पुण्यस्मरण
आज आईच्या पुण्यस्मरणाचा दिवस .
शेवटच्या पाच वर्षांचा संपूर्ण कार्यकाळ तिने माझ्या नावे लिहिला होता .घरात मोठा म्हणून जन्माला येण्याचं भाग्य ते असे असते . आई वडिलांच सानिध्य ,प्रेम ,माया जनरली मोठ्यांच्या वाट्याला येत असते, मी भाग्यवान आहे . मालमत्तेत मोठयांनी वाटा मागुच नये खरंतर !
तशी आईनी फार लवकर आमच्या पासून दूर होऊन आमच्यावर अन्यायच केला . 1946- 98 हा तिच्या आयुष्याचा छोटा काळ कुणालाही व्यथित करणारा असाच होता .
आम्हाला सौ बाबीताई लाभली जिने आईची जागा निभावली . आठवण येऊ दिली नाही . धपाटे , चकल्या आजही बाबीताईंनी कराव्या अन आईच्या हाताची चव द्यावी . आईवरचे हक्काचे चिडणे ,ओरडणे आता बाबीताई वरच होत असते ...
आईची अशात रोज आठवण येत आहे. पत्ते कुणी काढले कि सगळ्यांना ताई अलायस आई आठवते . आईच्या वाट्याला सुख फार कमी आले , रांधा , वाढा, उष्टी काढा यातच तिचं माझ्या आठवणीतलं सगळं आयुष्य गेलेलं !
भाऊंच्या स्वभावानुसार पै पाहुणे , मित्रांच्या राबत्या मुळे आणि आईच्या समर्थ साथीने घर भरलेले असायचे जे आजकाल दुर्मिळ चित्र आहे . त्यामुळे या " साहेबींन ' बाईचा मॅक्सिमम वेळ स्वयंपाक खोलीत जायचा . तिलाही खाऊ पिऊ घालण्याची आवडच होती . कोथिंबिरीच्या वड्या , गुलाबजामुन आईच्याच हाताचे ,व्वा !
अगस्तीला सांभाळून घेण्याचं अवघड काम ती लीलया निभावत होती . आईच्या पदराआडचं लेकरुच म्हणांव . भाऊं समोर जाण्याची त्यापूर्वी हिम्मत नव्हती . आईच्या जाण्या नंतर भाऊंनीच घरी दोन्ही रोल केले , त्यांनी स्वभावातही बदल केल्याचं स्मरते.
आज सर्व मावश्यांना फोन करणे हिच तिला आठवण्याची , तिच्यावर श्रद्धा दाखवण्याची रित मी टाकली . बंडू , चंदू, शिला वर तिचे विशेष प्रेम दिसायचे . दादामामाशी वेगळं गु-फत-गु असायचंच ! तेव्हा या सर्व समस्त मामकुळाला आजचा नमस्कार "आई ' निमित्त .
स्व सौ सुलभा प्रभाकर शास्त्री 1मे 1998
आज आईच्या पुण्यस्मरणाचा दिवस .
शेवटच्या पाच वर्षांचा संपूर्ण कार्यकाळ तिने माझ्या नावे लिहिला होता .घरात मोठा म्हणून जन्माला येण्याचं भाग्य ते असे असते . आई वडिलांच सानिध्य ,प्रेम ,माया जनरली मोठ्यांच्या वाट्याला येत असते, मी भाग्यवान आहे . मालमत्तेत मोठयांनी वाटा मागुच नये खरंतर !
तशी आईनी फार लवकर आमच्या पासून दूर होऊन आमच्यावर अन्यायच केला . 1946- 98 हा तिच्या आयुष्याचा छोटा काळ कुणालाही व्यथित करणारा असाच होता .
आम्हाला सौ बाबीताई लाभली जिने आईची जागा निभावली . आठवण येऊ दिली नाही . धपाटे , चकल्या आजही बाबीताईंनी कराव्या अन आईच्या हाताची चव द्यावी . आईवरचे हक्काचे चिडणे ,ओरडणे आता बाबीताई वरच होत असते ...
आईची अशात रोज आठवण येत आहे. पत्ते कुणी काढले कि सगळ्यांना ताई अलायस आई आठवते . आईच्या वाट्याला सुख फार कमी आले , रांधा , वाढा, उष्टी काढा यातच तिचं माझ्या आठवणीतलं सगळं आयुष्य गेलेलं !
भाऊंच्या स्वभावानुसार पै पाहुणे , मित्रांच्या राबत्या मुळे आणि आईच्या समर्थ साथीने घर भरलेले असायचे जे आजकाल दुर्मिळ चित्र आहे . त्यामुळे या " साहेबींन ' बाईचा मॅक्सिमम वेळ स्वयंपाक खोलीत जायचा . तिलाही खाऊ पिऊ घालण्याची आवडच होती . कोथिंबिरीच्या वड्या , गुलाबजामुन आईच्याच हाताचे ,व्वा !
अगस्तीला सांभाळून घेण्याचं अवघड काम ती लीलया निभावत होती . आईच्या पदराआडचं लेकरुच म्हणांव . भाऊं समोर जाण्याची त्यापूर्वी हिम्मत नव्हती . आईच्या जाण्या नंतर भाऊंनीच घरी दोन्ही रोल केले , त्यांनी स्वभावातही बदल केल्याचं स्मरते.
आज सर्व मावश्यांना फोन करणे हिच तिला आठवण्याची , तिच्यावर श्रद्धा दाखवण्याची रित मी टाकली . बंडू , चंदू, शिला वर तिचे विशेष प्रेम दिसायचे . दादामामाशी वेगळं गु-फत-गु असायचंच ! तेव्हा या सर्व समस्त मामकुळाला आजचा नमस्कार "आई ' निमित्त .
स्व सौ सुलभा प्रभाकर शास्त्री 1मे 1998
No comments:
Post a Comment