आज सकाळपासून जीव लागत नव्हता, कारण ही कळत नव्हतं.. खूप अस्वस्थता होती.. सकाळी सकाळी वाईट स्वप्न ही पडले.. कदाचित तेच कारण असेल अस्वस्थतेचे असे वाटले म्हणून दुसऱ्या गोष्टींमध्ये मन रमावण्याचा प्रयत्न केला..तरीसुद्धा तेच.. घरातले कामं संपल्यावर मोबाईल हातात घेताच एका ग्रुप मध्ये आईचा नुकताच आलेला मेसेज पहिला .. दुःखद निधन असा काहीसं होतं.. ग्रुप उघडताच आजींचा फोटो दिसला आणि अंगावर शहारे आले डोळ्यातून पाणी यायला लागलं .. अपर्णा आजी रामतीर्थकर गेल्या.. काय करावे कळेना .. सुचत नव्हतं...सगळे त्यांच्यासोबत घालवलेले क्षण डोळ्यासमोर उभे राहिले.. आत्ताच 14 मार्च ला मला म्हणाल्या की आई कडे ये राहायला 7 एप्रिल ला..मी येणार आहे.. माझा शेवटचा दौरा असेल तो .. तेवढाच राहणं होईल.. जवाईबापूंना सुद्धा घेऊन ये..
वाट बघत होती की कधी हे lockdown संपेल आणि आजींशी भेट होईल आणि अचानक ही बातमी ..
त्या पहिल्यांदा घरी आल्या तेव्हा मला नेमका या कोण आहेत काय करतात काहीच माहिती नव्हतं.. फक्त आईने सांगितले होते ... त्या खूप कडक आहेत ..बांगडी घाल..टिकली असू दे कपाळावर.. तशी ती नेहमीच असायची पण तरीसुद्धा भीती वाटत होती.. खूप लहान होती मी तेव्हा.. त्यांचा जबरदस्त कणखर आवाज सगळं व्यक्त करून जायचा..
पहिल्यांदा त्या घरी आल्या तेव्हा त्यांना आजी म्हणू तर त्यांना आवडेल का .. पण सगळे तर ताई म्हणतात..पण मी कसा ताई म्हणू... त्या किती मोठ्या आहेत.. असे प्रश्न होते..
त्यांनी आपुलकी नि जवळ घेत म्हटलं आजी म्हण.. माझी नात आहेस ना?
त्या दिवसापासून बाकी सर्वांकर्ता ताई आणि मला माझी आजी भेटली..
आजी घरात आल्या की वातावरण बदलून जात असत .. अगदी प्रफुल्लित होत असे.. घरात चर्चा व्हायच्या.. आजींना भेटायला येणारे लोकांची वर्दळ होत असे.. आजी प्रत्येकाचे प्रश्न एकदम स्वतःचा प्रश्न समजून सोडवत असे..
एखाद्याचं दुःख सांगताना त्यांच्या शब्दातून ती कळकळ जाणवायची..
आई च्या हातची कढी आवडत असे त्यांना खूप... नेहमी त्या आल्या की कढी करणं ठरलेलं.. मीनल मला तुझ्या हातची कढी खूप आवडते असा म्हणायच्या..
त्या पहिल्यांदा आल्या तेव्हा नुकतेच बाबा भाजप मध्ये कार्यरत झाले होते .. त्यांच्या बऱ्याच विषयावर चर्चा व्हायच्या.. त्यांना बाबांच्या कामाची जाणीव झाल्यावर, कोणतीही औरंगाबाद ची बातमी कळली की बाबांना फोन असे.. बिनधास्त पणे..
आजीच्या सोबत राहण्याचा त्यानंतर खूपदा योग आला त्यांच्या सोबत राहून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.. त्यांच्या व्याख्यानातून त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या .. त्या गोष्टी त्यांच्या वयक्तिक जीवनात सुद्धा पाळत असत.. आजच्या पिढीला त्यांच्या बऱ्याच गोष्टी न पटण्यासारख्या होत्या ..पण त्याचं सुद्धा समाधान होत त्यांच्याकडे.. कारणासहित..
माझ्या लग्नाला येऊ शकल्या नाही म्हणून वेळात वेळ काढून जालन्याला माझ्या घरी यायचे नियोजन केले.. आवर्जून येऊन आम्हा दोघांना आशीर्वाद दिला.. बाहेर आमच्या बाबांची Adv Sharad Wazarkar अशी पाटी बघताच मला विचारणा केली.. त्यांच्या field मधलं कोणीतरी माझ्या घरी आहे हे कळल्यावर आनंद झाला त्यांना.. खूप गप्पा मारल्या .. येताना माझ्याकरता स्वतः जाऊन विकत घेतलेली साडी आणली होती .. माझ्या आजीने घेतलेली साडी..
निघताना म्हणाल्या पुढच्या वेळेस जालन्याला अली की तुझ्याच कडे थांबेल...अगदी नक्की..
त्यांनतर माझ्या एका सणाला यायची इच्छा व्यक्त करत मंगळागौरी ला हजर झाल्या... अगदी आजीची भूमिका निभावत नातीचं कौतुक केलं..
मागच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सोलापूर ला आजींनी त्यांच्याशी निगडित असलेल्या सगळया कुटुंबाचं एकत्रीकरण केलं.. आई , सासूबाई , आजी-आजोबा गेले होते.. 200 ते 250 लोकांची ओळख करून देताना त्यांच्या हातात एक कागद सुद्धा नव्हतं.. आणि ओळख करून देताना नाव आणि गावच नाही तर त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहे, कोण काय करतं असे सगळे सांगितले.. जानेवारी मध्ये आमच्या आईची रिटायरमेंट होती .. अगदी ते सुद्धा लक्षात ठेवून सांगितले... सर्वांची विचारणा केली..
