकांचे फकीर पण

फकीर जन्म


शिस्त शिस्त म्हणती सारे
शिस्तीत बेशिस्त जगलो रे
का ,कुठे, कशाशी ? ए शिस्त..
बिनधास्त जिंदगी जगलो रे

कुणी कुणाशी लढती का ते ?
स्वतः शीच लढलो रे
दैन्य दुःख  बालपणीचे ,
ओझ्यात जिंदगी गुंतली रे !


घाव करता कुणी  ते का?
याद का करावे
नियती रुद्ध असतांना ती
मी तरी का डरावे ?

भोळ बाबडा जीव हा तो
संकोचून जगला रे
माय बाप उणे असता
हक्क कुठे शोधु रे !

भीडस्त होत जगणे ते का ,
जिंदादिल व्हावे?
नेमस्त ते बिनधास्त केले ,
जिंदगीचे गाणे !

उष्ट्याचेच भय ना कधीही
ताटात सोडताना
बाद होत गेले सगळे
मीच बाद नाही ...

जे नको ते विसरतो मी,
आनंद वाटतो मी
येत घुस्सा , राग राग तो
आलाप विलाप बदलतो मी ।

खडबडीत या देहाला
"माणूस' म्हणती सारे
वृद्ध ,बाल मैत्र जपतो
मी आनंदी पक्षी रे ...

पर्रिकर श्रध्दांजली

"ते समोर चाललेले पर्रिकर साहेब आहेत बहुतेक ' ललित म्हणाला ...
"अरे ते देशाचे मंत्री आहेत , त्यांच्या मागेपुढेच पाच दहा गाड्या असतात ' इति आम्ही .
शास्त्रीजी खरंच ते भाई आहेत भाई , केंद्रीय मंत्री ! ' सोबतच्यानी ललीतची भलावण केली . आम्ही झट झट पावले उचलली , समोरच्या दोघांना क्रॉस केले पाहतो तो खरेच परिकर साहेब होते . पणजीच्या भाजप कार्यालयाच्या पायऱ्या एव्हाना भाईंनी चढलेल्या होत्या . .. साधा हाफ बाह्याचा यु कट शर्ट , पॅन्ट ,चष्मा गळ्यात लटकलेला . ..
          एक मंत्री इतका साधा असू शकतो अविश्वसनीय मात्र सत्य होते  .
       प्रधानमंत्री मोदींजींच्या सभेच्या वेळी आम्ही प्रेक्षकांमध्ये उभे होतो तोच थोड्या वेळात गलका ऐकू आला पाहतो तो थेट पर्रिकरजी जनतेत उभे . सगळ्यांच्या हातात हात घेत , सुरक्षा रक्षकांना दूर ठेवत , एकदम अलगद जनसामान्यांच्यात मिसळलेले भाई ! मी त्यांचे जवळ गेलो एक सेल्फी काढण्यासाठी  . तेही थांबले क्षणभर , सेल्फी मला काढता आला नाही ... गेला चान्स !
       सभा संपवून पणजी भाजप कार्यालयाकडे निघालो .रस्त्यात भाई कुणा कार्यकर्त्याबरोबर बोलत उभे होते , मला आवाज देऊन " आता मोकळेपणाने सेल्फी ट्राय करा म्हणाले ,मी पुन्हा प्रयत्न केला .सेल्फी घेणे जमले नाही, जसा फोटो आला तसाच सही मानून ,  परत मात्र त्यांचा जास्त  वेळ घेणे मला संयुक्तिक वाटले नाही .त्यांचे आभार मानून तेथून काढता पाय घेतला .... मनावर " आमच्या नेत्यांना भेटणे इतके सोप्पे आहे तर ' हि भावना कोरली गेली .अधिक जोमाने माझ्यातला  कार्यकर्ता कामाला लागला .
      फोंडयाच्या डॉ साठ्यांना भाई सकाळी पाच वाजता सफाई कर्मचाऱ्यांना निर्देश देतांना , स्कुटर वर फिरतांना दिसतात  आणि राजकारणापासून दुरी राखणाऱ्या साठ्यांना नंतर या विषयात कसा इंटरेस्ट तयार झाला हे ऐकले की आमच्या इकडच्या नगरसेवकांचा तिथे गोव्यात वर्क शॉप ठेवला पाहिजे असे वाटते  .  एक मुख्यमंत्री इतका ...
             वाळपोई मतदार संघात प्रभारी म्हणून जबाबदारी निभावताना भाईंचे सादगीचे अनेक किस्से ऐकायला मिळायचे .स्वतः आम्हा कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले वरचे किस्से आज त्यांच्या जाण्याने पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर उभे राहतात,  डोळ्यांच्या कडा ओल्या करतात .
          भाई तुम्ही गेलात , राजकारण्यांसाठी संस्कार मागे ठेवत निघून गेलात , राष्ट्र तुमचे हे ऋण कदापि विसरणार नाही .
       श्री गुरुजींनी दाखवलेला पथ आपण जीवनभर एक स्वयंसेवक या नात्याने  सांभाळला त्यामुळेच मग ...
         शत्रु को भी जीतता था आपका चारित्र्य उज्वल
         निन्दकोंपर मात करता आपका व्यवहार निर्मल
 ...... असे जीवन  आपण जगलात ! नुसते गोवाच नाही तर संपूर्ण देश "पोरकं होणं ' अनुभवतय .
               शत शत नमन  - मंगलमुर्ती शास्त्री औरंगाबाद .


         
            

नरेंद्र मोदी प्रचार

महाराष्ट्रात 48 लोकसभा सीट साठी उमेदवारांची घोषणा झाली आहे, आणि ते खालीलप्रमाणे आहेत.......

