पानं

Monday, September 12, 2016

भगवानराव देशपांडे काका सत्कार निमित्त

[WHATSAPP वर आलेल्या मेसेजच्या निनावी लेखकाचे आभार]  


काही माणसं काही क्षणातच मनाला भावतात तर काही कितीही सहवासात राहिली तरी ओढ नावाची गोष्ट निर्माणच होत नाही......
मन एक अजीब रसायन आहे...
फक्त सौंदर्य हे प्रेमात पडायला कधीच पुरेसं नसते...
खूप सुंदर असलेली व्यक्ति जर हट्टी, आत्मकेंद्रीत आणि अहंकारयुक्त असेल तर ती व्यक्तीदेखील कालांतराने कंटाळवाणी, निरस वाटू लागते, कितीही सुन्दर दिसत असली तरीही...
कारण शेवटी आपण व्यक्तीच्या स्वभावाबरोबर रहातो...
शरीर तर निमित्तमात्र आहे...
त्याच व्यक्तीच्या स्वभावात गोडवा , विनयशीलता आणि शालीनता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...
घरात दिवे असूनही निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो...
सहवासातील माणसांचं देखील तसेच असतं...
एखाद्याच्या सौंदर्याने, प्रकाशाने दिपून जाणं, हा काही क्षणांचा खेळ असतो; पण खरे आत्मिक समाधान हे समईच्या इवल्याशा तेजानेच मिळतं...
आयुष्यातही अनेक लोक येतात आणि जातात......

काही जण तुम्हाला दिपवून टाकतात तर काही तुमच्या आयुष्यातील अंधाराची जाणीव करून देतात..........
जगात कुठलीच गोष्ट शाश्वत , निरंतर नसते पण सात्विक प्रेम मात्र नेहमी सोबत रहातं, जगण्याची उमेद देत.
नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरवात करता त्याचा पराभव निश्चित होतो...
अंधारल्या खोलीत लावलेलं निरांजन जसं दाही दिशा उजळतं, खरे प्रेमदेखील तुमची अशीच सोबत करतं.....
मनाला विश्वास देत जगाने नाकारलं तरी माझं प्रेम पाठीशी नेहमीच ठामपणे उभं राहील.......
प्रेम म्हणजे भक्तिचेच एक रूप आहे. ज्याच्यात आर्तता आहे, पण याचना नाही..........
आपल्या माणसांसाठी जळताना स्वतःच्या त्रासाची मोजदाद नाही........
                              

साधा विचार करून बघ, भोवताली दिव्यांची आरास असतानाही आपण समईच्या तेजापुढे नतमस्तक होतो ते का.........
कारण त्या तेजाला सात्विकतेचा, आपुलकीचा स्पर्श असतो...
खरं सांगू?
असे, निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी मिळकत असते, असं मला वाटतं...
तेजाला सात्विकतेचा, आपुलकीचा स्पर्श असतो... , भोवताली दिव्यांची आरास असतानाही आपण समईच्या तेजापुढे नतमस्तक होतो...... काका अॅड भगवानराव देशपांडे आपणापुढे हि कॉलनी नतमस्तक आहे.  निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी मिळकत तुम्ही आम्हाला दिलीत .
अॅड भगवानराव देशपांडे काका दुर्वांकुर मध्ये राहायला आले हे आम्हा नंदीग्राम वासियांचे अलौकिक भाग्यच.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील बिनीचे शिलेदार असलेले काका ,गोरगरिबांचे वकील म्हणून ओळखले जाणारे काका ,महाराष्ट्राची ओळख पुरोगामी म्हणून होण्यात ज्यांचा सिहाचा वाटा आहे असे काका , शेतकरी कामगार यांच्या जीवनाशी एकरूप होऊन उरी क्रांतीची स्वप्ने बाळगणारा वल्ली , कामगार चळवळसाठी  ,सामाजिक समतेच्या प्रश्नासाठी ,हैदराबाद मुक्तीसंग्रामासाठी त्यानंतर मराठवाड्याच्या विकासासाठी सतत कार्यमग्न राहणारे काका भारतीय न्यायव्यवस्था व राज्यघटना यावर प्रभुत्व ठेवून आहेत एक चालता बोलता ज्ञानकोषच .
      तसे पाहता काका अन आम्ही विचारांनी परस्पर विरोधी , काकांसाठी  मार्क्स हीच गीता तर आम्ही गीते मध्ये मार्क्स शोधणारे , मात्र काकांनी आम्हाला नवीन दृष्टी दिली . मार्क्सवादाचा आधार आर्थिक त्यांना संस्कृतीशी काही देणेघेणे नाही हि आमची संकल्पना . मात्र गणेश उत्सव आलाय शास्त्री वर्गणीसाठी अजून कुणी आले कसे नाही विचारणारे काका कृतीतून आम्हाला कृत कृत्य करतात .वर्गीय लढ्याचा आधार आर्थिक असला तरी त्याला सामाजिक सांस्कृतिक राजकीय आशय आहेच अन त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे ठणकावून सांगणारे काकाच . 

महात्मा फुले ,आंबेडकर, महात्मा गांधी यां विषयी गाढा अभ्यास असणारे काका हळूच आपल्याला समताधीष्टीत कसे बनवितात हे कळत सुद्धा नाही . अरे रस्त्यावरचे अतिक्रमण तुम्ही काढताय मात्र ज्याचं पोट त्यावर आहे त्यांची आधी सोय पहा मग अतिक्रमण काढा, सांगणारे काका भाजीवाल्यांशी ठेलेवाल्यांशी असणारे आमचे भांडण नकळत दूर करतात अन आम्ही त्यादृष्टीने विचार करायला लागतो .
      काकांनी आपले सर्व पुस्तकं ज्यांची अंदाजे किंमत २.५ लक्ष रुपये व्हावी LAW कोलेज ला दान केलेत हे हि नसे थोडके .त्यानिमित्त LAW कोलेज मध्ये मुक्ती संग्राम दिनी काकांचा सत्कार असणार आहे . सत्कार अन पुरस्कार यांनी आता काकांनाही जेरीस आणले .....
   काकांना अनेक पुरस्कार मिळाले .आता सत्कार म्हणता काका नाहीच म्हणणार ! मात्र आम्हाला सत्कार करायचा तो आमच्या स्वार्थासाठी .आम्हाला त्यांना एकायचय . कारण काकांनी बोलत रहाव अन आम्ही एकत ...एक वेगळी अनुभूती . काका आम्ही त्रिवार ऋणी आहोत तुम्ही आम्हाला भरभरून दिलत अन असेच वर्षानुवर्ष  देत राहाल या खात्रीसह ..................जय हिंद 
       आणि हो ह्या भगवानराव नावाच्या आपल्या विचारानंप्रती कर्मठ अन कर्त्यव्य कठोर व्यक्तिमत्वाला सांभाळणे हे कर्म कठीण काम ज्यांनी अनवरत केल त्या आमच्या उशाकाकू . शास्त्री आले एकेटे आले का दहा जणांना घेवून आले, कॉफी चहा झालाच पाहिजे! काका जेवताहेत उभ्या उभ्या एक धपाटा खाऊन घ्या काकांसोबत !!
न कंटाळता हे करणे किती कठीण . काका तुमच्या व्रतात काकुंचा वाटा अधिक आहे  सौ उशाकाकू देशपांडे तुमच्या समोर तुमचे सर्व शेजारी नतमस्तक आहेत
    आपणा दोघांनाहि निरामय उदंड आयुष्य लाभो हि प्रार्थना

-                               मंगलमुर्ती शास्त्री १२/९/२०१६


Sunday, August 14, 2016

राणी शुभेच्छा

बघता बघता दिवस ,      
         ..........गेले भर्रकन किती !!
राणी झाली 45ची, 
 .        आहे का तुम्हाला माहिती ?
(वय) लपवायच्या या वयात 
...............न वाटता भिति 
wish करता पटकन म्हणाली, मी वाढली किती !!

