"" माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी! खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो ! खरेच ती जगाची बयो होती; आई होती. माहेरची गडीमाणसे कांडपिणी, पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला 'बयो' म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ! ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे ! ''
साने गुरुजींच्या श्यामची आई चे वर्णन ...
या बयोच्या जागी ' बेबी " टाकलं तर खोलापूरकरांच्या ताईचही असेच वर्णन करता येईल .
ताई अलाईस आईचा आज स्मृतीदिन 1 मे . सकाळी उठल्यावर मावश्याना फोन करने आठवणी जागवने हा माझा नित्यपाठ 1में ला राहिला आहे . आज अनायसे मी मावश्या मामा सोबत राहील .
स्व सुलभा शास्त्री ,माझी आई , माहेरी ताई होती .अन तीनी ताई पण खरच गाजवले तसेच निभावलेही ! अण्णा तिच्याप्रमाने चालायचे, बंडूशी तिचं गुफ्तगू चालायचे,नंदू ,चंदू , सूंट्या,अनटया अन मायटा तिचं एकायचे . शिला तर जवळच होती अलकट सर्वांचीच लाडाची , सगळ्या भावण्डाची ती काळजी करायची अन म्हणून माहेरच्यांच काळीज होती .
सासरसुद्धा तिनं छान जपले होते , बोरगांव मंजुची प्रभाकडची दिवाळी आजही काका लोकं आठवण काढतात त्यामागे कष्ट सुलभाचेच होते . सगळे सण , वार कुल कुलाचार निर्विघ्न पार पड़त असत ते आई मुळेच . तात्या दादाचं या लहान्या भावजयी कड़े विशेष प्रेम होतं . तिचं लग्न जमवण्यात तात्यांनी मोठी भूमिका निभावलेली असल्याने अन सुहासताईनी तिच्या लग्नची अलीकडची वर्ष सुखदायी केलेली असल्याने असेल कदाचित , तिला जास्त लळा होता ...
आई हे ऐश्वर्य घरात माझ्या वाटयाला जास्त आलेलं .शिक्षणा साठी बाकी दोघ भाऊ लवकर बाहेर पडल्यामुळे , आणि नन्तर नोकरीनिमित्त बाहेर, त्यामुळे आई भाऊ (वडील) माझ्या वाटयाला अधिक !
आईची चेहरापट्टी घेतल्याने आईचा मुलगा अगस्तीच होता .सासु म्हणून आई कशी होती ...अरे पिच्चरला घेवून जा , फिरायला घेवून जा , असं मुलाला सांगणारी त्या काळातली वेगळी सासु होती ती, प्रगल्भ सासु होती .
आईच्या नन्तर भाऊंनी घरातील दोन्ही जेष्ठश्रेष्ठ भूमिका निभावल्या . मुद्दाम उल्लेखतो याच भूमिका आईभाऊंच्या पश्चात जिजाजी संजयराव निभावतात .भाऊ गेल्यावर तर संजयरावांनी घरातील " जावई ' पणाची कात टाकून दिली अन घरच्या जबाबदरया शिरोधार्य मानल्या,त्यांचे " सासर ' त्यांनीच संपवले ... आई साठी तर "जावई माझा भला' च होता .
अर्थात त्यांनी जावईपण कधीच गाजवले नाही .स्व अण्णा आजोबा मला मरेपर्यन्त जावईपण गाजवणाऱ्याच्या कथा ऐकवायचे . थैंक्स गॉड आम्ही नशिबवान !
छोटी छकुली आजी शिवाय राहत नव्हती .नातीची शेवटच्या क्षणा पर्यन्त काळजी तिला .
तर अशा आईचा कधी कधी खुप संताप येतो , का लवकर गेली ? अजुन काही वर्ष आम्हाला देती ! पंचावन्न है काय जाण्याचे वय होते . 1998चा 1 में काळ ठरवला आमच्यासाठी !
खोलापुरकरांची बेबी / ताई अर्थात साने गुरुजींच्या भाषेत " आवडी ' देवालाही लवकर आवडली आमच्यापेक्षा, आमच प्रेम कमी पडलं ! चल तुझ्या प्रतिमेलाच शिर साष्टांग नमस्कार !
- हेरंब, देवेंद्र ,अगस्ती, बाबी... आजही शोकाकुल !