१ नागपुर - नरेन्द्र मोदी
२ रामटेक - नरेन्द्र मोदी
३ वर्धा - नरेन्द्र मोदी
४ भंडारा-गोंदिया - नरेन्द्र मोदी
५ गडचिरोली-चिमुर - नरेन्द्र मोदी
६ यवतमाळ-वाशिम - नरेन्द्र मोदी
७ चंद्रपुर - नरेन्द्र मोदी
८ आकोला - नरेन्द्र मोदी
९ आमरावती - नरेन्द्र मोदी
१० बुलढाणा - नरेन्द्र मोदी
११ हिंगोली - नरेन्द्र मोदी
१२ नांदेड - नरेन्द्र मोदी
१३ परभणी - नरेन्द्र मोदी
१४ बिड - नरेन्द्र मोदी
१५ लातूर - नरेन्द्र मोदी
१६ उस्मानाबाद - नरेन्द्र मोदी
१७ सोलापुर - नरेन्द्र मोदी
१८ माढा - नरेन्द्र मोदी
१९ सांगली - नरेन्द्र मोदी
२० हातकणंगले - नरेन्द्र मोदी
२१ कोल्हापूर - नरेन्द्र मोदी
२२ रत्नागिरी - नरेन्द्र मोदी
२३ रायगढ - नरेन्द्र मोदी
२४ सातारा - नरेन्द्र मोदी
२५ अहमदनगर - नरेन्द्र मोदी
२६ बारामती - नरेन्द्र मोदी
२७ पुणे - नरेन्द्र मोदी
२८ औरंगाबाद - नरेन्द्र मोदी
२९ जालना - नरेन्द्र मोदी
३० जळगाव - नरेन्द्र मोदी
३१ रावेर - नरेन्द्र मोदी
३२ धुळे - नरेन्द्र मोदी
३३ नंदुरबार - नरेन्द्र मोदी
३४ दिंडोरी - नरेन्द्र मोदी
३५ नाशिक - नरेन्द्र मोदी
३६ पालघर - नरेन्द्र मोदी
३७ भिवंडी - नरेन्द्र मोदी
३८ कल्याण - नरेन्द्र मोदी
३९ ठाणे - नरेन्द्र मोदी
४० उत्तर मुंबई - नरेन्द्र मोदी
४१ वायव्य मुंबई - नरेन्द्र मोदी
४२ इशान्य मुंबई - नरेन्द्र मोदी
४३ उत्तरमध्य मुंबई - नरेन्द्र मोदी
४४ दक्षिणमध्य मुंबई - नरेन्द्र मोदी
४५ दक्षिण मुंबई - नरेन्द्र मोदी
४६ मावळ - नरेन्द्र मोदी
४७ शिरूर - नरेन्द्र मोदी
४८ शिर्डी - नरेन्द्र मोदी

लक्षात घ्या आपल्याला केवळ खासदार नाही तर देशाची सुरक्षा आणि प्रगतीसाठी पंतप्रधान निवडायचा आहे.

आणि मोदींजींच्या शिवाय देशात पंतप्रधान होण्यास लायक असा कोणता दुसरा उमेदवार पण नाही, तेंव्हा तुमच्या मतदारसंघात कोण उभा आहे, त्याने गेल्या 5 वर्षात काय कामे केली याचा विचार न करता मोदीजी यांनी गेल्या 5 वर्षात देशासाठी जे भरीव काम केले आहे त्याचा विचार करता भाजप प्रणित एनडीए च्या उमेदवाराला डोळे झाकून मतदान करा, कारण तुम्ही दिलेल्या मतामुळेच मोदीजी पुन्हा पंतप्रधान बनणार आहेत.
कारण देशाच्या 543 लोकसभा सीट वर कोणत्याही विरोधी पक्षाचा उमेदवार लढणार असला तरी प्रत्येक सीट वर मोदीजी लढत आहेत

हे फक्त मोदीजीच आहेत ज्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षांनी आपल्या देशाचे नाव जगात उंच केले आहे

पाकिस्तान ला त्यांच्या घरात घुसून मारले आहे

आतंकवादी जम्मू काश्मीर वगळता देशात कुठे पाय पसरू शकले नाहीत, बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना सीमेच्या पलीकडेच थांबवले आहे

ज्यांनी सेनेला पूर्णपणे मोकळीक देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे

म्हणून.....
या वेळी पण फक्त मोदीच
नमो नमो
हर हर मोदी घर घर मोदी
धन्यवाद!

गुढी पाडवा शोभायात्रा पोम्प्लेट

                ।।श्री ।।
नववर्ष (गुढीपाडवा) शुभेच्छा
           भव्य शोभायात्रा
युगाब्द 5121, शालिवाहन शके 1941 नवीन संवात्सराचा प्रारंभ म्हणजे वर्ष प्रतिपदा -गुढीपाडवा !
नववर्ष स्वागताच्या शोभायात्रेत सामिल व्हा , अनेकांना  सामिल करा .
संकल्प करू या .....भारताच्या पुनरुत्थानाचा ...
हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार युगाब्द 5121 तथा शालिवाहन शके 1940 विकारी नाम संवात्सराचा प्रारंभ म्हणजे
 वर्षप्रतिपदा ,गुढीपाडवा . या चैत्र शुध्द प्रतिपदेचे स्वागत करण्यासाठी आयोजित शोभायात्रेत जल्लोषात सामील होऊन आपल्या अभिमानास्पद परंपरांना उजाळा देऊ या !शोभायात्रा जयभवानीनगर ते गजानन महाराज मंदिर चौक ते गारखेडा ग्रामदैवत श्री मारुती मंदिर येथे विसर्जित होईल .
       सदर कार्यक्रमास आपण मंगल  वेशात (पुरुष :पांढरा कुर्ता पायजामा /शक्य असल्यास धोती सदरा) महिलांसाठी नववार साडी अथवा गोल साडी , मुलींसाठी उत्सवास साजेसा ड्रेस , पदयात्रेत सामिल व्हावे . मार्गात रांगोळी काढून ,पताका लावून , गुढी उभारून उत्साही वातावरण तयार करणे .आपापल्या नगराच्या वतीने एखादा देखावा सादर करणे . भजनी मंडळांनी टाळ मृदुगांसह सामिल व्हावे,ढोल ताशे वाजवून आनंद व्यक्त करावा . बैलगाडी सजवूनही आपण शोभायात्रेत सामिल होऊ शकता . शोभायात्रा सर्व समावेशक व्हावी या साठी प्रयत्न करणे .जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणे .

