शुभांगीनी आठवण दिली 7 ऑक्टोबर आजीचा स्व सुलभाआजीचा सुध्दा वाढदिवस आहे .
आई चा वाढ दिवस कधी साजरा झाल्याचे आठवत नाही . त्यामुळे असेल कदाचित तारीख ही आठवणीत नव्हती . दादामामानी दुजोरा दिला अन आई च्या आठवणीत रंगलो . आई ती आईच ! आमच्या साठी आई म्हणजे भाऊं पासूनचे प्रोटेकशन होते .अर्थात सगळ्यांची तीच कहाणी असते , आईच्या पदराखाली लपणे अन गुन्हे लपवणे यात गैर काही नाही . सांभाळून घेणे हे आईचे कामच त्या प्रेमापोटीहि क्रित्येक मुलं बिघडलेली असतात ! आई वर्गाची लोकप्रियता बाबा वर्गापेक्षा जास्त असते ते यामुळेच असावी
वाढदिवसानिमित्त स्व आईला नमस्कार ! तिच्या आठवणी आठवायचा प्रयत्न करावा तो चकल्या , धपाटे , खायचे पदार्थच आठवतात . खादाड सुद्धा तिनीच बनवलं न ! स्व भाऊंची आवड , चव तिनीच निभवावी . तिचं रूप आठवावे तो स्वयंपाक घरातलेच आठवते . दुसरे ते पत्ते टाकतानाचे ! हा गुण अस्मादिकांनी मनापासून सांभाळला . वेळ मिळो न मिळो एक डाव झालाच पाहिजे !!
नोकरी लागल्यावर आई साठी बंगलोर हुन साडी आणल्याचे स्मरते आजही रंग आठवतो . बाकी तिच्यासाठी आम्ही काही केल्याचं आठवत नाही . रोज एक पत्र अडीच वर्षे सांगलीतून पाठवत असे ख्याल खुशाली कळवण्यासाठी . आजच्या मोबाईल युगात तो पत्रानंद गायब झाला . आजच्या पिढीला असे आनंदी क्षण दुर्मिळ झाले आता !
शुभांगी आजी शिवाय राहात नव्हती .आम्ही जितूच्या साखरपुड्याला वडोद्याला घेऊन गेलो तर लवकर परतावे लागले होते . ती आजी जवळ आमच्याशिवाय चांगली रहायची .. आजही तिलाच आठवण आली !
आईचं सुखं आम्हा चौघात मलाच जास्त मिळाल ! मी खरच नशीब घेऊन जन्माला आलो . हेरंब देवेन्द्र बाबी घराबाहेर जास्त असल्याने मलाच जास्त लाभ झाला आईभाऊंचा .
अवघ पंचावन्न वर्षाचं आयुष्य तिला मिळालं . जरा लवकरच गेली , चटका आजही जाणवतो . अजून पाच वर्षे मिळते तो बरे झाले असते . अगस्ती सेटल झाल्याचे तिला पाहायला मिळाले असते ! ! योग नव्हते आणिक काय . लक्ष ठेव , आनंदी ठेव , आशीर्वाद असू दे या लेकरांवर एवढंच मागणं तिच्याकडे 7 ऑक्टोबर निमित्त ! साष्टांग दंडवत .
आई चा वाढ दिवस कधी साजरा झाल्याचे आठवत नाही . त्यामुळे असेल कदाचित तारीख ही आठवणीत नव्हती . दादामामानी दुजोरा दिला अन आई च्या आठवणीत रंगलो . आई ती आईच ! आमच्या साठी आई म्हणजे भाऊं पासूनचे प्रोटेकशन होते .अर्थात सगळ्यांची तीच कहाणी असते , आईच्या पदराखाली लपणे अन गुन्हे लपवणे यात गैर काही नाही . सांभाळून घेणे हे आईचे कामच त्या प्रेमापोटीहि क्रित्येक मुलं बिघडलेली असतात ! आई वर्गाची लोकप्रियता बाबा वर्गापेक्षा जास्त असते ते यामुळेच असावी
वाढदिवसानिमित्त स्व आईला नमस्कार ! तिच्या आठवणी आठवायचा प्रयत्न करावा तो चकल्या , धपाटे , खायचे पदार्थच आठवतात . खादाड सुद्धा तिनीच बनवलं न ! स्व भाऊंची आवड , चव तिनीच निभवावी . तिचं रूप आठवावे तो स्वयंपाक घरातलेच आठवते . दुसरे ते पत्ते टाकतानाचे ! हा गुण अस्मादिकांनी मनापासून सांभाळला . वेळ मिळो न मिळो एक डाव झालाच पाहिजे !!
नोकरी लागल्यावर आई साठी बंगलोर हुन साडी आणल्याचे स्मरते आजही रंग आठवतो . बाकी तिच्यासाठी आम्ही काही केल्याचं आठवत नाही . रोज एक पत्र अडीच वर्षे सांगलीतून पाठवत असे ख्याल खुशाली कळवण्यासाठी . आजच्या मोबाईल युगात तो पत्रानंद गायब झाला . आजच्या पिढीला असे आनंदी क्षण दुर्मिळ झाले आता !
शुभांगी आजी शिवाय राहात नव्हती .आम्ही जितूच्या साखरपुड्याला वडोद्याला घेऊन गेलो तर लवकर परतावे लागले होते . ती आजी जवळ आमच्याशिवाय चांगली रहायची .. आजही तिलाच आठवण आली !
आईचं सुखं आम्हा चौघात मलाच जास्त मिळाल ! मी खरच नशीब घेऊन जन्माला आलो . हेरंब देवेन्द्र बाबी घराबाहेर जास्त असल्याने मलाच जास्त लाभ झाला आईभाऊंचा .
अवघ पंचावन्न वर्षाचं आयुष्य तिला मिळालं . जरा लवकरच गेली , चटका आजही जाणवतो . अजून पाच वर्षे मिळते तो बरे झाले असते . अगस्ती सेटल झाल्याचे तिला पाहायला मिळाले असते ! ! योग नव्हते आणिक काय . लक्ष ठेव , आनंदी ठेव , आशीर्वाद असू दे या लेकरांवर एवढंच मागणं तिच्याकडे 7 ऑक्टोबर निमित्त ! साष्टांग दंडवत .
No comments:
Post a Comment