पानं

Thursday, December 21, 2017

श्रद्धांजली धनश्री वहिंनी ला ....

"एक धसाडा दया बर वाहिनीं तुमच्या भाषेत .....

इथून आसामला कस जाव लागतं दादा

" आसाम मध्ये काय जास्त पिकते ?

अग  दिशा ज़रा धनदीपला पाण्याचा ग्लास पाठौ !

वाहिनीं 50 रूपये टिकिट वसूल करा  घर दाख्वायला ! खेड्यापाडयाचे तुमचे दिर भिंती च्या दूर उभे करा भिंती खराब करतील !

धनश्रीवहिनीं सासरी किती म्हणुन एकरूप व्हाव्या ... "सेलुला चार दिवासासाठी कधी जात जा वाहिनीं ' आम्ही म्हणाव !

घरी आलेल्या प्रत्येकाची विचारपुस झांली नाही अस होणे नाही ...

दादाला फोन लावावा आणि वहिनींची खेचाखेची करावी हे रोजचेच ! आमची रमी,सिंडिकेट साठीची  बैठक वास्तविक  वाहिनीं साठी कटकटीची, मात्र त्यांनी कधी चेहऱ्यावर ते दाखवल नाही रात्री 11वाजता कॉफी चहाची विचारपुस झांली नाही असे कधी झांली नाही ....
      त्या रेणुला हातानी घेवू द्या ,  वाढून देवू नका .. उद्या तुम्ही आयुष्यभर चमचाने भरवणार आहात का ? त्यांना सेल्फ सफीशिएंट होऊ द्या .. आम्ही चिडावं वहिनिवर !! इतक्या लवकर रुतु,रेणुला सेल्फ सफीशिएंट व्हावे लागेल अस कधी दुरुनही वाटले नव्हते ....

 झाड कोसळलं उभं
पक्षी खोप्या मंदी ऱ्हाय
माया आटली देवाची
गेली पिलाचीच माय ।

कुठं शोधू तुला माय
आता उरली आबाळ
खाली तापलेली माती
वर आभाळ आभाळ ।

देव असा का वागला
सुख बघवन त्याला
माय आमची का नेली
तेची नव्हती का त्येला ।

दाना पानी बी मिळलं
अंगी देशील तू बळ
माझ्या मायेच्या पखाची
आता कशी घेऊ ऊब ।

माझ्या मायेच्या पखाची
आता कशी घेऊ ऊब ....

                                             -- श्रद्धांजली अगस्ती भौजीची  !


डॉ राजेन्द्र फडके

 डॉक्टर साहेबांना ( दादा)
   अ भा दे घोळकरी संप्रदाय सदस्याचा अगस्ती alias मंगलमुर्ती शास्त्रीचा  शीर सा नमस्कार.
            कितीही घोळ केले तरी पोटात घालुन तुम्ही आम्हाला सांभाळलत .  एक अद्भुत एकमेव द्वितीय अनुभव तूम्ही आम्हाला गोवा निवडणुकीत जबाबदारी देवुन दिलात त्याबद्दल पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करतो .
           मला सुरुवातीला मिळालेला कलंगूट बदलवून वाळपै दिले.  तेथे खुप अडचणी होत्या मात्र त्या दुर करतांना काम केल्याचे समाधान होते . रात्रंदिवस एक करत आम्ही मतदार संघ चर्चेत तरी आणला . त्यासाठी तुम्हाला यावे लागले, मात्र त्यामुळे काही प्रमाणात आपण म्युनिसिपल एरियात कार्यकर्ते एक्टिव करू शकलो .
         सुरुवातीला सरळ काम करायलाच  नकार देणारे बूथ कार्यकर्ते म्युनिसिपल एरियात)शेवटी शेवटी कामाला लागले अन निघातांना मागच्यापेक्षा आपण जास्त मतदान मिळवू असेही बोलायला लागले . लवकर तापणारा खुशाल स्वतःला शांत ठेवत ,  सावरत  पूर्णपणे येथेच काम करत होता त्याचा फायदा झाला
          भा भा सु म / गो सु म च्या आपल्याच लोकांना वळवितांना नाकात दम आला . आशा करू काही तरी चमत्कार होईल ,सद्सदविवेक या संघाच्या तृतीय वर्ग शिक्षित  विद्वानाना काही बुद्धि देईल !
            आज ची रैली 2500 ची झांली हे एकूण पुन्हा आशा वाढल्या . शेवटच्या दिवासातील व्यवस्थापन कसे होते त्यावर सर्व अवलंबून आहे .

