12March 2018
"बाबुराव तुमचे वय क़ाय? ' विचारले तर " मला शंभरीला इतके वर्ष इतके दिवस बाकी आहेत ' असं उत्तर आत्मविश्वासाने देणारे व्रतस्थ ऋषितुल्य , व्यक्तिविशेष ,आमच्यावर ज्यांचे लेखन संस्कारते झालेले, असे मा श्री बाबुराव उपाख्य माधव गो .वैद्य यांचे चरणस्पर्श करीत मिळालेले आशीर्वाद हि आजच्या आमच्या दिवसाची जमेची बाजु .
"मागो 'या शब्दाला आयाम ते किती असावे , तरुण भारतचे अनेक वर्ष संपादन व नन्तर प्रबंधन करणारे , तरुण भारतचे " दिशा 'कार , रा स्व संघाचे प्रवक्ते , विधानपरिषद सदस्य , हिस्लाप कॉलेजचे संस्कृतचे प्राध्यापक म्हणुन सूरवातीचा प्रवास...
तुझ्यासाठी " भाष्य ' ची पानं जमा करून ठेवलेत हो,असं आईच्या पत्रात वाचुन सुखानुभुती अस्मादिकांनी नोकरीच्या गावी अनेकदा घेतलेली ! आई किती माझी काळजी घेते हा आईविषयीचा आदर वाढ करणारा आनंद ज्यांच्या "भाष्य' मुळे मिळायचा त्यांची आज प्रत्यक्ष भेट तेही त्यांच्या 95 व्या वाढदिवशी . चार पाच महिन्यांची " भाष्य ' एकदमच वाचायचो तेव्हा . ...
" संघीष्टयाशी संसार करायचा म्हणजे मागच्या जन्मीचे पापच हो ' अशा काळात सौ सुनंदा माधवांना हया कडव्या संघीष्टयाचा संसार सांभाळायचा म्हणजे किती पापड़ बेलावे लागले असतील नाही ! आपल्या दोन मुलांसह किती समर्पण या माऊलीनं केल असेल तिलाच ठाऊक . हिस्लोपची अर्थसुरक्षा तरुण भारताने कशी निभवली असेल ? आणीबाणी तर पाचवीलाच पूजलेली .
....तरीही कृतकृत्यतेचे तेज आजही आजींच्या चेहऱ्यावर झळकताना पाहुन आनंद तर होतोच मात्र आदर द्विगुणीत तेव्हा होतो जेव्हा घरासमोर नेमप्लेट वर सौ सुनंदा माधव वैद्य MA संस्कृत वाचायला मिळते .... आदर पटीत वाढतो जेव्हा हे ऐकायला मिळते कि हि पदवी वयाच्या पासष्टाव्या वर्षी मिळवलेली आहे ! प
" प्रार्थयामहे भव शतायु:
ईश्वर सदा त्वाम् च रक्षतु ' म्हणतांना जीभ अड़खळते . फक्त शतायु म्हणावे ? राष्ट्रकार्याला समर्पित यज्ञकुंडाला आपल्या अनेक शतायुंच्या समिधांची आवश्यक्ता हा आमचा स्वार्थ . निरामय सुद्धा आमच्यासाठीच .. म्हणुन दिर्घ निरामय आयुष्यासाठी ईश्वराकडे मागणं .
-मंगलमुर्ती प्र . शास्त्री औरंगाबाद
ता क : श्री दत्ताजी जोशी यांच्यामुळे आम्हाला हा आनंद मिळाला त्यांना शिर साष्टांग दंडवत .
मनमोहन
राम
धनंजय
श्रीनिवास
माधव गोविंद वैद्य
83 ला
"बाबुराव तुमचे वय क़ाय? ' विचारले तर " मला शंभरीला इतके वर्ष इतके दिवस बाकी आहेत ' असं उत्तर आत्मविश्वासाने देणारे व्रतस्थ ऋषितुल्य , व्यक्तिविशेष ,आमच्यावर ज्यांचे लेखन संस्कारते झालेले, असे मा श्री बाबुराव उपाख्य माधव गो .वैद्य यांचे चरणस्पर्श करीत मिळालेले आशीर्वाद हि आजच्या आमच्या दिवसाची जमेची बाजु .
"मागो 'या शब्दाला आयाम ते किती असावे , तरुण भारतचे अनेक वर्ष संपादन व नन्तर प्रबंधन करणारे , तरुण भारतचे " दिशा 'कार , रा स्व संघाचे प्रवक्ते , विधानपरिषद सदस्य , हिस्लाप कॉलेजचे संस्कृतचे प्राध्यापक म्हणुन सूरवातीचा प्रवास...
तुझ्यासाठी " भाष्य ' ची पानं जमा करून ठेवलेत हो,असं आईच्या पत्रात वाचुन सुखानुभुती अस्मादिकांनी नोकरीच्या गावी अनेकदा घेतलेली ! आई किती माझी काळजी घेते हा आईविषयीचा आदर वाढ करणारा आनंद ज्यांच्या "भाष्य' मुळे मिळायचा त्यांची आज प्रत्यक्ष भेट तेही त्यांच्या 95 व्या वाढदिवशी . चार पाच महिन्यांची " भाष्य ' एकदमच वाचायचो तेव्हा . ...
" संघीष्टयाशी संसार करायचा म्हणजे मागच्या जन्मीचे पापच हो ' अशा काळात सौ सुनंदा माधवांना हया कडव्या संघीष्टयाचा संसार सांभाळायचा म्हणजे किती पापड़ बेलावे लागले असतील नाही ! आपल्या दोन मुलांसह किती समर्पण या माऊलीनं केल असेल तिलाच ठाऊक . हिस्लोपची अर्थसुरक्षा तरुण भारताने कशी निभवली असेल ? आणीबाणी तर पाचवीलाच पूजलेली .
....तरीही कृतकृत्यतेचे तेज आजही आजींच्या चेहऱ्यावर झळकताना पाहुन आनंद तर होतोच मात्र आदर द्विगुणीत तेव्हा होतो जेव्हा घरासमोर नेमप्लेट वर सौ सुनंदा माधव वैद्य MA संस्कृत वाचायला मिळते .... आदर पटीत वाढतो जेव्हा हे ऐकायला मिळते कि हि पदवी वयाच्या पासष्टाव्या वर्षी मिळवलेली आहे ! प
" प्रार्थयामहे भव शतायु:
ईश्वर सदा त्वाम् च रक्षतु ' म्हणतांना जीभ अड़खळते . फक्त शतायु म्हणावे ? राष्ट्रकार्याला समर्पित यज्ञकुंडाला आपल्या अनेक शतायुंच्या समिधांची आवश्यक्ता हा आमचा स्वार्थ . निरामय सुद्धा आमच्यासाठीच .. म्हणुन दिर्घ निरामय आयुष्यासाठी ईश्वराकडे मागणं .
-मंगलमुर्ती प्र . शास्त्री औरंगाबाद
ता क : श्री दत्ताजी जोशी यांच्यामुळे आम्हाला हा आनंद मिळाला त्यांना शिर साष्टांग दंडवत .
मनमोहन
राम
धनंजय
श्रीनिवास
माधव गोविंद वैद्य
83 ला
No comments:
Post a Comment