पानं

Thursday, May 30, 2019

पितृदिन 10सेप्टेंबर आईव भाऊन्ना विनम्र अभिवादन

        पिठोरी अमावास्येला अमरावतीला होतो .यश अन चिनू (मावस भाऊ ) भावांच्या पाठीवर बहिणीनं (डो पूर्वा )काकडी फोडत भावासाठी इडा पीडा टळो अशी अर्चना केली .
     आज मातृदिन सुद्धा होताच . आईनं आम्हाला पोरकं करण्याला आता वीस वर्षे झाली . उण्यापुऱ्या54 वर्षाच्या तिच्या आयुष्यात 35 वर्ष तिनं आई म्हणून पोट्ट्यांना सर्विस दिली .पोरांना आईच्या सेवेची थोडीही  उतराई करायची संधी न देता अचानक निघून गेली .
             मातृदिन कधी साजरा केला नाही ,त्याबद्दल माहितीही नव्हती ! मात्र आजकालच्या "दिन ' प्रथेनुसार खरेच सगळ्यानी आपल्या आईला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक सेलेब्रशन करायला हवे . त्यानिमित्ताने कृतज्ञतेची जाणिव निर्माण होईल , नसेल तर ! आणि असलीच तर व्यक्त करायला संधी ! कधी कुणी दरवर्षी एकदा तरी  आई "मी तुझा आभारी'  आहे असे म्हटल्याचे ऐकिवात नाही , ते होईल !  आई म्हणजे मुलांनी  अधिकाराने राबवण्यासाठीच दिलेली , अन तीही अपत्यप्रेमाने राबत असते !

    असो आईने ती संधी आम्हा भावंडाना दिली नाही , जेव्हा होती तेव्हा हि अक्कल नव्हती ! एकशष्टी , 75रीची वेळ येऊच दिली नाही . तिला अभिवादन

      आज आपल्या साठी हा पितृदिन आहे स्व भाऊंनी 10 सप्टेंबरलाच  देह ठेवला होता !
            भाऊंनी आम्हाला काय दिले ? एक दृष्टी दिली समाजा कडे पाहण्याची !
        भाऊंना आठवताना मन खूप मागे यवतमाळला गेले . ते मणदेव देवस्थान , खरद तलाव ! मी दुसरीत असताना भाऊंनी खरद तलाव साईट वर सायकलवर नेले होते . पंधरा सतरा किमी वर सायकलने गेलो कोजागिरी साठी .लाल कोहळ्याच्या भाजी , ठेचा वगैरे जेवण . सायबाचा मुलगा म्हणून खुप भाव होता . तेव्हा सायेब सायकलवर पण भाव खूप !! आता मासिरडीज मधून आलेल्या सायबाचा भाव zero असतो . अर्थात मजुरांसोबत कोजागिरी भाऊच करू जाणे .

            भाऊंनी साईटवरच्या एका दलित मुलाला शिकायला यवतमाळला आणले होते तो MA पर्यंत शिकला चांगला अधिकारी झाला असे भाऊंचे मित्र  सांगत होते . रामदास खुरसुंगे त्याचे नाव !
     यवतमाळ सोडल्यावर सुध्दा त्याला भाऊ मदत पाठवायचे .
                 काही गोष्टी कृतीतुनही भाऊंनी उतरवल्या . सकाळी लवकर उठायचे अन आम्हलाही . जी काही थोडी फार शिस्त आमच्यात आली त्यामागे भाऊ कारणीभुत . जेवणाच्या ताटात अन्न टाकून देणं त्यांना जमत नव्हते . डोक्यावर केस वाढलेले आवडत नसे .
             खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र सगळा बेशिस्त कारभार ! प्रचंड आग्रह ! लहानपणीच्या गरिबीची देणगी असलेल्या स्वतः च्या संकोची वृत्तीचे ते परिणाम असावेत . "अहो भाऊ आता जमाना बदललाय , आता खाऊ नको म्हणून सांगायची वेळ आली आहे ...आग्रह कुठचा करता ?' आमचे वाद व्हायचे ! 'आजोबा आत्ता आंबे नक्को ' अशी शुभु कंटाळायाची .

आठवणी खूप आहेत प्रवरासंगम मंदिरासाठी मी एकदा देणगी मागितली एका उद्योजकाकडून . माझ्या मुळे त्याचं एक अडलेल काम मार्गी लागलं होतं . आमच्या मंदिराला कंपाऊंड द्या म्हटलं बांधून ! तर तुझ्या घामाच्या पैशांन काय करायचे ते कर .अशा मार्गानं मंदिर उभाविण्या पेक्षा नसलेलं बरं म्हणाले .
           एक अत्युच्च पापभिरुता अंगात भिणवली ! याला हिम्मत लागते नको म्हणायला ! त्याआधी  " माझा बाप डरपोक इंजिनिअर यार ,रिटायर होईस्तोवर एक घर बांधू नाही शकला !!दुसरा कुणी असता तर चार पोट्ट्याना चार बंगले दिले असते " या सहज मानसिकतेत वावरणारा पुन्हा लाईन सोडत नाही .त्यांचेच जोडे पायात घालतो आणि वाट धरतो , राजकारणात हिच हिम्मत येण्याची वाट बघत बघत !!
 *विनम्र अभिवादन आई भाऊना*
         

सुधाकाकांचे फकीर पण

फकीर जन्म


शिस्त शिस्त म्हणती सारे
शिस्तीत बेशिस्त जगलो रे
का ,कुठे, कशाशी ? ए शिस्त..
बिनधास्त जिंदगी जगलो रे

कुणी कुणाशी लढती का ते ?
स्वतः शीच लढलो रे
दैन्य दुःख  बालपणीचे ,
ओझ्यात जिंदगी गुंतली रे !


घाव करता कुणी  ते का?
याद का करावे
नियती रुद्ध असतांना ती
मी तरी का डरावे ?

