पानं

Monday, December 31, 2018

लहानपणी चे जिगरी दोस्त

लहानपणापासून मला खूप जिगरी दोस्त मिळत आलेत .यवतमाळला माँटेसरी बालक मंदिरात चौथी पर्यंत कस्तुरे नावाचा मित्र होता .तो बुटका , त्याच्याघरी चिकूच्या झाडावर मला चढवायचा ,माझे हाताला चिकू लागायचे सतत सोबत असायचा, उंचीत फरक असुनही  आमचे चांगले ट्युनिंग होते

जायकवाडीला संत्या अन धन्या चोवीस तास सोबत असायचे .वर्गात एकत्र तसे शेजारी तेच मित्र ! मी लंबुटांग ते गुटबैंगंण (देवेंद्रला म्हणायची)आईच्या भाषेत .
        
   परवा शेगावला जातांना मुन्ना कस्तुरे गाडी ओळखून फास्ट पळत समोर बाईक उभी केली .ड्रायव्हर ने त्याला ओळखले तुमच्या मित्राची गाडी आहे ती,  म्हणताच उतरलो .त्याने कडाडून मिठी मारली ....उंचीत फरक तरीही !!
            मित्र हिच या अगस्तीची मिळकत या आयुष्याची ....

        अगस्ती दोस्त मित्रांच्या बाबतीत समृद्ध आहे पूर्वीपासून ! "मंगलमुर्ती 'नावाचं आकर्षण असेल .नावामुळे हुशार असल्याचा त्यांचा गैरसमजही होता !मी ही त्यांना आजतागायत पोसू दिला !!
त्यामुळे ते मला चिटकून असत !!

     असाच परवा मला बीडच्या आमच्या मल्टिपरपज हायस्कूल च्या एका क्लासमेंटचा फोन आला .जुन्या आठवणी ताज्या करण्याच्या प्रयत्नात मला विचारता झाला "अरे तुझ्या सोबत दोघे ठेंगणे, समोरच्या टेबलावर तुम्ही बसायचे , maths चे काळे सर बसवायचे त्यांच नाव काय तुझा काही संपर्क ?'
          दोघेही माझ्या पेक्षा खूप हुशार ,थोडे वेंधळे , गडबडे, अभ्यासात प्रचंड हुशार . दोघेही उंचीच्या बाबतीत माझ्यापेक्षा फूटभर कमीच ! त्यामुळे बुटकेच .

   वास्तविक त्या मुंसीपालटी च्या शाळेतला त्यापैकी एक मित्र माझ्या संपर्कात राहिलेला ! त्या शाळेत मी ऑगस्ट ते मार्च एवढाच कालावधी काढलेला , फार कुणी आठवणीतही नव्हते .हा मात्र पुन्हा संपर्कात आला . इंजिनिअर झाल्यावर माझा मेव्हणा म्हणून त्याचा संपर्क झाला . आहे तसाच आहे अजून काही बदल नाही  .
        मला अजिबात गती नसलेल्या प्रांतात अध्यात्म, ज्योतिष शास्त्रात गतिमान असणाऱ्या या मित्राला कठीण विषय आवडतात . काल फोन केला त्यानं उचलला नाही दत्त जयंती निमित्त पारायण केले त्यानी ! कठीण असते ते ,अच्छे अच्छे लोक दत्त महाराजांच्या नादी लागत नाहीत कडक सोवळे असते ..हा लीलया पेलतो .
          साधा सरळ माणूस , कुठलेही आढेवेढे याच्या जवळ नाहीत ! मध्यंतरी दुर्धर आजाराला धोबीपछाड दिली  . आज टकाटक पारायणं करणाऱ्या या गणेश पदे ला टकाटक रहात , माझ्याशी दोस्ती आणि नातं निभवू दे आई जगदंबे , हिच त्याच्या प्रकटदिनी प्रार्थना .
     
        
    
     

    

   

       
        

कृतज्ञ आम्ही कृतार्थ आम्ही


कृतज्ञ आम्ही कृतार्थ आम्ही

मा देवेन्द्रजी

      आम्ही संभाजीनगर वासीय आपले आभारी आहोत .आपण राज्य सरकारचे दायित्व आपल्या  खांद्यावर घेतल्यापासुन शहर विकासासाठी  मा आ अतुल सावे यांचे पाठीशी उभे राहिलात !
अतुलजींनी मागणी करावी आणि आपण पूर्तता .
      सर्व प्रथम रस्त्यांसाठी 25 कोटी दिलेत, ते पूर्ण झाल्यावर  आणखी देण्याचे वचन दिले . श्रेयासाठीच झगडणाऱ्या  महापालिकेने रस्ते पूर्ण करण्यास वेळ घेतला !
     त्यानंतर 100 कोटींची बेगमी आपण करून दिलीत . त्या रस्ताकामाच्या उदघाटनाला महापालिकेला 19च्या जानेवारीचा  मुहूर्त मिळाला . या रस्त्यांची कामे लवकर पूर्ण होवो व  आणखी निधी देण्याचा आपला मनोदय पूर्ण होवो !
      गुंठेवारी भागात विकास कामासाठी परवानगी देण्याबाबत  मा अतुलजींनी पाठपुरावा करताच आपण परवानगी दिली .त्याचे फळ सर्व गुंठेवारी भागातील रस्त्यांच्या व अन्य कामात बघायला मिळते !
          कचऱ्याचा प्रश्न आपणाकडे पोहोचला आपण तत्परतेने 90 कोटी दिले . कचऱ्यावर प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी आपण त्याचा फालो अप घेतलयाचे कळते .
        सिडको भागातील नागरिकांना नुकताच आपण मालकीहक्क प्रदान करण्याचा निर्णय घेतला .आणि सिडकोवासींयांच्या आनंदाला उधाण आलाय ! नुसते श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला मात्र आपल्याशिवाय कुणी हा प्रश्न मार्गी लावू शकणार नाही हे आम्हाला ठाऊक होते .मा अतुलजींचा  पाठपुरावा कार्यरत झाला ! सिडको वासीय कृतकृत्य झाले .
      स्मार्ट सिटी प्रकल्पात संभाजीनगर यावे यासाठी आपले योगदान आणि त्यानंतर सिटीबस त्या प्रकल्पात अंतर्भूत करण्यासाठीची आपली भूमिका आपल्या दूरदृष्टीची साक्ष देते !