* ठिकाण *                  *दिनांक*                      वेळ
जयभवानीनगर चौक      राष्ट्रीय सौर 16 चैत्र    सायं 4 ते रात्री 9
शिवाजी पुतळ्या जवळ   शनिवार दि 6 एप्रिल       पर्यंत

                                *   भवदिय  *
श्री विलासराव देशमुख
स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र
मराठवाडा विभागप्रमुख (दिंडोरी प्रणित )
 श्री मंगलमुर्ती शास्त्री  श्री उमाकांत रत्नपारखी श्री मनोज राठोड
नंदीग्राम सेवा समिती         बालकृष्णनगर            न्यायनगर
9422206749             9422711281       7798963610

श्री निलेश सुराशे            श्री सुनील डहाळे      श्री संजय बोराडे
स्वामी समर्थ केंद्र            श्री अण्णा जाधव     विश्वकर्मा संघटना
9423386677              स्वामी समर्थ केंद्र    




स्मृति दिन अर्थात स्मृतिचा वाढदिवस

कानातले केले प्रचितीनी !
दुसऱ्या दिवशी आईनी कानात घातले ते
तुटले ..इति सिद्धू
आज कप बशा विसळल्या प्रचितीनी ,
आज चहा पण केला .
आज सिद्धू रडला नाही ,
आज सिद्धू चिडला नाही !
त्यानं किरकिर केली नाही
ग्रीटिंग कार्ड सिद्धूनी केलं ,

सगळ्यात महत्वाचे सिद्धूच्या बाबांनी
वय न विचारता
फोन करून शुभेच्छा दिल्या !
19 वर्षा नंतर
पहिल्यांदाच शुभेच्छा दिल्या न संकोचता फोनवर !!
56 इंचकी छाती लगती बॉस शुभेच्छा देनेको !!!
स्मृतीला धन्य झाले
वाढदिवस साजरा झाला
"अस्मादिक असे वागता तर त्यांच्या "सौ 'नी त्यांचाच
केक केला असता ' असे सहज वाटून गेलं

आज सिद्धू केक बनवणार होता ...
स्वरूपानी सकाळी एक तास सेल फोन जेठाणी वर खर्च केला !
संध्याकाळी तिचा संताप झाला
स्मृतिनी वाढदिवस असल्याचं सकाळी  सांगितलेच नाही !!!
प्रशांतभौजिनी  रविवारी "वहिनी'कडेच
त्यांच्या वाढदिवसानिमित्त
गेट टूगेदर ठेवणार असं प्लॅन केलं !!!!!
पल्लवीआत्याने  फोनवर येथेच्छ बोअर करत शुभेच्छा दिल्या ..
मिनलकाकूं, अगस्ती काकांनी मिसळपाव येथेच्छ झोडलं
राहुलमामानी न बोलता बुके प्रदान केला
त्याच बुकेवर अगस्तीकाकांनी फोटो काढला


आणि

.
.
.
आज स्मृतीचा वाढ दिवस
अगस्तीभाऊजी सगळ्यांनाच
 काहीबाही लिहून शुभ शुभ म्हणतात !
मी त्यांच इतकं करते
नवनवीन पदार्थ खाऊ घालते
खमंग चिवडा कोथिंबीर टाकून वगैरे अन
माझ्याच वाढदिवसाला  काही का नाही ?
असं स्मृतीला वाटू नये म्हणून खरडले !!
तिला मन:पुर्वक शुभेच्छा !
तिचं वय विचारण्याची हिम्मत झाली नाही ..













अशोक दामले

"हाडाचा कार्यकर्ता ' तुम्हाला पाहायचाय ?
पुंडलीकनगर वार्डात हनुमाननगर  गल्ली नंबर 2 गाठा  .एखादं बारक पोरगही तुम्हाला पटकन गणपती निवास मध्ये घेऊन जाईल .पायऱ्या चढून वर जा आपलं काम सांगा मदतीला सदैव तयार असणारं व्यक्तित्व भेटेल अशोक दामले नावाचं !
जनतेच्या कामासाठी जीव तोडून काम करणे कसे असते ते या जयहरी "अशोक दामले' कडून शिकावं .
कामाचा धडाका असा का मोठे मोठे अधिकारी "नको रे बाबा म्हणत कार्यरत होतात .
कुणाचं राशन  कार्ड, तर कुणाचं आधार कार्ड ,कुणाला दवाखान्यासाठी सहाय्यता निधी .निराधार पेन्शन मिळवून देण्यासाठी तर बाबा आपल्याच सरकारला धारेवर धरायला मागेपुढे पहात नाही !
गारखेडा मंडळात सरचिटणीस पद सुद्धा किती कामाचे होऊ शकते , अख्या शहरात बोलबाला !
आपलं म्हणणं कसं बरोबर हे धाड धाड पटवून देणारे अशोक दामले "मग माझं तोंड खराब दिसतं तुम्हाला ' म्हणत समोरच्याला चूप करतात अन काम तडीस नेतात ..
हनुमान चौकातील त्यांनी  घेतलेल्या कार्यक्रमांचे सातत्य  त्यांना  पंचक्रोशीत नाव लौकिक मिळवून देतात.
सद्गुरू ह भ प कडूभाऊ  काटे महाराजांचे परमशिष्य सद्गुण संपन्न अशोक दामले यांना दीर्घ निरामय आयुष्यासाठी  खूप खूप शुभेच्छा !