भोळ बाबडा जीव हा तो
संकोचून जगला रे
माय बाप उणे असता
हक्क कुठे शोधु रे !

भीडस्त होत जगणे ते का ,
जिंदादिल व्हावे?
नेमस्त ते बिनधास्त केले ,
जिंदगीचे गाणे !

उष्ट्याचेच भय ना कधीही
ताटात सोडताना
बाद होत गेले सगळे
मीच बाद नाही ...

जे नको ते विसरतो मी,
आनंद वाटतो मी
येत घुस्सा , राग राग तो
आलाप विलाप बदलतो मी ।

खडबडीत या देहाला
"माणूस' म्हणती सारे
वृद्ध ,बाल मैत्र जपतो
मी आनंदी पक्षी रे ...

पर्रिकर श्रध्दांजली

"ते समोर चाललेले पर्रिकर साहेब आहेत बहुतेक ' ललित म्हणाला ...
"अरे ते देशाचे मंत्री आहेत , त्यांच्या मागेपुढेच पाच दहा गाड्या असतात ' इति आम्ही .
शास्त्रीजी खरंच ते भाई आहेत भाई , केंद्रीय मंत्री ! ' सोबतच्यानी ललीतची भलावण केली . आम्ही झट झट पावले उचलली , समोरच्या दोघांना क्रॉस केले पाहतो तो खरेच परिकर साहेब होते . पणजीच्या भाजप कार्यालयाच्या पायऱ्या एव्हाना भाईंनी चढलेल्या होत्या . .. साधा हाफ बाह्याचा यु कट शर्ट , पॅन्ट ,चष्मा गळ्यात लटकलेला . ..
          एक मंत्री इतका साधा असू शकतो अविश्वसनीय मात्र सत्य होते  .
       प्रधानमंत्री मोदींजींच्या सभेच्या वेळी आम्ही प्रेक्षकांमध्ये उभे होतो तोच थोड्या वेळात गलका ऐकू आला पाहतो तो थेट पर्रिकरजी जनतेत उभे . सगळ्यांच्या हातात हात घेत , सुरक्षा रक्षकांना दूर ठेवत , एकदम अलगद जनसामान्यांच्यात मिसळलेले भाई ! मी त्यांचे जवळ गेलो एक सेल्फी काढण्यासाठी  . तेही थांबले क्षणभर , सेल्फी मला काढता आला नाही ... गेला चान्स !
       सभा संपवून पणजी भाजप कार्यालयाकडे निघालो .रस्त्यात भाई कुणा कार्यकर्त्याबरोबर बोलत उभे होते , मला आवाज देऊन " आता मोकळेपणाने सेल्फी ट्राय करा म्हणाले ,मी पुन्हा प्रयत्न केला .सेल्फी घेणे जमले नाही, जसा फोटो आला तसाच सही मानून ,  परत मात्र त्यांचा जास्त  वेळ घेणे मला संयुक्तिक वाटले नाही .त्यांचे आभार मानून तेथून काढता पाय घेतला .... मनावर " आमच्या नेत्यांना भेटणे इतके सोप्पे आहे तर ' हि भावना कोरली गेली .अधिक जोमाने माझ्यातला  कार्यकर्ता कामाला लागला .
      फोंडयाच्या डॉ साठ्यांना भाई सकाळी पाच वाजता सफाई कर्मचाऱ्यांना निर्देश देतांना , स्कुटर वर फिरतांना दिसतात  आणि राजकारणापासून दुरी राखणाऱ्या साठ्यांना नंतर या विषयात कसा इंटरेस्ट तयार झाला हे ऐकले की आमच्या इकडच्या नगरसेवकांचा तिथे गोव्यात वर्क शॉप ठेवला पाहिजे असे वाटते  .  एक मुख्यमंत्री इतका ...
             वाळपोई मतदार संघात प्रभारी म्हणून जबाबदारी निभावताना भाईंचे सादगीचे अनेक किस्से ऐकायला मिळायचे .स्वतः आम्हा कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले वरचे किस्से आज त्यांच्या जाण्याने पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर उभे राहतात,  डोळ्यांच्या कडा ओल्या करतात .
          भाई तुम्ही गेलात , राजकारण्यांसाठी संस्कार मागे ठेवत निघून गेलात , राष्ट्र तुमचे हे ऋण कदापि विसरणार नाही .
       श्री गुरुजींनी दाखवलेला पथ आपण जीवनभर एक स्वयंसेवक या नात्याने  सांभाळला त्यामुळेच मग ...
         शत्रु को भी जीतता था आपका चारित्र्य उज्वल
         निन्दकोंपर मात करता आपका व्यवहार निर्मल
 ...... असे जीवन  आपण जगलात ! नुसते गोवाच नाही तर संपूर्ण देश "पोरकं होणं ' अनुभवतय .
               शत शत नमन  - मंगलमुर्ती शास्त्री औरंगाबाद .


         
            

नरेंद्र मोदी प्रचार

महाराष्ट्रात 48 लोकसभा सीट साठी उमेदवारांची घोषणा झाली आहे, आणि ते खालीलप्रमाणे आहेत.......

