पानं

Saturday, December 26, 2020

अक्काचा वाढ दिवस 27 डिसेंबर

आज 27 डिसेंम्बर , पाश्चात्य देशांमध्ये आजचा दिवस फ्रुट केक डे म्हणून साजरा केला जातो. युरोप अमेरिका हा दिवस नॅशनल फ्रुटकेक डे म्हणून साजरा करतो ! 

           मी सहज शोध घ्यायचा प्रयत्न केला नक्की हा दिवस का साजरा करत असतील ?  

   कदाचित आपल्यासारखे दिवाळी नन्तरचा फराळ डे असेल का , ख्रिसमसची उरलेली केक  खपवण्याचा दिवस असू शकेल ..वगैरे आमच्या बाल बुद्धीला साजेशे विचार अस्मादिक करत होते .... 

         नेटवर त्याची कुठेही माहिती मिळाली नाही , मात्र ड्राय फ्रुटस , बदाम , किसमिस , अनार दाणे टाकून  त्यावर ब्रॅण्डिंचा तडका (अल्कोहोल) देऊन केक ची रेसिपी सर्वदूर मिळाली ! A fruitcake is a boozy, chewy, rich amalgam of dried fruit, nuts, and sugar, saturated with your favorite alcohol, most commonly brandy or bourbon.

      एका ठिकाणी misunderstood fruits ला मागणी वाढावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो ... लिहिलेले ! 

न खपणाऱ्या फ्रूटसला डिमांड क्रिएट करणे हा उद्देश !

It’s a day for lovers of fruitcake to rejoice in the delights of the world’s most misunderstood fruit. 


              म्हणजे केक 25 डिसेंबर ला नाही तर 27 लाच बनवायची , अन वाटायची !!!  ख्रिसमस ची खपत नसलेली केक ..... वगैरे चुकीचे होते तर .

               रेसिपी वाचल्यावर ही केक खपणार नाही हे ही चूक होते आता ब्रॅण्डिंचा तडका  , छान तर्राट करणारी केक बनत असेल नाही ...आमच्या "देशी ' बुद्धीचा प्राणायाम !!

         कुणासाठी हा दिवस साजरा करायचा याचा शोध घेताना National Fruitcake Day is December 27, a day to celebrate every eccentric person you know. अस्से लिहिलेले वाचले ....  एसेन्ट्रीक म्हणजे विलक्षण माणूस असू शकेल ? डिक्शनरीत ...सनकी, झक्की माणसं असा अर्थ मिळाला ....

        

           कंटाळून   आजच्या दिवसाचा अभ्यास संपवला .  चला व्हाट्सअप्प काढू या , म्हणून गोडू ग्रुप उघडला !  

        तर आजचे वाढ दिवस आक्का , श्रीपाद , अभिषेक .... त्यात  मुक्तांनी 'मुक्त' प्रसादला आजच्याच दिवशी  जखडल्याचेही कळले ! 

     आजच्या उत्सव मूर्ती सनकी झक्की आहेत का ?  विलक्षण जरूर आहेत का ? 24×7 सोबत राहाणारेच सांगू शकतील . 

    " दिलीपराव आक्कीबद्दल सांगा बरं ' 

"अरे फार सनकी आहे बाबा , दिसते तसे नसते  ! ' 


      " श्रीपाद किती शांत स्वभावाचा आहे नाही प्रज्ञा !'' 

"तुम्हाला काय माहीत भाऊजी ते किती सनकी आहेत ' उत्तर असेल ...

        अभिषेक ....  

        सगळे कसे आपल्याला छान छान वाटतात , अन आपल्या साठी असतातही  ! सगळं विलक्षण जरूर आहे नाही ......    

      देवेंद्र म्हणेल तुला काय त्याच ! तूला काय करायचं तू तुझ्या शुभेच्छा द्यायच्या तर दे नाहीतर HBD लिही गुमानं ! 

तुला तर फ्रुटकेक मिळणारच नाही अन उत्सवमूर्तींनाही . 


             तर भोळी भाबडी आमची आक्का , तुला माझेच फोन उचलायला वेळ नसतो म्हणणारी आक्का , "मी आहेच वेंधळी' बोलतांना अत्यंत प्रामाणिक असणारी आमची आक्का , नको तितकी प्रेमळ आक्का  , सर्वांना घेऊन चालणारी आमची आक्का , संजयराव गोसावी नुसार " दिलीपला सहन करणारी आक्का , शिक्षणात तल्लख आक्का सगळ्यात अल्लग आक्का तुला उदंड निरामय आनंदी आयुष्यासाठी शुभकामना . 

   सगळ्यांसाठी घर हक्काचे , कायम असू दे अक्काचे !!!


आता जास्त लिहीत नाही नसता राणी अन "अबोली' भाबडी माई बोलेल तुला सगळ्यांबद्दल लिहायला वेळ असतो अन माझ्याच वाढ ...


       श्रीपाद डॉक्टर साठी सगळे दिवस रविवार असोत हीच कामना , अभिषेक ला नवनवीन इव्हेंटच्या कल्पना सुचो , अन त्याचा इव्हेंट लवकर साजरा होवो , प्रसादमुक्ताला भांडा सौख्यभरे !

             शुभकामना अगस्तीला फ्रुटकेक साठी , श्रीनकुल ला सद्बुद्धी मिळो फ्रुटकेक कयानी मधून आणण्यासाठी .



किती लिहितो रे दादा , पराग म्हणेल ! 

काय करू बाबीताई कडे आज फ्री हॅण्ड आहे , बायकोची भीती नाही !


आज उषाकाकू चा वाढदिवस ! तिच्या स्मृतींना विनम्र अभिवादन .



            

        

     

          


            

Wednesday, December 9, 2020

पोहणेरकर सर वाढदिवस

 



प्रा विजय पोहणेरकर
नंदिग्राम कॉलनी चेच नाही तर औरंगाबादचे भूषण !!
सरांच्या कविता , सरांची केमिस्ट्री , बॉडी लँग्वेज ,
सगळंच अफलातून !
हा मनुष्य रसायनातला , अणू रेणू चा  असा सदस्य आहे की जो सगळ्यांशी मैत्री करतो किंवा त्यांच्या केमिस्ट्री च्या  भाषेत  freind नावाचा मॉलेक्युल तयार व्हायला one of  the atom has to be Vijay Pohnerkar ! सर भेटले अन दोस्ती झाली नाही असे होणे नाही !!! दोस्त नावाचा फार्मूला तयार व्हायला विजय पोहणेरकर नावाचं bond पण  आवश्यक आहेच !!
           सर आज वाढदिवस साजरा करताहेत . वय वाढल्यावर कसं जगायचं सरांनी खूप दा सांगितलेय .... चाळीशीच्या कविता ,पन्नाशीच्या कविता , आता upcoming साठीच्या  ....... गोवा ट्रीपला जाताना पर्यटकांनमध्ये हवा भरण्यासाठी  त्यांनी सगळ्यांना जगण्याची प्रेरणा अशी दिली ....

         
नव्यानं आयुष्याकडे बघायला हवं
आपण आपल्या मनासारखं जगायला हवं

मनासारखं जगणं म्हणजे स्वैराचार नाही
हे सांगत असतांना ....
याचा अर्थ असा नाही कुणाचाच विचार नाही
सांगायला ते थकत नाहीत

सगळ्यांच सगळं करतांना
एकमेकाला जपावं
काम थोडं बाजूला ठेवून
गप्पा मारत हसावं
पुन्हा पुन्हा नवीन काही करायला हवं
आपण आपल्या मनासारखं वागायला हवं

केस पांढरे झाले तरी
पावसात भिजा वाटलं पाहिजे
सुरकुत्या पडल्या तरी
फेशियल करून नटलं पाहिजे


हौस मजा करत करत जगायला हवं
आपण आपल्या मनासारखं जगायला हवं

सरांच्याच रचनेतली वाक्य आहेत वरची !! असंच जगणं सरांच्या वाट्याला सतत येऊ देत हेच जगदंबे कडे मागणं !
दीर्घ निरामय आयुष्याच्या शुभकामना !

ता क : आम्हाला कविता करणे शक्य नाही !!सर स्वतःच्या वाढदिवशी स्वतः वरच एक रचना व्हायला हवी . स्वतः च स्वतः ला शुभकामना द्यायला हव्यात खास पोहणेरकर स्टाईलमध्ये !!!
                 कारण तुम्ही अस्मादिकांवर , सौ मीनल , सौ शुभांगी वर रचना केल्यात अगदी शास्त्री परिवारावर गीत लिहिलेत ....अन इकडे तर प्रतिभेचा वाणवा !!
                  तुमच्यावर कविता तुमची जबाबदारी !!!!!

-
मंगलमुर्ती शास्त्री
सौ मीनल शास्त्री
शुभांगी वझरकर
अजित वझरकार




काळजी काकांचा वाढदिवस

 खूप छान चर्चा ! 


जी गोष्ट माझ्या हातात नाही त्या गोष्टीबद्दल काळजी न करण्याची  वृत्ती कशी विकसित करता येईल . 


जे व्हायचे असेल ते होईल , जो होगा सो होगा ! 


"बेफिकीर वृत्ती ' डेव्हलप कशी करता येईल . 


काल देवेंद्र सोबत चर्चा झाली तो म्हणाला मी गेल्या सहा आठ महिन्यात असं स्वतःला विकसित केलंय की ताण घ्यायचा नाही . फिकीर करायची नाही . काम करत राहायचे फलश्रुती काय असेल त्याकडे दुर्लक्ष करायचे .फळ आंनद दायी असेल तर वेल अँड गुड , नाही तर अपेक्षाच नाही .. कर्मण्ये ... वगैरे आपण लहानपणापासून शिकलो मात्र "फलेशु कदाचन 'ला आमची गाडी ब्रेक डाउन होते ... 