अशीच असू दे  अल्लड अवखळ ,
             गाठतांना नव्वदी !

  सदैव असू दे आशिष ईश्वरा, 
                                राणीच्या पाठी !!

-                 - अगस्तीदादा 18जुलाई 2016

दिलीपराव एकषष्ठी निमित्त

ह्रुदयाचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे 
               वय निघून गेले ।

असेच काहीसे भाव ति.स्व. दिलीपराव कुलकर्णी यांचे आज असतील ... 
       त्यांच्या मुलांनी आज एकसष्टिचे सर्प्राइझ द्यायचे ठरवले ! बाबा आता तुम्ही रिटायर्ड झालात ,साठी ओलांडलीत,आता " दिल दोस्ती दुनियादारी'  बंद  ...हे सांगण्यासाठीच तर  ..
       तर अमेया बाबान्चे तारुणपण कधीच ओसरणार नाही ! प्रेमळ,जीव लावणारा  स्वभाव कधी आटणार नाही, त्यांचे " दोस्त ' अन "सामाजिक जाणिवा' कमी होणार नाहित  !  
      शुण्यातुन निर्मिती मी पाहिली, खामगावातिल फरशी तील घर मी पाहिले , स्व अण्णा बाईंच्या बाबतीत  शेवट पर्यन्त त्यांनी केलेली कर्तव्यपूर्ती मी अनुभवलेली ! या सर्व कटकटी कमी की काय आम्हा शास्त्रींचे ते जावई झाले अन मोठ्या जावयाचे कर्तव्य त्यांच्या नशिबी आले ! प्रसंगी सिंघम होत त्यांनी ते यथोचित नुसते निभवलेच नाही तर बहरवले सुद्धा !!
    राखी भाउबिजेला कुलकर्णी कमी शास्त्रीच जास्त !! आधीच्या पिढीला जसे "कुमुद'चे तसे आमच्यासाठी आक्कीचे स्थान निर्माण व्हायला त्यांच्या यजमानांच कर्तुत्व महत्वाच !!
      स्व  तात्यांची त्यांनी केलेली सेवा मी विसरु शकत नाही . आम्ही दुरून फक्त काळजी करू शकत होतो पण रात्री बे रात्री दत्ताला दिलीपरावच मदतीला . आर्थिक, शारीरिक ,मानसिक आधार त्यांचाच !! 
        सगळ्यात महत्वाचे त्यांनी जपलेला हरफनमौला स्वभाव ,ते जसे भजन किर्तनात रंगतात ( सासुबाई साठी) तसे आमच्या "रमी' ची त्यांना कटकट नसते , राणी दत्तालिनाला " सुगम ' मध्ये साथ देतांना आम्हाला आमच्या पार्ट्यांवर काकुबाई-प्रवचनं देत नाहीत! एन्जॉय म्हणत आशीर्वाद देतात !!😜 तात्यांशी त्यांचे नाते   "गायछाप' मित्राचे होते तसे मैफिलिला 
"अनुरागाने....' म्हणतान्ना ते तितकेच दिवाने होतात . 

येथे कुणीच नाही   
            माझ्यापरी दिवाणे
मी गीत गात आहे 
            येथे गुन्ह्याप्रमाने ।

     म्हणत तल्लीन होतात !! दिलीपराव तुम्ही आहात तसेच राहा आयुष्यभर निर्भिड, निसंकोच, आयुष्य जगा !! तुमच्या निरामय आयुष्य़ासाठी आम्ही आहोत इश्वर चरणी प्रार्थना करायला !!!

 अमेयाने अचानक ठेवलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणे जमले नाही ,सौ मिनल येण्यासाठी तयारीत होती तो दुकानातील फार्मासिस्ट आजारी पडला , तीला रद्द करावे लागले . दुपारपर्यंत व्यवस्था झाल्यास निघेन कदाचित. पण शक्यता दिसत नाही . दूकान मालक ही अपरिहार्य पण अवघड संकल्पना आहे .तरी आम्ही दिलीपरावांचे गुन्हेगार आहोत . क्षमा त्यांनी  करू नए सजा सुनावावी आम्ही दोघे गोड करून घेवु --- सौ मीनल - अगस्ती

दिलीप मामा नमस्कार आणि शुभेच्छा !! - शुभांगी 28जुलै 2016

गुड्डी वाढदिवस

आज काय प्लानिंग ?
कसचं काय प्लानिंग /सेलेब्रेशन अरे ...

मेघनाचा दिवसभर क्लास ,
ह्यांचा उपवास ,
हाच माझ्या वाढदिवसाचा प्रवास ! 

बिच्चारी गुड्डी ! 
सौ मानसी मकरंद देशपांडे 
आमच्या सगळ्यात लहानग्या बहिनाबाई !

अरे एव्हढच ना मी बघून घेते , किती घरी फिरायचं मी करून घेते , किती पोळ्या जमा करायच्या मी करून घेते .... नाना आजारी ,आई आजारी गुड्डीच लक्ष देणार, तशी सासू सासरयांना तिचीच सेवा मिळनार ! 
आधार कार्ड चा कैंप लावा गर्दीला साम्भाळने मानसीताईंच काम ,तसं शुभांगीच्या वाढ दिवसाला मूक बधिर विद्यार्थ्यांना छोले भठूरे खाऊ घालायला गुड्डी वंस आहेत न माझ्या मदतीला !! बालिकाश्रमात नास्ता न्यायचाय गुड्डी ताई आठवतात !!!! 
  खरच सगळ्यात लहान असूनही ही गुड्डी आम्हा सगळ्या "दादा 'लोकांसाठी ताईचा रोल अदा करते कुठलाही मान पान नाही ! रुसवा फुगवा नाही! राग लोभ नाही ! 
 अस्मादिकान्च्या सगळ्यात जवळ रहात असल्याने असेल कदाचित गुड्डीला त्रासच वाट्याला !
मात्र सार्वजनिक कार्यात त्रास गोड करणारी गुड्डी तुला  निश्चित उदंड निरामय  आयुष्य  लाभणारच आहे आम्ही फक्त तोंडी शुभेच्छांचे  धनी . .. स्वत:चे दुःख घरी ठेवून माहेर सासर आप्तेष्टांसोबतच समाजाच्या दुःखांवर फुंकर घालण्याचे सामर्थ्य तुला मिळो या प्रार्थने सह - अगस्ती दादा 14 ऑगस्ट 2016