आम्ही मंदिर प्रश्न आपणा कडे पोहोचवला आपण मार्ग काढण्यात उत्तर शोधण्यात जी तत्परता दाखवली आमच्या भावना जपल्या सर्व संभाजीनगरकर आपले कृतज्ञ आहोत .

              या शहरावर मा अतुलजी सावे यांच्या सह आम्हा कार्यकर्त्यांच्या सर्व मागण्यांबाबत आपण नेहमी सकारात्मक राहिलात ! शेवटी एवढेच ...

कृतज्ञ आम्ही ! कृतार्थ आम्ही !!!
  
               देवेन्द्रजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है
                         
                           - मंगलमुर्ती शास्त्री भाजपा मंडळ अध्यक्ष
      

 
    










Sunday, December 16, 2018

संजय गोसावी वाढ दिवस शुभेच्छा 2017

सांगा कस जगायच
कण्हत कण्हत
का गाणे म्हणत ?
संजय नारायण गोसावी यांना विचारा
ते बरोबर तुम्हाला गाणे म्हणतच जगायला मदत करतील .
उल्हास, दिलीप, अरुण,गजानन आणि बडनेरा  हिच यांची दिल दोस्ती अन दुनियादारी !
परवा अरुण दादा परांजपे आलेले
सगळे संजू संजू चाललेले .
दोस्ती जगावी,पेलावी, निभवावी, ती संजुनीच !
हेच जर अनुष्काला विचाराव तर उत्तर
संजुमामानीच ! ते तिचेही अलगद दोस्त बनून राहातात ,
अनं शुभांगीला विचारल तर संजुमामानीच !
अगदी श्रीनकुल सोबतही  दोस्त बनून राहाणारे संजयराव ,
हसत खेळत जगायला शिकवणारे !!!
त्यामुळेच ते जसे गोसावी परिवारात प्रिय असतात
तसे शास्त्री परिवारातही .
आम्ही शालक मंडळी जराशी ऐदी , आळशात रमनारी
त्यासापेक्ष संजयराव न कंटाळता (आम्हाला) ,
आजही साठीत पदार्पण करतांना ,
आठवातात तेव्हापासून चंटुकडेच आहेत .
हा गुण श्रीनकुलकड़ेही देण्याचा स्वार्थ त्यांनी साधला नाही !
स्वतः एकदम अनुशाशित जीवन जगणारे संजयराव आमच्यकड़ून कधीच अपेक्षा करत नाहीत .
 याचा आनंद अनं दुःखहि आहे .
कुठे आम्ही " जिजाजी' चा ग़ैरफायदा तर घेत नाही ?
संजयरावांची एकषष्ठी साजरी कराविच लागेल
किमान त्यांना तुम्ही साठी ओलांडली हे सांगण्यासाठी तरी !
तेव्हा देवेन्द्रा भारतात ये
रमी चा डाव रंगवुत ,
संजयराव आहेतच मधुन मधुन डब्बे समोर ठेवायला !
(चकल्या , शेव, काजू , बदाम कम चकना म्हणुन )
स्वतः जिम फिट राहातात ,
आम्ही कष्टाने उरळीकांचनला घटवतो ...
ते आमच्या पोटावर "घट' बसवतात ! पुन्हा U K ..
 तर असे आमचे जिजाजी संजयराव यांना साठीपुर्ती निमित्त
शिर साष्टांग नमस्कार . त्यांच्या असेच टकाटक,  जिम्फिट , निरामय आयुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना -अगस्ती

शुभांगी साखरपुडा निमित्त

*ये माय बैस थोडं माझ्या जवळ !*/
*लेकीचा साखरपुडा !*
*कवी : प्रा. विजय पोहनेरकर*
---------------------------------------------------

ये माय बैस थोडं माझ्या जवळ
कळालच नाही माझी लाडाची लेक
एवढी मोठी कधी झाली ते !
सहज कुणीतरी स्थळ सुचवलं
म्हणून विचारून पाहिलं
आणि बघता बघता पुढच्या सगळ्याच गोष्टी
इतक्या फास्ट आणि सुरळीत झाल्या
की आज एकदम
*साखरपुड्याचाच दिवस उगवला !*

माझ्या चिमणीचे दोनाचे चार हात होत आहेत
तिच्या अंगाला हळद लागणार आहे
याचा आनंद नक्कीच आहे
पण एक अनामिक हुरहूर वाटत आहे !

आज साखरपुडा होईल
येत्या तीन चार महिन्यात लग्न होऊन
लेक सासरी निघूनही जाईल !

लग्न होऊन प्रत्येक मुलगीच सासरी नांदायला जाते ही जगरहाटीच आहे
तरीही
तू या घरात नसणार या कल्पनेनंच कसं तरी होतंय
हुरहूर , धडधड , काळजाचा तुकडा पडणे
या सगळ्या शब्दांचे खरे अर्थ मला आज कळतायत !
आता माझीच ही परिस्थिती आहे तर तुझ्या आईचे हाल काय असतील ?
या विषयावर एकमेकाला बोलायची आमची हिंमतच नाही !
समोरा समोर आलं की
मी ही अबोल असतो आणि हल्ली ती ही अबोल असते
पसंती आल्या पासून तुझ्याशी खूप खूप बोला वाटतं
पण शब्दच फुटत नाहीत
म्हणून म्हणलं .........
*ये माय बैस थोडं माझ्या जवळ !*