खरच शक्य आहे हे ? बोलणे सोपे आहे ... 


आज गुरू ठाकूर यांनी लिहिलेलं काळजी गीत वाचण्यात आलं ....सुंदर गीत 


*होणार होतला   जाणार जातला*

*मागे तू फिरू नको*

*उगाच सांडून खऱ्याची संगत*

*खोट्याची धरू नको*

*येईल दिवस तुझा हि माणसा*

*जिगर सोडू नको*

*तुझ्या हाती आहे डाव सारा*

*इसर गजाल कालची रे*

*देवाक काळजी रे*

*माझ्या देवाक काळजी रे* 


              *गुरू ठाकूर* खरच नावाप्रमाणेच शब्द गुरू आहेत . माझे अति आवडते गीतकार ! 


देवेन्द्र शी चर्चा करतांना मजा येते ,  त्याचं वाचन खूप आहे , आणि मग विषय मिळतात लिहायला . परवा रात्री बोलताना तो म्हणाला , आमचं एकमत झालं, कि जी गोष्ट माझ्या हातात नाही त्याचा स्ट्रेस का घ्यायचा ! 


अन आज रात्री देवाला काळजी आहे रे सांगणारे गुरू ठाकूर भेटले .... यावर चर्चा व्हायला पाहिजे ग्रुपवर . 


इतके सगळे लिहिले अन आता पाच वाजले सकाळचे म्हणून गप डोळे मिटून पडू म्हणून शुभुनी रात्री टाकलेला मेसेज वाचायला व्हाट्सअप्प उघडले तर ...

     Gharcoool ग्रुपवर " काळजी ' करणाऱ्या माणसाचा हॅपी बर्थ डे ! सगळ्यांचीच काळजी असणारे  किंबहुना करणारया आमच्या बाबासाहेबांना आज वाढदिवस निमित्ताने शीर साष्टांग नमस्कार .....ते आशीर्वाद देतानाही म्हणतील " काळजी घे रे बाबा  ! '

              जबलपूर ला सगळी मंडळी जमलेली, मस्त रमी चा डाव मांडलेला ! सगळे डब्बा खेळण्यात मग्न ! बाबासाहेब सुद्धा *डब्ब्या* च्याच  काळजीत !!  टेन्शन मध्ये आपटेकाकू कडून आणायच्या डब्ब्याच्या काळजी त . मला आठवते कुणी तरी ऐन वेळी मेम्बर वाढलेले ( बहुदा राजुदादा फडके)  अन बाबासाहेबाना टेन्शन डबा पुरेल का नाही !  


        त्यांना काळजी  साठी कुठलेही कारण पुरेसे आहे . अर्थात त्यामुळे आम्ही मजेत राहतो हे हि तितकेच खरे ...पण बाबासाहेब काळ सोकावतो हो . आम्ही तुमची पोरं कुणाची कशाची काळजी करायचा विचारही डोक्यात येऊ देत नाही मग !!!! 

      व्यवसायाने निवृत्त अभियंता , अत्यंत शिस्तबद्ध जीवन , नीटनेटके पणात त्यांचा कुणी हात धरू शकणार नाही असे ,इतरांची काळजी वाहणारे ...

                

      असे आमचे काका बाबासाहेब उर्फ *भास्कर माधव कुलकर्णी* जबलपूर याना दीर्घ निरामय आयुष्यासाठी शुभ कामना ! ! 


      चर्चा काळजी या विषयावर झाली पाहिजे ! प्रत्यक्षात उतरवणे कठीण आहे . इतकी चर्चा तासभर करून देवेन्द्रला मी कोरोना बाधित झाल्याचे ऐकून दर तासाला अगस्ती डोळ्यासमोर येतोय अन त्याचे जागरण ! हेरंब रामरक्षा म्हणतोय ..... त्याबाबतीत मी बाबीताई बिनधास्त आहोत .

अस्मादिकाना बंधुराजांचेच टेन्शन ! 


                आणि आजची उत्सव मूर्ती बाबासाहेब उर्फ काळजीकाकांना  अगस्ती मिनू तर्फे *काळज्या* सप्रेम भेट .बाकी देण्यासारखे काय . एन्जॉय . 


चर्चा मात्र झालीच पाहिजे ! 





                 

                

        

Monday, November 30, 2020

अण्णा आजोबा जन्म शताब्दी

 पहाटे पहाटे अस्मादिक उठायचे ,

आवं दुधाचा ग्लास रिचवायचे .

गरम गरम गाकर 

अन डाळ फळ्या वरण 

त्यावर सुगंधी तूप 

अहाहा ....

जगात इतकं भारी किचन सापडणार नाही !

चुलीवरच्या गाकराची घ्या ,

का भाकराची घ्या ,

काळ्या भांड्यातल्या डाळ फळ्या वरणाची घ्या 

चव सेवन स्टार हॉटेलच्या शेफ ला 

ती "चव ' साधणार नाही ! 

कारण ओतप्रोत  प्रेम ओतलेले 

ते पदार्थ , आपल्या नाता ला खाऊ घालणारा तो शेफ 

जर नातोबाचा आजा असेल तर 

"राजे ' पण या परती मिळणार नाही !!! 

आणि  असे भाग्य तुमच्या नशिबी असल तर  ....

आम्ही हे भाग्य मिळवले 

अण्णा आजोबांनी ते वाटले 

अगस्ती राजेंना जरा जास्तच !

किरकिरा , कुरकुरा असू देत ना 

बेबीचं पोर होतं ती पण लाडाचीच ! 

अण्णा आजोबा फार लवकर गेले , 

पण मी नशिबानं नातू म्हणून 

खूप हिस्सा मिळवला !

बाबीताई नंतर मीच .

अण्णा आजोबा कसे होते 

म्हटलं तर 

रागीट होते असे सगळे म्हणतील 

पण माझ्या साठी नाही !!

आजही बाहेर दिवाणखान्यात 

सिलिंग फॅन खाली दिवानावर

तक्क्याला  रेलून तळ पाय मांडीवर ठेवून 

पलीकडे सोफ्यावर मी 

अन अण्णाआजोबा  चर्चा राजकारणावर !! 

मला नाही वाटत अण्णा आजोबा ह्या विषयावर 

कुणा पोराशी ,नाताशी बोलले असतील ,

कदाचित दादामामाशी झाली असेल क्वचित .

हे डेअरिंग " नातू'च करू शकतो 

बऱ्याच विषयांवर चर्चा 

मोकळ्या मनाने मी भाऊं सोबत करू शकत नव्हतो .

पण अण्णाआजोबा नो प्रॉब्लेम ! 

आज अण्णा आजोबांचा शताब्दीवस !

मला एक समृद्ध आजोबा मिळाले ,

समाजात एक प्रतिष्ठा असलेले आजोबा लाभले 

गावात ज्यांच्या शब्दाला मान होता 

ज्यांचा पंचक्रोशीत दबदबा होता ,

असे आजोबा लाभले , 

आपल्या कृतीतून संस्कारित करणारे आजोबा लाभले ,

"खोलापूरकर दत्तोपंत पांडे माझे आजोबा '

सांगताना छाती 56 इंची बनावी

असे आजोबा लाभले ... 

सासर माहेरच्या दूरदूरच्या नात्यांचा "आसरा' बनलेले 

आजोबा लाभले , 

उत्तुंग व्यक्तिमत्व आजोबा म्हणून लाभले 

भाग्य आमचे !!! 

अण्णा आजोबांना जन्म शताब्दी निमित्त 

अभिवादन .

अगस्ती

Monday, October 26, 2020

बाबीताई @57

मायेचं साजूक तूप
आईच दुसरं रूप
                काळजी रुपी धाक
                   प्रेमळ तिची हाक
कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल ...

कुण्या अज्ञात कवींनी ताई चे अगदी सार्थ वर्णन केलंय , वाचतांना असं वाटलं जसं आमच्या बाबीताई लाच डोळ्यासमोर ठेवून लिहिणाऱ्याने रचना केली ! 

लहानपणी आम्ही चौघे भावंडं सुट्टीत  आजोळी खोलापूरला जाणे , दिवाळीचे पंधरा दिवस अन उन्हाळ्यात एकदोन महिने , क्वचितच चुकले असतील ...
       मला आठवते ते बाबी ताई रात्री झोपताना आम्हा तिघांच्या पांघरुणाची काळजी करतानाची ! 

हो इतक्या लहानपणापासून , त्यावेळी ती हि फार मोठी नव्हती आमच्या पेक्षा दोन अडीच वर्षे अधिकचे , तरीही तिला हि काळजी घेण्याचं  कसं उमजले , कुणी सांगितलं नव्हतं , तर ते बहुदा प्रत्येक ताईला उपजतच असावं ,  बाबी ताई मध्ये जास्तच . ... अशीच काळजी ती आजतागायत घेतेय हे महत्वाचं . 

      आम्हा तिघा भावांना एका लाईन मध्ये ठवण्याचे कौशल्य तिनं बरोबर आत्मसात केलंय . तिच्याशी भांडणं , तिच्यावर हक्कानं चिडचिडणे आजही कमी नाही ,  मात्र ती तिच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी लीलया करून घेते . कदाचित तिची *कष्ट* करण्याची ताकद असेल कि सगळ्या माहेर-सासरच्याना तिचं ऐकावं लागतं .... अखेर प्रेम लावणे म्हणजे झिजावही लागतं ... इथेच तिच्या *"ताई'पणाचं* रहस्य आहे . .
        