१ नागपुर - नरेन्द्र मोदी
२ रामटेक - नरेन्द्र मोदी
३ वर्धा - नरेन्द्र मोदी
४ भंडारा-गोंदिया - नरेन्द्र मोदी
५ गडचिरोली-चिमुर - नरेन्द्र मोदी
६ यवतमाळ-वाशिम - नरेन्द्र मोदी
७ चंद्रपुर - नरेन्द्र मोदी
८ आकोला - नरेन्द्र मोदी
९ आमरावती - नरेन्द्र मोदी
१० बुलढाणा - नरेन्द्र मोदी
११ हिंगोली - नरेन्द्र मोदी
१२ नांदेड - नरेन्द्र मोदी
१३ परभणी - नरेन्द्र मोदी
१४ बिड - नरेन्द्र मोदी
१५ लातूर - नरेन्द्र मोदी
१६ उस्मानाबाद - नरेन्द्र मोदी
१७ सोलापुर - नरेन्द्र मोदी
१८ माढा - नरेन्द्र मोदी
१९ सांगली - नरेन्द्र मोदी
२० हातकणंगले - नरेन्द्र मोदी
२१ कोल्हापूर - नरेन्द्र मोदी
२२ रत्नागिरी - नरेन्द्र मोदी
२३ रायगढ - नरेन्द्र मोदी
२४ सातारा - नरेन्द्र मोदी
२५ अहमदनगर - नरेन्द्र मोदी
२६ बारामती - नरेन्द्र मोदी
२७ पुणे - नरेन्द्र मोदी
२८ औरंगाबाद - नरेन्द्र मोदी
२९ जालना - नरेन्द्र मोदी
३० जळगाव - नरेन्द्र मोदी
३१ रावेर - नरेन्द्र मोदी
३२ धुळे - नरेन्द्र मोदी
३३ नंदुरबार - नरेन्द्र मोदी
३४ दिंडोरी - नरेन्द्र मोदी
३५ नाशिक - नरेन्द्र मोदी
३६ पालघर - नरेन्द्र मोदी
३७ भिवंडी - नरेन्द्र मोदी
३८ कल्याण - नरेन्द्र मोदी
३९ ठाणे - नरेन्द्र मोदी
४० उत्तर मुंबई - नरेन्द्र मोदी
४१ वायव्य मुंबई - नरेन्द्र मोदी
४२ इशान्य मुंबई - नरेन्द्र मोदी
४३ उत्तरमध्य मुंबई - नरेन्द्र मोदी
४४ दक्षिणमध्य मुंबई - नरेन्द्र मोदी
४५ दक्षिण मुंबई - नरेन्द्र मोदी
४६ मावळ - नरेन्द्र मोदी
४७ शिरूर - नरेन्द्र मोदी
४८ शिर्डी - नरेन्द्र मोदी

लक्षात घ्या आपल्याला केवळ खासदार नाही तर देशाची सुरक्षा आणि प्रगतीसाठी पंतप्रधान निवडायचा आहे.

आणि मोदींजींच्या शिवाय देशात पंतप्रधान होण्यास लायक असा कोणता दुसरा उमेदवार पण नाही, तेंव्हा तुमच्या मतदारसंघात कोण उभा आहे, त्याने गेल्या 5 वर्षात काय कामे केली याचा विचार न करता मोदीजी यांनी गेल्या 5 वर्षात देशासाठी जे भरीव काम केले आहे त्याचा विचार करता भाजप प्रणित एनडीए च्या उमेदवाराला डोळे झाकून मतदान करा, कारण तुम्ही दिलेल्या मतामुळेच मोदीजी पुन्हा पंतप्रधान बनणार आहेत.
कारण देशाच्या 543 लोकसभा सीट वर कोणत्याही विरोधी पक्षाचा उमेदवार लढणार असला तरी प्रत्येक सीट वर मोदीजी लढत आहेत

हे फक्त मोदीजीच आहेत ज्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षांनी आपल्या देशाचे नाव जगात उंच केले आहे

पाकिस्तान ला त्यांच्या घरात घुसून मारले आहे

आतंकवादी जम्मू काश्मीर वगळता देशात कुठे पाय पसरू शकले नाहीत, बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना सीमेच्या पलीकडेच थांबवले आहे

ज्यांनी सेनेला पूर्णपणे मोकळीक देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे

म्हणून.....
या वेळी पण फक्त मोदीच
नमो नमो
हर हर मोदी घर घर मोदी
धन्यवाद!

गुढी पाडवा शोभायात्रा पोम्प्लेट

                ।।श्री ।।
नववर्ष (गुढीपाडवा) शुभेच्छा
           भव्य शोभायात्रा
युगाब्द 5121, शालिवाहन शके 1941 नवीन संवात्सराचा प्रारंभ म्हणजे वर्ष प्रतिपदा -गुढीपाडवा !
नववर्ष स्वागताच्या शोभायात्रेत सामिल व्हा , अनेकांना  सामिल करा .
संकल्प करू या .....भारताच्या पुनरुत्थानाचा ...
हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार युगाब्द 5121 तथा शालिवाहन शके 1940 विकारी नाम संवात्सराचा प्रारंभ म्हणजे
 वर्षप्रतिपदा ,गुढीपाडवा . या चैत्र शुध्द प्रतिपदेचे स्वागत करण्यासाठी आयोजित शोभायात्रेत जल्लोषात सामील होऊन आपल्या अभिमानास्पद परंपरांना उजाळा देऊ या !शोभायात्रा जयभवानीनगर ते गजानन महाराज मंदिर चौक ते गारखेडा ग्रामदैवत श्री मारुती मंदिर येथे विसर्जित होईल .
       सदर कार्यक्रमास आपण मंगल  वेशात (पुरुष :पांढरा कुर्ता पायजामा /शक्य असल्यास धोती सदरा) महिलांसाठी नववार साडी अथवा गोल साडी , मुलींसाठी उत्सवास साजेसा ड्रेस , पदयात्रेत सामिल व्हावे . मार्गात रांगोळी काढून ,पताका लावून , गुढी उभारून उत्साही वातावरण तयार करणे .आपापल्या नगराच्या वतीने एखादा देखावा सादर करणे . भजनी मंडळांनी टाळ मृदुगांसह सामिल व्हावे,ढोल ताशे वाजवून आनंद व्यक्त करावा . बैलगाडी सजवूनही आपण शोभायात्रेत सामिल होऊ शकता . शोभायात्रा सर्व समावेशक व्हावी या साठी प्रयत्न करणे .जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणे .

