पानं

Sunday, April 10, 2016

।।भटकेश्वर प्रसन्न ।।
मा गिरीशजी प्रभुणे अन मा महादेव आबा गायकवाड सर यांच्या समरसता मंचाच्या कार्यकर्त्यांच्या कष्टातुन साकारलेला भटक्या अन विमुक्त समाजासाठीच्या यमगरवाडी निवासी शाळा प्रकल्पास (तुळजापुर - मंगरुळ - यमगर वाडी) भेट ह़ा आजच्या दिवसाची उपलब्धी म्हणावी लागेल
          स्व रामचंद्र चाटुफळे यांच्या कुटुम्बीयांच्या दातृत्वातुन उभी राहिलेला यमगरवाडी प्रकल्प सामजिक सोहार्दासाठी (एक अति आवशक्तेतील) एक महत्वाचे पाउल म्हणावे लागेल .सैन्यातुन निवृत्त स्व चाटुफले यांना मिळालेलि जमीन 18 एकर त्यांनी दान द्यावी हे ग्रेटच !!
       आबांनी ऐकवलेली पारधी सुनील अन सुनीता या भावाबहिनींची कथा मन हेलावणारी होती . स्वताच्या आईचा बापाने केलेला खून अन त्या बापापासुन स्वताला वाचवत आजीकडे पोहोचलेली ,नंतर आजीसुद्धा पोरां पासून सूटका करून घेण्याच्या विवंचनेत ...
        शेवटी कष्ट अपार घेवुनही मुलांमध्ये काहीही फरक चार वर्षानंतरही दिसत नाही अन  कार्यकर्ते पुन्हा नवीन मुलांवर मेहनत घ्यायला तैयार ! जंगलात खायला प्यायला काही नाही ,टीवी मोबईलचे आमिष नाही, ज्यांना सुधारायाचे तेही आडमुठे , अशा विपरीत परिस्थितीत कार्यरत स्वयंसेवकांना अस्मादिकांच्या मानाच्या मुजरा
52 भटके 253 उपजाती असलेल्या भटक्या समाजाला मुळ समाजप्रवाहाशी जोड़ण्याचे काम करणारे भ वि परिषद प्रांत कार्यवाह श्री नरसिंग झरे व सौ भारती ताई देवकर ताई यांचीही तुळजापुर यांची भेट झाली . ही मंडळी काम करते म्हणून आम्ही उर्वरित लोक सुखानं झोपा काढू शकतो हे झोपा काढ़णाऱ्यांना तरी माहिती आहे का? दुर्दैव इथेच संपते तो नवल ! शासकीय स्तरावरचा निरढावलेपणा उद्वेग आणतो तो वेगळाच !!

 ब्रिटिशांनी गुन्हेगार ठरवलेल्या या जाती आजही तोच आपला व्यवसाय मानतात .त्या मुळ प्रवाहात येणार कधी ?
   स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भ वि परिषदेच्या माध्यमातुन 47हजार भटक्यान्ना रेशन कार्ड ते आधार कार्ड वाटप करण्यात आले ! Kudos to jems of society the real heros!!!

 वानप्रस्थी कार्यकर्ता म्हणून बाहेर पड़लेले श्री रघुवीरजी ओक़ काका व काकू भेटले . सतत हसतमुखता, शांतता अन प्रसन्नता सेवारत राहून मिळवलेल्या  समाधानातुन कशी मिळवावी, रिटायर्ड झालो तरी रि टायरिंग कसे करावे हे काकां कडूनच शिकावे !!! प्रेरणादायी   जोडगळीस  शीर साष्टांग प्रणिपात .
    चोरिच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या बापाचा अन बसमधून चोर म्हणून  ढकलले गेलेल्या मृत मायच्या कडेवरचा, आघातामुळे आलेल्या बहिरेपणा सोबत घेवून जगणारा  सुनील पवार आज एव्हढया लहान वयात सुन्दर लाकडी प्रतिमा कोरत होता . कला जगण्याची शोधत होता......माय बापाविना !!
आज रविवार काही मुलं एकमेकांची कटिंग करण्यात व्यस्त होते तर काही गणपतीच्या मूर्त्या बनवण्यात !साध्या मातीच्या !
इतक्या दुर्गम ठिकाणची एक मुलगी चेसमध्ये "नेशनल ' खेलते तर क्रित्येकांची चपळाई हरनासारखी ! मार्गदर्शन मिळते तो ओलिम्पियनच  व्हावित !!! .....
         लक्ष्मनजी , सुनीलजींनी मनावर घेवून खनाळे काकांच्या प्रेरणेने,मराठेकाकांच्या 22माघ अर्थात रविवारी , अक्षय,गोलू ,किशोरच्या सोबतीने उपकृत झालेला आजचा दिवस प्रथितयश उद्योजक ,स्वत:ची इनोव्हा, स्वत: चक्रधर होत ,आनंदात आम्हास सहन करbणारे  सेवाव्रती  भगवंत गोपालकृष्ण ग्रामले यांना सविनय अर्पण . ------मंगलमूर्ती शास्त्री अभिमन्यु प्रभात शाखा रा स्व संघ सम्भाजिनगर
14-9-2015

No comments:

Post a Comment