पुण्य स्मरण आईचे
आमची प्रूफ रीडर सौ मीनल सुट्टी वर असल्याने चूक भूल तिच्या नावे .....
साने गुरुजींच्या श्यामची आई चे वर्णन ...
या बयोच्या जागी ' बेबी " टाकलं तर खोलापूरकरांच्या ताईचही असेच वर्णन करता येईल .
ताई अलाईस आईचा आज स्मृतीदिन 1 मे . सकाळी उठल्यावर मावश्याना फोन करने आठवणी जागवने हा माझा नित्यपाठ 1में ला राहिला आहे . आज अनायसे मी मावश्या मामा सोबत राहील .
स्व सुलभा शास्त्री ,माझी आई , माहेरी ताई होती .अन तीनी ताई पण खरच गाजवले तसेच निभावलेही ! अण्णा तिच्याप्रमाने चालायचे, बंडूशी तिचं गुफ्तगू चालायचे,नंदू ,चंदू , सूंट्या,अनटया अन मायटा तिचं एकायचे . शिला तर जवळच होती अलकट सर्वांचीच लाडाची , सगळ्या भावण्डाची ती काळजी करायची अन म्हणून माहेरच्यांच काळीज होती .
सासरसुद्धा तिनं छान जपले होते , बोरगांव मंजुची प्रभाकडची दिवाळी आजही काका लोकं आठवण काढतात त्यामागे कष्ट सुलभाचेच होते . सगळे सण , वार कुल कुलाचार निर्विघ्न पार पड़त असत ते आई मुळेच . तात्या दादाचं या लहान्या भावजयी कड़े विशेष प्रेम होतं . तिचं लग्न जमवण्यात तात्यांनी मोठी भूमिका निभावलेली असल्याने अन सुहासताईनी तिच्या लग्नची अलीकडची वर्ष सुखदायी केलेली असल्याने असेल कदाचित , तिला जास्त लळा होता ...
आई हे ऐश्वर्य घरात माझ्या वाटयाला जास्त आलेलं .शिक्षणा साठी बाकी दोघ भाऊ लवकर बाहेर पडल्यामुळे , आणि नन्तर नोकरीनिमित्त बाहेर, त्यामुळे आई भाऊ (वडील) माझ्या वाटयाला अधिक !
आईची चेहरापट्टी घेतल्याने आईचा मुलगा अगस्तीच होता .सासु म्हणून आई कशी होती ...अरे पिच्चरला घेवून जा , फिरायला घेवून जा , असं मुलाला सांगणारी त्या काळातली वेगळी सासु होती ती, प्रगल्भ सासु होती .
आईच्या नन्तर भाऊंनी घरातील दोन्ही जेष्ठश्रेष्ठ भूमिका निभावल्या . मुद्दाम उल्लेखतो याच भूमिका आईभाऊंच्या पश्चात जिजाजी संजयराव निभावतात .भाऊ गेल्यावर तर संजयरावांनी घरातील " जावई ' पणाची कात टाकून दिली अन घरच्या जबाबदरया शिरोधार्य मानल्या,त्यांचे " सासर ' त्यांनीच संपवले ... आई साठी तर "जावई माझा भला' च होता .
अर्थात त्यांनी जावईपण कधीच गाजवले नाही .स्व अण्णा आजोबा मला मरेपर्यन्त जावईपण गाजवणाऱ्याच्या कथा ऐकवायचे . थैंक्स गॉड आम्ही नशिबवान !
छोटी छकुली आजी शिवाय राहत नव्हती .नातीची शेवटच्या क्षणा पर्यन्त काळजी तिला .
तर अशा आईचा कधी कधी खुप संताप येतो , का लवकर गेली ? अजुन काही वर्ष आम्हाला देती ! पंचावन्न है काय जाण्याचे वय होते . 1998चा 1 में काळ ठरवला आमच्यासाठी !
खोलापुरकरांची बेबी / ताई अर्थात साने गुरुजींच्या भाषेत " आवडी ' देवालाही लवकर आवडली आमच्यापेक्षा, आमच प्रेम कमी पडलं ! चल तुझ्या प्रतिमेलाच शिर साष्टांग नमस्कार !
- हेरंब, देवेंद्र ,अगस्ती, बाबी... आजही शोकाकुल !
पुण्य स्मरण आईचे
आमची प्रूफ रीडर सौ मीनल सुट्टी वर असल्याने चूक भूल तिच्या नावे .....
No comments:
Post a Comment