     आईच्या अकाली जाण्यामुळे तर ह्या ताई ला तीही पोकळी भरून काढावी लागली अन तीनी अक्षरशः पेलली ! 
आजही देवेन्द्रच्या पार्थ साठी , त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी गजानन महाराजांना साकडं घालण्याचं , त्यांचे पारायण करण्यासाठी ती जेव्हा बसते ..श्रध्दा असो वा नसो आम्ही नत मस्तक होतो सश्रद्ध होतो  !  
            गेल्याच पंधरवड्यात नवरात्र होतं तिला फोन केला ..  " मी गाडी पाठवतो तुम्हा दोघांना यायचे आहे म्हटलं ' तर स्वतः गाडीची व्यवस्था करत इथे पोहोचली ..  मला माहिताय अगस्ती कडे राहणे किती कंटाळवाणा कार्यक्रम आहे .घरी एकट्यानं राहणे , आपल्या घरी ठीक आहे पण .. ताई जिजाजी हजर झाले, तिकडे चिरंजीवांची, सुनेची कुरकुर सहन करत ... आम्ही कृतकृत्य आहोत . 

तर अशी हि आमची ताई बाई आज आपला वाढ दिवस वाढवत आहे , संपन्न करत आहे . तिच्या दीर्घ निरामयते करीत  शुभेच्छा रुपी शब्दफुलें ! 

                 ताई साठी आई कडेच मागणं - अगस्ती 
            
           
      
             
       

Friday, October 23, 2020

अजयदादा शुक्ल @65

 आज अजयदादा आपला वाढदिवस साजरा करत आहे .

    अजय दादा एव्हाना आपल्या ग्रुपला चांगलाच परिचयाचा झालाय !

मी ग्रुपमध्ये इन्ट्रोड्यूस करतांना त्याच्याबद्दल लिहिलेलं !त्यानंतर दादाला भेटून आल्यावर पल्लविने लिहिलेले .....

     *अजूदादा,नमस्कार,तुला भेटून आनंद झाला,तुझी दैनंदिनी ऐकून फार आनंद झाला,सकाळी 3 वाजता उठून वेदांचे अध्ययन करतोस,कुळ कुळाचाराचे वैभव वृद्धिंगत करत असून यातून मिळणारा आनंद हाच जीवनात यश देणारा आहे,वेदस्वराच्या कंप नांमुळेजडत्वाला चैतन्य प्राप्त होते,निवृत्ती चे आयुष्य पैश्याना न वाहून देता पुन्हा नव्याने आयुष्याचा अर्थ शोधू लागला हे भूषणावह आहे,या काळात स्वतः मध्ये डोकावण्याची सवय लागली तर पुढील आयुष्य सुखावह होते,तुझ्याकडून ही गोष्ट प्रेरणादायी असून अमच्यामध्येही असेच बदल होवोत यासाठी तुला मनोमन नमस्कार.*


एकूणच अजयदादा हे बहू आयामी व्यक्तिमत्व ! लहानपणी अमरावतीला जाताना त्याच्या क्रिकेट चे आम्हाला आकर्षण होते .... 

       खरे तर दादा ट्युशन क्लासेस चालवायचा ! आज तोच व्यवसाय continue केला असता तर ....

   दादाला दुर्दैवानं बँकेत नोकरी लागली ...अन आनंदी आंनद झाला !एक मोठा व्यवसायी/बिझिनेसमन म्हणून आज दादा आपल्यात असते .कारण शिकवणे हा आजचा रोरिंग बिझिनेस आहे . दादांनी त्या काळात स्वतःचे नाव केले होते अमरावतीत .

      अर्थात दादांनी निवृत्ती नन्तर शेती खात्यात अन पल्लवीने उद्घृत केल्यानुसार वेदभ्यासात वगैरे स्वतःला  गुंतवले ! 


     " मित्र जोडण्याच्या बाबतीत तर अजू प्रभावर गेलाय ' अस त्याच कौतुक आत्या सांगायची . खरेच , भाऊ मित्रांच्या बाबतीत नशीबवान होते , खूप मित्र त्यांनी जोडले तसे अजयदादानी सुद्धा !

       असे आमचे अजय दादा आज 65 पूर्ण होताहेत कुणाला सांगितले तर मला वेड्यात काढतील पण हे खरं आहे . दादांनी असेच निरामय आयुष्य  सेंच्युरी साजरी करतांनासुद्धा अनुभवाव यासाठी शुभकामना - अगस्ती

Sunday, October 11, 2020

सुमन आत्या @87

 आज सुमन आत्याचा वाढ दिवस ! डोक्यात आत्या या नात्याविषयी काही आठवायचा प्रयत्न केला तर ......   


बहिणाबाई या थोर  कवियत्रीची रचना सहज आठवली . त्यांनी लिहिले मात्र ...


माय म्हनता म्हनता 

          ओट ओटालागी भिडे

आत्या म्हनता म्हनता 

                   केवडे *अंतर* पडे


      खरचं मी नात्यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा आत्या किंचित दुर्लक्षित नात वाटलं .बहिणाबाईंच्या नातं उलघडणारी जी कविता त्यातही त्यांना आलेले अनुभव असतील कदाचित , पण  त्यांनी काका आत्या वगैरेंना दुर ढकललं .आई मामा मावशी जवळ च्या तर ..बाप काका आत्या ....दूरच्या


कदाचित रचना लिहिणाऱ्या बहिणाबाई सासुरवाशींनीच्या नजरेतून लिहित्या झाल्या असतील .....असो !


खर तर विषय सुमन आत्याच्या वाढदिवस अभिष्टचिंतनाचा !  सुमन आत्या नी मात्र *अंतर* पडू दिले नाही . तिच्या लहान भावाचे  मुलांना तिनं भारीच लळा लावला . लहानपणापासून  आम्ही सुट्या लागल्या की आत्याच्या घरी त्या गोवर्धनचाळीत जायचो . अन तिथून पुढे आजोळी . स्वतः उपाशी तापाशी राहत आपली ड्युटी बजावत घरी आम्हा सगळ्यांचे लाड करायला तयार ! 


बर झालं आम्ही वर्षातले काहीच दिवस तिच्या कडे असायचो .... नसता  सगळेच " *बबड्या'*   चे  अवतार झालो असते . अमर्याद लाड करणे तिचा जन्म सिद्ध हक्क आहे .


          तर अशी हि आमची आत्या . कष्ट तिच्या पत्रिकेत लिहिलेले जन्मापासून . सुखाचे दिवस कशाशी खातात तिला माहीत नाही . अर्थात तिची  इच्छा ही नाही!  पार पायानं लंगडत का होईना तुमची आवभागत  झालीच पाहिजे यातच तिला सुख .... अगस्ती माझ्याकडे खातच नाही म्हणत ती खाऊ पिऊ घातल्या शिवाय राहत नाही .


       तिनं स्वतःच्या बहीण भावाना जसं जपलं तसेच दीर नन्दाना सुद्धा !  त्यामुळे घरी पाहुण्यांचा राबता नेहमीचाच . तरीही तिची तक्रार  असतेच "तो येत नाही , ती येत नाही '  


       अस्मादिकांना अत्याशी भांडताना भल्ली मजा येते ! 


     तिच्या कष्टाची आठवण झाली तरी अंगावर शहारे यावे इतके !  सगळे स्वतः हुन ओढवून घेतलेले . नोकरीत तिनं यवतमाळ चांदुर बाजार तळेगाव दशासर ते अंजनगाव बारी असे अपडाऊन  झेलले ..... आता तुम्ही म्हणाल त्यात काय मोठे ! 


      मी शेवटच्या तिच्या अंजनगाव बारी च्या  ड्युटीचा साक्षीदार आहे . यशोदा नगर ते राजपेठ शेअर रिक्षा तिथून बडनेरा शेअर रिक्षा   तिथून अंजनगाव  शेअर रिक्षा किंवा बस  सकाळी जाणे दुपारी निघणे ..... त्यात काय मोठे असंही तुम्हाला वाटू शकते ! पण  हे सुमन आत्याने करणे यात कष्ट दडलेले आहेत . इतरांनी करणे अन सुमनआत्या ने करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे . तिचे सोवळे ओवळे तिला बाहेर च पाणी सुद्धा निषिद्ध करत असे अन मग अक्षरशः शब्दशः उपाशी राहत ती ड्युटी . याला खूप मोठा निग्रह लागतो . घरून पाणी पिऊन निघाल्यावर घरीच पाणी पिणार  . हि आहे सुमन आत्या  ! 


        सुखाचे दिवस दिसणार आता ,  शेवटचा पूर्ण पगार घेऊन घरी जातच होती का रिक्षां नी अपघात केला , तिला जायबंदी केले .  हे सगळे असेच तिला  सतत झेलावे  लागले . सिलेंडर अपघात तर भीषणच होता .


         सासुरवशींनीच्या सर्व कथा बहुदा तिच्या नशिबी आलेल्या ! कायम दबलेल्या स्वरात  जीवन गेलं . (हा माझा अंदाज ) तिनी आजपर्यंत कधी सासरच्या मंडळी बद्दल काहो सांगितल्याचे मला आठवत नाही . सुमनचे प्रतिनाव *सहन* ठेवावे .... आजच्या मुलींनी शिकावं ! 


     

     आमच्या नशिबाने स्व बाळासाहेब (आत्याचे  यजमान) प्रभाकररावांच्या मुलांचे "लाड 'च करायचे . त्यांनीही खूप प्रेम आम्हा चौघा भावंडांवर केले . साळ्याच्या मुलांकडे विशेष लक्ष द्यायचे . या सगळया गोष्टींमुळे कधीही सुमनआत्याला  चुकवून अमरावती ओलांडवत नाही . 


