मिल्या मित्रा ......
सकाळी 4 लाच जाग आली काहीही करायचा मुड नव्हता .नासिकला जायचे सकाळी सहाला !
मित्रांना शुभ सकाळ लिहिले मात्र .. आजची सकाळ शुभ असणार का?
मनात चिड चिड होती सव्वापाचला अशोकचा फोन आला तयारीसाठी उठालो ! ब्रश /स्नान आटोपले करायची इच्छा मात्र नव्हती . काढा बनवायला पुन्हा मूड नव्हता अशोकचा पुन्हा कॉल आला "सर तयार झालात ?' त्याच्यावर खेकसने सकाळी सकाळी ट़ाळले !
हेरम्बला उठवले , तो अंघोळ न करताच गाडीत बसला चिड चिड थोडक्यात वाचली ! प्रशांतला यायचेय म्हणून असंख्य कॉल केले महोदय सायलेंट वर झोपलेले नेहमीप्रमाणे ! कसाबसा फोन लागला त्याला निघतो सांगितले , तिन तिघाड़ा होऊ नए वाटत होते ,लहानपणापासुनचे अंध संस्कार !!
गाडीने लासुर सोडले अन बातमी आली मिल्यानी आमची साथ सोडली होती ,तीस वर्षापासुनची आमच्या दोस्तीला , मैत्रीला त्यानं पूर्ण विराम दिला होता ! तो दूर दूर गेला होता कधीही न भेटण्या साठी !!
गेली क्रित्येक दिवस कर्क रोगाने त्रस्त आमचा मित्र मिलिंद मधुकर खेर त्रासमुक्त झाला . इहलोक सोडता झाला ...
1985 च्या वर्षात भेटलेला मिल्या मित्रत्व काय, कसे निभवल्या जाऊ शकतं याच ज्वलंत उदाहरण ! मानपान, पैसा अड़का, राग लोभ कसलीही अभिलाषा नाही , फक्त निखळ मैत्री प्रेम देणारा हा मिलिंद जसा माझा तसा देवेन्द्रा हेरम्बचा सुद्धा तितकाच जिगरी ! बाबिताई संजय राव यांचेसाठी सुद्धा ! आम्हा तिघा भावांच्या दृष्टीने मिलिंदच महत्व वेगळेच होते , आहे ,रहाणार कारण आम्ही तिघेही ज्यावेळी अमरावती बाहेर होतो त्यावेळी आई भाऊंचा केअरटेकर तोच होता . अन मिल्याचे हे पांग फेडण्या पल्याडचे आहेत आम्हासाठी !
देवेंद्रला टेबल टेनिस मला बैटमिनटंनला जोडंण्याचे श्रेय खेळाडू वृत्तीच्या मिलिन्दलाच द्यावे लागेल . संगीत हाही त्याचा आवडता विषय . कुठल्याही कामाचा कधीही कंटाळा नाही .आई नेहमी सांगायची " घरी तुम्हा मुलांपेक्षा मला मिलिंद वर जास्त विश्वास आहे !'
पार्थच्या मौंजी नंतर त्याला आजाराने ग्रासले . नासिकला भेटायला गेलो दोन तिनदा ! त्याच दुःख अन कधीही न पाहिलेला दुःखी मिल्या पहाणे कष्ट दायक होते !
"अगस्ती 120 /300 च एक पान फक्त रात्री खात होतो रे ,देवानं ए व्ह ढी मोठी सजा का दिली ? ' म्हणाला . समजाविण्या पलिकडच होतं ते सगळं . काय समजाविणार ? अगतिक अन हतबल अगस्ती अनुभवला ! भेटण्याच सामर्थ्य हरवलेला अगस्ती ! डोळ्यांच्या कडा सतत पाणावलेला अगस्ती ! काकू कर्क रोगानी गेल्या सगळ्यांच्या मनाची तयारी होती सान्त्वन करणे जड गेले नाही .. आता मिलिंद सुद्धा त्याच मार्गानं गेला , मनांची तशीच तयारी त्यांनही करून ठेवलेली ! तरीही धीर देण्यासाठी जायचय .त्याच्या मुला बाळान्ना ,बहिन भावाला बाबांना धिर देईनच पण आम्हाला कोण देणार धीर ? प्रत्येक दु:खाला मिल्याच तर होता अन आता ...
ॐ पूर्ण मिद: ,पूर्ण मिदम .... तुझ्यासाठी कसं म्हणु मिल्या ..... हसतं खेळतं ठेवणं तुझ काम होत रडवणं नाही शेवटी गेल्यावरही शिव्या खाणार आहेस . हो त्याशिवाय का आपली मैत्री पूर्णत्वाला जाणार आहे !
..... आणी सम्पूर्ण शास्त्री परिवारातर्फे मी मंगलमूर्ती शास्त्री खेर कुटुम्बियांना दुखातुन बाहेर पडन्याच बळ मिळो अन आत्म्यास शान्ति लाभों यासाठी प्रार्थना करतो !
इतके तर बोलावेच लागेल ..
मित्रा मिल्या सकाळची चिड चिड किती वाढवलीस !