Friday, July 15, 2016

ll जोगवा वृक्षासाठी ll -प्रा पोहनेरकर


      ll जोगवा  वृक्षासाठी ll 
--------------

जीव लावा हो लावा हो लावा हो झाडाला 
पाणी येइंनं नदीला ,आडाला  ll धृ ll 

अख्ख्या गावात गावात 
हिरवळ होईल 
गाय वासराला वासराला 
चारा हो होईल 
दूध,दही,तूप मिळल खायाला 
जीव लावा हो लावा हो लावा हो झाडाला  ........ll 1 ll

नदी धरणा धरणात पाणी हो येईल 
पीक पाहून पाहून मन हो गाईल 
संबळ वाजलंकी जाऊ नाचायाला 
जीव लावा हो लावा हो लावा हो झाडाला .....ll 2 ll

सुख नांदल नांदल सारयांच्या  घरात 
मांडव सजल सजल गरीबाच्या दारात 
लेक निघल सासरी जायाला 
जीव लावा हो लावा हो लावा हो झाडाला .......ll 3 ll

कोणी झोपणार झोपणार नाही हो उपाशी 
खातील पोटाला पोटाला चांगल्या तुपाशी 
बाळसं येईल लहानाला मोठ्याला 
जीव लावा हो लावा हो लावा हो झाडाला .....ll 4 ll

नाही पडणार पडणार पुन्हा पुन्हा दुष्काळ 
नाही होणार होणार पांढरं कपाळ 
नाही जाणार बळीराजा फाशीला 
जीव लावा हो लावा हो लावा हो झाडाला .......ll 5 ll

प्रा.विजय पोहनेरकर 
9420929389
औरंगाबाद, 2/7/2016.
  



 गालफुगी "
------------------------

हे पहा ,
नवरा बायकोतली भांडणं 
सिरियसली घ्यायची नसतात
दुपारी तुंबून बसतात 
अन रात्री खुदू खुदू हसतात 

नवरा आणि बायको 
स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत 
म्हणून त्यां दोघांना 
वेगवेगळी मतं आहेत 

वाद विवाद होतो म्हणजे 
नेमकं काय होतं
एका गोष्टीवर दोघांचं 
वेगवेगळं मत असतं 

याला वाटतं तिची चूक आहे 
तिला वाटतं याची चूक आहे 
भांडण आणि प्रेम मात्र
दोघांचीही भूक आहे 

संसारात अधून-मधून 
" गालफुगी " होणारच 
कधी याच्या कधी तिच्या 
अंगामधे येणारच !

फाटोस्तर ओढायचं नाही 
एकदम शांत राहायचं 
जोडीदार गोडीत दिसला की 
हॉटेलात जेवायला जायचं

नवरा आरोपी असला की 
बायकोनं न्यायधीश व्हायचं
बायको आरोपी असली की 
नवर्यानं न्यायधीश व्हायचं

निकाल दिल्यानंतर मात्र 
डोळ्यात येऊ ने पाणी 
तिनं म्हणावं  " राजा "
आणि यानी म्हणावं राणी 

तुला ही साडी छान दिसते
म्हणन काय बिघडतं 
कधी कधी नवरटलंही
वेडयावनीच करतं 

नेहमीच चर चर बोलू ने 
बायकोला नसतं कळत 
थोडं जोरात बोललं की 
बसते पाणी गाळत 

छुटुपुटूच्या लढाया असतात 
वरच्या कोर्टात नेऊ ने 
नवरा बायकोनं मजेत रहावं
अंतर कुणाला देऊ ने 

प्रा. विजय पोहनेरकर 
9420929389
औरंगाबाद, 3/7/2016.

   
     

               " गालफुगी "
------------------------

हे पहा ,
नवरा बायकोतली भांडणं सिरियसली घ्यायची नसतात
ते दुपारी तुंबून बसतात 
अन रात्री खुदू खुदू हसतात 

नवरा आणि बायको 
स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत 
म्हणून त्यां दोघांना 
वेगवेगळी मतं आहेत 

वाद विवाद होतो म्हणजे 
नेमकं काय होतं
एका गोष्टीवर दोघांचं 
वेगवेगळं मत असतं 

याला वाटतं तिची चूक आहे 
तिला वाटतं याची चूक आहे 
भांडण आणि प्रेम मात्र
दोघांचीही भूक आहे 

संसारात अधून-मधून 
" गालफुगी " होणारच 
कधी याच्या कधी तिच्या 
अंगामधे येणारच 

फाटोस्तर ओढायचं नाही 
एकदम शांत राहायचं 
जोडीदार गोडीत दिसला की 
की हॉटेलात जेवायचं 

नवरा आरोपी असला की 
बायकोनं न्यायधीश व्हायचं
बायको आरोपी असली की 
नवर्यानं न्यायधीश व्हायचं

निकाल दिल्यानंतर मात्र 
डोळ्यात येऊ ने पाणी 
तिनं म्हणावं राजा 
आणि यानी म्हणावं राणी 

तुला ही साडी छान दिसते
म्हणन काय बिघडतं 
कधी कधी नवरटलं
वेडयावनीच करतं 

चर चर बोलू ने 
बायकोला नसतं कळत 
थोडं जोरात बोललं की 
बसते पाणी गाळत 

छुटुपुटूच्या लढाया असतात 
वरच्या कोर्टात नेऊ ने 
नवरा बायकोनं मजेत रहावं
अंतर कुणाला देऊ ने 

प्रा. विजय पोहनेरकर 
9420929389
औरंगाबाद, 3/7/2016.


" गोवा टूर "
-----------------------

काय सांगावं  बाई 
नुस्ता डोक्याला ताण झालाय
अन कधी नाही ते आमचा 
गोव्याला टूर चाललाय  

अगं मी फक्त यानला
एवढंच म्हणलं 
तर या बॉनं 
असं तोंड केलं 


फक्त लोळू नका 
बॅगा लवकर भरा 
सारखं झोपू नका 
थोडं कमी घोरा 

मी बोलते म्हणून 
माझं तोंड दिसतं 
हे आळशी माणूस 
नुसतं ढिगलावनी बसतं 

चटपटीत पणा तर 
अजिबात नाही 
आपण कितीही बोला 
काही फरक नाही 

अशात तर चोवीस तास 
Whats app वर असतेत 
बोलून बोलून माझं थोबाड दुखायलय 
नुसतं घुबडा सारखं बघतेत 

अगं बाई आमचं तर माणूस
नुसतं हिंडकटोर 
वण वण फिरत राहातेत 
कानकाप्या कुत्र्या सारखं 

घरचं एकही काम करत नाहीत 
जिथं तिथं मलाच मरावं लागतं 

बाकिलोकांच्या बॅगा भरून झाल्या 
आमचं कधी आवरावं कोणासठाऊक ?

दारात गाडी आल्यावरही 
हे माणूस काय mobile च खेळत राहतं 
का गोव्याला जातं 
देवच जाणे ?

प्रा. विजय पोहनेरकर 
9420929389 
औरंगाबाद , 3/7/2016.


