पानं

Thursday, December 21, 2017

वाढ दिवस अतुलजीचा

यथाचित्तम तथा वाचो ,
यथा वाचस्तथा क्रिया ।

जसे मनात तसे बोलणे , जसे बोलणे तसे करणे

राजकारणात हे चालत नाही ,किंबहुणा राजकारणी तो असू शकत नाही . आलेल्या प्रत्येकाला चॉकलेट , आइस कांडया द्याव्या लागतात कुणाला "नाही 'म्हणता येत नाही ...

             राजकारणात नाही म्हणायला शिकलं पाहिजे म्हणतात . मात्र फार क्वचित अस घडतांना दिसते . ... निवडणुका असतांना जर चंद्र मागितला तर त्यालाही देण्याचे आश्वासन नेते देतील ही आजची अवस्था !! 
                     आ अतुल सावे म्हणूनच एक वेगळा राजकारणी ठरतो ! तसे पाहिले तर अण्णांनी व्यवसाय आखुन दिलेले मात्र स्वतंत्र वेगळा विचार करत उद्योग उभारले आणी बहरवले .. राजकारणाचे तंत्र मात्र अण्णांच्या पायावर पाय ठेवुनच क्रमित झालेले . ...
          राजकारण हा पैसा कमविन्याचा व्यवसाय नाही त्यासाठी आपापले व्यवसाय सांभाळलेच पाहिजेत याविषयी आमचे अतुलजी आग्रही असतात . प्रसंगी  शास्त्रीजी दुकानात चक्कर झांली का नाही हे विचारायला ते चुकत नाहीत .

वेळेचे महत्व , TIME Management , अतुलजीकडुन शिकावं ! कुठल्याही कार्यक्रमाला , छोट्या बैठकीला " अर्धा तास आधीच पोहचा' असा निरोप मिळतो  कारण आमदार सावे साहेब येताहेत ...

   वाढ दिवस साजराच करायचा तर सामाजिक उपक्रम करू या , उगिच केक कापून डीजे बड़वुन वेळ आणी पैशाचा अपव्यय नको म्हणणारे अतुलजी असतात आणि त्यातून कार्यकर्ते भव्य अतुल्य आरोग्य शिबिरा ची तैयारी करतात, हे पूर्व औरंगाबादचे नाशिबच म्हणायचे !
          "अतुलजी मोंढा नाका पुलाचे कामासाठी रस्ता बंद करणार आहेत  तेव्हा पर्यायी कैलास स्मशान भूमि समोरच्या रस्त्याला जरा जेसीबी लावून सुरळीत करता येईल का ? '
      माझा sms वाचून पुण्याला तातडीच्या वैयक्तिक कामासाठी निघालेले अतुलजी माघारी येतात आधी पाहणी करतात अधिकाऱ्या ना सुचना करून पुढे निघतात ! रस्त्याच्या निधीसाठी मुंबईत प्रयत्नरत होतात !  सार्वजनिक कामासाठीची तत्परता अनुभवायला मिळते . निवडून आल्यावर पहिली भेट वैदुवाड़ीची घेतल्या जाते ....
                  दीन हीन सेवा ही परमेष्टि अर्चना ,
                                     केवल उपदेश नही कर्मरूप भावना !

शाली, बुके वर खर्च कर नका , तेवढया पैशात आपण एखाद्या विद्यार्थयाचा वह्या पुस्तकाचा इंतजाम करु शकतो हे प्रत्येक कार्यक्रमात अतुलजी एकवतात .
      विकास कामाबाबत सतत मुम्बई, दिल्लीतुन काही मिळवता येईल का , याबाबत प्रयत्नशील असतात . आमदार झाल्याबरोबर शहराला 25 कोटीचा निधि मिळविला त्यातून बरेच रस्ते चकाचक होतील आता जालना रस्त्यासोबत बीड बाय पाससाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न .त्यावेळी फ़क्त मतदारसंघाचा विचार न करता शहराच्या विचार करणारे अतुलजी म्हणूनच मग वेगळे वाटतात .

      वागण्या बोलण्यातली डिसेंसी हे संपूर्ण सावे कुटुंबियांची खासियत !  मुलांमध्ये ती अतुलजिंनी अलगद उतरवलेली ! सत्ताधारी आमदाराचे पुत्र  कुठेही चौकात उभे राहुन ,  चार दोन पिलांटु सोबत घेवून , आडवे उभे गंध माथ्यावर लावून , गचाळ अशा सोन्याच्या साखळया, हातात कड़े घातलेले ,  गळ्यात वेगवेगळ्या रंगाची  छापी घालुन पान, सिगरेटी हाती घेवून उभे आहेत , ट्रैफिक पोलिसाशी हुज्जत घालताहेत असे आढळले  नाही . मुलां मधील विनयशीलता कार्यकर्त्यांमध्ये उतरावण्यासाठी अतुलजी प्रयत्नरत असतात .

            सतत मतदार संघ समस्या सोडवण्यात व्यस्त असणारे , स्वतःचा विचार न करता रात्री उशीरा पर्यन्त कार्यरत राहाणारे अतुलजी आज वाढ दिवस साजरा करताहेत एका वेगळ्या पद्धतीने ! अतुल्य आरोग्य शिबिर आयोजित करून ! त्यांना उदंड , निरामय आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
                                  
                                                          - मंगलमुर्ती शास्त्री
           













No comments:

Post a Comment