पिठोरी अमावास्येला अमरावतीला होतो .यश अन चिनू (मावस भाऊ ) भावांच्या पाठीवर बहिणीनं (डो पूर्वा )काकडी फोडत भावासाठी इडा पीडा टळो अशी अर्चना केली .
आज मातृदिन सुद्धा होताच . आईनं आम्हाला पोरकं करण्याला आता वीस वर्षे झाली . उण्यापुऱ्या54 वर्षाच्या तिच्या आयुष्यात 35 वर्ष तिनं आई म्हणून पोट्ट्यांना सर्विस दिली .पोरांना आईच्या सेवेची थोडीही उतराई करायची संधी न देता अचानक निघून गेली .
मातृदिन कधी साजरा केला नाही ,त्याबद्दल माहितीही नव्हती ! मात्र आजकालच्या "दिन ' प्रथेनुसार खरेच सगळ्यानी आपल्या आईला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक सेलेब्रशन करायला हवे . त्यानिमित्ताने कृतज्ञतेची जाणिव निर्माण होईल , नसेल तर ! आणि असलीच तर व्यक्त करायला संधी ! कधी कुणी दरवर्षी एकदा तरी आई "मी तुझा आभारी' आहे असे म्हटल्याचे ऐकिवात नाही , ते होईल ! आई म्हणजे मुलांनी अधिकाराने राबवण्यासाठीच दिलेली , अन तीही अपत्यप्रेमाने राबत असते !
असो आईने ती संधी आम्हा भावंडाना दिली नाही , जेव्हा होती तेव्हा हि अक्कल नव्हती ! एकशष्टी , 75रीची वेळ येऊच दिली नाही . तिला अभिवादन
आज आपल्या साठी हा पितृदिन आहे स्व भाऊंनी 10 सप्टेंबरलाच देह ठेवला होता !
भाऊंनी आम्हाला काय दिले ? एक दृष्टी दिली समाजा कडे पाहण्याची !
भाऊंना आठवताना मन खूप मागे यवतमाळला गेले . ते मणदेव देवस्थान , खरद तलाव ! मी दुसरीत असताना भाऊंनी खरद तलाव साईट वर सायकलवर नेले होते . पंधरा सतरा किमी वर सायकलने गेलो कोजागिरी साठी .लाल कोहळ्याच्या भाजी , ठेचा वगैरे जेवण . सायबाचा मुलगा म्हणून खुप भाव होता . तेव्हा सायेब सायकलवर पण भाव खूप !! आता मासिरडीज मधून आलेल्या सायबाचा भाव zero असतो . अर्थात मजुरांसोबत कोजागिरी भाऊच करू जाणे .
भाऊंनी साईटवरच्या एका दलित मुलाला शिकायला यवतमाळला आणले होते तो MA पर्यंत शिकला चांगला अधिकारी झाला असे भाऊंचे मित्र सांगत होते . रामदास खुरसुंगे त्याचे नाव !
यवतमाळ सोडल्यावर सुध्दा त्याला भाऊ मदत पाठवायचे .
काही गोष्टी कृतीतुनही भाऊंनी उतरवल्या . सकाळी लवकर उठायचे अन आम्हलाही . जी काही थोडी फार शिस्त आमच्यात आली त्यामागे भाऊ कारणीभुत . जेवणाच्या ताटात अन्न टाकून देणं त्यांना जमत नव्हते . डोक्यावर केस वाढलेले आवडत नसे .
खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र सगळा बेशिस्त कारभार ! प्रचंड आग्रह ! लहानपणीच्या गरिबीची देणगी असलेल्या स्वतः च्या संकोची वृत्तीचे ते परिणाम असावेत . "अहो भाऊ आता जमाना बदललाय , आता खाऊ नको म्हणून सांगायची वेळ आली आहे ...आग्रह कुठचा करता ?' आमचे वाद व्हायचे ! 'आजोबा आत्ता आंबे नक्को ' अशी शुभु कंटाळायाची .
आठवणी खूप आहेत प्रवरासंगम मंदिरासाठी मी एकदा देणगी मागितली एका उद्योजकाकडून . माझ्या मुळे त्याचं एक अडलेल काम मार्गी लागलं होतं . आमच्या मंदिराला कंपाऊंड द्या म्हटलं बांधून ! तर तुझ्या घामाच्या पैशांन काय करायचे ते कर .अशा मार्गानं मंदिर उभाविण्या पेक्षा नसलेलं बरं म्हणाले .
एक अत्युच्च पापभिरुता अंगात भिणवली ! याला हिम्मत लागते नको म्हणायला ! त्याआधी " माझा बाप डरपोक इंजिनिअर यार ,रिटायर होईस्तोवर एक घर बांधू नाही शकला !!दुसरा कुणी असता तर चार पोट्ट्याना चार बंगले दिले असते " या सहज मानसिकतेत वावरणारा पुन्हा लाईन सोडत नाही .त्यांचेच जोडे पायात घालतो आणि वाट धरतो , राजकारणात हिच हिम्मत येण्याची वाट बघत बघत !!