सुहासकाकू

घरी सुखवस्तु  राहणीमान , बंगला नोकर चाकर अशी  संपन्नता असतांना  फाटक्या ,गळक्या भाड्याच्या कौलारु घरात  तात्यांमध्ये  प्रेम शोधणारी  तेही अशा काळी जेव्हा  प्रेम करणे ताज्य किंवा  वर्ज्य समजल्या जाणाऱ्या अशा काळी ....
     त्यातही असं खटलं जिथे कुजकट अन किचकट मंडळींची लांबलचक फौजच ! एक भावोजी अन चार चार दीर , नंदा (बहुदा) जिकडेतिकडे गेलेल्या म्हणून बरं .... एकेकाला झेलताना किती नाकात दम येत असेल . ... किती आयुष्य खरं खोटं करण्यात गेलं असेल ?
     आज सहस्त्रचंद्रदर्शनाला सुहासिनी शास्त्रीबद्दल लिहितांना असंच काहीसं मनात येतं ! काळ हा मागील शतकातील पाचव्या दशकातला म्हणून लिहितो . आज असं काही नंदा दिरांना सांभाळावे लागत नाही ! त्यामुळे त्यांच्यात कटकटी होत नाहीत .कुणी महिला आज सहनही करत नाही .
         तात्या सुहासकाकूनी प्रेम केलं अन काकूंनी इकडे प्रेम वाटलं ! संस्कार वाटले ,जाणिवा वाटल्या .  मागे मी रसिकाला पत्र लिहिले होते नमस्कार का करावा म्हणून त्याचे प्रेरणा स्थान काकुच होती . मुलाला (दत्ताला) सामाजिक कार्यात , संघ कार्यात प्रतिबद्ध करताना काकूंचा वाटा जास्त म्हणावा .
       
     
   

           

डॉ राजेन्द्र फड़के (राजुदादा)

                      घरी लहानपणा पासुन जनसंघाचे वातावरण , वडील स्व  अशोक फडके  इंजिनिअर असुनहि  हाडाचे शेतकरी !! डॉक्टर राजेंद्र फडके 1983 ला शिक्षण अन इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षण थांबवून प्रॅक्टिस सुरू करावी लागली कारण घरी अशुबाबांचे अकस्मात निधन झाले .घरातील वडील मुलगा म्हणून घर सांभाळणे क्रमप्राप्तच होते .
             1992 मध्ये दादांनी पुन्हा राजकारणात जाणे तेही पूर्ण कालिक कार्यकर्ता  म्हणजे (आई) उषाकाकूंसाठी किती क्लेषकारक असेल  कारण अशुबाबांनी (डॉक्टरांचे पिताश्री ) राजकारणात ऊंची तर गाठली होती , लोकप्रियता तर मिळवली होती मात्र निवडणुका बाबांनी लढवने तेही जनसंघ/भाजपाकडून म्हणजे घरचे खाऊन ....असा कार्यक्रम होता,  आर्थिक दृष्टया कष्टप्रद ऊंची हि आपोआप मिळालेली होती .काकुंनी नवरयाला आधीच झेललेलं , अन आता मुलगाही त्याच वळणावर जाणार !

            डॉक्टरांच्या आईचे ठीकच समजू तर भारती वाहिनीची काय कथा ! त्यांनी आधीच डिफेंस अकॉउंट  मधली चांगली स्टेटसची नोकरी सोडून वड़ोदया सारख्या रिमोट दुर्गम  खेड़यात प्रेमाखातर कारभारिन/कास्तकारीन व्हायच मान्य केल ! कदाचित, एव्हाना त्या सुपर क्लास वन अधिकारी म्हणुन मिरवत्या झाल्या असत्या !! 92 मध्ये प्रमोदजींनी  डॉक्टरांना बाहेर काढले . ... कायम  विरोधी पक्ष म्हणुन हिनवल्या जाणाऱ्या भाजपा साठी ! खा खस्ता आणखी काय ? बाबांचेच  निष्कांचन पर्वच पुन्हा सुरु  ! ! वाहिनी साहेब तुम्हीहि ग्रेटच !!

           सुरवातीला जळगाव लोकसभेची निवडणूक  जबाबदारी, नंतर जळगांव जिल्हा संघटन मंत्री मग उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री, महाराष्ट्र राज्य सहसंघटन मंत्री  म्हणून जबाबदरया पेलल्या आणि  प्रधानमंत्री मोदीजी शासनकर्ते झाल्यावर 5 जुन 15ला त्यांचा आवडता प्रकल्प "बेटी बचाव बेटी पढाव' राष्ट्रीय संयोजक म्हणुन भारत भर भ्रमन्ती सुरु !

            वरील जबाबदरया घेताना संघटन संघटन आणि संघटन याशिवाय काही मिळणार आहे काय ? अपेक्षाही नाही ! फक्त संघटन बढ़े चलो ,सुपंथ पर बढ़े चलो ...निस्पृह निष्काम  कर्मयोग !

     असु अम्ही सुखाने पत्थर पायातील
       मंदिर उभविने हेच आमुचे शील !

