सर्व मामामामी , मावश्या काकालोक ज्यांनी मन लावून माझे लग्न जुळवून दिले अन इथं पर्यंत निभावण्यासाठी मदत केली . दर वर्षी न चुकता आशीर्वाद पाठीशी ठेवतात अन मला उर्मी देतात पुढच्या लगीन गाठी दिनाच्या उत्सवासाठी त्या सगळ्यांना मनापासून शीर साष्टांग नमस्कार !
दैव योग ते किती ?
मी देवेन्द्र आई जबलपूर ला जाणार होतो मावशीकडे चार दिवस राहायला .देवेन्द्र काही कारणाने रद्द झाला , आईचे जाणे रद्द झाले .मी मंथ क्लोजिंग साठी नागपुरला ..अचानक बॉसने पाठवले .तिथून मित्र सौदागर मला घेऊन त्याच्या गावी म्हणजे जबलपूरला चल म्हणाला ....
मावशी कडे आनंद मनवत होतो . बाबासाहेबांना भाजी महत्वाची होती आम्ही भाजी बाजार पहात निघालो ...
मनमोहनसिंग आपला पहिला अर्थ संकल्प सादर करणार होते ...मिनूच्या गढा मधल्या घरी ! बाबासाहेब आपल्या भाजीच्या शोधात तिथं पर्यंत पोहोचले अन मी मनमोहनसिंग यांचा अर्थ संकल्प मनापासून पहिला ... अनर्थ मनानी केला.. .मनानं मिनूकडेच लक्ष दिलं ! ! !
मोठ्यामामीनी मनानी मिनूला माझ्यासाठी पाहून ठेवले होते ....
नानामामा त्यावेळी मिनूचा औट घटकेचा सख्खा मामा झाला अन मिनूच्या आईबाबांचा त्यांनी मामा केला 😜 संध्यामामी या कार्यात पुढे न येणेच नवल .
नानामामाला AG ऑफिसात नागपुरात काम निघाले पण तो नागपूरची गाडी चुकवून जबळपुरात गेला ...
हेरंब तातडीने मला घेऊन दर्यापूरला गेला . मला उंचीचे वैषम्य होते , हेरंबनी आता मागे नाही हटायचे म्हणत बरीच उंची गाठली होती ...मिनूनी त्याकाळी त्याला बरेच चांगले चुंगले पदार्थ खाऊ घातलेले .तो हि मनोमन तिला वहिनी मानत होता ...(आता लग्नानंतर ते पदार्थ अन त्याची नावं मिनू विसरली बहुदा ) .. अनिलमामा, दादामामा, बारिकमामी (त्याकाळची) , जयामामी (ईच्याबद्दल काही कमेंट टाकली तर हिचा नवरा मिल्टरया लई डेंजर ) , जितू सगळे सपोर्टिंग ऍक्टर चे काम करत होते !! आताही सगळे मिनूच्याच पाठीशी असतात त्यामुळं मला निभवावे लागते मुकाट्यानं 😄
अन आता मेन रोल ....क्या करे मौसीजी मेरा तो दिल ही कुछ ऐसा है ... मावशी , बाबासाहेब , पदी , वैभव !! मिनूच्या बाबांकडून होकार मिळवणं , अजुन तिच्या आईलाही कुठल्याही विषयासाठी , इतक्या वेळात शक्य होत नाही ..इतक्या तत्परतेने मावशीनी कार्य सिद्धीस नेलं कि बाबानी आज आशीर्वाद दिले ,केक आणला , ओवाळणे झाले ... जावई माझा भला ? याविषयी आजही ते सांशक असावेत नव्हे आहेतच !!!😄 केवढी शिला बाबासाहेबांची गडबड !!!
मला मात्र मिनूच्या आई बाबांच्या बाबतीत नशीब मिळाले .सर्व गोष्टी ते दोघं सांभाळून घेतात ..पदरी पडलं पवित्र केलं त्यांनी मला !!!
आज आठवण भाऊसाहेबांची होणे साहजिक आहे . आईभाऊंचे म्हणणे मुलीचे आधी ठरलेलं असतांना आम्ही हा उपद्व्याप करू नये . त्यांच्यावर भाऊसाहेबच प्रभावी उतारा होता बहुदा त्यांनीच आई भाऊंना पटविले .कारण मी तर फार दूर होतो औरंगाबादला ! अन आई भाऊ 1 बाबी 2 भाऊसाहेबांचाच सल्ला अण्णा आजोबांच्या पश्चात घेत असत मुख्यतः .
मिनूच्या बाबांचे पुन्हा विशेष आभार ! त्यांनी लग्न नोव्हेंबरमध्ये काढले .त्यामुळे मी पत्र लेखनात प्राविण्य मिळवले .आधी फक्त आईला पत्र टाकायचो रोज . ती जागा मिनूनी घेतली .एकही दिवस चुकला नाही ! अजूनही पत्र जपून ठेवली तिनी पण वाचायला कंटाळवाणे वाटतात बहुदा ! कधीच काढत नाही ...
मिनूनी काहीतरी लिहा म्हणून सांगितले .न ऐकून कसे चालेल निभावायचे तर आहे ना ...
मामा मावाश्यां प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यकच ! म्हणून सगळ्यांना त्रास दिला ."अहो झोपा आता बंद करा तो मोबाईल ' असा आदेश मिळण्यापूर्वी संपवलेलं बरं !! आजच घरी आणली ब्यांनवात तेव्हा मुकाट होती !!!