बघू दे तुझ्याकडे मायेनं
येऊ दे दाटून असंख्य आठवणी
आठउ दे भातुकलीचा खेळ ,
काही गोष्टींसाठी केलेला हट्ट
मी बाहेरून आल्यावर तू मारलेली गच्च मिठी
बाहेर जातांना भरून आलेले तुझे डोळे
आणि आत्ता येतो हे वचन देतांना
तुझा घेतलेला *गोड गोड पापा !*
आणि क्षणार्धात तुझ्या चेहऱ्यावर पसरलेला लाख मोलाचा आनंद !
म्हणून म्हणतो .......
फिरउ दे तुझ्या डोक्यावरून मला हात
लहानपणी सारखा ,
तुला लाख लाख शुभाशीर्वाद देण्यासाठी !
कारण .........
उद्या पासून तुझ्यावर दुसरं कोणीतरी हक्क सांगणार आहे !
*अजून दोन दिवस राहू द्या मुलीला*
ही याचना मला करावी लागणार आहे !
*ते* घर तुझं आणि *हे* घर परकं होणार आहे !
*खरंच तसं होत असतं ?*
होत नाही ......पण मानावं लागतं !

बघ न काय वेडे पणा आहे
तुला समजावायचं सोडून
मीचं हळवा होतोय ,
पोरीचा बाप पोरगी जातांना 
*पालापाचोळा* होतोय !
*पोटचा गोळा देतांना चोळामोळा होतोय !*

बाळ मला खात्री आहे
तू सगळं छान निभाऊन नेशील !
तुझ्या वागण्याने , बोलण्याने , नम्रतेने
सगळ्यांना आपलंसं करून घेशील !
तुझ्या शिवाय *त्या घरात* पानही हलणार नाही
*पण या घराचं आणि आम्हा दोघांचं काय होणार ?* हा प्रश्न कुणीही कुणाला विचारायचा नाही !
कारण ...........
काही काही प्रश्नांची उत्तरं न मिळवण्यातच भलं असतं , तसाच हा एक प्रश्न !

हे झालं आमचं
आणि तुझं ?
बाप रे ! कल्पनाही करवत नाही !
तुझ्या मनाची घालमेल
मी समजू शकतो
प्रत्येक आसवां मागचे भाव
मी जाणू शकतो
पण ..........
पण काही काळजी करू नकोस
सगळं सगळं छान होईल !
लवकरच तुझ्या चेहऱ्यावर
खळखळणार हासू नक्की येईल !

पण का कोण जाणे
पसंती आल्या पासून
तुझ्याकडे पुन्हा पुन्हा पहा वाटतं
आणि मायेनं जवळ घ्यावं वाटतं
म्हणून म्हणलं .....
*ये माय बैस थोडं माझ्या जवळ !*

*प्रा. विजय पोहनेरकर*
*9420929389*
*औरंगाबाद , 11/2 / 2018.*

Saturday, December 8, 2018

सुहासकाकुचा वाढदिवस

आज सुहासकाकुचा हॅपी बर्थ डे !
            सुहास काकु म्हणजे लहानपणीपासून " कर्त्यव्याने घडतो माणूस ' शिकवत आलेली ! कर्त्यव्याकडे कधीही दुर्लक्ष होऊ न दिलेली ...
       दिलीपरावांनी "त्या गावीची 'आठवण दिली .मी ते गीत आत्ता वाचले . गाणं ऐकायला आम्हाला तर काकूंचाच आवाजात ते आठवते जरी ते गजानन वाटवे यांनी फेमस केले . गीताचे बोल वाचल्यावर  डोळ्यापुढे काकू तात्या अन बार्शीटाकळी आणले तर .. एक वेगळा आयाम गीतातुन  आपल्या परिवारासाठी मिळुन जाऊ शकेल !
        मागे टाकळीला गेलो होतो बांधकाम सुरू होते काकू एकटीच तिथे होती . मनात काकू किती हेकड आहे हि सहज भावना  झाली  होती !
         ...आणि गीत वाचण्यात आले काही ओळी गेल्या आयुष्यात घेऊन जाणाऱ्या होत्या ! क्षण जगून झालेले, जुन्या पानांत जपावे ,आणि डोळ्यांतील पाण्यानेच, नवे पान उलटावे!! तसे झाले ..... मग काकूंचे टाकळी प्रेम उलघडलेलं ! तिचा हट्ट चूक का ?  या वयात पूर्वायुष्य , जे सुखाने समृद्ध होते बार्शीटाकळीतच  , तिथेच अडकलेलं !!

त्या गावी, त्या तिथवर, चल झरझर मना पुन्हा!
ती निरुंद पायवाट
वळत वळत जाय आत
ते शिवार, ती विहीर,
पुढे एक लिंब जुना!

            तात्यांसोबतचे सुखद क्षण तेही तिथलेच ...

ते यौवन ती प्रीती
ती ओळख ती भीती
त्या शपथा ती रुसनी
ते समेट क्षणा क्षणा
    
        शिवाय  तिथेच ...
" रंगविलेले गोड सुख '   आधार असतो  गीताचाही अन काकूंच्या आयुष्याचाही ! नकळत काकूंचे टाकळी प्रेम गोड करावेसे वाटते शहरातील समृद्ध नागरी व्यवस्थेच्या तुलनेत ! 
     काकूंचे आयुष्य निरामय सुखदायी तिथेच होऊ शकते .  तिला शुभेच्छा देताना मागणं एवढंच कि  तिच्या मनाप्रमाणे नीटनेटकं ,टापटीप,  चिरतरुण आयुष्य लाभू देत , सगळ्यांना संपन्न तर तिने केलं आहेच सर्वार्थानं !!
                        - अगस्ती 
            