* ठिकाण *                  *दिनांक*                      वेळ
जयभवानीनगर चौक      राष्ट्रीय सौर 16 चैत्र    सायं 4 ते रात्री 9
शिवाजी पुतळ्या जवळ   शनिवार दि 6 एप्रिल       पर्यंत

                                *   भवदिय  *
श्री विलासराव देशमुख
स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र
मराठवाडा विभागप्रमुख (दिंडोरी प्रणित )
 श्री मंगलमुर्ती शास्त्री  श्री उमाकांत रत्नपारखी श्री मनोज राठोड
नंदीग्राम सेवा समिती         बालकृष्णनगर            न्यायनगर
9422206749             9422711281       7798963610

श्री निलेश सुराशे            श्री सुनील डहाळे      श्री संजय बोराडे
स्वामी समर्थ केंद्र            श्री अण्णा जाधव     विश्वकर्मा संघटना
9423386677              स्वामी समर्थ केंद्र    




स्मृति दिन अर्थात स्मृतिचा वाढदिवस

कानातले केले प्रचितीनी !
दुसऱ्या दिवशी आईनी कानात घातले ते
तुटले ..इति सिद्धू
आज कप बशा विसळल्या प्रचितीनी ,
आज चहा पण केला .
आज सिद्धू रडला नाही ,
आज सिद्धू चिडला नाही !
त्यानं किरकिर केली नाही
ग्रीटिंग कार्ड सिद्धूनी केलं ,

सगळ्यात महत्वाचे सिद्धूच्या बाबांनी
वय न विचारता
फोन करून शुभेच्छा दिल्या !
19 वर्षा नंतर
पहिल्यांदाच शुभेच्छा दिल्या न संकोचता फोनवर !!
56 इंचकी छाती लगती बॉस शुभेच्छा देनेको !!!
स्मृतीला धन्य झाले
वाढदिवस साजरा झाला
"अस्मादिक असे वागता तर त्यांच्या "सौ 'नी त्यांचाच
केक केला असता ' असे सहज वाटून गेलं

आज सिद्धू केक बनवणार होता ...
स्वरूपानी सकाळी एक तास सेल फोन जेठाणी वर खर्च केला !
संध्याकाळी तिचा संताप झाला
स्मृतिनी वाढदिवस असल्याचं सकाळी  सांगितलेच नाही !!!
प्रशांतभौजिनी  रविवारी "वहिनी'कडेच
त्यांच्या वाढदिवसानिमित्त
गेट टूगेदर ठेवणार असं प्लॅन केलं !!!!!
पल्लवीआत्याने  फोनवर येथेच्छ बोअर करत शुभेच्छा दिल्या ..
मिनलकाकूं, अगस्ती काकांनी मिसळपाव येथेच्छ झोडलं
राहुलमामानी न बोलता बुके प्रदान केला
त्याच बुकेवर अगस्तीकाकांनी फोटो काढला


आणि

.
.
.
आज स्मृतीचा वाढ दिवस
अगस्तीभाऊजी सगळ्यांनाच
 काहीबाही लिहून शुभ शुभ म्हणतात !
मी त्यांच इतकं करते
नवनवीन पदार्थ खाऊ घालते
खमंग चिवडा कोथिंबीर टाकून वगैरे अन
माझ्याच वाढदिवसाला  काही का नाही ?
असं स्मृतीला वाटू नये म्हणून खरडले !!
तिला मन:पुर्वक शुभेच्छा !
तिचं वय विचारण्याची हिम्मत झाली नाही ..













अशोक दामले

"हाडाचा कार्यकर्ता ' तुम्हाला पाहायचाय ?
पुंडलीकनगर वार्डात हनुमाननगर  गल्ली नंबर 2 गाठा  .एखादं बारक पोरगही तुम्हाला पटकन गणपती निवास मध्ये घेऊन जाईल .पायऱ्या चढून वर जा आपलं काम सांगा मदतीला सदैव तयार असणारं व्यक्तित्व भेटेल अशोक दामले नावाचं !
जनतेच्या कामासाठी जीव तोडून काम करणे कसे असते ते या जयहरी "अशोक दामले' कडून शिकावं .
कामाचा धडाका असा का मोठे मोठे अधिकारी "नको रे बाबा म्हणत कार्यरत होतात .
कुणाचं राशन  कार्ड, तर कुणाचं आधार कार्ड ,कुणाला दवाखान्यासाठी सहाय्यता निधी .निराधार पेन्शन मिळवून देण्यासाठी तर बाबा आपल्याच सरकारला धारेवर धरायला मागेपुढे पहात नाही !
गारखेडा मंडळात सरचिटणीस पद सुद्धा किती कामाचे होऊ शकते , अख्या शहरात बोलबाला !
आपलं म्हणणं कसं बरोबर हे धाड धाड पटवून देणारे अशोक दामले "मग माझं तोंड खराब दिसतं तुम्हाला ' म्हणत समोरच्याला चूप करतात अन काम तडीस नेतात ..
हनुमान चौकातील त्यांनी  घेतलेल्या कार्यक्रमांचे सातत्य  त्यांना  पंचक्रोशीत नाव लौकिक मिळवून देतात.
सद्गुरू ह भ प कडूभाऊ  काटे महाराजांचे परमशिष्य सद्गुण संपन्न अशोक दामले यांना दीर्घ निरामय आयुष्यासाठी  खूप खूप शुभेच्छा !