         " *आणि घरी गेल्यावर खोट खोटं रागावणे मग हळूच जवळ घेणे . निघताना डोळ्यात पाणी आणणं  . अस निर्व्याज प्रेम ! खरच आपण किती नशीबवान ''*  मिनल म्हणतेय अन ते शत प्रतिशत खरंय .शुभांगी साठी इतक्या व्याधीं घरी ठेवून आत्या लग्नाला हजेरी लावती झाली .    बोलण्याची सुरवात " माझी नात कशी आहे ? ' अशीच होणार . मी आलो न माझ्याविषयी विचार म्हणत आमची भांडणाला सुरवात !!


         अशी  आमची आत्या  *सुमनताई देशपांडे* ,यशोदानगर  अमरावती , आज 87 पूर्ण करत आहे .  तिच्या शतकी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना टकाटक,  निरामय , आंनदी आयुष्य दे *माय अंबाबाई* इतकंच मागणं . 


    या निमित्तानं तिचे गुरू *सद्गुरू नारायण गुरू* महाराजांना साष्टांग दंडवत . छान सुखाचे आयुष्य वाटेला येऊ द्या , गुरू चरणी विंनती .


                     - अगस्ती 












        


     


       

Friday, October 2, 2020

शिला मावशी

 माय सांगतो 

       आस असता 

जाणीव

        तव स्पर्शाची 


मावशीच ती 

     भरून काढी 

उणीव त्या 

         कुशीची 


अशी आमची मावशी सौ शिला भास्करराव कुलकर्णी अर्थात शिलामावशीचा आज वाढदिवस ...मावशी बद्दल खूप काही खूप जणांना लिहिता येईल .असं हे नातं त्यातही आई च्या पश्चात या नात्याने महत्व अधिकच ! 

   आम्ही वैभवी मिळे मावशी ... (आज एकुलत्यांच्या जगात  दुर्मिळ होत चाललेले मामा मावशी ) असही आजच्या परिपेक्ष म्हणावे लागेल .


हेरंब देवेंद्र अगस्ती बाबी साठी शिलामावशी हे " दैवत ' कारण कळायला लागल्या पासून किंबहुना पहिला घास भरवण्यापासून असेल कदाचित शिला  मावशीनंच आम्हाला वाढवलं आई असताना अन नसताना सुद्धा !

       पक्षी उडालं आकाशी तिचं लक्ष घरट्या पाशी तसं मावशी भारताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरते मात्र बाबी अगस्ती *हेरंब* दिवू कडे लक्ष ठेवूनच असते ....हेरंब कडे जरा पार्सलिटी 😄 

     हे प्रेम सतत बरसत राहो हिच रेणुके चरणी मागणं - अगस्ती

Wednesday, September 30, 2020

पराग शास्त्री दिवटा

 आज परागचा वाढदिवस अन "अगस्ती दादानी काहीच कसं लिहिलं नाही?'  राणीला नक्की खंत असेल ..दोघेही घरात दिवटे !!! पराग वयानं अन राणी ... जाऊ देत पुन्हा राणीची उंची का काढायची !!!


   तर पराग , सगळ्यात लहान शास्त्री ! "जाऊ दे नं दादा मला घरात कुणीच कधी सिरियसली घेत नाही ' म्हणत सगळ्यांना आपले म्हणणे नकळत सिरीयसली घ्यायला लावणारा हा दिवटा ! 


    कुठलीही गोष्ट जर ठामपणे न अडखळता , स्वतःच्या मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता तुम्ही मांडू शकला तर अगदी तद्दन चुकीची गोष्ट ,  फालतू वस्तू तुम्ही विकू शकता , तुमच्या बोलण्यात ताकद " दम' असला पाहिजे .तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे . एक्सप्रेसिव्ह पॉवर !! 


    पराग काहीही विकू शकतो ! तो इतरांना चूप ठेवतो , करतो , उसकी बातो मे " दम' जरूर रहता है ! असा आमचा हा दमदार भाऊ , दिलदार पण आहे ......सगळ्यात लहान आहे पण सगळे जमा झाले तर पटकन कुठलाही विचार न करता खिशात हात घालणारा !! अगस्तीचा आवडता ...


     मला लहानपणी चा पराग आजही आठवतो , चुटुचुटु काम करणारा ! कुणीही काम सांगा पटकन करायचा त्याला या त्याच्या "रामागडी' अवस्थेतून भाऊंनी बाहेर काढले ,शहाने केले .पण त्यांच्यातली कष्ट करण्याची क्षमता तसूभरही कमी झाली नाही ! सर्व क्षेत्रात रुची ठेवणारा , तो जसा नवरात्रात गरबा , क्रिकेट सामने  आयोजतो तसा करोना काळात ही पर्वा न करता कार्यरत असतो . स्पोर्ट्स मध्ये रुची ठेवतो तसे स्टेजवरच्या कार्यक्रमात सुद्धा रस दाखवतो , मित्र जमवन्यात त्याचा हात कुणी पकडू शकत नाही ! 


     नाती गोती बऱ्यापैकी सांभाळतो हे ही  तितकेच कौतुकास्पद आहे .  सगळ्यांना हवाहवासा वाटतो !!


त्याच्यातला बोलघेवडा असाच सतत बोलत राहो ,


त्यांच्यातली उर्मी सतत बहरत राहो , 


त्याच्यातला कार्यकर्ता सतत कार्यरत राहो 


यासाठी दीर्घ निरामय आंनदी आयुष्य लाभो 


.......इतकीच माय रेणुके जवळ त्याच्या वाढदिवशी प्रार्थना 


- अगस्ती

Saturday, July 18, 2020

चंदुमामा स्वतीमामी वाढ दिवस

चंदुमामाला आणि त्याच्या "अग' ला लक्ष लक्ष शुभेच्छा ! दोघांची एकी तर जन्मापासूनच आहे बघा .एकाच तारखेला जन्मले ... त्यात आज शुक्रवार बालाजीच्या प्रसादाच्या गोड शिऱ्यात वाढदिवस साजरा होणार ,सेलिब्रेशन !


        आम्हा चौघा भावंडांना मामा म्हणजे चंदुमामा .कारण आम्हाला कळायला लागले तेव्हा पहिला मामा भेटला तो हाच .बोरगाव मंजुला हेरंबाच्या जन्माच्या वर्षी मामाचे शिक्षणा साठी का आईच्या मदतीसाठी असेल कदाचित आजोबांनी त्याला पाठवले होते .आणि आम्ही मामा भक्त झालो !

            माझ्या काही आठवणीत मामांनी दिवाणखान्यात आयोजिलेल्या भजन दिंडी ची आठवण .त्यावेळी तो भजन साथी साठी जायचा एकदा सगळं घर वाडा खाली होता मी अन मामा दोघेच ! कदाचित माझा तो पहिला सार्वजनिक कार्यक्रम असावा , आम्ही भजनं दिवाणखान्यात ठेवले , पाच पन्नास , शंभर लोकं आलेले ! समोर देवाची भजनं चालू अन मागे आपल्याकडे म्हशीचे दूध दवायला येणाऱ्या मामुनी आम्हाला देव दाखवले , चोरी केली ! सगळ्या जनावरांना मोकळे केले त्यांच्या नाकातल्या रस्या , बाहेरचे काही अवजारे डुंड्या , डवऱ्या चोरून नेल्या ! मग पडली मार ..... सगळे गडी घरी बसले ! शेतावर जायचे कसे हा प्रश्न पडला त्यांना ....

पोलीस हवालदार आला तो ही आम्हालाच बोलला तुम्ही घरी असतांना चोरी होतेच कशी ? एकंदारीत मामानी नन्तर कधी भजनाचे नाव काढले नसेल पक्के ! आमचा पहिला इव्हेंट असा निकाली निघाला !

मामा म्हणजे बाबीअगस्तीसाठी निरपेक्ष प्रेम ! त्यानं कधी कुठली अपेक्षा केली नाही . उलट " येणं खोलापूरला बिट्टया  करतो' हा उत्साह , तो गेल्या आठ धा वर्षापासून स्वतः लॉकडाऊन असतांना देखील , दाखवतो .परिस्थिती खराब असतांना त्याने कधी रडगाणे गायलेले मला आठवत नाहीत . आजही दाल बाटीची बिटट्या पार्टी पंगत अमरावतीकरांना त्याच्याकडून असतेच असते .खूप मोठ्या मनाचा मामा !

       आमच्या आईसाहेबांचं या त्यांच्या "चंदया'वर विशेष माया होतीच . तसं खूप कष्टीक जीवन जगलेल्या या मामाला ईश्वराने घरी बसवले याचे खूप वाईट वाटते ... आता वॉकर नी घरातल्या घरात फिरतो म्हणाला !

             निरलस प्रेम कसं करावं त्याच्याकडून शिकावं . आणि त्याला साथ मिळाली स्वातीमामीची ! अगदी त्यांचा तर तो "बबड्या 'च लाडाचा नवरा ! जे पाहिजे ते, जसं पाहिजे तसं ! दोघांची केमिस्ट्री का काय म्हणतात ती इतकी जुळलेली आहे . ...अगदी आयुष्यभर ज्या विडी न त्याचा घात केला , घरातील सगळ्यांचा तिरस्काराचा विषय .... आता तब्यत *अशी* असतांना सुद्धा मामी त्याचे विडीचे सुद्धा लाड पुरवतात !! *लाडाचो नवरो ..*
         
           स्वातीमामीच सुद्धा आयुष्य कष्टात गेले , जात आहे , आणि प्रचंड त्रासात ही वास्तविकता ! मात्र तशातही तुरु तुरु कार्यरत होतात स्वागत , आव भगत करतातच अन तेही हसत हसत ! आजच्या मुला मुलींना हे घेण्यासारखे आहे ....