         " राष्ट्रासाठी काहीही ' हि विचारधारा बाळगत जगणारी ही मंडळी क्रित्येक कार्यकर्त्यांना घडवत असते . मोदींजींच्या रूपाने मंदिर आपण उभे केलेत . मोदींजींच्या अत्यंत विश्वासातला कार्यकर्ता म्हणुन हि आपणच उभे राहिलात !
            दादा आपण मोदीजींसाठी आतापर्यंत गुजरात , राजस्थान, गोवा,कर्नाटक , मध्य प्रदेश आणि आता दिल्ली येथे निवडणुक प्रभारी म्हणुन यशस्वी कारकीर्द निभवलीत .

       जय गुरुदेव दादा ! तुम्हाला साठीचे म्हणतांना जीभ कचकन चावल्या गेली बघा !! पण एक्सेप्ट करावेच लागते ,अन आता एकसष्टिची तयारी सुद्धा .....आज वाढदिवशी तुम्हाला उदंड, निरामय, सुखदायी,  आयुष्य चिन्तितांना खुप मोठ्ठया जबाबदाऱ्या मिळो हि प्रार्थना .

 - मंगलमुर्ती शास्त्री 15 में 2019





संदीप जोशी

आज नागपूरला 45 डिग्री मध्ये जाऊन आलो . लाही लाही होणे ते काय हे अजमावून आलो .
      मित्रवर्य सुरेंद्र सोबत होते . आणी मनात आनंद होता . आपला एक नातेवाईक नेत्याच्या भूमिकेत पाहताना खरेच खूप आनंद झाला .
          मी संदीप जोशींचा दरबार पाहून आलो . शे पन्नास लोकं आपल्या समस्या घेऊन आलेली आणी संदीप त्या हसत मुखाने, आदरा तिथ्याने सोडवताना प्रत्यक्ष अनुभवले !
       आम्हीही काही वैयक्तिक कामानिमित्त गेलो होतो . आम्ही आतल्या रूम मध्ये गेलो . तिथे योगेश भेटला . म्हणाला दादाच काही खरं नाही आता अकरा बारा कितीही वाजतील !
        आम्हाला संदीपचा तो दरबार पाहूनच इतका आनंद झाला होता का तो तसाच राहू देत कितीही वाजेपर्यंत ! आम्ही थांबुत ही भावना होती ,  नेता त्यातूनच तर पॉप्युल्यारिटी मिळवत असतो .
          संदीप मोठा आहेच पण आज प्रत्यक्ष अनुभवला . मुख्य म्हणजे वेळ लागेल यायला याची कल्पना द्यायला त्याचा मनुष्य येऊन गेला . त्यांच्या मोठेपणाचा अभिमान वाटला .
            सगळ्यात महत्वाचे म्हणजे विधानसभेच टिकिट मिळावे ,  आपण नक्की वेळ काढू महिनाभर अन प्रचाराला जाऊ असे मनोमन आम्ही दोघानी ठरवले .
             अंजुमामी तुमचा हा तुमचा प्रसन्न चेहरयाचा भाऊ फार मोठी ऊंची गाठनार है नक्की ! आपला माणुस मोठ्ठया पदावर पाहण्यासाठी आसुसलेला ....
                                                         - अगस्ती 

खैरेच

" अहो सगळया शहरात तणाव आहे , इकडे सगळी दुकानं बंद झालीत पटापट , तिकडे खडकेश्वरला ?  तुम्ही पण शटर डाउन करा ' सौ चा फोन पलीकडून होता ,काळजी या
आवाजावरून दिसतच होती .
            दुकानाबाहेर आलो तो अख्ख कॉम्प्लेक्स जमा झालेलं . कुणी म्हणे अरे राजाबाजारमध्ये धींगाणा सुरु आहे तो कुणी म्हणे पुण्डलिक नगर रोडला दुकान फोडले ...सगळे दहशतीत !
       शिवनाथनी 100 नम्बरवर खुप ट्राय केला संपर्क करण्याचा ,  व्यर्थ प्रयत्न ! सगळे व्यापारी चिंतेत कुणाला काही सूचत नव्हते ,आपापल्या नेत्यांना सपंर्क करण्याच्या प्रयत्नात तर  मी डायरेक्ट 9422202525 फिरवला .अनोळखी फोन कॉल पलिकडून उचलला गेला .
       "साहेब खड़केश्वर हुन शास्त्री बोलतोय साहेब इकडे सगळे परेशान आहेत साहेब ''
    " शास्त्रीजी मी गुलमण्डी वरच आहे कुठेही काही गड़बड़ नाही काळजी करायचे कारण नाही तिथेच थांबा मी येतोच  '
    दोनच मिनिटात  गाडीतुन खैरे साहेब उतरले .मी सम्पूर्ण शहरात फिरून आलोय , तुरळक घटना घडल्या मात्र सगळे शांत आहे , आम्ही काही हातात बांगड़या नाही घातल्यात , शटर बिनधास्त वर करा  '   अन गाड़ी नागरिकांना विश्वास देण्यासाठी पुढे रवाना झाली .1990 च्या दशकात अशा सतत दंगलीच्या दहशतीत जगलेलो , 1996 साली तर सकाळी 7 वाजता दुकान उघडले न उघडले तोच आतून शटर ओढुन आत पूर्ण दिवस उपशिपोटी जीव मुठित ठेवून काढलेला !!!

       आज एवढं सगळे आठवण्याचे कारण खैरे साठी मत मागायाला जावं तर लोकं वाहयात बड़बड़ करत होते ! आणि आता तीच मंडळी  हळहळताहेत . फक्त साडेचार हजारांनी हो ! ! आमच्या लाडक्या प्रधानमंत्री मोदीजींच्या प्रतिनिधिला या हलकटांनी पाडले ! अख्खा देश सेलेब्रेशन करत असताना संभजिनगरकरानी माती खाल्ली .