- साठा उत्तरी ही कहाणी इथेच थांबवतो . खूप खूप धन्यवाद
- अगस्ती
दैव योग ते किती ?
मी देवेन्द्र आई जबलपूर ला जाणार होतो मावशीकडे चार दिवस राहायला .देवेन्द्र काही कारणाने रद्द झाला , आईचे जाणे रद्द झाले .मी मंथ क्लोजिंग साठी नागपुरला ..अचानक बॉसने पाठवले .तिथून मित्र सौदागर मला घेऊन त्याच्या गावी म्हणजे जबलपूरला चल म्हणाला ....
मावशी कडे आनंद मनवत होतो . बाबासाहेबांना भाजी महत्वाची होती आम्ही भाजी बाजार पहात निघालो ...
मनमोहनसिंग आपला पहिला अर्थ संकल्प सादर करणार होते ...मिनूच्या गढा मधल्या घरी ! बाबासाहेब आपल्या भाजीच्या शोधात तिथं पर्यंत पोहोचले अन मी मनमोहनसिंग यांचा अर्थ संकल्प मनापासून पहिला ... अनर्थ मनानी केला.. .मनानं मिनूकडेच लक्ष दिलं ! ! !
मोठ्यामामीनी मनानी मिनूला माझ्यासाठी पाहून ठेवले होते ....
नानामामा त्यावेळी मिनूचा औट घटकेचा सख्खा मामा झाला अन मिनूच्या आईबाबांचा त्यांनी मामा केला 😜 संध्यामामी या कार्यात पुढे न येणेच नवल .
नानामामाला AG ऑफिसात नागपुरात काम निघाले पण तो नागपूरची गाडी चुकवून जबळपुरात गेला ...
हेरंब तातडीने मला घेऊन दर्यापूरला गेला . मला उंचीचे वैषम्य होते , हेरंबनी आता मागे नाही हटायचे म्हणत बरीच उंची गाठली होती ...मिनूनी त्याकाळी त्याला बरेच चांगले चुंगले पदार्थ खाऊ घातलेले .तो हि मनोमन तिला वहिनी मानत होता ...(आता लग्नानंतर ते पदार्थ अन त्याची नावं मिनू विसरली बहुदा ) .. अनिलमामा, दादामामा, बारिकमामी (त्याकाळची) , जयामामी (ईच्याबद्दल काही कमेंट टाकली तर हिचा नवरा मिल्टरया लई डेंजर ) , जितू सगळे सपोर्टिंग ऍक्टर चे काम करत होते !! आताही सगळे मिनूच्याच पाठीशी असतात त्यामुळं मला निभवावे लागते मुकाट्यानं 😄
अन आता मेन रोल ....क्या करे मौसीजी मेरा तो दिल ही कुछ ऐसा है ... मावशी , बाबासाहेब , पदी , वैभव !! मिनूच्या बाबांकडून होकार मिळवणं , अजुन तिच्या आईलाही कुठल्याही विषयासाठी , इतक्या वेळात शक्य होत नाही ..इतक्या तत्परतेने मावशीनी कार्य सिद्धीस नेलं कि बाबानी आज आशीर्वाद दिले ,केक आणला , ओवाळणे झाले ... जावई माझा भला ? याविषयी आजही ते सांशक असावेत नव्हे आहेतच !!!😄 केवढी शिला बाबासाहेबांची गडबड !!!
मला मात्र मिनूच्या आई बाबांच्या बाबतीत नशीब मिळाले .सर्व गोष्टी ते दोघं सांभाळून घेतात ..पदरी पडलं पवित्र केलं त्यांनी मला !!!
आज आठवण भाऊसाहेबांची होणे साहजिक आहे . आईभाऊंचे म्हणणे मुलीचे आधी ठरलेलं असतांना आम्ही हा उपद्व्याप करू नये . त्यांच्यावर भाऊसाहेबच प्रभावी उतारा होता बहुदा त्यांनीच आई भाऊंना पटविले .कारण मी तर फार दूर होतो औरंगाबादला ! अन आई भाऊ 1 बाबी 2 भाऊसाहेबांचाच सल्ला अण्णा आजोबांच्या पश्चात घेत असत मुख्यतः .
मिनूच्या बाबांचे पुन्हा विशेष आभार ! त्यांनी लग्न नोव्हेंबरमध्ये काढले .त्यामुळे मी पत्र लेखनात प्राविण्य मिळवले .आधी फक्त आईला पत्र टाकायचो रोज . ती जागा मिनूनी घेतली .एकही दिवस चुकला नाही ! अजूनही पत्र जपून ठेवली तिनी पण वाचायला कंटाळवाणे वाटतात बहुदा ! कधीच काढत नाही ...
मिनूनी काहीतरी लिहा म्हणून सांगितले .न ऐकून कसे चालेल निभावायचे तर आहे ना ...
मामा मावाश्यां प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यकच ! म्हणून सगळ्यांना त्रास दिला ."अहो झोपा आता बंद करा तो मोबाईल ' असा आदेश मिळण्यापूर्वी संपवलेलं बरं !! आजच घरी आणली ब्यांनवात तेव्हा मुकाट होती !!!
- साठा उत्तरी ही कहाणी इथेच थांबवतो . खूप खूप धन्यवाद
- अगस्ती
No comments:
Post a Comment