 गोवा जा रहें है "
-----------------------

जिंदगी जिने की 
कोशिश कर रहे है 
दो दिन के लिये हम
गोवा जा रहे है  l

मीनल दीदी ने प्रस्ताव रख्खा
वासंती दीदी , अंजु  हां बोली 
योगिनी ,आशा , बाबी ने कहा
मैं भी निकली  l

विजू ,अगस्ती,सुनील के साथ
दीपक और संजय आ रहे है
दो दिन के लिये हम 
गोवा जा रहें है  l

गप छप करेंगे 
और गानाभी गायेंगे 
जीवन की थैली में
खुशिया भरेंगे 
पेट भरने के लिये रोज काम कर रहे है 
दो दिन के लिये हम गोवा ...


बीच पे जायेंगे 
गायेंगे , नाचेंगे 
मखमली रेत पर 
नंगे पैर घुमँगे 

सागर की लहरोंको 
बातें करेंगे 
सुख और दुःख को 
गाते रहेंगे 

क्या करना कौन कितना
कम रहें है 
दो दिन के लिये हम
गोवा जा रहें है  l

सतीश,अरुण,प्रज्ञा, सीमा
नहीं आ रहें है 
इसलिये सबजन 
दुखी हो रहें है   
इस गम को हम थोडा 
छिपा रहें है 
दो दिन के लिये हम 
गोवा जा रहें है l


प्रा.विजय पोहनेरकर 
9420929389
5/7/2016.


" मना सारखं जगायला हवं "
-------------------------

नव्याने आयुष्याकडे 
बघायला हवं 
आपण आपल्या  मनासारखं 
जगायला हवं 

पन्नाशीच्या जवळपास 
जेंव्हा दोघे  येतात 
प्रापंचिक जवाबदारीतून 
थोडे मुक्त होतात 

शिकून सवरुन पोरं आता 
झालीत थोडी मोठी 
मित्र आणि मैत्रिणींच्या 
घेतात गाठी भेटी 

त्यांना थोडं मनासारखं 
वागू द्यायला हवं 
आपण आपल्या मनासारखं 
जगायला हवं 

मनासारखं जगणं म्हणजे 
स्वैराचार नाही 
याचा अर्थ असा नाही की 
कुणाचाच विचार नाही 

सगळ्यांच सगळं करतांना 
एकमेंकालाही जपावं 
काम थोडं बाजूला ठेऊन 
गप्पा मारत हसावं 

नवीन लग्न झाल्यावर तर 
हिंडून फिरून आलंच पाहिजे 
दोन लेकरं झाल्यावरही 
" हनिमूनला " गेलं पाहिजे 

संसारातला " Honey "
कधीही कमी होऊ ने 
नवरा आणि बायकोनं 
एकमेकाला अंतर देऊ ने 

आता आपलं काय राहिलं ?
कशासाठी कन्हायचं ?
" ओ मेरी जोहरा जुबी "
हेचं गाणं म्हणायचं ...

पुन्हा पुन्हा नवीन काही 
करायला हवं 
आपण आपल्या मनासारखं 
जगायला हवं 

केसं पांढरे झाले तरी 
पावसात भिजा वाटलं पाहिजे 
सुरकुत्या पडल्या तरी 
"फेशियल"करून नटलं पाहिजे 

एकात भेळ खातांना 
बघितलं तर बघितलं 
'कवळी' घातल्यावर सिनेमा पाहुने 
हे कुणी सांगितलं ?

तिच्यासाठी गजरा आणला 
कोणतं पाप केलं 
प्रेम करायचं नव्हतं 
तर लग्न कशाला केलं ?

विनाकारण नावं ठेवणं 
हे जगाचं कामच असतं 
प्रेमाच्या भावनेला 
म्हातारपण कधीच नसतं 

हौस मौज करत करत 
गुणगुणायला हवं 
आपण आपल्या मनासारखं 
जगायला हवं 

प्रा.विजय पोहनेरकर 
9420929389
औरंगाबाद , 7/7/2016.



            निसर्ग श्रुंगार "
-----------------------

आंबोलीचा घाट 
झालो ओलेचिंब 
पाण्याचे ते थेंब 
धबधब्याचे     ll

अंगावर पाणी 
थेंब गार गार 
निसर्ग शृंगार 
मनोहर          ll

पाहुनिया रूप 
वाहत्या पाण्याचे 
गीत प्रणयाचे 
ओठावरी       ll

अंबोली घाटात 
धबधब्याची रांग 
सखे जरा सांग 
कान गोष्टी     ll

वनराई सांगे 
लुटा रे आनंद 
खावा गुलकंद 
प्रेमभावे      ll

नको आठऊस 
धुणं आणि भांडी 
सांडो प्रेमरस 
क्षणोक्षणी    ll

उधळून टाकू 
सारे अंतरंग 
होऊनिया गुंग 
पूर्णरूप       ll

तालातच गावे 
आयुष्याचे गाणे 
पाहु ने ग उणे 
कोणिकधी    ll

जीवापाड घ्यावी 
दोघांनीं काळजी 
होऊनिया राजी 
सुखासाठी     ll

प्रा. विजय पोहनेरकर 
9420929389
औरंगाबाद, 7/7/2016.

" टूर वरून आल्यावर "

[10/07 4:03 PM]  : " टूर वरून आल्यावर "
------------------------

टूर संपत आला आता 
आपले गाव येईल 
उद्या पासून पहिल्या सारखे 
रुटीन सुरु होईल 

भाजी चिरा ,स्वयंपाक करा 
पाणी सुद्धा भरा 
चीड चीड न करता 
नौकरी , व्यवसाय करा 

चार पैसे मिळवण्यासाठी 
कष्ट करावेच लागतील 
पोटाचे आणि जिभेचे 
तरच चोचले भागतील 

टूर वरून आल्यामुळे 
उत्साह वाढेल 
फिरून पुन्हा कामावर 
मन आपलं जडेल 

शीण जावा , ताण जावा 
म्हणून टूर असते 
आपलं घर आपल्याला 
मंदिरावनी भासते 

काय होतं कळत नाही 
उभारी येते कुठून 
हिंडल्यामुळे , फिरल्यामुळे 
दुःख जातं गोठून 

निसर्गाच्या सानिध्यात 
मन होतं हलकं 
काळजातल्या कपारीतलं
दुःख होतं हलकं 

अधून मधून वेळ काढून
टूर काढली पाहिजे 
जगण्या बद्दल माणसाची 
उमेद वाढली पाहिजे 

धनरेषा वाढवताना 
आयुष्याकडे लक्ष द्यावं 
दऱ्या खोर्यात पाना फुलात 
निसर्गाचं गीत गावं

टूर वरून आल्यावर 
शहाण्या सारखं वागायचं 
आळस झटकून मस्त पैकी
कामाला लागायचं 

प्रा. विजय पोहनेरकर 9420929389
        

                   : " कटाक्ष "
-----------------------

गुरूजी मला देता का 
एखादा " रुद्राक्ष  "
रोज रोज मला छळतात
बायकोचे " कटाक्ष "

वेगवेगळ्या कटाक्ष्याचे
वेगवेगळे अर्थ 
नवरा कितीही हुशार असो 
सारं काही व्यर्थ 

कधी तिचा कटाक्ष म्हणतो 
नवरा माझा मूर्ख 
कितीही  सांगितलं तरी 
वागतो येड्या सारखं 