प्रशांत दिशा ऍनीवरसरी

दोन वर्षांपूर्वी येथील ओंकार बालवाडीत
एक मुलगी मुलाखतीला आली . मतिमंद ,मानसिक विकलांग मुलांना (ऑटिझम ) सांभाळण्यासाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी नेमणूक व्हायची होती .
     मुलीला विचारण्यात आले .नाव , गाव, वय शेवटी आणि ... शिक्षण ?
तिने उत्तर दिले , शिक्षण काय सांगणार ..." या व्यक्तीचा नवरा म्हणून 20 वर्ष सांभाळ केला  , लग्न झाल्यापासून चकार शब्द कधी काढला नाही ,स्वतः मूक होत  त्याला बधिर ठेवले , तो मुकाट्याने स्वतः ची भाजी स्वतः शिजवायचा मलाही खाऊ घालायचा !माहेरी कधी गेली नाही जायचा विचारही केला नाही , हा बिघडला तर कुठे जाईल नेम नाही ..... '
       आणि तिचे सिलेक्शन झाले ... qualification काय ते विचारलेच गेले नाही . सगळ्या गोष्टी नवऱ्याच्या वर्तनातून शिकल्याचे ...अन मग सगळा आनंदी आनंद !

 आता तिला दोन वर्षातच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणार म्हणे ! अशा त्या नवऱ्याचे नाव सांगून तिने जी नोकरी मिळवली ते नाव होते ....


प्रशांत अन उमेदवार होती दिशा !

आत्ताच प्रशांत नी ही भावभिनी कहाणी मला सांगितली फोनवर ! बायकोला कसे हुशार केले म्हणे !!!
मलाही त्याचे कौतुक वाटले अन दिशाचेही ! कारण त्याच्या लग्नाचा आज 23 वा वाढदिवस अत्यंत आनंदात जशे दोघे आहेत तशेच घालवतात ! कुठेही कुरबुर नाही किरकिर नाही !

तो राग आला की बाहेर कोंबड्यामागे फिरतो अन ती घरी कांदा लसूण अद्रक मसाले काढून ठेवते.... समेवर दिपकदादां सगळे धाक बाजूला काढुन  wish करायला पोहोचतो ! अस्मादिकांना अस्मान ठेंगणे होते कारण रमिचा डाव आज प्रशांतच्या नावे करायचा असातो ....जय जगदंब !

अंनिवरसरीच्या मनःपुर्वक शुभेच्छा !- अगस्ती 

Saturday, December 1, 2018

2 डिसेंबर वाढदिवस दोन स्वयंसेवकांचा

आज आपल्या परिवारातील  दोन स्वयंसेवकांचे वाढदिवस !
         दत्ता शास्त्री नगर कार्यवाह अकोला , डॉ हेरंब शास्त्री जिल्हा व्यवस्थाप्रमुख परभणी !
         दोघांची देहबोली वेगवेगळी . अनोटॉमी वेगवेगळी !  दत्ता प्रचंड कष्टीक तर तुलनेने हेरंब किंचित सुस्त . (किंचित शब्दाला अनेकांचे आक्षेप येतील, मात्र आज त्याचा वाढ दिवस आहे !)
         मात्र संघकार्य करतांना दोघेही समर्पित भावनेने ताकदीने करताना दिसतात . दत्ता कुठल्याही कार्यात अग्रेसर असणारा मात्र हेरंबचे तसे नाही ,  तरी संघ कार्यात तो प्रचंड कष्टीक असतो . आज परभणी शहर व ग्रामीण जिल्ह्यात त्याने खूप नाव मिळवले .
      कुणाहीकडे परिवारातील काही कार्य असल्यास दत्ता शास्त्री पाहिले आठवल्या जातात , अन तेही समर्पित भावाने कार्यरत होतात . मी समर्पित यासाठी लिहितो की कुणी माझें नाव घ्यावे ही अपेक्षाही नसते !  सगळ्यांची आवभगत, वास्तपुस्त करावी ती दत्तानीच .
        आई तात्यांचे संस्कार आणि तीन बहीनिंच्या  आशीर्वादाने ,  दत्ताला घरात एकुलता असूनही "आळशी' बनू दिले  नाही ! (Thanks to माई आक्की राणी ) त्याचे फार लाड झाल्याचे कधी दिसले नाही .
          कार्यक्रमात  स्वयंपाकाकडे लक्ष देण्यापासून भाज्या , किराणा आणण्यापासून ते आग्रहाने  वाढण्यापर्यंत , आणि कार्य पूर्तता झाल्यावर रात्री आमच्या सारख्या (कार्यात खायला काळ अन भुईला भार असणाऱ्या ) कार्यकर्त्यांच्या मनोरंजनासाठी पत्त्यांसह तत्पर असणाऱ्या  शास्त्री परिवारात दोघांचे स्थान अभेद्य आहे एक दत्ता शास्त्री , दीपक शास्त्री   ! श्यामदादा  , दिपकदादां या दोन दादांमुळेच  मुळे शुभागींचे लग्न सुखकर झालेले , अस्मादिक निश्चिन्त होते .
        हेरंब शास्त्री घरात शेंडेफळ , त्यात परभणीला,  अबोल, सुस्त त्यामुळे नातेवाईकांकडून काहीसा दुर्लक्षित ! व्यवसाय निमित्ताने परभणीला अनोळखी गावात .
         "कितीक जन परभणीतून जातात मात्र माझ्याकडे येत नाहीत , तुझ्या शी संपर्कात राहतात ,मला साधा फोन करत नाहीत ' असे तक्रारवजा  तुणतुणे काहि वर्षांपूर्वी  वाजवायचा ! बाबीताईला , मला घरात मोठे असल्याचा फायदा होता ....तो शेवटचा .
           म्हटले " याचा दोष तुझाच ! ' आणि त्याने स्वतः चे विश्व उभे केले परभणीत .  "अरे वो काम डॉक्टरसाब देख लेंगे ' असे जेव्हा इतर लोक बोलू लागतात तेव्हा उर अभिमानाने भरून येतो . 
       या दोन्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "अधिकारी ' व्यक्तींना वाढदिवस शुभ शुभ ! सुदीनं सुदिनम जन्मदिनम तव म्हणताना त्यांच्या समर्थ साथीदार सौ लीना आणि सुषमा यांना जन्मदिनम मधुरं मधुरं करण्याचे सुचो यासाठी जगदंबे कडे प्रार्थना !