सकाळी 4 लाच जाग आली काहीही करायचा मुड नव्हता .नासिकला जायचे सकाळी सहाला !
मित्रांना शुभ सकाळ लिहिले मात्र .. आजची सकाळ शुभ असणार का?
मनात चिड चिड होती सव्वापाचला अशोकचा फोन आला तयारीसाठी उठालो ! ब्रश /स्नान आटोपले करायची इच्छा मात्र नव्हती . काढा बनवायला पुन्हा मूड नव्हता अशोकचा पुन्हा कॉल आला "सर तयार झालात ?' त्याच्यावर खेकसने सकाळी सकाळी ट़ाळले !
हेरम्बला उठवले , तो अंघोळ न करताच गाडीत बसला चिड चिड थोडक्यात वाचली ! प्रशांतला यायचेय म्हणून असंख्य कॉल केले महोदय सायलेंट वर झोपलेले नेहमीप्रमाणे ! कसाबसा फोन लागला त्याला निघतो सांगितले , तिन तिघाड़ा होऊ नए वाटत होते ,लहानपणापासुनचे अंध संस्कार !!
गाडीने लासुर सोडले अन बातमी आली मिल्यानी आमची साथ सोडली होती ,तीस वर्षापासुनची आमच्या दोस्तीला , मैत्रीला त्यानं पूर्ण विराम दिला होता ! तो दूर दूर गेला होता कधीही न भेटण्या साठी !!
गेली क्रित्येक दिवस कर्क रोगाने त्रस्त आमचा मित्र मिलिंद मधुकर खेर त्रासमुक्त झाला . इहलोक सोडता झाला ...
1985 च्या वर्षात भेटलेला मिल्या मित्रत्व काय, कसे निभवल्या जाऊ शकतं याच ज्वलंत उदाहरण ! मानपान, पैसा अड़का, राग लोभ कसलीही अभिलाषा नाही , फक्त निखळ मैत्री प्रेम देणारा हा मिलिंद जसा माझा तसा देवेन्द्रा हेरम्बचा सुद्धा तितकाच जिगरी ! बाबिताई संजय राव यांचेसाठी सुद्धा ! आम्हा तिघा भावांच्या दृष्टीने मिलिंदच महत्व वेगळेच होते , आहे ,रहाणार कारण आम्ही तिघेही ज्यावेळी अमरावती बाहेर होतो त्यावेळी आई भाऊंचा केअरटेकर तोच होता . अन मिल्याचे हे पांग फेडण्या पल्याडचे आहेत आम्हासाठी !
देवेंद्रला टेबल टेनिस मला बैटमिनटंनला जोडंण्याचे श्रेय खेळाडू वृत्तीच्या मिलिन्दलाच द्यावे लागेल . संगीत हाही त्याचा आवडता विषय . कुठल्याही कामाचा कधीही कंटाळा नाही .आई नेहमी सांगायची " घरी तुम्हा मुलांपेक्षा मला मिलिंद वर जास्त विश्वास आहे !'
पार्थच्या मौंजी नंतर त्याला आजाराने ग्रासले . नासिकला भेटायला गेलो दोन तिनदा ! त्याच दुःख अन कधीही न पाहिलेला दुःखी मिल्या पहाणे कष्ट दायक होते !
"अगस्ती 120 /300 च एक पान फक्त रात्री खात होतो रे ,देवानं ए व्ह ढी मोठी सजा का दिली ? ' म्हणाला . समजाविण्या पलिकडच होतं ते सगळं . काय समजाविणार ? अगतिक अन हतबल अगस्ती अनुभवला ! भेटण्याच सामर्थ्य हरवलेला अगस्ती ! डोळ्यांच्या कडा सतत पाणावलेला अगस्ती ! काकू कर्क रोगानी गेल्या सगळ्यांच्या मनाची तयारी होती सान्त्वन करणे जड गेले नाही .. आता मिलिंद सुद्धा त्याच मार्गानं गेला , मनांची तशीच तयारी त्यांनही करून ठेवलेली ! तरीही धीर देण्यासाठी जायचय .त्याच्या मुला बाळान्ना ,बहिन भावाला बाबांना धिर देईनच पण आम्हाला कोण देणार धीर ? प्रत्येक दु:खाला मिल्याच तर होता अन आता ...
ॐ पूर्ण मिद: ,पूर्ण मिदम .... तुझ्यासाठी कसं म्हणु मिल्या ..... हसतं खेळतं ठेवणं तुझ काम होत रडवणं नाही शेवटी गेल्यावरही शिव्या खाणार आहेस . हो त्याशिवाय का आपली मैत्री पूर्णत्वाला जाणार आहे !
..... आणी सम्पूर्ण शास्त्री परिवारातर्फे मी मंगलमूर्ती शास्त्री खेर कुटुम्बियांना दुखातुन बाहेर पडन्याच बळ मिळो अन आत्म्यास शान्ति लाभों यासाठी प्रार्थना करतो !
इतके तर बोलावेच लागेल ..
मित्रा मिल्या सकाळची चिड चिड किती वाढवलीस !
30 जाने 2016
No comments:
Post a Comment