त्यांच्या कार्याबद्दल तर जितके लिहावे तितके कमीच आहे..
वयाच्या 40व्या वर्षी अभ्यास करून एवढ समाजकार्य करण्याचं सामर्थ्य खूप कमी लोकांजवळ असते .. त्यातीलच आजी एक..
लिहिताना कुठे थांबावं हे कळत नाहीये.. सांगायला आठवणी खूप आहे..पण..
🙏🏻ओम शांती🙏🏻
- शुभांगी
वाट बघत होती की कधी हे lockdown संपेल आणि आजींशी भेट होईल आणि अचानक ही बातमी ..
त्या पहिल्यांदा घरी आल्या तेव्हा मला नेमका या कोण आहेत काय करतात काहीच माहिती नव्हतं.. फक्त आईने सांगितले होते ... त्या खूप कडक आहेत ..बांगडी घाल..टिकली असू दे कपाळावर.. तशी ती नेहमीच असायची पण तरीसुद्धा भीती वाटत होती.. खूप लहान होती मी तेव्हा.. त्यांचा जबरदस्त कणखर आवाज सगळं व्यक्त करून जायचा..
पहिल्यांदा त्या घरी आल्या तेव्हा त्यांना आजी म्हणू तर त्यांना आवडेल का .. पण सगळे तर ताई म्हणतात..पण मी कसा ताई म्हणू... त्या किती मोठ्या आहेत.. असे प्रश्न होते..
त्यांनी आपुलकी नि जवळ घेत म्हटलं आजी म्हण.. माझी नात आहेस ना?
त्या दिवसापासून बाकी सर्वांकर्ता ताई आणि मला माझी आजी भेटली..
आजी घरात आल्या की वातावरण बदलून जात असत .. अगदी प्रफुल्लित होत असे.. घरात चर्चा व्हायच्या.. आजींना भेटायला येणारे लोकांची वर्दळ होत असे.. आजी प्रत्येकाचे प्रश्न एकदम स्वतःचा प्रश्न समजून सोडवत असे..
एखाद्याचं दुःख सांगताना त्यांच्या शब्दातून ती कळकळ जाणवायची..
आई च्या हातची कढी आवडत असे त्यांना खूप... नेहमी त्या आल्या की कढी करणं ठरलेलं.. मीनल मला तुझ्या हातची कढी खूप आवडते असा म्हणायच्या..
त्या पहिल्यांदा आल्या तेव्हा नुकतेच बाबा भाजप मध्ये कार्यरत झाले होते .. त्यांच्या बऱ्याच विषयावर चर्चा व्हायच्या.. त्यांना बाबांच्या कामाची जाणीव झाल्यावर, कोणतीही औरंगाबाद ची बातमी कळली की बाबांना फोन असे.. बिनधास्त पणे..
आजीच्या सोबत राहण्याचा त्यानंतर खूपदा योग आला त्यांच्या सोबत राहून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.. त्यांच्या व्याख्यानातून त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या .. त्या गोष्टी त्यांच्या वयक्तिक जीवनात सुद्धा पाळत असत.. आजच्या पिढीला त्यांच्या बऱ्याच गोष्टी न पटण्यासारख्या होत्या ..पण त्याचं सुद्धा समाधान होत त्यांच्याकडे.. कारणासहित..
माझ्या लग्नाला येऊ शकल्या नाही म्हणून वेळात वेळ काढून जालन्याला माझ्या घरी यायचे नियोजन केले.. आवर्जून येऊन आम्हा दोघांना आशीर्वाद दिला.. बाहेर आमच्या बाबांची Adv Sharad Wazarkar अशी पाटी बघताच मला विचारणा केली.. त्यांच्या field मधलं कोणीतरी माझ्या घरी आहे हे कळल्यावर आनंद झाला त्यांना.. खूप गप्पा मारल्या .. येताना माझ्याकरता स्वतः जाऊन विकत घेतलेली साडी आणली होती .. माझ्या आजीने घेतलेली साडी..
निघताना म्हणाल्या पुढच्या वेळेस जालन्याला अली की तुझ्याच कडे थांबेल...अगदी नक्की..
त्यांनतर माझ्या एका सणाला यायची इच्छा व्यक्त करत मंगळागौरी ला हजर झाल्या... अगदी आजीची भूमिका निभावत नातीचं कौतुक केलं..
मागच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सोलापूर ला आजींनी त्यांच्याशी निगडित असलेल्या सगळया कुटुंबाचं एकत्रीकरण केलं.. आई , सासूबाई , आजी-आजोबा गेले होते.. 200 ते 250 लोकांची ओळख करून देताना त्यांच्या हातात एक कागद सुद्धा नव्हतं.. आणि ओळख करून देताना नाव आणि गावच नाही तर त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहे, कोण काय करतं असे सगळे सांगितले.. जानेवारी मध्ये आमच्या आईची रिटायरमेंट होती .. अगदी ते सुद्धा लक्षात ठेवून सांगितले... सर्वांची विचारणा केली..
त्यांच्या कार्याबद्दल तर जितके लिहावे तितके कमीच आहे..
वयाच्या 40व्या वर्षी अभ्यास करून एवढ समाजकार्य करण्याचं सामर्थ्य खूप कमी लोकांजवळ असते .. त्यातीलच आजी एक..
लिहिताना कुठे थांबावं हे कळत नाहीये.. सांगायला आठवणी खूप आहे..पण..
🙏🏻ओम शांती🙏🏻
- शुभांगी
No comments:
Post a Comment