चरैवेति चरैवेति
                 यही तो मंत्र है अपना
नहीं रूकना नहीं थकना,
          सतत् चलना सतत् चलना
यही तो मंत्र है अपना,
            शुभंकर मंत्र है अपना ।


   दोघांच्याही राष्ट्र कार्यास मनःपुर्वक शुभेच्छा ! यज्ञेन यज्ञ मयंत देव: ....


           
         
         
       
 
        

Wednesday, November 28, 2018

मीनल वाढदिवस शुभेच्छा।

*देवघरातली समई*
----------------------------------------

व्यवसाय असो
अथवा असो घर
कधीच नसतो
त्यांचा ऊंच स्वर      ll

शांत , संयमी
कामाशी काम
धार्मिक वृत्ती
मुखा मध्ये राम ll

ना कुणाशी स्पर्धा
ना कुणाशी वैर
सर्वांचा आदर
वागणे ना गैर  ll

आठयागाठयांची गर्दी
चेहर्यावर कधीच नसते
म्हणूनच घरामध्ये
माणसांची वर्दळ असते ll

या म्हणलंकी घरी यायला
कुणी रिकामं नसतं
माणसं तिथेच जमतात
जिथे स्वागत असतं  ll

घर व्यवसाय सांभाळताना
धावपळ होते थोडी
कुलाचार , कुलधर्माची
आहे त्यांना गोडी ll

मंगलमूर्ती शास्त्रीची
अनमोल कमई
मिनल वहिनी म्हणजे
देव घरातली समई    ll

प्रा. विजय पोहनेरकर
9420929389
औरंगाबाद , 29/11/2018

Thursday, May 24, 2018

मनिषदादा मानसी वहिनी

हमने अक्सर तुम्हारी

राहो मे

रुक कर

अपनाही

इंतजार किया... 

अशा भावनांनी बार्शीटाकळीला टक लावून बसलेला मनीष दादाचे  कष्ट  आजच्याच दिवशी मलकापूरला चांडक हाय स्कूल  फळाला आल्याला आज 29 वर्ष पूर्ण होताहेत .
        वर्षावहिणींनी अशी समर्थ साथ दिली कि त्याला आज त्या निवडीचे समाधान निश्चित असेल .
             
           तुमसे मिली जो जिंदगी
                     हमने अभि बोई नही
             तेरे सिवा कोई न था,
                       तेरे सीवा कोई नही ... अशा गुल गुलझार भावना त्याच्या असतील  .

          सहज बोलता बोलता शुभेच्छा देतांना , आज तिघांच्या लग्नतिथी आहेत पैकी संजय शास्त्रींना विनाकष्ट बबडी मिळाली असं हसत बोललो तो मनिषदादा " चिरंजीव कुत्सित , हसताय का असूयेने का आणखी काही ' बोलते झाले .
               त्यानंतर अर्धा तास टाकळी ते मलकापूर , आक्काची मदत , वगैरे झाले . प्रवास कसा खडतर होता , यजुर्वेद ऋग्वेद चर्चा झाल्या . एकतर्फी प्रवास किती वाईट असतो हे अस्मादिकांसह सर्व सामान्यांना चांगले ठाऊक असते !  ती सर्व सामान्य मंडळी स्टेशन बदलत अखेर ठेपा गाठतात .
                     पण  दादासारखा स्टेशन पक्के ठरवत प्रवास पूर्ण करतो त्याचा आम्हास अभिमान असणे स्वाभाविक आहे . त्यामुळे कुत्सित वगैरे भाव आमच्या बोलण्यात येणं शक्य नाही . ते स्वभावात नाही .  असूया म्हणाल तर नक्कीच आहे .
            दादा त्या काळातल्या चर्चा गॉसिप बद्दल बोलले . वर्षा वहिनीशी साक्षगंधाअगोदर कधीच बोलणे न होताही उगीचच ..
            दादा याचीच असूया आहे ! शास्त्रींची अख्खी पिढी निष्क्रिय निघाली . अकराच्या अकरा भावंड ... ! आरजू अन इंतजार शिवाय कुणाच्याच हाती काही लागले नाही , कुणाचीच चर्चा नाही .गॉसिपचा विषय होणे तो दूरच !! आम्हाला तुमचा अभिमान असावा पण कोत्या मनाचे नं, म्हणून असूया !!! तसेही तुम्हाला आम्ही शास्त्रीच मानतो ...पण हे समाधान आहे . चर्चेत तर तात्यानंतर मनिषदादाच !
         
     *" चर्चे उन्हीं के होते है, जिनके मिजाज कुछ अलग से होते है '*

इथेच महत्व "मनीष' असण्याचे आहे दादा . आपण जे मिळवलं ते अथांग आहे वर्षा वहिनीच्या रूपाने ! !  " सहन करणे ' याची परिभाषा   जीने  "सहज करणे ' अशी केली  , सगळे आनंदाने निभवले , सांभाळले !!  तुम्हाला नक्कीच निवडीचे समाधान असेल . आणी "  रुक कर अपनाही इंतजार किया ...' या गुलजार   भावना मनी असतील .

                  आजच्या   सर्व *(सौ मानसी(वर्षा)-मनिषदादा , सौ विनोदिता(बबडी)- संजय शास्त्री , सौ  रश्मी (नूतन alias छोटी )- रविकांत दिक्षित)* उत्सवमूर्तींना   लग्न तिथीच्या अनगिणत   शुभेच्छा -अगस्ती

Wednesday, May 2, 2018

आई पुण्यस्मरण 1 मे 2018

पुण्यस्मरण

आज आईच्या पुण्यस्मरणाचा दिवस .
शेवटच्या पाच वर्षांचा संपूर्ण  कार्यकाळ तिने माझ्या नावे लिहिला होता .घरात मोठा म्हणून जन्माला येण्याचं भाग्य ते असे असते . आई वडिलांच सानिध्य ,प्रेम ,माया जनरली मोठ्यांच्या वाट्याला येत असते, मी भाग्यवान आहे . मालमत्तेत मोठयांनी वाटा मागुच नये खरंतर !
         
