पानं

Saturday, February 20, 2021

पाल्हाळाचे कारण की

 


परवा आशीर्वाद , शुभेच्छा देण्यासाठी ति शामदादांचा फोन आला , बोलतांना आज काय उपक्रम वाढदिवसाप्रीत्यर्थ ?  विचारणे झाले .. काही नाही शेगाव कचोऱ्या अन बर्फी यावरच यावर्षी शुभेच्छा देणाऱ्यांची बोळवण आहे म्हणणार ..तर लक्षात आले दादांना काय सामाजिक उपक्रम अपेक्षित असेल ...
       यंदा वाढदिवस साजरा न करता बाहेर पळायचा उपक्रम होता खरे तर . नरसोबावाडी ठरलेही होते , बाबीताई जाऊनही आली आमच्या ड्रायव्हर साहेबांनी दांडी मारली अन आम्हाला 11 जानेवारी साजरी करणे आले . ..
        इथेच असल्याने आमच्या कार्यकर्त्यांनी दोनशे शेगाव कचोऱ्या , स्वीट वगैरे च्या पावत्या अस्मादिकांच्या नावाने फाडून ठेवलेल्या . थोडक्यात निभावले ( करोना लाभार्थी ! )

तर पाल्हाळाचे सविनय कारण की दादांनी कन्याकुमारी शिला स्मारकासाठीच्या स्व.  एकनाथजी रानडे यांच्या एक रुपया समर्पणाची गोष्ट सांगितली . साठ च्या दशकातील पूर्वार्धात असेल शिलास्मारकासाठी शामदादांच्या पिताश्रींनी म्हणजे आपल्या श्रीराम पंतांनी मलकापूरला चार मुलांच्या नावाने 44 रुपयांची कुंपणे त्या काळी घेऊन विवेकानंद शिला स्मारकासाठी आपले योगदान दिले होते . त्यात काय  विशेष ? वाटेल आपल्याला .
        मात्र 164 रुपये पगारातून अन घरी स्वतःची , भाऊबंदाची दहा तोंडं भरवायची असतांना त्या 44 चे महत्व कळते . शेजारच्या त्याकाळच्या लक्षाधीश चांडक सेठचे 1001चे समर्पण त्यापुढे फिके पडावे असे .
       पंतांना त्यांच्या आयुष्यात शिलास्मारक पोरांनी दाखवले का हा अवघड प्रश्न श्याम दादांना विचारायचा राहिला . पण अख्ख्या पिंगळे कुटुंबासाठी हा अभिमानाचा निश्चित विषय आहे की शिलास्मारकासाठी त्यांचे योगदान आहेच .
            तर सांगायचा मूळ  मुद्दा , वाढदिवसा प्रित्यर्थ श्री राम जन्मभूमी न्यासाला माझे योगदान , स्थानिक राम मंदिराला (पाच हजार )योगदान अन वेद पाठशाळेतील गोशाळेसाठी वैरण असे काही विषय मी केले . मी अकरा हजाराचा राम जन्मभूमीचा पहिला चेक सुपूर्द केला आणि माझ्या सासूबाई श्रीमती सुरेखाताई मोहरील यांनी राहुलच्या वाढदिवस पाच हजार देऊन संपन्न केला .
         काल एका वाढदिवसाला (दत्ताजी दंडवळकर ) हजेरी लावली पाच हजाराचा चेक समर्पण मिळाले .

        आता समर्पण निधी अभियान येत्या 15 तारखेला सुरू होत आहे आपल्या नातेवाईक मंडळींनी मागे राहू नये . मी पंतांसारखे अगदी मासिक आमदणीच्या 25 टक्के वगैरे देऊन उगाच " श्रीराम पंत "  बना म्हणणार नाही , परंतु 100 रुपये का होई ना दया . ईश्वरी कार्य आहे तिथे पैसा कमी पडणार नाही मात्र माझेही योगदान असलेच पाहिजे खारीचा वाटा ..... आणि हो जमल्यास आपलं योगदान मधुघट वर टाकल्यास इतरांना प्रेरणा जरूर मिळेल !
  
श्याम दादा धन्यवाद .

अगस्ती 
      

No comments:

Post a Comment