शुभाशिर्वाद
रसिका आजोबांच्या पाया पड !नमस्कार कर ...आजीनी केलेल्या सूचनेचा अनादर रसिका कशी करणार ?रसिकाने पटापट सगळ्यांच्या पायावर माथा टेकवला अन वडिलधारया मंडळींचे कौतुक जमा केले !मलाही लहानपणापासून ते आजतागायत भाउंकडून अशीच आज्ञा केली जाते !तेही डोळे मोठ्ठे करून !!!!
लहानपणी मी आलेल्या पैपाहुन्यांच्या पाया का पडायचं ?हे मला कुणी समजाविल्याच आठवत नाही .त्यामुळे पाहुणे [मोठाले !]घरी आले कि ,मला उगीचच नकोसं व्हायचं त्यांच्यासमोर जायला ...आता करा नमस्कार !नमस्कार का करायचा ?याचा शोध घेण्याचा मी लहानपणी कधी प्रयत्नही केला नाही .कुणी मला विचारले असते (त्यावेळी ),का पाया पडायचं मोठ्यांच्या.... तर उत्तर ''भाऊ म्हणतात म्हणून '' असेच मी दिले असते !!नमस्कार का करायचा ?नमस्काराचा मला काय फायदा ?याचा विचार तू कधी केला आहेस ,रसिका ? आजीनी कदाचित काही सांगितले असेल ! आजीनी ,आजोबांनी या पत्रापुर्वी तुला काय विवेचन नमस्कार संबधी केले हे तू मला पत्रानेच कळव
....तर पत्र लिहिण्याचे कारण कि ,[आता तुझ्या लक्षात आलेच असेल ] नमस्काराचे फायदे काय ?तोटे काय? का करावा शीर साष्टांग नमस्कार !...अगस्ती काकाला रिकामपण फार !!असे तुला कदाचित वाटून जाईल ,पण तूझ्या या काकाचा नाईलाज आहे !!तुला वाचावेच लागेल !चुकीचे वाटले तर काकाला सुधाराव लागेल !!पत्रोत्तर द्यावे लागेल !!!
सर्वप्रथम नमस्कार हा संस्कार आहे काय ?नमस्कार करायचे म्हणजे काय करायचे ?आपण काय करतो ,माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही हात जोडून नाकाच्या शेंड्यापर्यंत नेणे हे अभिवादन ,तर दोन्ही हात जोडून खाली वाकून शीर [ माथा ] टेकवून करायचा तो शीर साष्टांग ....कशाही प्रकारे केले तरी यामध्ये आपल्या शरीराच्या हालचाली होतात अन उगीचच का होईना आपल्याला हसावही लागतं! ............मला असं वाटत,हाच माझ्या दृष्टिन पहिला फायदा !शरीराला आवश्यक असलेला व्यायाम !मुद्दाम न करताघडणारा !अन तेही प्रसन्न(हास्य मुद्रेत )मुद्रेत !! तब्येत खुश !रोज किमान दहा जणांच्या पाया तब्येतीसाठी पडायचीसवय लहानपानापासून ठेवावी ,का रोज सकाळ संध्याकाळ वडील धारयांच्या पाया पडलो तर फायदाच फायदानुकसान मात्र होईल ....रसिकाचा आवडता आळस मात्र दूर जाईल !भूकहि लागेल !अन्न जास्त लागेल !!!आईचे स्वयंपाकाचे कष्ट वाढतील ...........
नमस्कार आपण कुणाकुणाला करतो ?देवाला ,संताना ,साधूंना ,सज्जनांना ,सर्व वडिलधारयांना ,आदरार्थींना,अन समवयस्क मित्रमैत्रिणींना .
हि सर्व मंडळी नमस्काराच्या बदल्यात आपल्याला काय देतात ? तर स्नेह प्रेम देतात .कसा देतात तर ...आपण नमस्कार केल्याने नम्रता दिसते ,लीनता दिसते अहंकार कमी झाल्यामुळे दुरावा कमी होतो,जवळीक प्रेम वाढते ,मोठी चूक केलेली असली अन शीर साष्टांग नमस्कार घातला अन चूक कबूल केली कि काम फत्ते !दुसऱ्याच्या मनातला बेबनाव म्हणा ,किल्मिष म्हणा दूर होऊन प्रेम पूर्ववत होते .या सगळ्या गोष्टींसाठी भांडवल ते काय ,फक्त नमस्कार !!!