     तशी आईनी फार लवकर आमच्या पासून दूर होऊन आमच्यावर अन्यायच केला . 1946- 98 हा तिच्या आयुष्याचा छोटा काळ कुणालाही व्यथित करणारा असाच होता .

     आम्हाला सौ बाबीताई लाभली जिने आईची जागा निभावली . आठवण येऊ दिली नाही . धपाटे , चकल्या आजही बाबीताईंनी कराव्या अन आईच्या हाताची चव द्यावी . आईवरचे हक्काचे  चिडणे ,ओरडणे  आता बाबीताई वरच होत असते ... 

        आईची अशात रोज आठवण येत आहे. पत्ते कुणी काढले कि सगळ्यांना ताई अलायस आई आठवते . आईच्या वाट्याला सुख फार कमी आले , रांधा , वाढा, उष्टी काढा यातच तिचं माझ्या आठवणीतलं सगळं आयुष्य गेलेलं !

       भाऊंच्या स्वभावानुसार पै पाहुणे , मित्रांच्या राबत्या मुळे आणि आईच्या समर्थ साथीने घर भरलेले असायचे जे आजकाल दुर्मिळ चित्र आहे . त्यामुळे या " साहेबींन ' बाईचा मॅक्सिमम वेळ स्वयंपाक खोलीत जायचा . तिलाही खाऊ पिऊ घालण्याची आवडच होती . कोथिंबिरीच्या वड्या , गुलाबजामुन आईच्याच हाताचे ,व्वा !

         अगस्तीला सांभाळून घेण्याचं अवघड काम ती लीलया निभावत होती . आईच्या पदराआडचं लेकरुच  म्हणांव .  भाऊं समोर जाण्याची त्यापूर्वी हिम्मत नव्हती . आईच्या जाण्या नंतर भाऊंनीच घरी दोन्ही रोल केले , त्यांनी स्वभावातही बदल केल्याचं स्मरते.

       आज सर्व मावश्यांना फोन करणे  हिच तिला आठवण्याची , तिच्यावर श्रद्धा दाखवण्याची रित  मी टाकली . बंडू , चंदू,  शिला वर तिचे विशेष प्रेम दिसायचे . दादामामाशी वेगळं गु-फत-गु असायचंच ! तेव्हा या सर्व समस्त  मामकुळाला आजचा  नमस्कार "आई ' निमित्त .

स्व सौ  सुलभा प्रभाकर शास्त्री 1मे 1998

बाबुराव उपाख्य मा गो वैद्य

 12March 2018


           "बाबुराव तुमचे वय क़ाय? ' विचारले तर " मला शंभरीला इतके वर्ष इतके दिवस बाकी आहेत ' असं उत्तर आत्मविश्वासाने देणारे व्रतस्थ ऋषितुल्य , व्यक्तिविशेष ,आमच्यावर ज्यांचे लेखन संस्कारते झालेले,  असे मा श्री बाबुराव उपाख्य माधव गो .वैद्य यांचे चरणस्पर्श करीत मिळालेले आशीर्वाद  हि आजच्या आमच्या  दिवसाची जमेची बाजु .
           "मागो 'या शब्दाला आयाम ते किती असावे , तरुण भारतचे अनेक वर्ष संपादन व नन्तर प्रबंधन करणारे , तरुण भारतचे " दिशा 'कार , रा स्व संघाचे प्रवक्ते , विधानपरिषद सदस्य , हिस्लाप कॉलेजचे संस्कृतचे प्राध्यापक म्हणुन सूरवातीचा प्रवास...
            तुझ्यासाठी " भाष्य ' ची  पानं जमा करून ठेवलेत  हो,असं आईच्या पत्रात वाचुन सुखानुभुती अस्मादिकांनी नोकरीच्या गावी  अनेकदा  घेतलेली ! आई किती माझी काळजी घेते हा आईविषयीचा आदर वाढ करणारा आनंद ज्यांच्या "भाष्य' मुळे मिळायचा त्यांची आज प्रत्यक्ष भेट तेही त्यांच्या 95 व्या वाढदिवशी . चार पाच महिन्यांची " भाष्य ' एकदमच वाचायचो तेव्हा . ... 
         " संघीष्टयाशी संसार करायचा म्हणजे  मागच्या जन्मीचे पापच हो ' अशा काळात  सौ सुनंदा माधवांना हया कडव्या संघीष्टयाचा संसार सांभाळायचा म्हणजे किती पापड़ बेलावे लागले असतील नाही ! आपल्या दोन मुलांसह किती समर्पण या माऊलीनं केल असेल तिलाच ठाऊक . हिस्लोपची अर्थसुरक्षा तरुण भारताने कशी निभवली असेल  ? आणीबाणी तर पाचवीलाच पूजलेली .
         ....तरीही कृतकृत्यतेचे तेज आजही आजींच्या चेहऱ्यावर झळकताना पाहुन आनंद तर होतोच मात्र आदर द्विगुणीत तेव्हा होतो जेव्हा घरासमोर नेमप्लेट वर सौ सुनंदा माधव वैद्य MA संस्कृत वाचायला मिळते .... आदर पटीत वाढतो जेव्हा हे ऐकायला मिळते कि हि पदवी वयाच्या पासष्टाव्या वर्षी मिळवलेली आहे !       प
        "  प्रार्थयामहे भव शतायु:
                  ईश्वर सदा त्वाम् च रक्षतु ' म्हणतांना जीभ अड़खळते . फक्त शतायु म्हणावे ? राष्ट्रकार्याला समर्पित यज्ञकुंडाला आपल्या अनेक शतायुंच्या समिधांची आवश्यक्ता हा आमचा स्वार्थ . निरामय सुद्धा आमच्यासाठीच .. म्हणुन दिर्घ निरामय आयुष्यासाठी ईश्वराकडे मागणं .
                                   -मंगलमुर्ती प्र . शास्त्री औरंगाबाद


ता क : श्री दत्ताजी जोशी यांच्यामुळे आम्हाला हा आनंद मिळाला त्यांना शिर साष्टांग दंडवत .