एखाद्याला आहेर करतांना 
डोळे इंगळे पिंगळे 
कटाक्षातून मला म्हणते 
चिकट काळे मुंगळे 

एक एक कटाक्ष तिचा 
काळजात बसतो रुतून 
गुरुजी तुम्ही भेटलात म्हणजे  
रडा वाटतं आतून 

हल्ली तिच्या कटाक्ष्यानी 
खूप घायाळ होतो 
खूप काही करायचय पण 
कोलमडून जातो 

घाबरू नकोस वत्सा तुला 
मी औषध देईन 
त्या आगोदर तुझ्या बायकोचं
म्हणणं ऐकूण घेईन 

गुरुजी मी खरं सांगते 
खोटं बोलणार नाही 
या " बॉ " च घरामधे 
बिलकुल लक्ष नाही 

नेहमी नेहमी पार्ट्या 
अन तसेच त्यांचे दोस्त 
खायला प्यायला पुढे 
अन काम म्हणलं की सुस्त 

शपथ तुम्हाला सांगते गुरूजी 
माझं ऐकत नाहीत 
कुठं  जातेत ? काय करतेत ?
काहीच सांगत नाहीत 

अहो गुरुजी मला सुद्धा 
प्रेमळ " कटाक्ष " येतो 
पण काय सांगू ' हा माणूस '
माझाच सूड घेतो 

त्यांच्या तब्यती मुळेच 
मी " बंधनं " घालते 
तर मला म्हणतेत उंटा सारखं
तूच तिरपी चालते 

तुम्हीच सांगा गुरुजी यात 
माझं काही चुकत का ?
बायको शिवाय कुणाच्या 
काळजात कधी दुखतं का ?

गुरुजी म्हणले खरंय तुमचं 
एकमेकाला समजून घ्या 
रागीट कटाक्ष टाकताना 
एखादा " प्रेमळ " असू  द्या 

पोरं सोरं लग्नाला आलीत 
घरात लक्ष देत जा 
रुद्राक्ष्याची गरज नाही 
फक्त  प्रेम करत जा 

नवरा बायकोचं भाडंण म्हणजे 
लाडिक , प्रेमळ तक्रारी 
काळजी पोटी भरलेल्या 
शब्दांच्या पिचकारी 

प्रा. विजय पोहनेरकर 
9420929389 
औरंगाबाद , 11/7/2016.
  

        " ट्रिप मधल्या आठवणी "
------------------------

ट्रिप मधल्या गंमती जंमती
अजूनही आठवतात 
मनातल्या मना मधे 
पुन्हा पुन्हा हसवतात 

आल्या आल्या मानेवर 
जु बसलं कामाचं 
छान छान खाऊ घातलं 
मन मोठं मामाचं 

किती बोललो किती हसलो 
सारं सारं आठवतंय 
मन मात्र पुन्हा पुन्हा 
बीच वरच घुटमळतंय 

भेंड्या काय उखाणे काय 
खूप केली मस्ती 
घाटातल्या धबधब्याशी
कशी केलती दोस्ती 

वय , हुद्दा सारं विसरून 
सुटले होते सैराट 
चार दिवस मज्जा केली 
झिंग झिंग झिंगाट 

हल्ली आता कोणत्याच स्त्रीला 
माहेरपण राहिलं नाही 
चोवीस तास काम काम 
बायकोला निवांत पाहिलं नाही 

खर्च जरी झाला जास्त 
तरीही फिरायला जात जा 
वेळ काढून बायको साठी 
प्रेमगीत गात जा 

गप्पा गोष्टी मजा करून 
माणूस जेंव्हा हसत असतो 
डायबीटीज अन बी पी सुद्धा 
एकदम normal रहात असतो 

problems तर असतातच 
तरी आनंद लुटत जा 
अधून मधून सारे मिळून 
अशीच trip काढत जा 

प्रा. विजय पोहनेरकर 
9420929389 
14/7/2016.
[15/07 



   " जगण्याची नांदी पांडुरंग "
------------------------

कटेवरी कर 
कपाळी चंदन 
प्रथम वंदन 
पांडुरंगा      ll

शोभतसे गळा 
माळ तुळशीची 
काळजी विश्वाची 
पांडुरंगा         ll

गोर गरिबांचा 
हाच तो कैवारी
येती वारकरी 
पांडुरंगा         ll

उपाशी तापाशी 
धाऊनिया येती 
मुखा वाटे गाती 
पांडुरंग           ll


पाहुनिया मुख 
शीण जातो देवा 
म्हणोनिया धावा 
पांडुरंगा          ll

नाही देत देव 
सोने नाणे चांदी 
जगण्याची नांदी 
पांडुरंग           ll

वाटते आतून 
भेटोनिया यावे 
कोडे सोडवावे 
पांडुरंगा          ll 

तुझे आणि माझे 
नाते तरी काय 
लेकराची माय 
पांडुरंग           ll

प्रा.विजय पोहनेरकर 
9420929389
15/7/2016./ आषाढी
[15/07 


   " स्वर्ग सुख   "
-----------------------

आषाढी कार्तिकी 
भक्तांचा हो मेळा 
साधू संत गोळा 
विठुसाठी       ll

पंढरीसी जाता 
कुणा काय मिळे 
ज्याचे त्याला कळे
पांडुरंगा           ll

लाखोजण येती 
विठ्ठला बोलती 
जाताना दिसती 
समाधानी         ll 

अरे बा विठ्ठला 
कमाल तुझीच 
तक्रार कधीच 
केली नाही       ll

येता दोघे चौघे 
आम्ही परेशान 
करी भनभन 
सदोदित        ll 

पंढरी सोडता 
आम्ही काय घ्यावे 
सोबतीला न्यावे 
काय काय       ll


दया ,क्षमा, शांती 
सोबतीला न्यावी 
जगून पहावी 
एक ओवी        ll

कधीच कुणाचा 
करू नये द्वेष 
करा जयघोष 
विठ्ठलाचा       ll

तुकोबाची गाथा 
आणि ज्ञानेश्वरी 
ठेवा घरोघरी 
जपोनिया        ll

हाच एक आहे 
कल्याणाचा मार्ग 
ओवी ओवी स्वर्ग 
सुख आहे         ll

प्रा.विजय पोहनेरकर 
9420929389
15/7/2016.औरंगाबाद.
" सखे तुझ्या मनांत काय आहे सांग ? "
-------------------------

या सागरी किनारी 
दिसे माडांची रांग 
सखे तुझ्या मनां मधे 
काय आहे सांग  ?  ll धृ ll

मऊ मऊ वाळूत 
ठसे पावलांचे 
गालास येई रंग 
गुलाबी फुलांचे 
वागण्यात बोलण्यात प्रणयाची झिंग 
सखे तुझ्या मनां मधे
काय आहे सांग ......ll 1 ll

खेळतात लाटा 
इथे शिवनापाणी 
ओठांवर येतात 
प्रीतीची गाणी 
अंतरंग भिजवतात 
पाण्याचे थेंब 
सखे तुझ्या मनां मधे 
काय आहे सांग ? ......ll 2 ll

शंख शिंपल्याची 
ही रांगोळी कुणास ?
वारा हासवितो 
तनास-मनास 
निसर्गाच्या तालावर 
होऊ आज दंग 
सखे तुझ्या मनां मधे 
काय आहे सांग ? .....ll 3 ll

हातात घेऊन हात 
सोबतीने चालू 
खोल आंत दडलेले 
सारे गुपित खोलू 
नको होऊ देऊ आता 
एकांताचा भंग 
सखे तुझ्या मना मधे 
काय आहे सांग ?......ll 4 ll


प्रा. विजय पोहनेरकर 
9420929389 
गोवा ,9/7/2016.