    आणि हो खुप शिकेल प्रतिनिधि तुम्ही दिला ना  या लोकसभेला , विकासाचे राहु दया ते हिरवे फूत्कार जे व्हाट्सएप्प वर फिराताहैत ना ते बंद कर म्हणा ! आणि ते कौम कौम चाललय ना  त्या कौमातून बाहेर आला तरच शिकेल समजू आम्ही !! मागील पाच वर्षात "मध्य' चा विकास करायचाच  राहून गेलाय तो आता जिल्ह्याच्या विकासासोबत तेवढा करून दया म्हणजे झालं (आम्ही जिल्हाच तुमच्या ताब्यात दिलाय ...)

          खैरे साहेबांची आवशक्ता संभाजीनगरला आहेच ! त्यांना सेनेने राज्यसभेवर का होईना पाठवावेच अन मंत्रिपद सुद्धा ! खैरे होते म्हणुन टफ़ दिली नसता जाती साठी माती खाण्याच्या या युगात हिन्दुत्वाला रेस मध्ये  खैरेच ठेवू शकले हे हि तितकेच खरे आहे !!
                                          - मंगलमुर्ती शास्त्री
         
        
         
      

अर्थव्यवस्थेचे मारक डॉ सुधाकर शास्त्री


डॉ सुधाकर शास्त्री : देशाच्या अर्थ व्यवस्थेचे मारक


संजय ठक्कर युरो एक्सिम बँकेच्या CEO नी अर्थशास्त्राच्या दुश्मन कोण या विषयी विचार करायला लावणारे संशोधन जगा समोर ठेवले . ....  देशाच्या अर्थ व्यवस्थेसाठी आपदा ठरणाऱ्या या लोकांबद्दल खरच विचार करावा लागेल .... कोण आहेत हि माणसं ?



१) सायकलीस्ट : जसे की डॉ सुधाकर शास्त्री

- त्यांनी कधी कार विकत घेतली नाही  त्यामुळे कधी कार साथीचे कर्ज !

- त्यांनी कधी  car insurance काढला नाही !

- कधी पेट्रोल डिझेलवर खर्च केला नाही !

- त्यांना कधी कार सर्व्हिसिंग लागली नाही का कार दुरुस्ती करावी लागली !!!!

- त्यांना कधी पार्किंग द्यावी लागली नाही

- सुधाकाकांचे  कधी पोट सुटले नाही

- आणी हो , हे हि खरच आहे ! तंदुरुस्त लोकं देशाच्या अर्थ व्यवस्थे साठी घातक ठरतात !!देशाच्या अर्थ व्यवस्थे साठी तंदुरुस्त लोकं काय कामाचे !! ते कधी औषधी घेत नाहीत का हॉस्पिटलमध्ये जात नाहीत , डॉक्टरांच्या फीस देत नाहीत !!

- देशाच्या GDP मध्ये डॉ सुधाकर शास्त्रींचे  काहीही कॉन्ट्रीबुशन नसते !!! विचारा यांच्या नातवांना ...

- या सुधाकर शास्त्रींनी किती लोकांचे जॉब गिळले बघा !!


  याच्या उलट प्रत्येक नवीन मॅक डोनाल्ड आउटलेट मुले किमान 30 जॉबची निर्मिती होते - 10 कारडीओलॉजिस्ट (हृदयविकार तज्ञ) 10 डेंटिस्ट , 10 वेट लॉस एक्स्पर्टस . या व्यतिरिक्त मॅक डोनाल्ड चा स्टाफ

आता सांगा काय निवडण्यात हशील आहे

एक सायकलिस्ट सुधाकाका (अर्थव्यवस्थेचे मारक ) का मॅक डोनाल्ड !

तेव्हा तुम्ही देश भक्त असाल तर सुधाकर शास्त्रींनी वाचवलेले पैसे घ्या अन देशाची अर्थ व्यवस्था सुधरवा .... जा डोमिनोज, मॅक डोनाल्ड, अगदीच नाही तर कोल्हापुरी तडका किंवा गोली वडापाव !! 


     

विचार करण्या जोगे आहे की नाही . 🤔🤔😀😀

(औरंगाबाद परभणी ट्रैन मधून निवांत लेखन ) 