         या वाढदिवसाच्या निमित्ताने मामाचं अन त्याच्यामुळे मामीचं लॉकडाऊन बालाजीराया खतम कर हिच प्रार्थना करतो आणखी काय ?


अगस्ती

पोहणेरकर सर अनिव्हर्सरी शुभेच्छा

*शुभेच्छा कवीला अन हक्काच्या श्रोत्याला सुद्धा .....*

समर्थ रामदास कवीचं कौतुक लिहिताना कवेश्वर स्तवनात लिहितात

आतां वंदूं कवेश्वर |
शब्दसृष्टीचे ईश्वर |
 नातरी हे परमेश्वर |
      वेदावतारी ||

कीं हे शब्दरत्नाचे सागर |
कीं हे मुक्तांचें मुक्त सरोवर |
नाना बुद्धीचे वैरागर |
निर्माण जाले ।।

     वेदातील अफाट शब्दसृष्टी पाहून, कवी त्या वेदाचे अवतारच वाटतात. किंवा कवी म्हणजे वेदावतारी परमेश्वरच होत.
               शब्दरुप रत्नाचे सागर, अंतःकरण सरोवरात मुक्तपणे विहारणारे काव्यरुप मुक्तपुरुष, नाना प्रकारचे बुद्धीचे खेळ खेळणारे वैरागर ते हे कवी होत.

     *कवीचे कोण कौतुक बघा ! आणि प्रत्येक जण शत प्रतिशत सहमत असणारच .....*

समर्थ तत्पूर्वीच श्रोते स्तवनही लिहितात !

तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति | तेथें माझी वित्पत्ती किती | बुद्धिहीन अल्पमती | सलगी करितों |
किं हे ऋषेश्वरांची मंडळी | शांतस्वरूप सत्वागळी | जयांचेनि सभामंडळीं | परम शोभा ||

                  कवी कितीही हुशार असेल , *समोर श्रोता नसला तर त्याच्या कविता व्यर्थ आहेत !* ऐकणारा श्रोता तर हवाच ना , तोच काव्य सभेचा परम शोभा म्हणावा .....

              आमच्या  कवीमित्रानी  आजच्याच दिवशी 29 वर्षांपूर्वी हक्काचा श्रोता घरी आणला  !

         प्रा विजय पोहणेरकर यांनी आजच्या दिवशी हहहे अंजु अशा आपल्या खास स्टाइलनं  आवाज देऊन आपल्या कवितेवर पहिली दाद अंजूची घेतली ! हा श्रोताही ज्ञानी निघाला ...त्याची दाद अखंड अन निर्विवाद  राहिली , आम्हाला कवीमित्र  मिळाला ...कविता मिळाल्या !! मिळत राहोत अनेकानेक वर्ष .... म्हणून
     
    प्रा विजय पोहणेरकर सर अन सौ अंजुवहिनी लग्नगाठीच्या अगणित शुभेच्छा

- मंगलमुर्ती शास्त्री  - सौ मीनल
- अजित वझरकर-सौ शुभांगी

Wednesday, June 3, 2020

सतीश नारखेडे अस्सल मित्रत्व

सतीश नारखेडे
जया वहिनी
मित्र करायला
एकदम ऑरगॅनिक जोडी !
सेंद्रियच !!
एकदम ओरिजिनल ,
निखळ मित्रत्व
कुठलीही भेसळ नाही !
त्या दोघांचीही केमिष्ट्री अशी जमलीय ,
जसं पाण्यातलं ऑक्सिजन , हायड्रोजन !!
एक असं रसायन
जे रासायनिक नाही !!!
उगाच खोटी प्रतिष्ठा नाही
का उगाच खोटे अवसान नाही .
जे काही असेल ते शुभ्र नि स्वच्छ !
कुणाला दुखवणे नाही ,
कुणाला जिंकवणे नाही ...
कुणाला हरवणे नाही !
कुटुंब वत्सल ,
आम्हा सहनिवासींचे आधारवड ,
सतीश सर -जया वहिनी
यांना लग्नगाठीच्या खूप खूप शुभेच्छा !

 - मंगलमुर्ती शास्त्री
 -सौ मीनल




पोहणेरकर सर अंनिव्हर्सरी


शुभेच्छा कवीला अन श्रोत्याला सुद्धा
समर्थ रामदास कवीचं कौतुक लिहिताना कवेश्वर स्तवनात लिहितात


आतां वंदूं कवेश्वर |
शब्दसृष्टीचे ईश्वर |
    नातरी हे परमेश्वर |
        वेदावतारी ||

कीं हे शब्दरत्नाचे सागर |
कीं हे मुक्तांचें मुक्त सरोवर |
नाना बुद्धीचे वैरागर | निर्माण जाले ।।

     वेदातील अफाट शब्दसृष्टी पाहून, कवी त्या वेदाचे अवतारच वाटतात. किंवा कवी म्हणजे वेदावतारी परमेश्वरच होत.
               शब्दरुप रत्नाचे सागर, अंतःकरण सरोवरात मुक्तपणे विहारणारे काव्यरुप मुक्तपुरुष, नाना प्रकारचे बुद्धीचे खेळ खेळणारे वैरागर ते हे कवी होत.

कवीचे कोण कौतुक बघा ! आणि प्रत्येक जण शत प्रतिशत सहमत असणारच .....

समर्थ तत्पूर्वीच श्रोते स्तवनही लिहितात !

तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति | तेथें माझी वित्पत्ती किती | बुद्धिहीन अल्पमती | सलगी करितों |
किं हे ऋषेश्वरांची मंडळी | शांतस्वरूप सत्वागळी | जयांचेनि सभामंडळीं | परम शोभा ||

                  कवी कितीही हुशार असेल , समोर श्रोता नसला तर त्याच्या कविता व्यर्थ आहेत ! ऐकणारा श्रोता तर हवाच ना , तोच काव्य सभेचा परम शोभा म्हणावा .....

आमच्या  कवीमित्रानी  आजच्याच दिवशी 29 वर्षांपूर्वी हक्काचा श्रोता घरी आणला  !

   प्रा विजय पोहणेरकर यांनी आजच्या दिवशी हहहे अंजु आवाज देऊन आपल्या कविता वर पहिली दाद अंजूची घेतली ! हा श्रोताही ज्ञानी निघाला ...त्याची दाद अखंड अन निर्विवाद  राहिली , आम्हाला कवीमित्र  मिळाला ...कविता मिळाल्या !! मिळत राहोत अनेकानेक वर्ष .... म्हणून
      
    प्रा विजय पोहणेरकर सर अन सौ अंजुवहिनी लग्नगाठीच्या अगणित शुभेच्छा

- मंगलमुर्ती शास्त्री
- सौ मीनल शास्त्री






Friday, May 22, 2020

नरदेह स्तवन

अत्यंत सुंदर असे वर्णन समर्थानी नरदेहाचे केलेले , पहिल्या दशकात दहाव्या समासात ! *नरदेहस्तवन*
   
*धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो* ..
 अशी सुरवात करत खूप छान गुणवर्णन नरदेहाचे करतानाच , नरदेह श्रेष्ठ का आहे हे हळूच विशद करतात समर्थ . सारासार विचार करण्याची जी ताकद या देहात आहे ती प्राण्यांमध्ये नाही .
 विचाराने चालणारे ते सिद्धी प्राप्त करतात वेगवेगळ्या विषयात तज्ञता मिळवतात .

 येक मनोसिद्ध,येक वाचासिद्ध।
      *येक अल्पसिद्ध, येक सर्व सिद्ध*

या सिद्धि प्राप्त लोकांचं छान वर्णन समर्थ करतात .आपण हे सतत अनुभवत असतोही 
        आम्ही पहिले तर चांगले काही करण्याचं  मनातच काही आणत नाही .मग घडणार काय ? मनोसिद्ध होण्याचं तर दूरच राहिले .

        मी स्वतः असं बरेचदा अनुभवतो कि काही लोक मनात काही आणतात अन त्याप्रमाणे घडत जाते  , काही जे बोलतात ते घडत जाते .काहींना लहानसहान गोष्टीत सिद्धि प्राप्त असते तर काही सर्व बाबतीत ! त्यांना आपण  सिद्धि प्राप्त म्हणतो ते संत सज्जन असतात .

आता माई रागे भरेल मी देत असलेल्या उदाहरणाने ...आम्ही पत्ते खेळतो दीपक दादा ...आणि हा जोक्कर म्हणत पत्त उचलतो अन जोकर काढतो मी त्याला वाचासिद्ध म्हणतो !!!
      गमतीचा भाग जाऊ देत , असे लोकं आपण अनुभवत असतो रोजच्या जीवनात !

*म्हणौनी नरदेह श्रेष्ठ । नाना देहां मध्ये वरीष्ठ* । *जयाचेनि चुके अरिष्टय।यमयातनेचे...*

अस वर्णन करता करता समर्थ अहंकाराने पीडित माणसाची गुर्मी उतरवतात अगदी सहजपणे !  उदाहरण देत याच समासात .

श्रेष्ठ आहे म्हणून कसेही वागले तरी चालेल असे नाही

तैसा नव्हे नरदेहो । इच्छा जावं अथवा राहो।
     .....याला कोणी पकडू शकत नाही असे नाही . नरदेह जपणे आवश्यकच आहे .मूर्ख माणूस उत्तम निर्व्यंग ( इतुके हे नसता वेंग।) देह मिळालेला असताना परमार्थ विसरून , मायेच्या जाळ्यात अडकून माजतो , त्याच्यात भ्रम पैदा होतो अन मी मी सुरू होते ते खूप छान वर्णिले समर्थांनी ... काय म्हणतात समर्थ ?

