एकच क्लासमेट जी .......
राष्ट्रीय शेतकी विद्यालय खोलापुर येथे आमच्या माध्यमिक शिक्षणाची सांगता झाली . दहावी झाली एकदाची . सुखद आठवणी सोबतच्या सहविद्यार्थ्यांच्या ,मित्रांच्या विचाराल तर फार कमी .
जिवलग राजाभाऊ सध्या पेपर वाटतो ,चार गावाचे टपाल त्याच्याकडे आहे . गावात गेलो कि भेट नक्की होते .
माकोड़े .. निष्णात गवंडी आहे विश्वकर्माच होता .(दहावी नन्तर भेट नाही .
चौधरी हा ग्रामसेवकाचा मुलगा . बरयापैकी हुश्शार .
हा बहुरूपी समाजाचा . गाव वस्त्यावर गावोगाव फिरून ,पोलिस, अधिकारी , शंकर हनुमान अशी सोंग घेत लोकांची करमणुक करणे अन समाजस्वास्थ्य हलकंफुलकं ठेवण , समाजमनावरचा ताण (स्ट्रेस)घालवण्याचे अत्यंत महत्वाचे काम या समाजाकडे पूर्वीच्या काळी होते . हाही पुढे ग्रामसेवक झाल्याचे कळले मात्र भेट कधी झाली नाही .
एक राऊळ म्हणुन माझ्यासोबत होता तो पुढे दर्यापुरला बारावी पर्यन्त रूम घेवून रहात होता . मला आठवती आणि "जाणीव'ती याची पाहिली " गरीबी ' ... रोज कड़बोळी शिजवने अनं दिवस ढकलने अशी याची परिस्थिति .मी मुद्दाम घरून डबा घेवून याच्या रूम वर जात असे .तेवढाच याला चेंज म्हणुन !
यांचीही नन्तर भेट नाही . ........
एकच क्लासमेट जी माझ्याशी आजही संपर्क ठेवते ...
एकच क्लासमेट जी दिसायला सुंदर आहे .....
(अस लिहिणे मिनललाही आवडेल !)
एकच क्लासमेट जी भेटली कि मला खाली वाकवते ...
(माझ्यानंतर जन्माला येवून सुद्धा !)
एकच क्लासमेट जी.. शिर साष्टांग नमस्कार घेते
एकच क्लासमेट जी आमच्या कुटुंबाची काळजी करते
एकच क्लासमेट जी अगणित समस्यांचे उत्तर आहे .
एकच क्लासमेट जी आम्हास समजुन घेते
एकच क्लासमेट जी आम्हा सगळ्यांची लाड़की आहे
एकच क्लासमेट जी ची भेट आम्हा कुटुंबियाना अनिवार्य असते .
एकच क्लासमेट जीच्या साठी भांडण मारामाऱ्या करून अस्मादिकांनी बारावी पणाला लावली .( पेपरला जाताना संरक्षणात जावे लागले होते ...)
ती आज (तीची क्षमा मागुन वय सांगतो ..)बावन्न ची पूर्ण होत आहे . सर्व मामकुळासाठीचं बावन्नकशी सोनं , शेंडेफळ म्हणुन लाडाच असणारच पण शेंडेफळ असूनही मोठेपण मिळवणारं अस हे व्यक्तिमत्व .....बाबीताई पासून सर्व भाच्यासाठी मावशी आत्या हे नातं मैत्रीण किवा ताई मध्ये बदलवणारी !
तेव्हाची शाळेतली अलका दत्तात्रय पांडे आजची सौ अलका सुनील कुलकर्णी आज वाढ दिवस साजरा करत आहे .
तिला शिर साष्टांग प्रणिपात .....
---- अगस्ती
राष्ट्रीय शेतकी विद्यालय खोलापुर येथे आमच्या माध्यमिक शिक्षणाची सांगता झाली . दहावी झाली एकदाची . सुखद आठवणी सोबतच्या सहविद्यार्थ्यांच्या ,मित्रांच्या विचाराल तर फार कमी .
जिवलग राजाभाऊ सध्या पेपर वाटतो ,चार गावाचे टपाल त्याच्याकडे आहे . गावात गेलो कि भेट नक्की होते .
माकोड़े .. निष्णात गवंडी आहे विश्वकर्माच होता .(दहावी नन्तर भेट नाही .
चौधरी हा ग्रामसेवकाचा मुलगा . बरयापैकी हुश्शार .
हा बहुरूपी समाजाचा . गाव वस्त्यावर गावोगाव फिरून ,पोलिस, अधिकारी , शंकर हनुमान अशी सोंग घेत लोकांची करमणुक करणे अन समाजस्वास्थ्य हलकंफुलकं ठेवण , समाजमनावरचा ताण (स्ट्रेस)घालवण्याचे अत्यंत महत्वाचे काम या समाजाकडे पूर्वीच्या काळी होते . हाही पुढे ग्रामसेवक झाल्याचे कळले मात्र भेट कधी झाली नाही .
एक राऊळ म्हणुन माझ्यासोबत होता तो पुढे दर्यापुरला बारावी पर्यन्त रूम घेवून रहात होता . मला आठवती आणि "जाणीव'ती याची पाहिली " गरीबी ' ... रोज कड़बोळी शिजवने अनं दिवस ढकलने अशी याची परिस्थिति .मी मुद्दाम घरून डबा घेवून याच्या रूम वर जात असे .तेवढाच याला चेंज म्हणुन !
यांचीही नन्तर भेट नाही . ........
एकच क्लासमेट जी माझ्याशी आजही संपर्क ठेवते ...
एकच क्लासमेट जी दिसायला सुंदर आहे .....
(अस लिहिणे मिनललाही आवडेल !)
एकच क्लासमेट जी भेटली कि मला खाली वाकवते ...
(माझ्यानंतर जन्माला येवून सुद्धा !)
एकच क्लासमेट जी.. शिर साष्टांग नमस्कार घेते
एकच क्लासमेट जी आमच्या कुटुंबाची काळजी करते
एकच क्लासमेट जी अगणित समस्यांचे उत्तर आहे .
एकच क्लासमेट जी आम्हास समजुन घेते
एकच क्लासमेट जी आम्हा सगळ्यांची लाड़की आहे
एकच क्लासमेट जी ची भेट आम्हा कुटुंबियाना अनिवार्य असते .
एकच क्लासमेट जीच्या साठी भांडण मारामाऱ्या करून अस्मादिकांनी बारावी पणाला लावली .( पेपरला जाताना संरक्षणात जावे लागले होते ...)
ती आज (तीची क्षमा मागुन वय सांगतो ..)बावन्न ची पूर्ण होत आहे . सर्व मामकुळासाठीचं बावन्नकशी सोनं , शेंडेफळ म्हणुन लाडाच असणारच पण शेंडेफळ असूनही मोठेपण मिळवणारं अस हे व्यक्तिमत्व .....बाबीताई पासून सर्व भाच्यासाठी मावशी आत्या हे नातं मैत्रीण किवा ताई मध्ये बदलवणारी !
तेव्हाची शाळेतली अलका दत्तात्रय पांडे आजची सौ अलका सुनील कुलकर्णी आज वाढ दिवस साजरा करत आहे .
तिला शिर साष्टांग प्रणिपात .....
---- अगस्ती
No comments:
Post a Comment