नवरा आणी बायको

आमचे मित्रवर्य पोहनेरकर सरांनी आत्ताच लिहिलेली 

" नवरा आणि बायको " 
-------------------------

देव असं का करतो 
तेच मला कळत नाही 
नवरा आणि बायकोच 
का बरं मत जुळत नाही 

नवऱ्याला जो रंग आवडतो 
तो बायकोला आवडत नसतो 
बायको असते चटपटीत
तर नवरा गबाळ्यावनी दिसतो 

त्याने साधा शर्ट घातला 
की ती म्हणते टी शर्ट घाला 
हा सांगतो आल्याचा चहा 
ती म्हणते कोका-कोला 

ती म्हणते भावगीत 
तर हा म्हणतो गझल 
ती करते ' एक घाव दोन टुकडे '
हा नेहमीच  puzzle 

त्याला लागतं face book 
ती म्हणते book 
हा म्हणतो " बुंग "
ती म्हणते ' झुक झुक '

तो म्हणतो  " आई गं "
ती म्हणते चूप 
हा मागतो ताक 
ती म्हणते सूप 

काही काही नवरा-बायको 
नेहमी भांडत असतात 
तरी बरं यांच्या " पत्रिका "
जुळालेल्या  असतात 

गरीब असो श्रीमंत असो 
हीच असते  कथा 
तो म्हणतो ' दुःख '
ती म्हणते ' व्यथा '

नवरा आणि बायको म्हणजे 
अफलातून जोडी 
कोणी म्हणतं " बेडी "
अन कोणी मानतं " गोडी "

प्रा, विजय पोहनेरकर .
9420929389
औरंगाबाद , 11/7/2016.

Sunday, April 10, 2016

।।भटकेश्वर प्रसन्न ।।
मा गिरीशजी प्रभुणे अन मा महादेव आबा गायकवाड सर यांच्या समरसता मंचाच्या कार्यकर्त्यांच्या कष्टातुन साकारलेला भटक्या अन विमुक्त समाजासाठीच्या यमगरवाडी निवासी शाळा प्रकल्पास (तुळजापुर - मंगरुळ - यमगर वाडी) भेट ह़ा आजच्या दिवसाची उपलब्धी म्हणावी लागेल
          स्व रामचंद्र चाटुफळे यांच्या कुटुम्बीयांच्या दातृत्वातुन उभी राहिलेला यमगरवाडी प्रकल्प सामजिक सोहार्दासाठी (एक अति आवशक्तेतील) एक महत्वाचे पाउल म्हणावे लागेल .सैन्यातुन निवृत्त स्व चाटुफले यांना मिळालेलि जमीन 18 एकर त्यांनी दान द्यावी हे ग्रेटच !!
       आबांनी ऐकवलेली पारधी सुनील अन सुनीता या भावाबहिनींची कथा मन हेलावणारी होती . स्वताच्या आईचा बापाने केलेला खून अन त्या बापापासुन स्वताला वाचवत आजीकडे पोहोचलेली ,नंतर आजीसुद्धा पोरां पासून सूटका करून घेण्याच्या विवंचनेत ...
        शेवटी कष्ट अपार घेवुनही मुलांमध्ये काहीही फरक चार वर्षानंतरही दिसत नाही अन  कार्यकर्ते पुन्हा नवीन मुलांवर मेहनत घ्यायला तैयार ! जंगलात खायला प्यायला काही नाही ,टीवी मोबईलचे आमिष नाही, ज्यांना सुधारायाचे तेही आडमुठे , अशा विपरीत परिस्थितीत कार्यरत स्वयंसेवकांना अस्मादिकांच्या मानाच्या मुजरा
52 भटके 253 उपजाती असलेल्या भटक्या समाजाला मुळ समाजप्रवाहाशी जोड़ण्याचे काम करणारे भ वि परिषद प्रांत कार्यवाह श्री नरसिंग झरे व सौ भारती ताई देवकर ताई यांचीही तुळजापुर यांची भेट झाली . ही मंडळी काम करते म्हणून आम्ही उर्वरित लोक सुखानं झोपा काढू शकतो हे झोपा काढ़णाऱ्यांना तरी माहिती आहे का? दुर्दैव इथेच संपते तो नवल ! शासकीय स्तरावरचा निरढावलेपणा उद्वेग आणतो तो वेगळाच !!

 ब्रिटिशांनी गुन्हेगार ठरवलेल्या या जाती आजही तोच आपला व्यवसाय मानतात .त्या मुळ प्रवाहात येणार कधी ?
   स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भ वि परिषदेच्या माध्यमातुन 47हजार भटक्यान्ना रेशन कार्ड ते आधार कार्ड वाटप करण्यात आले ! Kudos to jems of society the real heros!!!

 वानप्रस्थी कार्यकर्ता म्हणून बाहेर पड़लेले श्री रघुवीरजी ओक़ काका व काकू भेटले . सतत हसतमुखता, शांतता अन प्रसन्नता सेवारत राहून मिळवलेल्या  समाधानातुन कशी मिळवावी, रिटायर्ड झालो तरी रि टायरिंग कसे करावे हे काकां कडूनच शिकावे !!! प्रेरणादायी   जोडगळीस  शीर साष्टांग प्रणिपात .
    चोरिच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या बापाचा अन बसमधून चोर म्हणून  ढकलले गेलेल्या मृत मायच्या कडेवरचा, आघातामुळे आलेल्या बहिरेपणा सोबत घेवून जगणारा  सुनील पवार आज एव्हढया लहान वयात सुन्दर लाकडी प्रतिमा कोरत होता . कला जगण्याची शोधत होता......माय बापाविना !!
आज रविवार काही मुलं एकमेकांची कटिंग करण्यात व्यस्त होते तर काही गणपतीच्या मूर्त्या बनवण्यात !साध्या मातीच्या !
इतक्या दुर्गम ठिकाणची एक मुलगी चेसमध्ये "नेशनल ' खेलते तर क्रित्येकांची चपळाई हरनासारखी ! मार्गदर्शन मिळते तो ओलिम्पियनच  व्हावित !!! .....
         लक्ष्मनजी , सुनीलजींनी मनावर घेवून खनाळे काकांच्या प्रेरणेने,मराठेकाकांच्या 22माघ अर्थात रविवारी , अक्षय,गोलू ,किशोरच्या सोबतीने उपकृत झालेला आजचा दिवस प्रथितयश उद्योजक ,स्वत:ची इनोव्हा, स्वत: चक्रधर होत ,आनंदात आम्हास सहन करbणारे  सेवाव्रती  भगवंत गोपालकृष्ण ग्रामले यांना सविनय अर्पण . ------मंगलमूर्ती शास्त्री अभिमन्यु प्रभात शाखा रा स्व संघ सम्भाजिनगर
14-9-2015

