पानं

Thursday, May 30, 2019

सुहासकाकू

घरी सुखवस्तु  राहणीमान , बंगला नोकर चाकर अशी  संपन्नता असतांना  फाटक्या ,गळक्या भाड्याच्या कौलारु घरात  तात्यांमध्ये  प्रेम शोधणारी  तेही अशा काळी जेव्हा  प्रेम करणे ताज्य किंवा  वर्ज्य समजल्या जाणाऱ्या अशा काळी ....
     त्यातही असं खटलं जिथे कुजकट अन किचकट मंडळींची लांबलचक फौजच ! एक भावोजी अन चार चार दीर , नंदा (बहुदा) जिकडेतिकडे गेलेल्या म्हणून बरं .... एकेकाला झेलताना किती नाकात दम येत असेल . ... किती आयुष्य खरं खोटं करण्यात गेलं असेल ?
     आज सहस्त्रचंद्रदर्शनाला सुहासिनी शास्त्रीबद्दल लिहितांना असंच काहीसं मनात येतं ! काळ हा मागील शतकातील पाचव्या दशकातला म्हणून लिहितो . आज असं काही नंदा दिरांना सांभाळावे लागत नाही ! त्यामुळे त्यांच्यात कटकटी होत नाहीत .कुणी महिला आज सहनही करत नाही .
         तात्या सुहासकाकूनी प्रेम केलं अन काकूंनी इकडे प्रेम वाटलं ! संस्कार वाटले ,जाणिवा वाटल्या .  मागे मी रसिकाला पत्र लिहिले होते नमस्कार का करावा म्हणून त्याचे प्रेरणा स्थान काकुच होती . मुलाला (दत्ताला) सामाजिक कार्यात , संघ कार्यात प्रतिबद्ध करताना काकूंचा वाटा जास्त म्हणावा .
       
     
   

           

No comments:

Post a Comment