सुहासकाकू

घरी सुखवस्तु  राहणीमान , बंगला नोकर चाकर अशी  संपन्नता असतांना  फाटक्या ,गळक्या भाड्याच्या कौलारु घरात  तात्यांमध्ये  प्रेम शोधणारी  तेही अशा काळी जेव्हा  प्रेम करणे ताज्य किंवा  वर्ज्य समजल्या जाणाऱ्या अशा काळी ....
     त्यातही असं खटलं जिथे कुजकट अन किचकट मंडळींची लांबलचक फौजच ! एक भावोजी अन चार चार दीर , नंदा (बहुदा) जिकडेतिकडे गेलेल्या म्हणून बरं .... एकेकाला झेलताना किती नाकात दम येत असेल . ... किती आयुष्य खरं खोटं करण्यात गेलं असेल ?
     आज सहस्त्रचंद्रदर्शनाला सुहासिनी शास्त्रीबद्दल लिहितांना असंच काहीसं मनात येतं ! काळ हा मागील शतकातील पाचव्या दशकातला म्हणून लिहितो . आज असं काही नंदा दिरांना सांभाळावे लागत नाही ! त्यामुळे त्यांच्यात कटकटी होत नाहीत .कुणी महिला आज सहनही करत नाही .
         तात्या सुहासकाकूनी प्रेम केलं अन काकूंनी इकडे प्रेम वाटलं ! संस्कार वाटले ,जाणिवा वाटल्या .  मागे मी रसिकाला पत्र लिहिले होते नमस्कार का करावा म्हणून त्याचे प्रेरणा स्थान काकुच होती . मुलाला (दत्ताला) सामाजिक कार्यात , संघ कार्यात प्रतिबद्ध करताना काकूंचा वाटा जास्त म्हणावा .
       
     
   

           

डॉ राजेन्द्र फड़के (राजुदादा)

                      घरी लहानपणा पासुन जनसंघाचे वातावरण , वडील स्व  अशोक फडके  इंजिनिअर असुनहि  हाडाचे शेतकरी !! डॉक्टर राजेंद्र फडके 1983 ला शिक्षण अन इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षण थांबवून प्रॅक्टिस सुरू करावी लागली कारण घरी अशुबाबांचे अकस्मात निधन झाले .घरातील वडील मुलगा म्हणून घर सांभाळणे क्रमप्राप्तच होते .
             1992 मध्ये दादांनी पुन्हा राजकारणात जाणे तेही पूर्ण कालिक कार्यकर्ता  म्हणजे (आई) उषाकाकूंसाठी किती क्लेषकारक असेल  कारण अशुबाबांनी (डॉक्टरांचे पिताश्री ) राजकारणात ऊंची तर गाठली होती , लोकप्रियता तर मिळवली होती मात्र निवडणुका बाबांनी लढवने तेही जनसंघ/भाजपाकडून म्हणजे घरचे खाऊन ....असा कार्यक्रम होता,  आर्थिक दृष्टया कष्टप्रद ऊंची हि आपोआप मिळालेली होती .काकुंनी नवरयाला आधीच झेललेलं , अन आता मुलगाही त्याच वळणावर जाणार !

            डॉक्टरांच्या आईचे ठीकच समजू तर भारती वाहिनीची काय कथा ! त्यांनी आधीच डिफेंस अकॉउंट  मधली चांगली स्टेटसची नोकरी सोडून वड़ोदया सारख्या रिमोट दुर्गम  खेड़यात प्रेमाखातर कारभारिन/कास्तकारीन व्हायच मान्य केल ! कदाचित, एव्हाना त्या सुपर क्लास वन अधिकारी म्हणुन मिरवत्या झाल्या असत्या !! 92 मध्ये प्रमोदजींनी  डॉक्टरांना बाहेर काढले . ... कायम  विरोधी पक्ष म्हणुन हिनवल्या जाणाऱ्या भाजपा साठी ! खा खस्ता आणखी काय ? बाबांचेच  निष्कांचन पर्वच पुन्हा सुरु  ! ! वाहिनी साहेब तुम्हीहि ग्रेटच !!

           सुरवातीला जळगाव लोकसभेची निवडणूक  जबाबदारी, नंतर जळगांव जिल्हा संघटन मंत्री मग उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री, महाराष्ट्र राज्य सहसंघटन मंत्री  म्हणून जबाबदरया पेलल्या आणि  प्रधानमंत्री मोदीजी शासनकर्ते झाल्यावर 5 जुन 15ला त्यांचा आवडता प्रकल्प "बेटी बचाव बेटी पढाव' राष्ट्रीय संयोजक म्हणुन भारत भर भ्रमन्ती सुरु !

            वरील जबाबदरया घेताना संघटन संघटन आणि संघटन याशिवाय काही मिळणार आहे काय ? अपेक्षाही नाही ! फक्त संघटन बढ़े चलो ,सुपंथ पर बढ़े चलो ...निस्पृह निष्काम  कर्मयोग !

     असु अम्ही सुखाने पत्थर पायातील
       मंदिर उभविने हेच आमुचे शील !

         " राष्ट्रासाठी काहीही ' हि विचारधारा बाळगत जगणारी ही मंडळी क्रित्येक कार्यकर्त्यांना घडवत असते . मोदींजींच्या रूपाने मंदिर आपण उभे केलेत . मोदींजींच्या अत्यंत विश्वासातला कार्यकर्ता म्हणुन हि आपणच उभे राहिलात !
            दादा आपण मोदीजींसाठी आतापर्यंत गुजरात , राजस्थान, गोवा,कर्नाटक , मध्य प्रदेश आणि आता दिल्ली येथे निवडणुक प्रभारी म्हणुन यशस्वी कारकीर्द निभवलीत .

       जय गुरुदेव दादा ! तुम्हाला साठीचे म्हणतांना जीभ कचकन चावल्या गेली बघा !! पण एक्सेप्ट करावेच लागते ,अन आता एकसष्टिची तयारी सुद्धा .....आज वाढदिवशी तुम्हाला उदंड, निरामय, सुखदायी,  आयुष्य चिन्तितांना खुप मोठ्ठया जबाबदाऱ्या मिळो हि प्रार्थना .