Friday, February 19, 2016

ती अपघातात गेली
तीनं फार मोठा आघात दिला
तीनं खुप समस्या निर्माण केल्या
तिच्या तरी काय हातात होत
तिच्याच नाही तर कुणाच्या हातात होत
चुक कुणाची ?
ताई जीजाजी स्वत:ला दोषी मानतात ?
आनंदात वाटेकरी नको ?
गाडी देणारा दोषी ?
ड्रायव्हर ?
का समोरून विमनस्क अवस्थेतील दुचाकिस्वार ?
सत्य नियती आहे !
नियतिचे गणित तू मी सोडवू शकत नाही
भोग वगैरे नियातिचेच शिल्लक अवशेष !!
आयुष्य हेच भोग आहेत जन्मल्यापासुनचे !
कसे झेलायचे हे ज्याचे त्याने ठरवायाचे ,
रडत रडत का हसत खेळत !
काळ हाच सापेक्ष आहे जसा जाईल तसा बदलेल
कालचे हसणे आज रडणे उद्याचा " बदल ' निरपेक्ष आहे

तु जसा वर्तमानात जगतो तसाच राहिलास तर उत्तर आपोआप मिळतिल स्वभावानुसार स्वाभाविक !

तुझा धीर हाच कुटुम्बाचा आजचा  आधार आहे .

सगळे भाऊ भावंड आत्तापर्यंत साम्भाळलेस आता त्यांचीच आठवण ठेव सगळे निभेल !!

शेवटी एकेकट्यांनीच यायचे ,जगायचे अन जायचे आहे !
शिल्लक रहायचय कुणाला ..

तु तर कुल दिपक आहेस ग्रेट !!  

AGASTI

Saturday, January 30, 2016

मिल्या मित्रा ......


सकाळी 4 लाच जाग आली काहीही करायचा मुड नव्हता .नासिकला जायचे सकाळी सहाला !
 मित्रांना शुभ सकाळ लिहिले मात्र .. आजची सकाळ शुभ असणार का?
   मनात चिड चिड होती सव्वापाचला अशोकचा फोन आला तयारीसाठी उठालो ! ब्रश /स्नान आटोपले करायची इच्छा मात्र नव्हती . काढा बनवायला पुन्हा मूड नव्हता अशोकचा पुन्हा कॉल आला "सर तयार झालात ?' त्याच्यावर खेकसने सकाळी सकाळी ट़ाळले !
     हेरम्बला उठवले , तो अंघोळ न करताच गाडीत बसला चिड चिड थोडक्यात वाचली ! प्रशांतला यायचेय म्हणून असंख्य कॉल केले महोदय सायलेंट वर झोपलेले नेहमीप्रमाणे ! कसाबसा फोन लागला त्याला निघतो सांगितले , तिन तिघाड़ा होऊ नए वाटत होते ,लहानपणापासुनचे अंध संस्कार !!
  गाडीने लासुर सोडले अन बातमी आली मिल्यानी आमची साथ सोडली होती ,तीस वर्षापासुनची आमच्या दोस्तीला , मैत्रीला त्यानं पूर्ण विराम दिला होता ! तो दूर दूर गेला होता कधीही न भेटण्या साठी !!
गेली क्रित्येक दिवस कर्क रोगाने त्रस्त आमचा मित्र मिलिंद मधुकर खेर  त्रासमुक्त झाला . इहलोक सोडता झाला ...
    1985 च्या वर्षात भेटलेला मिल्या मित्रत्व काय, कसे निभवल्या जाऊ शकतं याच ज्वलंत उदाहरण ! मानपान, पैसा अड़का, राग लोभ  कसलीही अभिलाषा नाही , फक्त निखळ मैत्री प्रेम देणारा हा मिलिंद जसा माझा तसा देवेन्द्रा हेरम्बचा सुद्धा तितकाच जिगरी ! बाबिताई संजय राव यांचेसाठी सुद्धा ! आम्हा तिघा भावांच्या दृष्टीने मिलिंदच महत्व वेगळेच होते , आहे ,रहाणार कारण आम्ही तिघेही ज्यावेळी अमरावती बाहेर होतो त्यावेळी आई भाऊंचा केअरटेकर तोच होता . अन मिल्याचे हे पांग फेडण्या पल्याडचे आहेत आम्हासाठी !  
   देवेंद्रला टेबल टेनिस मला बैटमिनटंनला जोडंण्याचे श्रेय खेळाडू वृत्तीच्या मिलिन्दलाच द्यावे लागेल . संगीत हाही त्याचा आवडता विषय . कुठल्याही कामाचा कधीही कंटाळा नाही .आई नेहमी सांगायची " घरी तुम्हा मुलांपेक्षा मला मिलिंद वर जास्त विश्वास आहे !'
  पार्थच्या मौंजी नंतर त्याला आजाराने ग्रासले . नासिकला भेटायला गेलो दोन तिनदा ! त्याच दुःख अन कधीही न पाहिलेला दुःखी मिल्या पहाणे कष्ट दायक होते !
 "अगस्ती 120 /300 च एक पान फक्त रात्री खात होतो रे ,देवानं ए व्ह ढी मोठी सजा का दिली ? ' म्हणाला . समजाविण्या पलिकडच होतं ते सगळं . काय समजाविणार ? अगतिक अन हतबल अगस्ती अनुभवला ! भेटण्याच सामर्थ्य हरवलेला अगस्ती ! डोळ्यांच्या कडा सतत  पाणावलेला अगस्ती ! काकू कर्क रोगानी गेल्या सगळ्यांच्या मनाची तयारी होती सान्त्वन करणे जड गेले नाही .. आता मिलिंद सुद्धा त्याच मार्गानं गेला , मनांची तशीच तयारी त्यांनही करून ठेवलेली ! तरीही धीर देण्यासाठी जायचय .त्याच्या मुला बाळान्ना ,बहिन भावाला बाबांना धिर देईनच पण आम्हाला कोण देणार धीर ? प्रत्येक दु:खाला मिल्याच तर होता अन आता ...
    ॐ पूर्ण मिद: ,पूर्ण मिदम .... तुझ्यासाठी कसं म्हणु मिल्या ..... हसतं खेळतं ठेवणं तुझ काम होत रडवणं नाही शेवटी गेल्यावरही शिव्या खाणार आहेस . हो त्याशिवाय का आपली मैत्री पूर्णत्वाला जाणार आहे !




    ..... आणी सम्पूर्ण शास्त्री परिवारातर्फे  मी मंगलमूर्ती शास्त्री  खेर कुटुम्बियांना दुखातुन बाहेर पडन्याच  बळ मिळो अन आत्म्यास शान्ति लाभों यासाठी प्रार्थना करतो  !
       इतके तर बोलावेच लागेल ..