*मृत्तिका खाणोन घर केले* । *ते माझे ऐसें दृढ कल्पिले* ।
*परी ते बहुतांचे ,हे कळले* । *नाहीच तयाला ....*

माती खणून बंगला बांधला अन माझे घर माझे घर म्हणून फुशारक्या मारनाऱ्याना ते घर त्याचे नाही हे कळतच नाही !!

म्युषक म्हणती घर आमुचे ..आणखी कोण कोण ? पाली, मक्षिका, कातीनी, मुंगळे मुंग्या सॅप, विंचू, मांजरी कुत्रे,  वाळवी , पिसवा ....पशु घरचे नोकर दासी इतर माणसे , मित्र, चोर अन सरकार सुद्धा !

असे सगळे जण घर माझे म्हणतात हा मूर्खही बरळतो घर माझे , अखेर घर जड होते सोडून दुसरीकडे जातो ...

ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचिती ।
     *जन्म दो दिसांची वस्ती । कोठे तरी करावी ।*

जस घर आपले नाही तसे देह सुद्धा आपला नाही ! तो ही बहुतां कारणे निर्मिले ...कसे ! माणसाच्या डोक्यात उवा , एखादे गळु झाले का त्यात किडे, पोटात जंत , दाताला कीड कानाला कीड लागली का मग गोमाशा .... अशा बहुतासाठी ही तर हाच देह आहे ...अन मग मी पणा कशासाठी !

*ऐसें शरीर बहुतांचे । मूर्ख म्हणे आमुचे ।....*

मग देह कारणी लागायचा असेल तर परमार्थ महत्वाचा नाही तर आला तसा गेला ...

देह परमार्थी लाविले । तरीच याचे सार्थक जालें ।
 नाही तरी हे वैर्थ चि गेले । नाना आघाते मृत्यू पंथे ।।

               बाकी या मूर्ख नरदेहाचे वर्णन पुढे समर्थ करणारच आहेत .... मी पाहिले दशक संपवले वाचून .दासबोधाची वाचनात सुद्धा एक लय आहे त्या लयीत वाचले तर पटकन घुसते डोसक्यात ! मग होऊन जाऊ द्या  दासबोध पारायण ..बघा काही घुसते का  डोसक्यात !!

समर्थांच समग्र वाङ्मय एका अँप वर उपलब्ध आहे सगळ्यांनी  आपल्या मोबाईल मध्ये उतरवून वाचायला सोयीस्कर आहे .samagra Ramdas या नावाचे अँप

चला हा लॉक डाऊन सुफळ संपुर्ण होऊ देत....

जय जय रघुवीर समर्थ .

दासबोध ग्रंथ कैसा ?

दासबोध ग्रंथ कैसा ? सांगण्यासाठी समास पहिला ग्रंथारंभलक्षण समर्थांनी लिहिला आहे  . त्यात काय काय आहे ,थोडक्यात प्रस्तावनाच या समासात समर्थानी लिहिली आहे .
दासबोध हा गुरू शिष्य संवाद असून भक्तिमार्ग दाखवणे हा तर उद्देशच आहे .शुद्ध आत्मस्वरूप कसे, विदेहस्थिती कोणती , आणि अलिप्तता म्हणजे काय हे सांगत असतानाच उपासना कशी करावी, वेगवेगळ्या काव्यांची लक्षणे कोणती, चातुर्याची लक्षणे , प्रेमाच्या उत्पत्तीची लक्षणे , पंच महाभूतांची लक्षणे ,सृष्टीचा कर्ता धरता कोण यावर समर्थानी प्रकाश टाकला आहे .
           दासबोध 20 दशकात विभागलेला असून प्रत्येक दशकात 10 समास आहेत . प्रत्येक समास तुम्हांला समाधानाने  जगण्याची नवी दृष्टी देतो . दासबोध लिहिताना जे आधार ग्रंथ (referances) समर्थांनी अभ्यासले त्याचा उल्लेख या ग्रंथारंभ समासात उल्लेखिले आहेत . दासबोध प्रत्येकाने वाचलाच पाहिजे असा आहे . उगाच टीका करणाऱ्या बाबतीत समर्थ लिहितात

पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण ।उगा ठेवी जो दूषणं ।
                तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरे करी

दासबोधातून मिळणार काय आहे ? - माणसाचे वागणे बदलते ,संशयाचे भूत माणगुटीवरून उतरते , अहंकार , क्रोध दूर होतात .अज्ञान, दुःख , खोट्या समजुती दूर होतात .शिस्त लागते , माणसाला उत्तम गती लाभते , व्यावहारिक चातुर्य सुद्धा समर्थांनी दासबोधात शिकविले आहे .

नाना धोके देहबुद्धीचे। नाना किंत संदेहा चे ।
नाना उद्वेग संसाराचे ।नासती श्रवणे ।

इतके सगळे छान छान समर्थानी लिहिलेले आपण जन्मभर वाचलेच नाही तर ... श्रवणे चुके अधोगती । ऐसी याच्या जन्माची फलश्रुती ।

अर्थात समर्थ समास शेवटी समारोप करतात ....

जयाचा भावार्थ जैसा ।तयास लाभे तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । तयास तेचि प्राप्त ।।

तुमच्या डोक्यात मत्सर असेल तर तुम्हाला तेच मिळेल !

तुमच्या डोसक्यात पिरम आसल तर लोक तुमाले पिरम दावतील ....नाही का गडे हो !

दासबोध वाचलाच पाहिजे त्यांनी ज्यांना आयुष्यात उन्नती हवी आहे . सगळे विषय त्यांनी त्याकाळी हाताळले ते आजही उपयुक्तच आहेत .समर्थ दिव्य दृष्टीचे होते ...


Sunday, May 3, 2020

ये वादा रहा स्टोरी

विक्रम (ऋषिकपूर )राखीचा एकुलता एक पोरगा असतो राखी मोठ्या उद्योग घराण्याची चेअरमन असते.  विक्रम गायक कलाकार असतो तो एका सुनीता नावाच्या गायिकेच्या प्रेमात पडतो

    ती गरीब घरची असल्याने कहाणीला ट्विस्ट येतो .राखीला हे लग्न मान्य नसते , राखी काही वेगळेच ठरवते,  मात्र दोघे पळून जाऊन मंदिरात जाऊन , लग्न करायच्या आणाभाका घेतात ये वादा रहा !
             सुनीता ( पूनम ढिल्लो ) ऋषी मंदिरात येताना त्यांचा अपघात होतो . दोघे दवाखान्यात .सुनिताच्या चेहऱ्यात गाडीच्या  खिडकीच्या काचा  घुसल्याने ,  सुनीताचा  चेहरा खराब होतो .
राखी याचा फायदा घेत दोघांना दूर करण्याचा प्रयत्न करते .ती विक्रमला सुनीता अपघातात गेल्याचे सांगते तर सुनीताला विक्रम पासून त्याच्या जीवनातून  दूर व्हायला सांगते कारण तिचा खराब  चेहरा ! सुनीता याला तयार होते .

  नन्तर डॉक्टर तिला मुंबईला पाठवतात .सुनीताची तिची प्लास्टिक सर्जरी करतात

 तिची प्लास्टिक सर्जरी करणारे डॉक्टर मेहेरा (शम्मी कपूर ) तिला दुरुस्त करतो तिला नवीन चेहरा देतो नवीन सुनीता (टीना मुनीम) हि पुन्हा विक्रम च्या नावाने रडते . मात्र विक्रमच्या घरी जाताच त्याचे एनगेजमेंट राखी दुसऱ्याच उद्योगपतींच्या  मुलीशी (सारिका)  करत असते . डॉक्टर मेहेरा आणी  सुनीता त्यांच्या घरी परत जातात . विक्रमला सुनिता नी विसरावे म्हणून तिला नवीन नावाने कुसुम या नावाने नवीन जिंदगी सुरू करायला प्रवृत्त करतात .
          विक्रम आजूनही सुनीताच्याच प्रेमात असतो त्या चक्कर मध्ये तो सारिकेला टाळत असतो  .

  विक्रम आपले गाण्याचे कार्यक्रम थिएटर मध्ये लावतो त्या कार्यक्रमात सुनीता डॉक्टर मेहेरा सोबत जाते .न राहवून ती विक्रमला गाणं संपल्यानंतर स्टेज वर जाऊन गाणं म्हणते . विक्रम सुनीताला ओळखत नाही मात्र आवाज त्याच्या कानात भिनत असतो . त्याच्या मित्राला गोगा ला शोध घ्यायला सांगतो

तो बरोबर कुसुमला शोधतो .मग विक्रम कुसुमच्या मागे स्टेज शो करायला मागे लागतो ... कुसुम पहिले नकार देते .मात्र विक्रम मागेच असतो तो गेट बाहेर रात्रभर गाडीत वाट पहात बसतो . सकाळी कुसुम बाहेर पडते तो तिला गाडीत बसायचा आग्रह करतो ती नकार देत चालू लागते .तो एक सायकल वाला तिला सायकलवर लिफ्ट द्यायचे बोलतो मग विक्रम एक फाईट मारतो .....कुसुम विक्रमच्या गाडीत बसते .
        विक्रम कुसुमला गाण्यासाठी बोलतो तर ती नकार देते .मात्र विक्रम गावभर कार्यक्रमाचे मोठाले बॅनर लावतो .
कुसुम त्याचा जाब विचारायला घरी  जाते .
     ते बॅनर पाहून सारिका च्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात .ती या दोघांना एकत्र आणण्यासाठी राखीला बोलते .तिकडे डॉ मेहेरा राखीला बोलतात . कुसुम हीच सुनीता असल्याचे सांगतात शेवटी राखी विक्रमला कुसुम कडे म्हणजेच सुनीता कडे पाठवते
  तिकडे कुसुम पळून जाऊन त्यांनी जिथे शपथ घेतलेली असते तिथे शपथ मोडण्यासाठी गेलेली असते
              विक्रम तिथे पोहोचतो अन गोड शेवट होतो .