 - मंगलमुर्ती शास्त्री 15 में 2019





संदीप जोशी

आज नागपूरला 45 डिग्री मध्ये जाऊन आलो . लाही लाही होणे ते काय हे अजमावून आलो .
      मित्रवर्य सुरेंद्र सोबत होते . आणी मनात आनंद होता . आपला एक नातेवाईक नेत्याच्या भूमिकेत पाहताना खरेच खूप आनंद झाला .
          मी संदीप जोशींचा दरबार पाहून आलो . शे पन्नास लोकं आपल्या समस्या घेऊन आलेली आणी संदीप त्या हसत मुखाने, आदरा तिथ्याने सोडवताना प्रत्यक्ष अनुभवले !
       आम्हीही काही वैयक्तिक कामानिमित्त गेलो होतो . आम्ही आतल्या रूम मध्ये गेलो . तिथे योगेश भेटला . म्हणाला दादाच काही खरं नाही आता अकरा बारा कितीही वाजतील !
        आम्हाला संदीपचा तो दरबार पाहूनच इतका आनंद झाला होता का तो तसाच राहू देत कितीही वाजेपर्यंत ! आम्ही थांबुत ही भावना होती ,  नेता त्यातूनच तर पॉप्युल्यारिटी मिळवत असतो .
          संदीप मोठा आहेच पण आज प्रत्यक्ष अनुभवला . मुख्य म्हणजे वेळ लागेल यायला याची कल्पना द्यायला त्याचा मनुष्य येऊन गेला . त्यांच्या मोठेपणाचा अभिमान वाटला .
            सगळ्यात महत्वाचे म्हणजे विधानसभेच टिकिट मिळावे ,  आपण नक्की वेळ काढू महिनाभर अन प्रचाराला जाऊ असे मनोमन आम्ही दोघानी ठरवले .
             अंजुमामी तुमचा हा तुमचा प्रसन्न चेहरयाचा भाऊ फार मोठी ऊंची गाठनार है नक्की ! आपला माणुस मोठ्ठया पदावर पाहण्यासाठी आसुसलेला ....
                                                         - अगस्ती 

खैरेच

" अहो सगळया शहरात तणाव आहे , इकडे सगळी दुकानं बंद झालीत पटापट , तिकडे खडकेश्वरला ?  तुम्ही पण शटर डाउन करा ' सौ चा फोन पलीकडून होता ,काळजी या
आवाजावरून दिसतच होती .
            दुकानाबाहेर आलो तो अख्ख कॉम्प्लेक्स जमा झालेलं . कुणी म्हणे अरे राजाबाजारमध्ये धींगाणा सुरु आहे तो कुणी म्हणे पुण्डलिक नगर रोडला दुकान फोडले ...सगळे दहशतीत !
       शिवनाथनी 100 नम्बरवर खुप ट्राय केला संपर्क करण्याचा ,  व्यर्थ प्रयत्न ! सगळे व्यापारी चिंतेत कुणाला काही सूचत नव्हते ,आपापल्या नेत्यांना सपंर्क करण्याच्या प्रयत्नात तर  मी डायरेक्ट 9422202525 फिरवला .अनोळखी फोन कॉल पलिकडून उचलला गेला .
       "साहेब खड़केश्वर हुन शास्त्री बोलतोय साहेब इकडे सगळे परेशान आहेत साहेब ''
    " शास्त्रीजी मी गुलमण्डी वरच आहे कुठेही काही गड़बड़ नाही काळजी करायचे कारण नाही तिथेच थांबा मी येतोच  '
    दोनच मिनिटात  गाडीतुन खैरे साहेब उतरले .मी सम्पूर्ण शहरात फिरून आलोय , तुरळक घटना घडल्या मात्र सगळे शांत आहे , आम्ही काही हातात बांगड़या नाही घातल्यात , शटर बिनधास्त वर करा  '   अन गाड़ी नागरिकांना विश्वास देण्यासाठी पुढे रवाना झाली .1990 च्या दशकात अशा सतत दंगलीच्या दहशतीत जगलेलो , 1996 साली तर सकाळी 7 वाजता दुकान उघडले न उघडले तोच आतून शटर ओढुन आत पूर्ण दिवस उपशिपोटी जीव मुठित ठेवून काढलेला !!!

       आज एवढं सगळे आठवण्याचे कारण खैरे साठी मत मागायाला जावं तर लोकं वाहयात बड़बड़ करत होते ! आणि आता तीच मंडळी  हळहळताहेत . फक्त साडेचार हजारांनी हो ! ! आमच्या लाडक्या प्रधानमंत्री मोदीजींच्या प्रतिनिधिला या हलकटांनी पाडले ! अख्खा देश सेलेब्रेशन करत असताना संभजिनगरकरानी माती खाल्ली .

    आणि हो खुप शिकेल प्रतिनिधि तुम्ही दिला ना  या लोकसभेला , विकासाचे राहु दया ते हिरवे फूत्कार जे व्हाट्सएप्प वर फिराताहैत ना ते बंद कर म्हणा ! आणि ते कौम कौम चाललय ना  त्या कौमातून बाहेर आला तरच शिकेल समजू आम्ही !! मागील पाच वर्षात "मध्य' चा विकास करायचाच  राहून गेलाय तो आता जिल्ह्याच्या विकासासोबत तेवढा करून दया म्हणजे झालं (आम्ही जिल्हाच तुमच्या ताब्यात दिलाय ...)

          खैरे साहेबांची आवशक्ता संभाजीनगरला आहेच ! त्यांना सेनेने राज्यसभेवर का होईना पाठवावेच अन मंत्रिपद सुद्धा ! खैरे होते म्हणुन टफ़ दिली नसता जाती साठी माती खाण्याच्या या युगात हिन्दुत्वाला रेस मध्ये  खैरेच ठेवू शकले हे हि तितकेच खरे आहे !!
                                          - मंगलमुर्ती शास्त्री
         
        
         
      

अर्थव्यवस्थेचे मारक डॉ सुधाकर शास्त्री


डॉ सुधाकर शास्त्री : देशाच्या अर्थ व्यवस्थेचे मारक


संजय ठक्कर युरो एक्सिम बँकेच्या CEO नी अर्थशास्त्राच्या दुश्मन कोण या विषयी विचार करायला लावणारे संशोधन जगा समोर ठेवले . ....  देशाच्या अर्थ व्यवस्थेसाठी आपदा ठरणाऱ्या या लोकांबद्दल खरच विचार करावा लागेल .... कोण आहेत हि माणसं ?