Thursday, May 9, 2019

रवि दीक्षित प्रमोशन

श्री दिक्षित यांनी मागील आठवड्यात 34 वर्ष पूर्ण झाल्याची पोस्ट टाकली होती नी काल रवी दिक्षित AGM झाल्याची पोस्ट आली  . दोघांचेही खुप खुप अभिनंदन !
       दोघांनी स्टेट बैंक ऑफ हैदराबाद त्या वेळी जॉइन केली होती . पुण्य नगरीतून थेट अम्बड़ ,लासुर सारख्या कोरडया, शुष्क जागी आनंदाने जॉब स्वीकारते झाले . आणि बैंकेला समर्पित झाले . ऑफिस मध्ये दोन चार दिवस मुक्कामी राहणारा बैंकर रवि ..आज या मुक्कामी पोहोचला!!! याचा आंनद त्यांच्या बँकेतील मित्रांना अधिक असेल . रवि दिक्षित म्हणजे बैंकेसाठीचा वेडा माणुस अस त्यांचे औरंगाबादकर मित्र म्हणतात .अन त्यात चूक नाही. आमच्या छोटी नी है वेडेपण भोगलय आनंदाने !
      या दोघांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे .SBH चे SBI मध्ये विलीनीकरण झाल्यावर बहुतांश SBH कर्मचारी  निवृत्ती मार्गाला गेले VRS घेते झाले  , मात्र (श्री + रवि )कांत दिक्षित SBI मध्येही स्वत:ला फिट करवते झाले .
      रवींचा बैंक कंप्यूटर प्रोग्रामिंग क्षेत्रातील, त्यांच्या समर्पित कामाबद्दल मागे राष्ट्रीय स्तरावर गौरव झालेला .
ज्या ठिकाणी त्यांना बँकेने पाठवले त्या त्या जबाबदरयांना त्यांनी न्याय दिला . मागे अठरा वर्षपूर्वी  ग्रामीण भागात अडुळ ला पोस्टिंग असताना त्यांनी काही तासात कर्ज मिळू शकते हे अडुळकरांना दाखवून दिले होते .आज कंप्यूटर युगात हे शक्य आहे, त्याकाळी कठिन होते .
       एकूणच दीक्षित परिवारामध्ये एक उद्योजक लपलेला आहे. अन त्याचा फायदा यांच्या बैंक ग्राहकाना मिळाला नसता तर नवल .ज्या ज्या ठिकाणी यांची पोस्टिंग झाली तेथील उद्योजक व्यापारी खुश .
        "एक उद्योजक लपलेला 'अस मी का म्हणू शकतो .. बैंकेची स्टेटस वाली नोकरी असताना सुद्धा यांनी आपापल्या " सौ 'ना स्क्रीन प्रिंटिंग असेल, ब्यूटी पार्लर असेल, कार्यरत केलेले मी पहिले !
      रवीकांत दिक्षित आज आज AGM झाले आम्ही आनंदलो . कामधेनु पशुऔषधालय,आज अक्षय तृतीयेला 24व्या वर्षपुर्ती करत आहे,   आधी स्थानिक देवगिरी बैंकेकड़े होती ,  रविंमुळे SBH मध्ये गेलो .आणि जी काही भरभराट कामधेनु नी केली त्याला SBH साक्षीदार राहिली . श्री दीक्षित ,रवि दीक्षितांच्या नुसत्या नामस्मरणाने काम फत्ते होत असे,  बँक स्टाफला मी कामाला लावत असे !!! अर्थात सगळी बँक माझी मित्र झाली होती रविमुळेच  ..... उद्या आमचे  मित्रवर्य,  वडील बंधु संगारेड्डीकर रागवतील, त्यानीही तितकेच प्रेम दिले  !
        या दीक्षित परिवारतील सर्व कांत (श्यामकांत पासून निशिकांत पर्यन्त ) लळा लावणारे  आहेत . यांच्यात कुणीही सिंघम मधला  जयकांत शिकरे  नाही...  सर्वाना या निमित्ते नमस्कार !
     पुन्हा एकदा रविकांत दीक्षित यांचे अनेकानेक अभिनंदन  आणि छोटी चेही कारण घर तिनीच सम्भाळलेले....
            - सौ  मिनल , अगस्ती

Wednesday, May 1, 2019

पुण्य स्मरण आईचे

"" माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी! खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो ! खरेच ती जगाची बयो होती; आई होती. माहेरची गडीमाणसे कांडपिणी, पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला 'बयो' म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ! ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे ! ''

                साने गुरुजींच्या श्यामची आई चे वर्णन ...

या बयोच्या जागी ' बेबी " टाकलं तर खोलापूरकरांच्या ताईचही असेच वर्णन करता येईल .
           ताई अलाईस आईचा आज स्मृतीदिन 1 मे . सकाळी उठल्यावर मावश्याना फोन करने आठवणी जागवने हा माझा नित्यपाठ 1में ला राहिला आहे . आज अनायसे मी मावश्या मामा सोबत राहील .
             स्व सुलभा शास्त्री ,माझी आई , माहेरी ताई होती .अन तीनी ताई पण खरच गाजवले तसेच निभावलेही ! अण्णा तिच्याप्रमाने चालायचे,  बंडूशी तिचं गुफ्तगू चालायचे,नंदू ,चंदू , सूंट्या,अनटया अन मायटा तिचं एकायचे . शिला तर जवळच होती अलकट सर्वांचीच लाडाची ,  सगळ्या भावण्डाची ती काळजी करायची अन म्हणून माहेरच्यांच काळीज होती .
         सासरसुद्धा तिनं छान जपले होते , बोरगांव मंजुची प्रभाकडची दिवाळी आजही काका लोकं आठवण काढतात त्यामागे कष्ट सुलभाचेच होते . सगळे सण , वार कुल कुलाचार निर्विघ्न पार पड़त असत ते आई मुळेच . तात्या दादाचं या लहान्या  भावजयी कड़े विशेष प्रेम होतं . तिचं लग्न जमवण्यात तात्यांनी मोठी भूमिका निभावलेली असल्याने अन सुहासताईनी तिच्या लग्नची अलीकडची वर्ष सुखदायी केलेली असल्याने असेल कदाचित , तिला जास्त लळा होता ...
 
