[WHATSAPP
वर आलेल्या मेसेजच्या निनावी लेखकाचे आभार]
काही माणसं काही क्षणातच मनाला भावतात तर काही कितीही सहवासात राहिली
तरी ओढ नावाची गोष्ट निर्माणच होत नाही......
मन एक अजीब रसायन आहे...
फक्त सौंदर्य हे प्रेमात पडायला कधीच पुरेसं नसते...
खूप सुंदर असलेली व्यक्ति जर हट्टी, आत्मकेंद्रीत
आणि अहंकारयुक्त असेल तर ती व्यक्तीदेखील कालांतराने कंटाळवाणी, निरस वाटू लागते, कितीही सुन्दर
दिसत असली तरीही...
कारण शेवटी आपण व्यक्तीच्या स्वभावाबरोबर रहातो...
शरीर तर निमित्तमात्र आहे...
त्याच व्यक्तीच्या स्वभावात गोडवा , विनयशीलता
आणि शालीनता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...
घरात दिवे असूनही निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला
अधिक प्रसन्न करणारा ठरतो...
सहवासातील माणसांचं देखील तसेच असतं...
एखाद्याच्या सौंदर्याने, प्रकाशाने
दिपून जाणं, हा काही क्षणांचा खेळ असतो; पण खरे आत्मिक समाधान हे समईच्या इवल्याशा तेजानेच मिळतं...
आयुष्यातही अनेक लोक येतात आणि जातात......
काही जण तुम्हाला दिपवून टाकतात तर काही तुमच्या आयुष्यातील अंधाराची
जाणीव करून देतात..........
जगात कुठलीच गोष्ट शाश्वत , निरंतर
नसते पण सात्विक प्रेम मात्र नेहमी सोबत रहातं, जगण्याची
उमेद देत.
नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच आणि
ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरवात करता त्याचा पराभव
निश्चित होतो...
अंधारल्या खोलीत लावलेलं निरांजन जसं दाही दिशा उजळतं, खरे प्रेमदेखील तुमची अशीच सोबत करतं.....
मनाला विश्वास देत जगाने नाकारलं तरी माझं प्रेम पाठीशी नेहमीच
ठामपणे उभं राहील.......
प्रेम म्हणजे भक्तिचेच एक रूप आहे. ज्याच्यात आर्तता आहे, पण याचना नाही..........
आपल्या माणसांसाठी जळताना स्वतःच्या त्रासाची मोजदाद नाही........
साधा विचार करून बघ, भोवताली
दिव्यांची आरास असतानाही आपण समईच्या तेजापुढे नतमस्तक होतो ते का.........
कारण त्या तेजाला सात्विकतेचा, आपुलकीचा
स्पर्श असतो...
खरं सांगू?
असे, निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं, ही
आयुष्यातील सगळ्यात मोठी मिळकत असते, असं
मला वाटतं...
तेजाला सात्विकतेचा, आपुलकीचा स्पर्श
असतो... , भोवताली
दिव्यांची आरास असतानाही आपण समईच्या तेजापुढे नतमस्तक होतो...... काका अॅड
भगवानराव देशपांडे आपणापुढे हि कॉलनी नतमस्तक आहे. निरागस, पवित्र
आणि भावनाशील प्रेम लाभणं, ही आयुष्यातील
सगळ्यात मोठी मिळकत तुम्ही आम्हाला दिलीत .
अॅड भगवानराव देशपांडे काका दुर्वांकुर मध्ये राहायला आले हे आम्हा
नंदीग्राम वासियांचे अलौकिक भाग्यच.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील
बिनीचे शिलेदार असलेले काका ,गोरगरिबांचे वकील म्हणून ओळखले जाणारे काका ,महाराष्ट्राची
ओळख पुरोगामी म्हणून होण्यात ज्यांचा सिहाचा वाटा आहे असे काका , शेतकरी कामगार
यांच्या जीवनाशी एकरूप होऊन उरी क्रांतीची स्वप्ने बाळगणारा वल्ली , कामगार चळवळसाठी ,सामाजिक समतेच्या प्रश्नासाठी ,हैदराबाद
मुक्तीसंग्रामासाठी त्यानंतर मराठवाड्याच्या विकासासाठी सतत कार्यमग्न राहणारे
काका भारतीय न्यायव्यवस्था व राज्यघटना यावर प्रभुत्व ठेवून आहेत एक चालता बोलता ज्ञानकोषच
.