नमस्काराने आपले अवगुण कमी होतात ,मोठ्या चुकांना क्षमा मिळते ,ज्याला आपण दंडवत घालतो त्याच्या मनात आपल्या विषयी भाव बदलतात ,कृपा उचंबळते,अंतकरणात दया भरून येते ,तो प्रसन्न होतो अन अनपेक्षितपणे तो आपली जबाबदारी घेतो .आपल्या संवर्धनाची ,रक्षणाची जबाबदारी नमस्कार घेणारयावर जाते .अन हे सर्व फुकटात !विना खर्चात ,विना कष्टात ,कुठल्याही साधन सामग्रीशिवाय..अगदी फुकटात .....चकटफू !!!!
रसिका ,जर का मी आलेल्या व्यक्तीला पटकन नमस्कार करीत असेन तर त्यांचा आणखी एक फायदा ...मला कुणी गैर समजानेही 'शिष्ट 'म्हणणार नाही .मी लाजरा असतो ,बुजरा असतो .समोर आलेल्यांशी काय बोलावे कळत नाही ,सुचत नाही ,अशा वेळी चटकन नमस्कार केला कि काम खल्लास !!काळजी वाहण्याची जबाबदारी त्यांची ...नमस्कार केल्यावर केवढी जिम्मेदारी !!
आता तू म्हणशील ,सगळेच नमस्कार करून घेणारे काही माझ्याकडे लक्ष देत नाहीत !काहीच काळजी वाहतात .खरे आहे ते ,पण या काळजी ,जबाबदारी घेणाऱ्यांची पारख आपण कशी करणार ?त्यापेक्षा सगळ्याच मोठ्यांना नमस्कार करून निदान बंधन तर घालू त्यांच्यावर ! काही मंडळी नमस्कार केला नाही म्हणून रागावणारीहि असतात .नमस्कार करून घेतल्यावर भलेही नंतर जिम्मेदारी टाळतात ,अशा कर्म दरिद्री लोकांची आपण मनातल्या मनात कीव करूया !नमस्कार हा व्हायलाच पाहिजे ,असे मला वाटते .त्या ठिकाणी आपला फायदा ..व्यायामाचा !!फायदा क्र. एक ......वर उल्लेखिल्याप्रमाणे !
आता चौथे पण जास्त लिहित नाही,फक्त तीन तिघाडा काम बिघाडा होऊ नये म्हणून लांबवतो ...नसता उद्या काका कित्ती कित्ती बोअर आहे म्हणून कुजबुज करशील !!
नमस्काराचे मला फायदेच जास्त सुचले अन तोटे कमी .तू तोटे शोधून काढ अन चार पानी पत्र लिही आणि माझ्याकडून बक्षीस मिळव ..चार पानिपुरया चाटवाल्याकडच्या .Iकाही लिहिता नाही आले तर माझ्या वतीने रोज आई बाबा आजी तात्या यांना सकाळ संध्याकाळ शीर साष्टांग नमस्कार घाल ...कळावे लोभ राहू द्यावा !!!
आता तू म्हणशील ,सगळेच नमस्कार करून घेणारे काही माझ्याकडे लक्ष देत नाहीत !काहीच काळजी वाहतात .खरे आहे ते ,पण या काळजी ,जबाबदारी घेणाऱ्यांची पारख आपण कशी करणार ?त्यापेक्षा सगळ्याच मोठ्यांना नमस्कार करून निदान बंधन तर घालू त्यांच्यावर ! काही मंडळी नमस्कार केला नाही म्हणून रागावणारीहि असतात .नमस्कार करून घेतल्यावर भलेही नंतर जिम्मेदारी टाळतात ,अशा कर्म दरिद्री लोकांची आपण मनातल्या मनात कीव करूया !नमस्कार हा व्हायलाच पाहिजे ,असे मला वाटते .त्या ठिकाणी आपला फायदा ..व्यायामाचा !!फायदा क्र. एक ......वर उल्लेखिल्याप्रमाणे !
आता चौथे पण जास्त लिहित नाही,फक्त तीन तिघाडा काम बिघाडा होऊ नये म्हणून लांबवतो ...नसता उद्या काका कित्ती कित्ती बोअर आहे म्हणून कुजबुज करशील !!
नमस्काराचे मला फायदेच जास्त सुचले अन तोटे कमी .तू तोटे शोधून काढ अन चार पानी पत्र लिही आणि माझ्याकडून बक्षीस मिळव ..चार पानिपुरया चाटवाल्याकडच्या .Iकाही लिहिता नाही आले तर माझ्या वतीने रोज आई बाबा आजी तात्या यांना सकाळ संध्याकाळ शीर साष्टांग नमस्कार घाल ...कळावे लोभ राहू द्यावा !!!
तुझाच
अगस्तीकाका
No comments:
Post a Comment