विक्रम (ऋषिकपूर )राखीचा एकुलता एक पोरगा असतो राखी मोठ्या उद्योग घराण्याची चेअरमन असते. विक्रम गायक कलाकार असतो तो एका सुनीता नावाच्या गायिकेच्या प्रेमात पडतो
ती गरीब घरची असल्याने कहाणीला ट्विस्ट येतो .राखीला हे लग्न मान्य नसते , राखी काही वेगळेच ठरवते, मात्र दोघे पळून जाऊन मंदिरात जाऊन , लग्न करायच्या आणाभाका घेतात ये वादा रहा !
सुनीता ( पूनम ढिल्लो ) ऋषी मंदिरात येताना त्यांचा अपघात होतो . दोघे दवाखान्यात .सुनिताच्या चेहऱ्यात गाडीच्या खिडकीच्या काचा घुसल्याने , सुनीताचा चेहरा खराब होतो .
राखी याचा फायदा घेत दोघांना दूर करण्याचा प्रयत्न करते .ती विक्रमला सुनीता अपघातात गेल्याचे सांगते तर सुनीताला विक्रम पासून त्याच्या जीवनातून दूर व्हायला सांगते कारण तिचा खराब चेहरा ! सुनीता याला तयार होते .
नन्तर डॉक्टर तिला मुंबईला पाठवतात .सुनीताची तिची प्लास्टिक सर्जरी करतात
तिची प्लास्टिक सर्जरी करणारे डॉक्टर मेहेरा (शम्मी कपूर ) तिला दुरुस्त करतो तिला नवीन चेहरा देतो नवीन सुनीता (टीना मुनीम) हि पुन्हा विक्रम च्या नावाने रडते . मात्र विक्रमच्या घरी जाताच त्याचे एनगेजमेंट राखी दुसऱ्याच उद्योगपतींच्या मुलीशी (सारिका) करत असते . डॉक्टर मेहेरा आणी सुनीता त्यांच्या घरी परत जातात . विक्रमला सुनिता नी विसरावे म्हणून तिला नवीन नावाने कुसुम या नावाने नवीन जिंदगी सुरू करायला प्रवृत्त करतात .
विक्रम आजूनही सुनीताच्याच प्रेमात असतो त्या चक्कर मध्ये तो सारिकेला टाळत असतो .
विक्रम आपले गाण्याचे कार्यक्रम थिएटर मध्ये लावतो त्या कार्यक्रमात सुनीता डॉक्टर मेहेरा सोबत जाते .न राहवून ती विक्रमला गाणं संपल्यानंतर स्टेज वर जाऊन गाणं म्हणते . विक्रम सुनीताला ओळखत नाही मात्र आवाज त्याच्या कानात भिनत असतो . त्याच्या मित्राला गोगा ला शोध घ्यायला सांगतो
तो बरोबर कुसुमला शोधतो .मग विक्रम कुसुमच्या मागे स्टेज शो करायला मागे लागतो ... कुसुम पहिले नकार देते .मात्र विक्रम मागेच असतो तो गेट बाहेर रात्रभर गाडीत वाट पहात बसतो . सकाळी कुसुम बाहेर पडते तो तिला गाडीत बसायचा आग्रह करतो ती नकार देत चालू लागते .तो एक सायकल वाला तिला सायकलवर लिफ्ट द्यायचे बोलतो मग विक्रम एक फाईट मारतो .....कुसुम विक्रमच्या गाडीत बसते .
विक्रम कुसुमला गाण्यासाठी बोलतो तर ती नकार देते .मात्र विक्रम गावभर कार्यक्रमाचे मोठाले बॅनर लावतो .
कुसुम त्याचा जाब विचारायला घरी जाते .
ते बॅनर पाहून सारिका च्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात .ती या दोघांना एकत्र आणण्यासाठी राखीला बोलते .तिकडे डॉ मेहेरा राखीला बोलतात . कुसुम हीच सुनीता असल्याचे सांगतात शेवटी राखी विक्रमला कुसुम कडे म्हणजेच सुनीता कडे पाठवते
तिकडे कुसुम पळून जाऊन त्यांनी जिथे शपथ घेतलेली असते तिथे शपथ मोडण्यासाठी गेलेली असते
विक्रम तिथे पोहोचतो अन गोड शेवट होतो .
" मग काय होते ?' एक बालिश प्रश्न
काय होते काय ? ऋषिकपूर टीना मुनीम गळ्यात गळे घालून नाचतात ..... इति आई !!!
ऋषिकपूरचा " ये वादा रहा ' ची स्टोरी ! आजच TVवर पाहिला त्याची शीला मावशी किंवा स्व आई नी कशी स्टोरी सांगितली असती .....