*विनम्र अभिवादन आई भाऊना*
आज मातृदिन सुद्धा होताच . आईनं आम्हाला पोरकं करण्याला आता वीस वर्षे झाली . उण्यापुऱ्या54 वर्षाच्या तिच्या आयुष्यात 35 वर्ष तिनं आई म्हणून पोट्ट्यांना सर्विस दिली .पोरांना आईच्या सेवेची थोडीही उतराई करायची संधी न देता अचानक निघून गेली .
मातृदिन कधी साजरा केला नाही ,त्याबद्दल माहितीही नव्हती ! मात्र आजकालच्या "दिन ' प्रथेनुसार खरेच सगळ्यानी आपल्या आईला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक सेलेब्रशन करायला हवे . त्यानिमित्ताने कृतज्ञतेची जाणिव निर्माण होईल , नसेल तर ! आणि असलीच तर व्यक्त करायला संधी ! कधी कुणी दरवर्षी एकदा तरी आई "मी तुझा आभारी' आहे असे म्हटल्याचे ऐकिवात नाही , ते होईल ! आई म्हणजे मुलांनी अधिकाराने राबवण्यासाठीच दिलेली , अन तीही अपत्यप्रेमाने राबत असते !
असो आईने ती संधी आम्हा भावंडाना दिली नाही , जेव्हा होती तेव्हा हि अक्कल नव्हती ! एकशष्टी , 75रीची वेळ येऊच दिली नाही . तिला अभिवादन
आज आपल्या साठी हा पितृदिन आहे स्व भाऊंनी 10 सप्टेंबरलाच देह ठेवला होता !
भाऊंनी आम्हाला काय दिले ? एक दृष्टी दिली समाजा कडे पाहण्याची !
भाऊंना आठवताना मन खूप मागे यवतमाळला गेले . ते मणदेव देवस्थान , खरद तलाव ! मी दुसरीत असताना भाऊंनी खरद तलाव साईट वर सायकलवर नेले होते . पंधरा सतरा किमी वर सायकलने गेलो कोजागिरी साठी .लाल कोहळ्याच्या भाजी , ठेचा वगैरे जेवण . सायबाचा मुलगा म्हणून खुप भाव होता . तेव्हा सायेब सायकलवर पण भाव खूप !! आता मासिरडीज मधून आलेल्या सायबाचा भाव zero असतो . अर्थात मजुरांसोबत कोजागिरी भाऊच करू जाणे .
भाऊंनी साईटवरच्या एका दलित मुलाला शिकायला यवतमाळला आणले होते तो MA पर्यंत शिकला चांगला अधिकारी झाला असे भाऊंचे मित्र सांगत होते . रामदास खुरसुंगे त्याचे नाव !
यवतमाळ सोडल्यावर सुध्दा त्याला भाऊ मदत पाठवायचे .
काही गोष्टी कृतीतुनही भाऊंनी उतरवल्या . सकाळी लवकर उठायचे अन आम्हलाही . जी काही थोडी फार शिस्त आमच्यात आली त्यामागे भाऊ कारणीभुत . जेवणाच्या ताटात अन्न टाकून देणं त्यांना जमत नव्हते . डोक्यावर केस वाढलेले आवडत नसे .
खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र सगळा बेशिस्त कारभार ! प्रचंड आग्रह ! लहानपणीच्या गरिबीची देणगी असलेल्या स्वतः च्या संकोची वृत्तीचे ते परिणाम असावेत . "अहो भाऊ आता जमाना बदललाय , आता खाऊ नको म्हणून सांगायची वेळ आली आहे ...आग्रह कुठचा करता ?' आमचे वाद व्हायचे ! 'आजोबा आत्ता आंबे नक्को ' अशी शुभु कंटाळायाची .
आठवणी खूप आहेत प्रवरासंगम मंदिरासाठी मी एकदा देणगी मागितली एका उद्योजकाकडून . माझ्या मुळे त्याचं एक अडलेल काम मार्गी लागलं होतं . आमच्या मंदिराला कंपाऊंड द्या म्हटलं बांधून ! तर तुझ्या घामाच्या पैशांन काय करायचे ते कर .अशा मार्गानं मंदिर उभाविण्या पेक्षा नसलेलं बरं म्हणाले .
एक अत्युच्च पापभिरुता अंगात भिणवली ! याला हिम्मत लागते नको म्हणायला ! त्याआधी " माझा बाप डरपोक इंजिनिअर यार ,रिटायर होईस्तोवर एक घर बांधू नाही शकला !!दुसरा कुणी असता तर चार पोट्ट्याना चार बंगले दिले असते " या सहज मानसिकतेत वावरणारा पुन्हा लाईन सोडत नाही .त्यांचेच जोडे पायात घालतो आणि वाट धरतो , राजकारणात हिच हिम्मत येण्याची वाट बघत बघत !!
*विनम्र अभिवादन आई भाऊना*