         
    
             












 मनमोहन
राम
धनंजय
श्रीनिवास
माधव गोविंद वैद्य

83 ला 

केळवण

26मार्च 2018

         आजच्या दिवसाचा समारोप एका नितांत  सूंदर भावोत्कट  केळवनाच्या कार्यक्रमाने झाली . मन भरून येणे ,कंठ दाटने, तेही एका हसत खेळत चाललेल्या कार्यक्रमात . डोळ्यात पाणी अनं बोलणे अवघड व्हावे असा .
      आम्ही खरच नशीबावान आहोत .गजानन महाराजा च्या आशिर्वादाने इतके छान शेजारी मिळावेत . सोहोनी,नारखेड़े ,कस्तूरे, पोहनेरकर, गोसावी, कुलकर्णी, देशमुख, देसाई ,शास्त्री एक भलमोठं कुटुंबच !
      आजच्या कार्यक्रमातील प्रत्येकाचा औपचारिकता विरहित सहभाग आनंद देणारा मात्र माझ्यासाठी आजच " घेवू कसा निरोप ,तूटतात आत धागे ' असा डोळे भरून आणणारा !
       सरांची साखरपुडयाची कविता अनं आजची कविता सतत जाणीव देणाऱ्या ! ! खरच मुलीचा बाप हा   छळभावनांचा पसारा असतो . आवरणे उत्तरोत्तर  कठीण व्हावे ...
         वासंती मामींचे कार्यक्रमास एक सूत्रात बांधने ,आणी कस्तूरमामानी मेनू सांभाळने आणी आम्ही एन्जॉय करणे हे नित्याचेच झाले . या वेळी  मुलांच्या सहभागाने प्रोग्राम "खेळ' कर झाला .
      हया अशा कार्यक्रमाचे पूर्वीचे महत्व कदाचित ,ज्यांच्याकडे शुभकार्ये आहेत त्यांना मदत वगैरे असावे ! मात्र आजच्या सापेक्ष महत्व तेव्हा अधोरेखित होते जेव्हा ..
                 आमची रंजुताई त्याचा आस्वाद घेते , व्यस्त शेड्यूल मध्ये वेळ काढत  , डॉ रंजना देशमुख मैडम रुग्णालयात सकाळपासुन रात्री पर्यन्त असंख्यांचे शुगर बीपी हार्ट नार्मल करत , घरी सोवळेओवळे ,स्वयंपाक सांभाळत देशमुखांचे बीपी कंट्रोल करत (!!) ,सकाळी लवकर उठुन पक्वान्न म्हणुन करंज्या करते , मिनु तुला आवडतात " चल खा ' सुद्धा होते. गोविंद सरांशी किती एकरूप आहे ते पेपर मधल्या मार्कात पहिला नंबर घेत सिद्धही करते !
              वर स्वागताच्या पायघड्या रंजुताईच्याच! सगळे ग्रेट !
सौ रसिका वहिनींची महालक्ष्मी आराधना वातावरण मंगलमय  झालेले . सतीश काकांची फोटोग्राफी बहरुन आलेली !
         चि शुभांगी च्या केळवनाला आपणा सर्वांच्या उत्साहाने रंगत आली . आपण सर्वांचे अनेक आभार

          
          

Sunday, March 4, 2018

एकच क्लासमेट जी ...

एकच क्लासमेट जी .......


राष्ट्रीय शेतकी विद्यालय खोलापुर येथे आमच्या माध्यमिक शिक्षणाची सांगता झाली . दहावी झाली एकदाची . सुखद आठवणी सोबतच्या सहविद्यार्थ्यांच्या ,मित्रांच्या  विचाराल तर फार कमी .
        जिवलग राजाभाऊ सध्या पेपर वाटतो ,चार गावाचे टपाल त्याच्याकडे आहे . गावात गेलो कि भेट नक्की होते .
          माकोड़े .. निष्णात गवंडी आहे विश्वकर्माच होता .(दहावी नन्तर भेट नाही .
           चौधरी हा ग्रामसेवकाचा मुलगा . बरयापैकी हुश्शार .
हा बहुरूपी समाजाचा . गाव वस्त्यावर गावोगाव फिरून ,पोलिस, अधिकारी , शंकर हनुमान अशी सोंग घेत लोकांची करमणुक करणे अन समाजस्वास्थ्य हलकंफुलकं ठेवण , समाजमनावरचा ताण (स्ट्रेस)घालवण्याचे अत्यंत महत्वाचे काम या समाजाकडे पूर्वीच्या काळी होते . हाही पुढे ग्रामसेवक झाल्याचे कळले मात्र भेट कधी झाली नाही .
           एक राऊळ म्हणुन माझ्यासोबत होता तो पुढे दर्यापुरला बारावी पर्यन्त रूम घेवून रहात होता . मला आठवती आणि "जाणीव'ती याची पाहिली " गरीबी ' ... रोज कड़बोळी शिजवने अनं  दिवस ढकलने अशी याची परिस्थिति .मी मुद्दाम घरून डबा घेवून याच्या रूम वर जात असे .तेवढाच याला चेंज म्हणुन !
यांचीही नन्तर भेट नाही . ........
           
           एकच क्लासमेट जी माझ्याशी आजही संपर्क ठेवते ...

           एकच क्लासमेट जी दिसायला सुंदर आहे .....
           (अस लिहिणे मिनललाही आवडेल !)