तसे पाहता काका अन
आम्ही विचारांनी परस्पर विरोधी , काकांसाठी
मार्क्स हीच गीता तर आम्ही गीते मध्ये मार्क्स शोधणारे , मात्र काकांनी
आम्हाला नवीन दृष्टी दिली . मार्क्सवादाचा आधार आर्थिक त्यांना संस्कृतीशी काही
देणेघेणे नाही हि आमची संकल्पना . मात्र गणेश उत्सव आलाय शास्त्री वर्गणीसाठी अजून
कुणी आले कसे नाही विचारणारे काका कृतीतून आम्हाला कृत कृत्य करतात .वर्गीय
लढ्याचा आधार आर्थिक असला तरी त्याला सामाजिक सांस्कृतिक राजकीय आशय आहेच अन
त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे ठणकावून सांगणारे काकाच .
महात्मा फुले ,आंबेडकर, महात्मा गांधी यां विषयी गाढा अभ्यास असणारे
काका हळूच आपल्याला समताधीष्टीत कसे बनवितात हे कळत सुद्धा नाही . अरे रस्त्यावरचे
अतिक्रमण तुम्ही काढताय मात्र ज्याचं पोट त्यावर आहे त्यांची आधी सोय पहा मग
अतिक्रमण काढा, सांगणारे काका भाजीवाल्यांशी ठेलेवाल्यांशी असणारे आमचे भांडण नकळत
दूर करतात अन आम्ही त्यादृष्टीने विचार करायला लागतो .
काकांनी आपले सर्व
पुस्तकं ज्यांची अंदाजे किंमत २.५ लक्ष रुपये व्हावी LAW कोलेज ला दान केलेत हे हि
नसे थोडके .त्यानिमित्त LAW कोलेज मध्ये मुक्ती संग्राम दिनी काकांचा सत्कार असणार
आहे . सत्कार अन पुरस्कार यांनी आता काकांनाही जेरीस आणले .....
काकांना अनेक पुरस्कार मिळाले .आता सत्कार
म्हणता काका नाहीच म्हणणार ! मात्र आम्हाला सत्कार करायचा तो आमच्या स्वार्थासाठी .आम्हाला
त्यांना एकायचय . कारण काकांनी बोलत रहाव अन आम्ही एकत ...एक वेगळी अनुभूती . काका
आम्ही त्रिवार ऋणी आहोत तुम्ही आम्हाला भरभरून दिलत अन असेच वर्षानुवर्ष देत राहाल या खात्रीसह ..................जय
हिंद
आणि हो ह्या भगवानराव
नावाच्या आपल्या विचारानंप्रती कर्मठ अन कर्त्यव्य कठोर व्यक्तिमत्वाला सांभाळणे
हे कर्म कठीण काम ज्यांनी अनवरत केल त्या आमच्या उशाकाकू . शास्त्री आले एकेटे आले
का दहा जणांना घेवून आले, कॉफी चहा झालाच पाहिजे! काका जेवताहेत उभ्या उभ्या एक
धपाटा खाऊन घ्या काकांसोबत !!
न कंटाळता हे करणे किती कठीण . काका तुमच्या व्रतात काकुंचा वाटा
अधिक आहे सौ उशाकाकू देशपांडे तुमच्या
समोर तुमचे सर्व शेजारी नतमस्तक आहेत
आपणा दोघांनाहि निरामय
उदंड आयुष्य लाभो हि प्रार्थना
- मंगलमुर्ती शास्त्री १२/९/२०१६
No comments:
Post a Comment