" मग काय होते ?' एक बालिश प्रश्न

काय होते काय ? ऋषिकपूर टीना मुनीम गळ्यात गळे घालून नाचतात ..... इति आई !!!

ऋषिकपूरचा " ये वादा रहा ' ची स्टोरी ! आजच TVवर पाहिला त्याची शीला मावशी किंवा स्व आई नी कशी स्टोरी सांगितली असती .....

एक प्रयत्न अगस्तीचाही ! एन्जॉय



    

Tuesday, April 28, 2020

अपर्णाताई श्रद्धांजली

ताई तुम्ही अगदी सहज निघून गेल्या .एक झंझावात विसावला .इथे चार दिवस मुक्कामी यायची त्यांची इच्छा तशीच राहिली . मार्च च्या सुरवातीला मिनल ला  फोन आला होता ..."मला यायचंय ,मला आता वेणी सुध्दा घालता येत नाही , तुलाच माझ्या वेनिफनी पासून सगळं करावं लागेल '' असं मीनल कडून चारदा कबूल करून घेतले मात्र सेवेची संधी न देताच निघून गेल्या .सौ मीनल शुभांगी वर निरतिशय प्रेम वर्षावणारया ताई , शुभुच्या लग्नाला येऊ शकल्या नव्हत्या त्यांनी जालण्याला जाऊन अजित शुभागींला आशीर्वाद देऊन आल्या होत्या .मंगळागौरीला दोन दिवस राहून लग्नातल्या अनुपस्थितीची त्यांनी भर काढली होती .
       अपर्णा ताई परंपरा वादी होत्या . माझे त्यांचे काही विचार पटायचे नाही खूप चर्चा व्हायची अन त्या विचार बदलायला लावायच्या  . त्या घरी आल्या की चैतन्य  असायचं ! आईची उणीव त्या घालवायच्या . त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्त्व , विचार , वाणी नतमस्तक करायची . कुटुंब कल्याण कुटुंब संस्था टिकण्यासाठी चे त्यांचे कष्ट अविरत होते . घरी पती  स्व अरुण जीचे आजारपण सांभाळत त्यांचे दौरे अव्याहत चालू होते .
      लव्ह जिहाद मध्ये धर्म सोडून गेलेल्या अनेक मुलींना त्यांनी पुन्हा परत आणले .त्याबाबतीत त्यांचे डेअरिंग अद्भुत होते . मालेगावच्या पळून नेलेली मुलगी त्यांनी स्वतः जाऊन सोडवून आणली होती !!
   पारधी समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांचे काम खूप होते !!
       एक हाऊसवाईफ स्त्री वयाच्या चाळिसाव्या वर्षी शाळेत दाखल होते अन कायद्याची पदवी मिळवत वकील होते . सगळेच अनोखे !! वकिलीला सुरवात करताना लक्षात येत की कुटुंब तुटणे चुकीचे आहे जोडले पाहिजे ...घटस्फोट कमी व्हायला पाहिजे , त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढते अन रूढी परंपराच हे काम करू शकतात ,पाश्चिमात्य विचारांचा आचारांचा , राहणीमानाचा पगडा दूर झाल्या शिवाय लग्न संस्था बळकट होणे नाही , हे लक्षात घेऊन देशभर एकट्या बळावर कार्यरत होते ...अन सगळ्या फुरोगाम्यांना टक्कर देत लोकप्रियता मिळवते हे एऱ्यागैरयाचे काम नव्हे .
          अपर्णा ताई  तुम्ही सहज निघून गेल्यात पोरकं केलंत अख्ख्या  महाराष्ट्राला !
              - मंगलमुर्ती शास्त्री

अपर्णा आजी श्रद्धांजली -शुभांगी

आज सकाळपासून जीव लागत नव्हता, कारण ही कळत नव्हतं.. खूप अस्वस्थता होती.. सकाळी सकाळी वाईट स्वप्न ही पडले.. कदाचित तेच कारण असेल अस्वस्थतेचे असे वाटले म्हणून दुसऱ्या गोष्टींमध्ये मन रमावण्याचा प्रयत्न केला..तरीसुद्धा तेच.. घरातले कामं संपल्यावर मोबाईल हातात घेताच एका ग्रुप मध्ये आईचा नुकताच आलेला मेसेज पहिला .. दुःखद निधन असा काहीसं होतं.. ग्रुप उघडताच आजींचा फोटो दिसला आणि अंगावर शहारे आले डोळ्यातून पाणी यायला लागलं .. अपर्णा आजी रामतीर्थकर गेल्या.. काय करावे कळेना .. सुचत नव्हतं...सगळे त्यांच्यासोबत घालवलेले क्षण डोळ्यासमोर उभे राहिले.. आत्ताच 14 मार्च ला मला म्हणाल्या की आई कडे ये राहायला 7 एप्रिल ला..मी येणार आहे.. माझा शेवटचा दौरा असेल तो .. तेवढाच राहणं होईल.. जवाईबापूंना सुद्धा घेऊन ये..

वाट बघत होती की कधी हे lockdown संपेल आणि आजींशी भेट होईल आणि अचानक ही बातमी ..

त्या पहिल्यांदा घरी आल्या तेव्हा मला नेमका या कोण आहेत काय करतात काहीच माहिती नव्हतं.. फक्त आईने सांगितले होते ... त्या खूप कडक आहेत ..बांगडी घाल..टिकली असू दे कपाळावर.. तशी ती नेहमीच असायची पण तरीसुद्धा भीती वाटत होती.. खूप लहान होती मी तेव्हा.. त्यांचा जबरदस्त कणखर आवाज सगळं व्यक्त करून जायचा..

पहिल्यांदा त्या घरी आल्या तेव्हा त्यांना आजी म्हणू तर त्यांना आवडेल का .. पण सगळे तर ताई म्हणतात..पण मी कसा ताई म्हणू... त्या किती मोठ्या आहेत.. असे प्रश्न होते..
त्यांनी आपुलकी नि जवळ घेत म्हटलं आजी म्हण.. माझी नात आहेस ना?

त्या दिवसापासून बाकी सर्वांकर्ता ताई आणि मला माझी आजी भेटली..

आजी घरात आल्या की वातावरण बदलून जात असत .. अगदी प्रफुल्लित होत असे.. घरात चर्चा व्हायच्या.. आजींना भेटायला येणारे लोकांची वर्दळ होत असे.. आजी प्रत्येकाचे प्रश्न एकदम स्वतःचा प्रश्न समजून सोडवत असे..
एखाद्याचं दुःख सांगताना त्यांच्या शब्दातून ती कळकळ जाणवायची..

आई च्या हातची कढी आवडत असे त्यांना खूप... नेहमी त्या आल्या की कढी करणं ठरलेलं.. मीनल मला तुझ्या हातची कढी खूप आवडते असा म्हणायच्या..

त्या पहिल्यांदा आल्या तेव्हा नुकतेच बाबा भाजप मध्ये कार्यरत झाले होते .. त्यांच्या बऱ्याच विषयावर चर्चा व्हायच्या.. त्यांना बाबांच्या कामाची जाणीव झाल्यावर, कोणतीही औरंगाबाद ची बातमी कळली की बाबांना फोन असे.. बिनधास्त पणे..

आजीच्या सोबत राहण्याचा त्यानंतर खूपदा योग आला त्यांच्या सोबत राहून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.. त्यांच्या व्याख्यानातून त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या .. त्या गोष्टी त्यांच्या वयक्तिक जीवनात सुद्धा पाळत असत.. आजच्या पिढीला त्यांच्या बऱ्याच गोष्टी न पटण्यासारख्या होत्या ..पण त्याचं सुद्धा समाधान होत त्यांच्याकडे.. कारणासहित..

माझ्या लग्नाला येऊ शकल्या नाही म्हणून वेळात वेळ काढून जालन्याला माझ्या घरी यायचे नियोजन केले.. आवर्जून येऊन आम्हा दोघांना आशीर्वाद दिला.. बाहेर आमच्या बाबांची Adv Sharad Wazarkar अशी पाटी बघताच मला विचारणा केली.. त्यांच्या field मधलं कोणीतरी माझ्या घरी आहे हे कळल्यावर आनंद झाला त्यांना.. खूप गप्पा मारल्या .. येताना माझ्याकरता स्वतः जाऊन विकत घेतलेली साडी आणली होती .. माझ्या आजीने घेतलेली साडी..
निघताना म्हणाल्या पुढच्या वेळेस जालन्याला अली की तुझ्याच कडे थांबेल...अगदी नक्की..
त्यांनतर माझ्या एका सणाला यायची इच्छा व्यक्त करत मंगळागौरी ला हजर झाल्या... अगदी आजीची भूमिका निभावत नातीचं कौतुक केलं..

मागच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सोलापूर ला आजींनी त्यांच्याशी निगडित असलेल्या सगळया कुटुंबाचं एकत्रीकरण केलं.. आई , सासूबाई , आजी-आजोबा गेले होते.. 200 ते 250 लोकांची ओळख करून देताना त्यांच्या हातात एक कागद सुद्धा नव्हतं.. आणि ओळख करून देताना नाव आणि गावच नाही तर त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहे, कोण काय करतं असे सगळे सांगितले.. जानेवारी मध्ये आमच्या आईची रिटायरमेंट होती .. अगदी ते सुद्धा लक्षात ठेवून सांगितले... सर्वांची विचारणा केली..