           एकच क्लासमेट जी भेटली कि मला खाली वाकवते ...
           (माझ्यानंतर जन्माला येवून सुद्धा !)

            एकच क्लासमेट जी.. शिर साष्टांग नमस्कार घेते

            एकच क्लासमेट जी आमच्या कुटुंबाची काळजी करते

            एकच क्लासमेट जी अगणित समस्यांचे उत्तर आहे .

            एकच क्लासमेट जी आम्हास समजुन घेते

            एकच क्लासमेट जी आम्हा सगळ्यांची लाड़की आहे

           एकच क्लासमेट जी ची भेट आम्हा कुटुंबियाना अनिवार्य    असते .

             एकच क्लासमेट जीच्या साठी भांडण मारामाऱ्या करून          अस्मादिकांनी बारावी पणाला लावली .( पेपरला जाताना संरक्षणात जावे लागले होते ...)
             
              ती  आज (तीची क्षमा मागुन वय सांगतो ..)बावन्न ची पूर्ण होत आहे . सर्व मामकुळासाठीचं बावन्नकशी सोनं , शेंडेफळ म्हणुन लाडाच असणारच पण शेंडेफळ असूनही मोठेपण मिळवणारं अस हे व्यक्तिमत्व .....बाबीताई पासून   सर्व भाच्यासाठी मावशी आत्या हे नातं मैत्रीण किवा ताई मध्ये बदलवणारी !

               तेव्हाची शाळेतली अलका दत्तात्रय पांडे आजची सौ अलका सुनील कुलकर्णी आज वाढ दिवस साजरा करत आहे .
तिला शिर साष्टांग प्रणिपात .....
       
                                          ----   अगस्ती
   



           



           
             

Sunday, January 7, 2018

शरद काका गंभीर अमृतमहोत्सव

दंताजीचे ठाणे सुटले
नन्ना म्हणते मान
फुटले दोनही कान
अवघे पाऊणशे वयमान .....
अशी सामान्यतः अमृतमहोत्सवी जेष्ठांची व्यथा असते ! मात्र कालच्या शरद काका गंभीराच्या अमृतमहोत्सवी   वाढदिवशी कुठेही जाणवले नाही .
        महोदय ,महाराज ...अशी सुरवात फोनवर झाली  कि समजाव जॉली ,एंजॉयस शरद काकांचा कॉल आहे.जनरली Expect nothing, appreciate Everything अशी रचना असल्याने , काकांचा कॉल हवाहवासा वाटने सहज आहे .
           काकांचे मला आकर्षण  त्यांचे एयरफोर्स बैकग्राउंड असल्याने सुद्धा आहेच .भाऊंची अतिशय इच्छा होती एकतरी मुलगा मिल्ट्रीत जावा .मी "एयरमैन'ची परीक्षा नागपुरला पास केली मात्र मुंबईत शारिरिक मध्ये फेल झालो . भाऊचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही कारण नन्तर प्रयत्न केले नाही ... त्या उंचीवर मी पोहोचलो नाही फक्त उंचीच वाढली !!
           शरदकाकातील त्या सैनिकाला सलाम !
              गंभीर कुटुंबाचे महत्व माझ्या लेखी खुप मोठे आहे हे सांगायला मी निःसंकोच आहे . स्व मामीआजीनी वाटलेल्या निरपेक्ष ,निस्वार्थ,निखळ प्रेमाचा मी लाभार्थी आहे . नव्वदीच्या दशकात औरंगाबादला माझे पहिले Gauranter स्व रमेशकाका ,रेवती काकु होत्या त्या काळात ज्यावेळी कदाचित भाऊनी पटकन घेतली नसती . ..
        ( ब्राम्हणांनी व्यापार धंदे करू नए, नोकरीच करावी अशा काळात माझ्या पहिल्या बँक कर्जाला हमी माझ्यासाठी दिली रमेश काकानी . रमेश काका माणसात रमनारे ,सर्व नातीगोती जपणारे ...पुढच्या पिढीत अमोल बरयापैकी जपतोय...  या निमित्ताने स्व रमेशकाकाना अभिवादन ! )
         मदनकाका आपल्य्या ग्रुपवर एक्टिव असल्याने त्यांचा परिचय वेगळा सांगण्याची गरज नाही , चित्रा आत्यातर गेली क्रित्येक वर्ष आमच्या आहार विहार अन  व्यवहारावर लक्ष ठेवून आहे ... ऑडिट करते आहे ....
       
       तर शरद काका कालच्या उत्सवी सोहळयात झालेल्या मनोगतानी आपले व्यक्तित्व अधिकच खुलले, माहीत झाले ! सांध्य घनातुन झिरपत आली विश्वम्भर सावली अशीच आपली रेखा सर्व मुलांनी उभी केली ते खरेच आहे . ..
                  तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा तृप्ततेचा भाव दिसला , जीवनात उषा सूंदर होतीच मात्र संध्या अधिकच सूंदर आहे , दिवसभराच्या प्रकाशदानाने तृप्त झालेला सुर्य अधिक प्रकाशमय अधिक स्नेहशील असतो , कृतार्थतेचा, कृतकृत्यतेचा भाव ओतप्रोत असतो हा कुसुमाग्रजान्चा अनुभव आपण सगळे अनुभवत असतो ...
          तर शरदकाका तुम्हाला असेच हसतेखेळते ,बिनधास्त , टकाटक ...निरामय दीर्घायुष्य लाभो हि रेणुकाचरणी प्रार्थना !
         
                                                     - अगस्ती
                                                     - सौ मिनल

ता क : अगस्ती ,देवेंद्र, हेरम्ब ,बाबीची ख्याल खुशाली चिंतणारे आमचे आवडते बाक पिम्पळगावचे  गोविंदमामा कुलकर्णी यांचे गंभीराशी नाते क़ाय असा प्रश्न सौ मिनल विचारत होती !! गोविंद ,गोविंद ..आणिक क़ाय !!!!!