पानं

Saturday, December 8, 2018

सुहासकाकुचा वाढदिवस

आज सुहासकाकुचा हॅपी बर्थ डे !
            सुहास काकु म्हणजे लहानपणीपासून " कर्त्यव्याने घडतो माणूस ' शिकवत आलेली ! कर्त्यव्याकडे कधीही दुर्लक्ष होऊ न दिलेली ...
       दिलीपरावांनी "त्या गावीची 'आठवण दिली .मी ते गीत आत्ता वाचले . गाणं ऐकायला आम्हाला तर काकूंचाच आवाजात ते आठवते जरी ते गजानन वाटवे यांनी फेमस केले . गीताचे बोल वाचल्यावर  डोळ्यापुढे काकू तात्या अन बार्शीटाकळी आणले तर .. एक वेगळा आयाम गीतातुन  आपल्या परिवारासाठी मिळुन जाऊ शकेल !
        मागे टाकळीला गेलो होतो बांधकाम सुरू होते काकू एकटीच तिथे होती . मनात काकू किती हेकड आहे हि सहज भावना  झाली  होती !
         ...आणि गीत वाचण्यात आले काही ओळी गेल्या आयुष्यात घेऊन जाणाऱ्या होत्या ! क्षण जगून झालेले, जुन्या पानांत जपावे ,आणि डोळ्यांतील पाण्यानेच, नवे पान उलटावे!! तसे झाले ..... मग काकूंचे टाकळी प्रेम उलघडलेलं ! तिचा हट्ट चूक का ?  या वयात पूर्वायुष्य , जे सुखाने समृद्ध होते बार्शीटाकळीतच  , तिथेच अडकलेलं !!

त्या गावी, त्या तिथवर, चल झरझर मना पुन्हा!
ती निरुंद पायवाट
वळत वळत जाय आत
ते शिवार, ती विहीर,
पुढे एक लिंब जुना!

            तात्यांसोबतचे सुखद क्षण तेही तिथलेच ...

ते यौवन ती प्रीती
ती ओळख ती भीती
त्या शपथा ती रुसनी
ते समेट क्षणा क्षणा
    
        शिवाय  तिथेच ...
" रंगविलेले गोड सुख '   आधार असतो  गीताचाही अन काकूंच्या आयुष्याचाही ! नकळत काकूंचे टाकळी प्रेम गोड करावेसे वाटते शहरातील समृद्ध नागरी व्यवस्थेच्या तुलनेत ! 
     काकूंचे आयुष्य निरामय सुखदायी तिथेच होऊ शकते .  तिला शुभेच्छा देताना मागणं एवढंच कि  तिच्या मनाप्रमाणे नीटनेटकं ,टापटीप,  चिरतरुण आयुष्य लाभू देत , सगळ्यांना संपन्न तर तिने केलं आहेच सर्वार्थानं !!
                        - अगस्ती 
            









No comments:

Post a Comment