१) सायकलीस्ट : जसे की डॉ सुधाकर शास्त्री

- त्यांनी कधी कार विकत घेतली नाही  त्यामुळे कधी कार साथीचे कर्ज !

- त्यांनी कधी  car insurance काढला नाही !

- कधी पेट्रोल डिझेलवर खर्च केला नाही !

- त्यांना कधी कार सर्व्हिसिंग लागली नाही का कार दुरुस्ती करावी लागली !!!!

- त्यांना कधी पार्किंग द्यावी लागली नाही

- सुधाकाकांचे  कधी पोट सुटले नाही

- आणी हो , हे हि खरच आहे ! तंदुरुस्त लोकं देशाच्या अर्थ व्यवस्थे साठी घातक ठरतात !!देशाच्या अर्थ व्यवस्थे साठी तंदुरुस्त लोकं काय कामाचे !! ते कधी औषधी घेत नाहीत का हॉस्पिटलमध्ये जात नाहीत , डॉक्टरांच्या फीस देत नाहीत !!

- देशाच्या GDP मध्ये डॉ सुधाकर शास्त्रींचे  काहीही कॉन्ट्रीबुशन नसते !!! विचारा यांच्या नातवांना ...

- या सुधाकर शास्त्रींनी किती लोकांचे जॉब गिळले बघा !!


  याच्या उलट प्रत्येक नवीन मॅक डोनाल्ड आउटलेट मुले किमान 30 जॉबची निर्मिती होते - 10 कारडीओलॉजिस्ट (हृदयविकार तज्ञ) 10 डेंटिस्ट , 10 वेट लॉस एक्स्पर्टस . या व्यतिरिक्त मॅक डोनाल्ड चा स्टाफ

आता सांगा काय निवडण्यात हशील आहे

एक सायकलिस्ट सुधाकाका (अर्थव्यवस्थेचे मारक ) का मॅक डोनाल्ड !

तेव्हा तुम्ही देश भक्त असाल तर सुधाकर शास्त्रींनी वाचवलेले पैसे घ्या अन देशाची अर्थ व्यवस्था सुधरवा .... जा डोमिनोज, मॅक डोनाल्ड, अगदीच नाही तर कोल्हापुरी तडका किंवा गोली वडापाव !! 


     

विचार करण्या जोगे आहे की नाही . 🤔🤔😀😀

(औरंगाबाद परभणी ट्रैन मधून निवांत लेखन ) 

Thursday, May 9, 2019

रवि दीक्षित प्रमोशन

श्री दिक्षित यांनी मागील आठवड्यात 34 वर्ष पूर्ण झाल्याची पोस्ट टाकली होती नी काल रवी दिक्षित AGM झाल्याची पोस्ट आली  . दोघांचेही खुप खुप अभिनंदन !
       दोघांनी स्टेट बैंक ऑफ हैदराबाद त्या वेळी जॉइन केली होती . पुण्य नगरीतून थेट अम्बड़ ,लासुर सारख्या कोरडया, शुष्क जागी आनंदाने जॉब स्वीकारते झाले . आणि बैंकेला समर्पित झाले . ऑफिस मध्ये दोन चार दिवस मुक्कामी राहणारा बैंकर रवि ..आज या मुक्कामी पोहोचला!!! याचा आंनद त्यांच्या बँकेतील मित्रांना अधिक असेल . रवि दिक्षित म्हणजे बैंकेसाठीचा वेडा माणुस अस त्यांचे औरंगाबादकर मित्र म्हणतात .अन त्यात चूक नाही. आमच्या छोटी नी है वेडेपण भोगलय आनंदाने !
      या दोघांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे .SBH चे SBI मध्ये विलीनीकरण झाल्यावर बहुतांश SBH कर्मचारी  निवृत्ती मार्गाला गेले VRS घेते झाले  , मात्र (श्री + रवि )कांत दिक्षित SBI मध्येही स्वत:ला फिट करवते झाले .
      रवींचा बैंक कंप्यूटर प्रोग्रामिंग क्षेत्रातील, त्यांच्या समर्पित कामाबद्दल मागे राष्ट्रीय स्तरावर गौरव झालेला .
ज्या ठिकाणी त्यांना बँकेने पाठवले त्या त्या जबाबदरयांना त्यांनी न्याय दिला . मागे अठरा वर्षपूर्वी  ग्रामीण भागात अडुळ ला पोस्टिंग असताना त्यांनी काही तासात कर्ज मिळू शकते हे अडुळकरांना दाखवून दिले होते .आज कंप्यूटर युगात हे शक्य आहे, त्याकाळी कठिन होते .
       एकूणच दीक्षित परिवारामध्ये एक उद्योजक लपलेला आहे. अन त्याचा फायदा यांच्या बैंक ग्राहकाना मिळाला नसता तर नवल .ज्या ज्या ठिकाणी यांची पोस्टिंग झाली तेथील उद्योजक व्यापारी खुश .
        "एक उद्योजक लपलेला 'अस मी का म्हणू शकतो .. बैंकेची स्टेटस वाली नोकरी असताना सुद्धा यांनी आपापल्या " सौ 'ना स्क्रीन प्रिंटिंग असेल, ब्यूटी पार्लर असेल, कार्यरत केलेले मी पहिले !
      रवीकांत दिक्षित आज आज AGM झाले आम्ही आनंदलो . कामधेनु पशुऔषधालय,आज अक्षय तृतीयेला 24व्या वर्षपुर्ती करत आहे,   आधी स्थानिक देवगिरी बैंकेकड़े होती ,  रविंमुळे SBH मध्ये गेलो .आणि जी काही भरभराट कामधेनु नी केली त्याला SBH साक्षीदार राहिली . श्री दीक्षित ,रवि दीक्षितांच्या नुसत्या नामस्मरणाने काम फत्ते होत असे,  बँक स्टाफला मी कामाला लावत असे !!! अर्थात सगळी बँक माझी मित्र झाली होती रविमुळेच  ..... उद्या आमचे  मित्रवर्य,  वडील बंधु संगारेड्डीकर रागवतील, त्यानीही तितकेच प्रेम दिले  !
        या दीक्षित परिवारतील सर्व कांत (श्यामकांत पासून निशिकांत पर्यन्त ) लळा लावणारे  आहेत . यांच्यात कुणीही सिंघम मधला  जयकांत शिकरे  नाही...  सर्वाना या निमित्ते नमस्कार !
     पुन्हा एकदा रविकांत दीक्षित यांचे अनेकानेक अभिनंदन  आणि छोटी चेही कारण घर तिनीच सम्भाळलेले....
            - सौ  मिनल , अगस्ती

