आज सुमन आत्याचा वाढ दिवस ! डोक्यात आत्या या नात्याविषयी काही आठवायचा प्रयत्न केला तर ......
बहिणाबाई या थोर कवियत्रीची रचना सहज आठवली . त्यांनी लिहिले मात्र ...
माय म्हनता म्हनता
ओट ओटालागी भिडे
आत्या म्हनता म्हनता
केवडे *अंतर* पडे
खरचं मी नात्यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा आत्या किंचित दुर्लक्षित नात वाटलं .बहिणाबाईंच्या नातं उलघडणारी जी कविता त्यातही त्यांना आलेले अनुभव असतील कदाचित , पण त्यांनी काका आत्या वगैरेंना दुर ढकललं .आई मामा मावशी जवळ च्या तर ..बाप काका आत्या ....दूरच्या
कदाचित रचना लिहिणाऱ्या बहिणाबाई सासुरवाशींनीच्या नजरेतून लिहित्या झाल्या असतील .....असो !
खर तर विषय सुमन आत्याच्या वाढदिवस अभिष्टचिंतनाचा ! सुमन आत्या नी मात्र *अंतर* पडू दिले नाही . तिच्या लहान भावाचे मुलांना तिनं भारीच लळा लावला . लहानपणापासून आम्ही सुट्या लागल्या की आत्याच्या घरी त्या गोवर्धनचाळीत जायचो . अन तिथून पुढे आजोळी . स्वतः उपाशी तापाशी राहत आपली ड्युटी बजावत घरी आम्हा सगळ्यांचे लाड करायला तयार !
बर झालं आम्ही वर्षातले काहीच दिवस तिच्या कडे असायचो .... नसता सगळेच " *बबड्या'* चे अवतार झालो असते . अमर्याद लाड करणे तिचा जन्म सिद्ध हक्क आहे .
तर अशी हि आमची आत्या . कष्ट तिच्या पत्रिकेत लिहिलेले जन्मापासून . सुखाचे दिवस कशाशी खातात तिला माहीत नाही . अर्थात तिची इच्छा ही नाही! पार पायानं लंगडत का होईना तुमची आवभागत झालीच पाहिजे यातच तिला सुख .... अगस्ती माझ्याकडे खातच नाही म्हणत ती खाऊ पिऊ घातल्या शिवाय राहत नाही .
तिनं स्वतःच्या बहीण भावाना जसं जपलं तसेच दीर नन्दाना सुद्धा ! त्यामुळे घरी पाहुण्यांचा राबता नेहमीचाच . तरीही तिची तक्रार असतेच "तो येत नाही , ती येत नाही '
अस्मादिकांना अत्याशी भांडताना भल्ली मजा येते !
तिच्या कष्टाची आठवण झाली तरी अंगावर शहारे यावे इतके ! सगळे स्वतः हुन ओढवून घेतलेले . नोकरीत तिनं यवतमाळ चांदुर बाजार तळेगाव दशासर ते अंजनगाव बारी असे अपडाऊन झेलले ..... आता तुम्ही म्हणाल त्यात काय मोठे !
मी शेवटच्या तिच्या अंजनगाव बारी च्या ड्युटीचा साक्षीदार आहे . यशोदा नगर ते राजपेठ शेअर रिक्षा तिथून बडनेरा शेअर रिक्षा तिथून अंजनगाव शेअर रिक्षा किंवा बस सकाळी जाणे दुपारी निघणे ..... त्यात काय मोठे असंही तुम्हाला वाटू शकते ! पण हे सुमन आत्याने करणे यात कष्ट दडलेले आहेत . इतरांनी करणे अन सुमनआत्या ने करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे . तिचे सोवळे ओवळे तिला बाहेर च पाणी सुद्धा निषिद्ध करत असे अन मग अक्षरशः शब्दशः उपाशी राहत ती ड्युटी . याला खूप मोठा निग्रह लागतो . घरून पाणी पिऊन निघाल्यावर घरीच पाणी पिणार . हि आहे सुमन आत्या !
सुखाचे दिवस दिसणार आता , शेवटचा पूर्ण पगार घेऊन घरी जातच होती का रिक्षां नी अपघात केला , तिला जायबंदी केले . हे सगळे असेच तिला सतत झेलावे लागले . सिलेंडर अपघात तर भीषणच होता .
सासुरवशींनीच्या सर्व कथा बहुदा तिच्या नशिबी आलेल्या ! कायम दबलेल्या स्वरात जीवन गेलं . (हा माझा अंदाज ) तिनी आजपर्यंत कधी सासरच्या मंडळी बद्दल काहो सांगितल्याचे मला आठवत नाही . सुमनचे प्रतिनाव *सहन* ठेवावे .... आजच्या मुलींनी शिकावं !
आमच्या नशिबाने स्व बाळासाहेब (आत्याचे यजमान) प्रभाकररावांच्या मुलांचे "लाड 'च करायचे . त्यांनीही खूप प्रेम आम्हा चौघा भावंडांवर केले . साळ्याच्या मुलांकडे विशेष लक्ष द्यायचे . या सगळया गोष्टींमुळे कधीही सुमनआत्याला चुकवून अमरावती ओलांडवत नाही .
" *आणि घरी गेल्यावर खोट खोटं रागावणे मग हळूच जवळ घेणे . निघताना डोळ्यात पाणी आणणं . अस निर्व्याज प्रेम ! खरच आपण किती नशीबवान ''* मिनल म्हणतेय अन ते शत प्रतिशत खरंय .शुभांगी साठी इतक्या व्याधीं घरी ठेवून आत्या लग्नाला हजेरी लावती झाली . बोलण्याची सुरवात " माझी नात कशी आहे ? ' अशीच होणार . मी आलो न माझ्याविषयी विचार म्हणत आमची भांडणाला सुरवात !!
अशी आमची आत्या *सुमनताई देशपांडे* ,यशोदानगर अमरावती , आज 87 पूर्ण करत आहे . तिच्या शतकी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना टकाटक, निरामय , आंनदी आयुष्य दे *माय अंबाबाई* इतकंच मागणं .
या निमित्तानं तिचे गुरू *सद्गुरू नारायण गुरू* महाराजांना साष्टांग दंडवत . छान सुखाचे आयुष्य वाटेला येऊ द्या , गुरू चरणी विंनती .
- अगस्ती
No comments:
Post a Comment