       

      मित्रा मिल्या सकाळची चिड चिड किती वाढवलीस !
30 जाने 2016

Thursday, January 14, 2016

एन डी के एक अद्भुत रसायन

काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे
                   रात्री आमचे   जालन्या जवळील शेलगावचे व्यवसायिक
मित्र श्री गायके यांचा फोन आला म्हणाले शास्त्रीजी माझी भावजय ,लहान भावाची बायको  एकदम सीरियस आहे काविळ झालाय चार दिवासापुर्वीची बाळंत . चांगल्यात चांगले डॉक्टर सांगा . मात्र तिला आपल्याला वाचवायचे आहे . जालन्याला ट्रीटमेंट केली ,  मात्र काही उपयोग नव्हता म्हणून अडूळ जवळ एका काविळीवर औषध देनारया माणसाकडे आणले तिथे ती सीरियस झालीय . आता कुणी डॉक्टर सांगा पैशाची काळजी करू नका मात्र ती वाचली पाहिजे .माझ्याही सौचा वर्षभरापुर्वी बाळन्त झाल्यावर काविळीन घात केला आता भावजय ! सेम सिचुएशन सेम किस्सा ...  मित्र एकदम रडवेल्या स्वरात बोलत होता . माझ डॉक्टरांबद्दलच ज्ञान तोपर्यंत बेताचच होत मग काहीही झाले तरी डॉ हेडगेवार रुग्णालय आम्ही जवळ करणार . मी त्याला तेथेच घेवून जाण्यास सांगितले . त्याने ऐकले रात्री भरती केले डॉ फाटकांची ट्रीटमेंट सुरु झाली . मी रात्री घरी जातांना त्याला भेटलो धीर दिला . त्याच्या सोबतची खुप सारी मंडळी घरी गावाकडे पाठवली म्हटल इथे आवशक्ता नाही . ...
       दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला रुग्णालयात गेलो विचारपूस केली .
       त्या दिवशी महिन्याचा शेवटचा  गुरुवार होता .  त्याकाळी  आम्ही घरी व्याख्यान / बौद्धिक आयोजित करत असू . त्यादिवशीच्या नियोजनासाठी रुग्णालयात होतोच म्हणून एन डी सरांना भेटण्यासाठी  त्यांच्या केबिनकड़े गेलो सोबत मित्र होताच . सरांच्या केबिन बाहेर नेहमी प्रमाणे खुपसारे पेशंट पाहिले अन आपला धुडगुस त्यामध्ये नको या विचाराने माघारी परतलो तो त्यांच्या अटेंडंटनी हाक मारली मला ओळखत होता म्हणाला काय काम होत ?
    "या बसलेल्या पेशंट्स पेक्षा महत्वाच काम नाही मी घरी भेटेल . " इतक्या लोकांच्या मनातल्या मनातच्या शिव्यांचा धनी मला व्हायचे नव्हते !
         सर तुम्ही आत जा तेव्हढेच सर रिलेक्स होतील , सकाळी ओटी केली आता ही ओपीडी . सरांना ज़रा फुरसत नाही . तुम्ही इतर कामासाठी आलात तर नक्की आत जा !! ' त्याची काळजी मला एक वेगळाच आनंद देवून गेली .
    मी पुन्हा सरांकड़े गेलो . सरांचे पेशंट आणी आम्ही असा संवाद सुरु . मधेच प्रा पांडव सरांना फोन करून त्यांचीही व्याख्यानासाठी  वेळ घेणे झाले आमच्या रात्रि 9 वाजताच्या  कार्यक्रमाचे  नियोजन झाले  . मी ओपरेशन पश्चातचे पेशंट पहात आहे ओपीडी नाही . व्याख्यानाला   डॉट पोहोचतो " वगैरे सांगुन झाले.  आम्ही निघताना सोबतच्या मित्राबद्दल विचारले . अरे हो त्याची तर ओळख दिलीच नव्हती ...
    थोडक्यात मित्र भावजय डॉ फाटक ..सांगितले तो अरे आज डॉ फाटक गावाला गेलेत म्हणत त्यांनी वार्डात फोन लावून मित्राच्या भावजयिची चौकशी केली तिथल्या स्टाफला आवश्यक सूचना केल्या .
        मी घरी परतलो आणी श्रोते जमवण्याच्या कामाला लागलो .  रात्री डॉट 9 ला सरांना व्याख्यानाच्या आठवणी साठी रिंग दिली .  मात्र एन डी सर आले नाहीत ....  आम्ही किंचित हिरमुसलो,  मात्र सेवाव्रती  सरांना सर्वात  आवडता विषय इमर्जन्सि  पेशंट मिळाला असणार हे कुणी सांगायला हवं का ? बौद्धिक छान झाले उपस्थिति चांगली होती मात्र सर नव्हते एक रुखरुख .
      रात्री कार्यक्रमा दरम्यान मित्राचा फोन आला म्हणाला डॉक्टर ओपरेशन करायच म्हन्तेत काय करू ? मी डॉक्टरांवर विश्वास ठेव सांगितले अन फोन बन्द केला ! व्याख्यानात व्यत्तय नको !!!
    सकाळी दुकानात जाताना रुग्नालयाजवळ मित्र भेटला अतिशय आनंदात होता " लय भारी डॉक्टर भेटला बघा '  त्याच्या भावाजयीच तातडीनं ओपरशन करून छातीतील 2 लीटर पस काढन्यात आला होता ! तो काविळीचा रुग्ण नव्हताच मुळी ! ! शरीरातील घाण निघाल्याबरोबर पेशंट टकाटक .
    ... समोर एन डी सर दिसताहेत कालच्या "डॉट' प्रोमिसचे काय झाले विचारणार तोच ..
   बरं झाल तुम्ही रात्री रिंग दिली मी पोर्चं मधून बाहेर पडतच होतो मला फाटक डॉक्टरांचा पेशंट आठवला परत वार्डात गेलो तो काविळिचा पेशंट नसून छातीतील पस मुळे हां त्रास होता हे लक्षात आले ओपरेशन सक्सेसफुल !!
      मी नतमस्तक झालो . सगळेच सर्जन अशी सर्जनशील सेवा देतील तो ?
 मित्राची बायको याच आजाराने बाळन्तपनानंतर  आदल्या वर्षी बाळाला सोडून गेली होती . बाळन्तपनानंतरची घ्यायची काळजी न घेतल्यामूळे !!
   जालन्याहुन नंतर परततांना शेलागावला थांबलो असता आमचा सत्कार करण्यात आला शाल अन सौ ना साडी चोळी !  मिळाली ज्याचे धनी सर होते . अतिआग्रहामुळे आम्हांस स्विकारावी लागली . दगडाला शेंदुर फासून इश्वर त्यांना गाठायचा होता !!!

एव्हढे सगळे सांगायचे कारण की .


      अनेकांसाठी तारणहार इश्वर  आमच्यासाठी संतत्व धारण केलेले इतरांच्या आनंदात आपला आनंद माननारया, आमच्या माननीय नगरसंघचालक डॉ नरेन्द्र दत्तात्रय कुलकर्णी उर्फ़ एनडीसर यांचा आज वाढ दिवस ! त्यांना दिर्घायुष्या साठी प्रार्थना करतो . सुदिनम सुदिनम जन्म दिनम तव ... म्हणत शेवटी एवढेच ---

जीवन की मुस्कान हो तुम
फूल खिलाते हो
               क्यारी क्यारी ।
नयी सफलता के
                       सुमनो से
महके जीवन की
                      फुलवारी

      -  मंगलमूर्ती ,सौ मिनल , शुभांगी शास्त्री परिवार