     आई हे ऐश्वर्य घरात माझ्या वाटयाला जास्त आलेलं .शिक्षणा साठी बाकी दोघ भाऊ लवकर बाहेर पडल्यामुळे , आणि नन्तर नोकरीनिमित्त बाहेर, त्यामुळे आई भाऊ (वडील) माझ्या वाटयाला अधिक !
      आईची चेहरापट्टी घेतल्याने आईचा मुलगा अगस्तीच होता .सासु म्हणून आई कशी होती ...अरे  पिच्चरला घेवून जा , फिरायला घेवून जा , असं मुलाला सांगणारी त्या काळातली वेगळी सासु  होती ती,  प्रगल्भ सासु  होती .
            आईच्या नन्तर  भाऊंनी घरातील दोन्ही जेष्ठश्रेष्ठ भूमिका निभावल्या . मुद्दाम उल्लेखतो याच भूमिका आईभाऊंच्या पश्चात जिजाजी संजयराव निभावतात .भाऊ गेल्यावर तर संजयरावांनी घरातील " जावई  ' पणाची कात टाकून दिली अन घरच्या जबाबदरया शिरोधार्य मानल्या,त्यांचे " सासर ' त्यांनीच संपवले ... आई साठी तर "जावई माझा भला' च होता .
        अर्थात त्यांनी जावईपण कधीच गाजवले नाही .स्व अण्णा आजोबा मला मरेपर्यन्त जावईपण गाजवणाऱ्याच्या कथा ऐकवायचे . थैंक्स गॉड आम्ही नशिबवान !
         छोटी छकुली आजी  शिवाय राहत नव्हती .नातीची शेवटच्या क्षणा पर्यन्त काळजी तिला .

       तर अशा आईचा कधी कधी खुप संताप येतो ,  का लवकर गेली ? अजुन काही वर्ष आम्हाला देती ! पंचावन्न है काय जाण्याचे वय होते . 1998चा 1 में काळ ठरवला आमच्यासाठी !

         खोलापुरकरांची बेबी / ताई अर्थात साने गुरुजींच्या भाषेत " आवडी ' देवालाही लवकर आवडली आमच्यापेक्षा, आमच प्रेम कमी पडलं  ! चल तुझ्या प्रतिमेलाच शिर साष्टांग नमस्कार !

                 - हेरंब, देवेंद्र ,अगस्ती, बाबी... आजही शोकाकुल !
       

         
पुण्य स्मरण आईचे



आमची प्रूफ रीडर सौ मीनल सुट्टी वर असल्याने  चूक भूल तिच्या नावे .....       
         
   
         
       

Thursday, February 21, 2019

अण्णा आजोबा 21 फेब्रुवारी1989

1987 साली मला पहिल्यांदा नोकरी मिळाली सांगलीला M R म्हणून ! मात्र बॉस सतत मोटोरसायकल घेण्यासाठी मागे लागलेला ! मग मी अमरावतीला भाऊंकडे , त्यांनी असमर्थता व्यक्त करत "नोकरी सोडुन दे 'वगैरे झाले !
        मी खोलापूरला अण्णा आजोबांकडे ! त्यांना अंगात ताप आलेला असतांनाही,  त्यांनी त्यांच्या लाडक्या राजेंसाठी गावात पायपीट करत पंच्यामध्ये  पंधरा हजार रुपये जमवले , आम्ही राजपेठला जाऊन साडेचौदा हजार रुपयांची TVS सुझुकी किसान मॉडेल खरेदी केली ! RC बुक वर पहिल्यांदा  नाव लागले मंगलमुर्ती शास्त्री !!
                  आश्चर्य म्हणजे त्या दिवसापर्यंत अस्मादिकांना मोटोरसायकलला किक मारण्याचे भाग्य लाभले नव्हते ! त्यानंतर आतापर्यंत पंचवीस RC बुकात नाव लागले मात्र त्या पहिल्या गाडीचे महत्व अनमोल  आहे .
                    त्या गाडीने अख्खा महाराष्ट्र पाहिलेला ! माझ्या जीवनाला दिशा दिलेली ! हे सगळे शक्य झाले ते अण्णा आजोबांमुळे . आजी आजोबांचे प्रेम सर्व नातवांमध्ये मला सर्वाधिक मिळाले ! मीच लाभार्थी .
            तसे पाहिले तर अण्णा आजोबा तापट स्वभावाचे , मात्र मी पहिला नातु त्यामुळे असेल कदाचित पण शिव्या खाल्लेल्या कधी आठवत नाहीत . त्याबाबतीत मामालोकं भाग्यवान होते !!
              सकाळी 5वाजता अभ्यासा साठी त्यांनी आवाज द्यावा मी तयार व्हावे , पहिल्या धारेचे  "आवं ' दूध मारून सकाळीच त्यांच्या हातचे चुलीतले गाकरं,  त्यासोबत डाळ फळ्या वरण , अहाहा !
       आजही ती टेस्ट आठवते ,माझे वजन मात्र एक वर्षात दुप्पट वाढले असेल त्यावेळी . त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी मग  मी ही बऱ्यापैकी अभ्यासही करत असे !!
            आज या सगळ्या गोष्टी आठवण्याचं कारण म्हणजे आज त्यांची तारीख 21 फेब्रुवारी !  1989 ची ही तारीख स्वतीमामीनी फोटो पाहून कन्फर्म केली , माई मावशींनी आठवण केलेली ! त्यांचे पुण्य स्मरण .
      
         अण्णा आजोबा उर्फ दत्तात्रय पांडे , खोलापूरचे एक खूप मोठे  प्रस्थ . त्यांचा नातू म्हणून बराच मान गावात  मिळवलेला !  प्रचंड कष्ट उपसत मोठी विरासत त्यांनी आमच्यासाठी ठेवली .

         प्रभाकर शास्त्री कुटुंबासाठी एक भरभक्कम आधार , प्रत्येक कार्यात , त्यांचे भरीव योगदान असायचेच .  बाबीताईचे लग्न त्यांनीच सुकर केले . राजकारणाचे ज्ञान  त्यांच्या कडूनच मिळाले म्हणायला हरकत नाही .

              आज त्यांच्या स्मृतीनां उजाळा देत वंदन करण्याची संधी घेतो . त्यांचे आशीर्वाद  आजही कार्यरत असतात ह्या नातवासाठी ..... अगस्ती