पानं

Tuesday, October 29, 2019

नलु ताई 30 ऑक्टोम्बर2019

साधारणता नव्वदची गोष्ट असावी मी भुसावळला जात असे. जळगावला हेडक्वार्टर (घर ) होते . रोजचाच दीडशे किमी चा टूर असायचा ... छान चार रूमचा ऐस पैस ब्लॉक भाड़याने घेतलेला ! टूर वरून आल्यावर फ्रेश झाल्यावर गाडीला किक मारायची अन उशिरा पण भुसावळ गाठायचे .... पंचायत वाड्या तल्या त्या घरी मुक्काम पडायचा ! सहा बाय दहाच्या त्या छोट्या  खोल्यात जीव रमायचा .. आडवे उभे का होईना निवांत झोप व्हायची , तब्येतीने , आग्रहाने वास्तपुस्त व्हायची ओलावा अलौकिक होता , सकाळी दहाबाय दहाच्या खोलीत ..वन रूम .. किचन, बेडरूम ,लिविंग रूम , सर्व काही एकाच खोलीत,  बालाजी मंदिराच्या आणि वर माझ्या सारखा पाहुणा कलाकार हजेरी लावणारच !!
       दोन खोल्या शालूताईच्या अन एक खोली नलू ताइची ! या दोघींची श्रीमंती उम्बरठया बाहेरच्या खेटरांवरच  मोजावी . स्व भाऊ साठी शाली नली म्हणजे फारच कौतुकाचा विषय !
    
      सकाळीच गुड्डीला " मिठाई वा चमचमित खायला दयायचेच तर काही तरी वेगळे दे जसे  लाल भोपळयाच्या वड्या शीरे दोडक्याच्या शीरांपासून बनवलेले पदार्थ '' असा सल्ला देवून झाला . भाऊबिजेला या जेष्ठ ताई लोकांची आठवण काढ़ने सहज आहे ...त्यांनी दिलेले निर्व्याज प्रेम ! मी भटका अन विमुक्त असल्याने मला जास्तच मिळाले !!

       या तायांची पुढची पिढीहि हा ठेवा  जपण्याचा प्रयत्न करतेय,  आनंद आहे .या सगळ्या आठवणीचे कारण आज नलू ताईनी देह ठेवला .अतुलनी अगस्ती मामाला कळवा म्हणून सांगितले .आणि लगेच  दूसरी सूचना रात्री दहापर्यंत कुणाला कळवू नको . आपल्या मुळे कुणाला त्रास होता कामा नए सगळ्याची भाऊ बीज होऊन जाऊ देत .... ! आजची भाऊ बीज खरेच किती दुर्दैवी आहे आमच्या या बहिनीला बीजेच्या कोरीपासून दूर तर नेलेच अन या दुःखद वार्तेला सुद्धा , अर्थात इतरांच्या आनंदासाठी !! अक्का आत्याचे संस्कार ...

        सौ नलुताईचे कष्टप्रद आयुष्य सुफळ पूर्णत्वाकड़े गेले . सर्व मुलं चांगली निघाली , अतुलनी आईची खुप सेवा केली  . हे दुःख पेलण्याची अतुल ,प्रशांत,सौ  वर्षाला, एकूणच  डोखले परिवाराला ताकद देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !!

          

No comments:

Post a Comment