एक प्रयत्न अगस्तीचाही ! एन्जॉय
ती गरीब घरची असल्याने कहाणीला ट्विस्ट येतो .राखीला हे लग्न मान्य नसते , राखी काही वेगळेच ठरवते, मात्र दोघे पळून जाऊन मंदिरात जाऊन , लग्न करायच्या आणाभाका घेतात ये वादा रहा !
सुनीता ( पूनम ढिल्लो ) ऋषी मंदिरात येताना त्यांचा अपघात होतो . दोघे दवाखान्यात .सुनिताच्या चेहऱ्यात गाडीच्या खिडकीच्या काचा घुसल्याने , सुनीताचा चेहरा खराब होतो .
राखी याचा फायदा घेत दोघांना दूर करण्याचा प्रयत्न करते .ती विक्रमला सुनीता अपघातात गेल्याचे सांगते तर सुनीताला विक्रम पासून त्याच्या जीवनातून दूर व्हायला सांगते कारण तिचा खराब चेहरा ! सुनीता याला तयार होते .
नन्तर डॉक्टर तिला मुंबईला पाठवतात .सुनीताची तिची प्लास्टिक सर्जरी करतात
तिची प्लास्टिक सर्जरी करणारे डॉक्टर मेहेरा (शम्मी कपूर ) तिला दुरुस्त करतो तिला नवीन चेहरा देतो नवीन सुनीता (टीना मुनीम) हि पुन्हा विक्रम च्या नावाने रडते . मात्र विक्रमच्या घरी जाताच त्याचे एनगेजमेंट राखी दुसऱ्याच उद्योगपतींच्या मुलीशी (सारिका) करत असते . डॉक्टर मेहेरा आणी सुनीता त्यांच्या घरी परत जातात . विक्रमला सुनिता नी विसरावे म्हणून तिला नवीन नावाने कुसुम या नावाने नवीन जिंदगी सुरू करायला प्रवृत्त करतात .
विक्रम आजूनही सुनीताच्याच प्रेमात असतो त्या चक्कर मध्ये तो सारिकेला टाळत असतो .
विक्रम आपले गाण्याचे कार्यक्रम थिएटर मध्ये लावतो त्या कार्यक्रमात सुनीता डॉक्टर मेहेरा सोबत जाते .न राहवून ती विक्रमला गाणं संपल्यानंतर स्टेज वर जाऊन गाणं म्हणते . विक्रम सुनीताला ओळखत नाही मात्र आवाज त्याच्या कानात भिनत असतो . त्याच्या मित्राला गोगा ला शोध घ्यायला सांगतो
तो बरोबर कुसुमला शोधतो .मग विक्रम कुसुमच्या मागे स्टेज शो करायला मागे लागतो ... कुसुम पहिले नकार देते .मात्र विक्रम मागेच असतो तो गेट बाहेर रात्रभर गाडीत वाट पहात बसतो . सकाळी कुसुम बाहेर पडते तो तिला गाडीत बसायचा आग्रह करतो ती नकार देत चालू लागते .तो एक सायकल वाला तिला सायकलवर लिफ्ट द्यायचे बोलतो मग विक्रम एक फाईट मारतो .....कुसुम विक्रमच्या गाडीत बसते .
विक्रम कुसुमला गाण्यासाठी बोलतो तर ती नकार देते .मात्र विक्रम गावभर कार्यक्रमाचे मोठाले बॅनर लावतो .
कुसुम त्याचा जाब विचारायला घरी जाते .
ते बॅनर पाहून सारिका च्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात .ती या दोघांना एकत्र आणण्यासाठी राखीला बोलते .तिकडे डॉ मेहेरा राखीला बोलतात . कुसुम हीच सुनीता असल्याचे सांगतात शेवटी राखी विक्रमला कुसुम कडे म्हणजेच सुनीता कडे पाठवते
तिकडे कुसुम पळून जाऊन त्यांनी जिथे शपथ घेतलेली असते तिथे शपथ मोडण्यासाठी गेलेली असते
विक्रम तिथे पोहोचतो अन गोड शेवट होतो .
" मग काय होते ?' एक बालिश प्रश्न
काय होते काय ? ऋषिकपूर टीना मुनीम गळ्यात गळे घालून नाचतात ..... इति आई !!!
ऋषिकपूरचा " ये वादा रहा ' ची स्टोरी ! आजच TVवर पाहिला त्याची शीला मावशी किंवा स्व आई नी कशी स्टोरी सांगितली असती .....
एक प्रयत्न अगस्तीचाही ! एन्जॉय
No comments:
Post a Comment