Wednesday, May 1, 2019

पुण्य स्मरण आईचे

"" माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी! खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो ! खरेच ती जगाची बयो होती; आई होती. माहेरची गडीमाणसे कांडपिणी, पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला 'बयो' म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ! ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे ! ''

                साने गुरुजींच्या श्यामची आई चे वर्णन ...

या बयोच्या जागी ' बेबी " टाकलं तर खोलापूरकरांच्या ताईचही असेच वर्णन करता येईल .
           ताई अलाईस आईचा आज स्मृतीदिन 1 मे . सकाळी उठल्यावर मावश्याना फोन करने आठवणी जागवने हा माझा नित्यपाठ 1में ला राहिला आहे . आज अनायसे मी मावश्या मामा सोबत राहील .
             स्व सुलभा शास्त्री ,माझी आई , माहेरी ताई होती .अन तीनी ताई पण खरच गाजवले तसेच निभावलेही ! अण्णा तिच्याप्रमाने चालायचे,  बंडूशी तिचं गुफ्तगू चालायचे,नंदू ,चंदू , सूंट्या,अनटया अन मायटा तिचं एकायचे . शिला तर जवळच होती अलकट सर्वांचीच लाडाची ,  सगळ्या भावण्डाची ती काळजी करायची अन म्हणून माहेरच्यांच काळीज होती .
         सासरसुद्धा तिनं छान जपले होते , बोरगांव मंजुची प्रभाकडची दिवाळी आजही काका लोकं आठवण काढतात त्यामागे कष्ट सुलभाचेच होते . सगळे सण , वार कुल कुलाचार निर्विघ्न पार पड़त असत ते आई मुळेच . तात्या दादाचं या लहान्या  भावजयी कड़े विशेष प्रेम होतं . तिचं लग्न जमवण्यात तात्यांनी मोठी भूमिका निभावलेली असल्याने अन सुहासताईनी तिच्या लग्नची अलीकडची वर्ष सुखदायी केलेली असल्याने असेल कदाचित , तिला जास्त लळा होता ...
 
     आई हे ऐश्वर्य घरात माझ्या वाटयाला जास्त आलेलं .शिक्षणा साठी बाकी दोघ भाऊ लवकर बाहेर पडल्यामुळे , आणि नन्तर नोकरीनिमित्त बाहेर, त्यामुळे आई भाऊ (वडील) माझ्या वाटयाला अधिक !
      आईची चेहरापट्टी घेतल्याने आईचा मुलगा अगस्तीच होता .सासु म्हणून आई कशी होती ...अरे  पिच्चरला घेवून जा , फिरायला घेवून जा , असं मुलाला सांगणारी त्या काळातली वेगळी सासु  होती ती,  प्रगल्भ सासु  होती .
            आईच्या नन्तर  भाऊंनी घरातील दोन्ही जेष्ठश्रेष्ठ भूमिका निभावल्या . मुद्दाम उल्लेखतो याच भूमिका आईभाऊंच्या पश्चात जिजाजी संजयराव निभावतात .भाऊ गेल्यावर तर संजयरावांनी घरातील " जावई  ' पणाची कात टाकून दिली अन घरच्या जबाबदरया शिरोधार्य मानल्या,त्यांचे " सासर ' त्यांनीच संपवले ... आई साठी तर "जावई माझा भला' च होता .
        अर्थात त्यांनी जावईपण कधीच गाजवले नाही .स्व अण्णा आजोबा मला मरेपर्यन्त जावईपण गाजवणाऱ्याच्या कथा ऐकवायचे . थैंक्स गॉड आम्ही नशिबवान !
         छोटी छकुली आजी  शिवाय राहत नव्हती .नातीची शेवटच्या क्षणा पर्यन्त काळजी तिला .

       तर अशा आईचा कधी कधी खुप संताप येतो ,  का लवकर गेली ? अजुन काही वर्ष आम्हाला देती ! पंचावन्न है काय जाण्याचे वय होते . 1998चा 1 में काळ ठरवला आमच्यासाठी !

         खोलापुरकरांची बेबी / ताई अर्थात साने गुरुजींच्या भाषेत " आवडी ' देवालाही लवकर आवडली आमच्यापेक्षा, आमच प्रेम कमी पडलं  ! चल तुझ्या प्रतिमेलाच शिर साष्टांग नमस्कार !

                 - हेरंब, देवेंद्र ,अगस्ती, बाबी... आजही शोकाकुल !
       

         
पुण्य स्मरण आईचे



आमची प्रूफ रीडर सौ मीनल सुट्टी वर असल्याने  चूक भूल तिच्या नावे .....