त्यांच्या कार्याबद्दल तर जितके लिहावे तितके कमीच आहे..
वयाच्या 40व्या वर्षी अभ्यास करून एवढ समाजकार्य करण्याचं सामर्थ्य खूप कमी लोकांजवळ असते .. त्यातीलच आजी एक..

लिहिताना कुठे थांबावं हे कळत नाहीये.. सांगायला आठवणी खूप आहे..पण..



🙏🏻ओम शांती🙏🏻 
                     

                        - शुभांगी

Saturday, April 18, 2020

माधुरी ताई चे अभिष्टचिंतन 61 टोटल

समया समे पळून
गर्दीत चेंगरून
मी ही दमून आलो
ती ही दमून आली

मी बैसलो जरासा
सोफ्यावरी निवांत
प्याला करी चहाचा
घेऊन तीच आली .....

कवी शैलेश हिंदळेकर यांच्या नोकरी करणाऱ्या महिलांबद्दलच्या  कवितेत सकाळीच वाचले . खरंच आहे , मिनल दुकानातून येते न येते तोच "भूक लागली गड्या ' अस्मादिकांनी बोलावे अन तिनी शेगडीवर कढई चढवावी !!
       नवरे ,पुरुष मंडळींचे एवढे लाड पुरवायला या महीला वर्गाला कुठून एव्हढी शक्ती येते कुणास ठाऊक .
      आज हे सगळे आठवण्याचं कारण म्हणजे सकाळी माधुरीताईच अभिष्टचिंतन करायला फोन केला अन गप्पा मारल्या . घर , कॉलेज, संस्था , भाषा सभा सांभाळायचं  म्हणजे किती उठापटक !!
       आज आमच्या या ताईबाई  61 पूर्ण करत्या झाल्या , गेल्या वर्षभरात आम्हाला एकसष्टी करण्याचे त्यानिमित्त तिचे कौतुक करण्याचे सुचले नाही . ... आता पंचात्तरी दणक्यात करू !
            सौ रश्मी रमेश नाईक, निवृत्त  प्राचार्या एच ए एल स्कूल , त्यांनतर काही वर्षे मॅनेजमेंट बॉडी मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन चे किचकट काम ! नासिक सारख्या शहरात संस्कृत भाषा सभेचे दायित्व पार पाडायचे , सोबत अन्न सेवा मंडळाच्या अन्न वाटप तेही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये !

             स्विटी सोनूचे लाड पुरवत ,  घरी यजमानांचा मधुमेह कंट्रोल करायचा सोबत देशस्थ ऋग्वेदी मंडळाच्या बैठकीला हजेरी लावायची , मंडळाचे पदसिद्ध दायित्व निभवायचे ,  भावाबहिणीसाठी !!
            
              भावाबहिणीसाठी यासाठी म्हणतो तिच्या ह्या ऍक्टव्हिटीचे लाभार्थी आहेत प्रशांत शास्त्री , विदुला ! आजची दुसरी उत्सव मूर्ती  अपूर्वा साठी मुजुमदार तिनेच शोधले तसे दिशापतीची  द्रुपदा हि तिचेच फाईंड .
            
             आता सगळे सोडून निवांत व्हायचा मानस तिनी बोलून दाखवला तो मीनं  चकटफु सल्ला देल्लाच .... आता तर खरे कामात राहायला पायजे नाहीतर घरात बसल्या बसल्या दुखणं काढशील ! ताई सामाजिक कामात गुंतवलं तरच समाधान अन तब्येत दोन्ही लाभतील . बाकी रहाटगाडगे तर नेहेमीचेच .

            दीर्घ निरामय आयुष्यासाठी , पंचात्तरी , सहस्त्र चंद्रा साठी शुभकामना ताई !
              

  

Sunday, April 12, 2020

पत्याच लगन

वडोद्याला बळीराम्बॉ च्या पत्या च्या लग्नाला गेलतो , बापा बापा
      सकाई 10वाजेच लगीन . सकाई पाच वाजेलाच औरंगाबाद हुन निगलो , तसं बी एक दोन घनटे तर लगीन लागायले लागतेच किनी बॉ !म्हणलं मीयुन जाईन .
    खामगाव नांदुरा खांडवी च्या रोडाणं दरमजल करत पोचलो साडे बाराले वडोद्यात . बिगी बिगी धापा टाकतच एस्टी तुन उडी मारून पयालो , लगन सापडलं तर सापडून जाईन  म्हनलं . ......  तो बैराम बॉ चौकातच  भेटले . दोनी पायावर बसेल , बहुतेक खाली मुंडकं घालून  विडी फुकत बसेल व्हते .
         त्याहिले बोल्लो का लगन लागलं वाटते ?  थ म्हणले नाही न भाऊ . लाईन मन म्हणते दोनाले लाईट देतो . माईक भोंग्या बिगर लगन कसं लावता .
     माया जीव भांड्यात पडला . म्हंजी लगन दोन वाजेपतूर लागे ना . आपण दुरून जाऊन गाठलं .
      पण बॉ इकडं काय करत व्हते चौकात . त्यायच्या घरी मंडप आसन ना . पौने रावळे सोडून बुवा इकडं कुठं !  मायी मनात पाल चुकचुकली . कायी तरी गडबड हाय .
      बिगी बिगी घरी गेलो तो ... कयलं बुवाचे सात का पाच जावाई रुसून बसेल होते , कुनाले मुदी पैजे व्हती त कुनाले सफारी .
   मधले तीन जावई तर अशे रुसले व्हते का त्यायच्या साठी आनेल  पहिल्या धारेची कॅन मास्तरनं लपून थेवल व्हती . गावातलं हे रघु मास्तर  पण फार बिगडेल व्हतं !! आता बुवांच्या घरचं लगीन मास्तर न कायला मदे मदे करा ! बैराम बॉ मास्तरचं सेतावर काम करे , अन पत्याच्या लगनाला कायी मदत बी देल्ली आसन , पन मनुन का कायदे कानून सिकवा का ? बुवाचे सगळं जावई वैतागेल होते कारन  मास्तरन सांगतलं व्हतं का लगन लागल्याबिगर दारू सारू नै ..  तिकडं लाईन मन लाईट देत नोता इकडं मास्तर टाईट हु देत नोता .
          तवा माया ध्यानी आलं का लगन घर सोडून बैराम बॉ चौका मंदी विडी सिलगाऊन का बसेल व्हते !!!
         पत्याच्या लगनाची पंगत जेवलो, मावशीच्या घरूनच वाटी पेला नेलता !  बुवाच्या घराच्या मागल्या गल्लीत पंगत होती बहुदा तिथं जेवलो . लाईन मन च काई मन झालं नई का लवकर लाईन द्यावी . चार वाजोले त्यानं . मायी परत जा ची गाडी साडेतीनाची . दोनशे मैलावरून लग्नाले गेलतो . टायमात गेलतो पन लगन काई लावू शकलो नाई . परत आलो,  हाय कीनी मज्जा ....

- अगस्ती

Wednesday, February 26, 2020

जिवेत शरदा शतम

या जन्माची गत जन्माची पुण्याई सुफलो
विघ्नविनाशक गणेश तुम्हा वर देवो सुखदम
जिवेत शरदा शतम । जिवेत शरदा शतम

पुत्र पौत्र धन धान्य संपदा वर्षतु तुमच्या गेही
विजयश्रीची अवती भवती सदा फिरो ग्वाही
उणीव कसली तुम्हा न भासो आस हीच नित्यम

उभय लोकीचे सौख्य साधन्या स्मरा पंच साधना
जिवा शिवाचे ऐक्य साधने नको दुजी कल्पना
नर जन्माचे सार्थक व्हावे आस हिच नित्यम
जिवेत शरदा शतम । जिवेत शरदा शतम





Wednesday, February 19, 2020

कामधेनु परभणी विशीत

आज शिवजयंती !
शिवप्रभुंना अभिवादन !!
कामधेनु पशुऔषधालय परभणीला विसावे लागले !
परभणीला दुकान टाकायचे ठरल्यावर मुहूर्त भाऊंना विचारला तर शिवजयंतीचाच सांगितला ,  पंचांग न पाहता ।।
कामधेनु औरंगाबाद साठी 1 मे महाराष्ट्र दिन,  कामगार दिवस अन अक्षय तृतीया असा योग होता , दुकान शिफ्ट केल्यावर 26 जानेवारी मुहूर्त होता यावेळी परभणीला शिवजयंतीचा ...
      19 फेब्रुवारी2001 चे पंचांग आज नेट वर पाहिले मुहूर्त बरोबर होता का नाही ते !!!! अगदी अचूक निघाला विजया एकादशी होती त्या दिवशी . शुभ मुहूर्त !
         माझ्यासाठी उत्साह असेल तो दिवस मुहूर्ताचा !  या दिवशी अख्खे शहर उत्साहात नहालेले असते  .असो
         चि हेरंबचे खूप खूप अभिनंदन . त्याने दुकानदारी चांगली केली . त्याला सुष्माची चांगली साथ म्हणजे दुकानात जरी ती गेली नाही तरी घरची किरकिर मागे लावली नाही, घर चांगले सांभाळले  !!!!
          दुकान छान चालले . कामधेनुनी नाव दिले हेरंबला . अनोळखी शहरात ओळख दिली .

मनःपूर्वक शुभेच्छा !

-अगस्ती