                    एका मतदार संघाची संपूर्ण जबाबदारी पत्रक लिहिणे, डिजाईनींग, वाटप , sms, phone no लिस्ट मिळवने, रोज एक sms लिहिणे , कार्यकर्ते एक्टिव ठेवणे इथपासून ते कोपरा बैठाकांना संबोधित करणे , वगैरे केले . कार्यकर्ते एक्टिव करतांना कुठेही आईस कांडीचा वापर केला नाही !!
                कार्यकर्त्यांची प्रचंड असलेली संख्या 46 बूथवर जवळपास सहाशे कार्यकर्ते होते पाच पंचायती मध्ये कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली . , अनिल नेने,  अमेय पारकर या स्थानिक  वक्तयांनी सभा, कोपरा बैठका  गाजवल्या . प्रचंड टाळ्या घेणाऱ्या अनिल नेने यांना बाकी राज्यभर हिंडवन्यास हरकत नसावी  .
              आपण ही संधी दिली मी कृतकृत्य आहे . आपल्या सोबत काम करणे हा ही अनुभव आहे . कार्यकर्ता कसा सांभाळावा हे तुमच्याकड़ून शिकावे . काही प्रभारी कोट्याधीश होते मात्र साध्या व्यवस्थेत कमीत कमी खर्चात कसे सगळ्यांनी" प्रभारी ' पण निभवले . मोठ्या नेत्यांच सांनिध्य काहींना मिळाले ही उपलब्धी .  प्रसंगी रागावून ,चुक ला चुक म्हणायला तुम्ही चुकत नव्हते ! योग्य वेळी कौतुक करणे,  कुरवाळने हे आम्हाला जमल तर ....

    गोवा निवडणुकी मुळे मला अजय भोळे ते हेमंत , संजय बोरसे , अमित ते ललित अनेक उत्तर महाराष्ट्री मित्र तर मिळालेच्  मात्र गावतलेच विकास ,दिलीप आता चांगले मित्र होऊत .
           तुमच्या सोबत खुप शिकायला मिळाले त्याचा निश्चित फायदा नुसता राजकीयच नाही तर रोजच्या जीवनात नक्की उपयोग होईल .
पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करत शीर साष्टांग प्रणिपात।  - अगस्ती .


ता क : संघटनमंत्र्या ची संघटनेतील आवशक्ता अधोरेखित झांली ! प्रत्येक स्तरावर ती असावी . किमान मंडळ स्तरापर्यन्त तरी असावी .

          
प्रिय राष्ट्रभक्त माता बंधू भगिनीनो
मागील कशी महिन्यां पासुन आपल्या देशात एक आश्वासक कणखर देशभक्त सामान्यतल्या सामान्य माणसाच्या विचार करणारे आपल्या हिन्दुस्थानच्या प्राचीन परंपरा , संस्कृती,विचारधारा जपणारे एक समर्थ नेतृत्व मा नरेंद्र मोदी यांच्या रूपाने कार्यरत झालेले आहे . "मेक इन इंडिया ' मार्फ़त नाव तरुणांना होणार असलेल्या व्यवसाय संधी असोत , कि " स्टार्ट अप इंडिया ' स्टैंड अप इंडिया  द्वारे नाव उद्योजकांसाठी मिळणार पाठबळ असो , महिला दलित वंचित सनाजासाठी उद्योग सुरु करू पहाणाऱ्यासाथी मुद्रा सारख्या योजनां असोत , जनधन सारख्या योजनाद्वारे गरीबातल्या गरीबासाठी उघडली गेलेली बँकांची दवारे असो , एक विकास गंगाच आपल्या दारी आल्याचे आपन रोजच्या द्रुक- श्राव्य माध्यमात वर्तमान पत्रात वाचत असतो .
            वरील परिस्थिती निर्माण होण्यामागे अनेक देशभक्त नागरिकांचे अथक परिश्रम , त्यांचा राष्ट्रहितैषी दृष्टिकोण , त्यासाठी करावा लागलेला असीम त्याग व् बलिदान आहे .
          वरील परिस्थिति खालच्या राज्याच्या पातळीवर आणण्याचे महत्वपूर्ण कार्य गोवा राज्य सरकार रूपाने मा मनोहर पार्रिकर यांच्या दूर दृष्टिकोनातून साकारले आहे . महिला सबलीकरण सशक्ति करन या क्षेत्रात गोवा राज्य संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर नेण्याचा काम या सुपुत्रांनी करून ठेवल आहे .
          आपल्या सर्वांसाठी अजुन एक संधि विधानसभा निवाडणुकी निमित्ताने आपल्या समोर चालून आलेली आहे . या निमित्ताने विनम्रतापूर्वक आवाहन करतो की " मतदान करणे हे आपले पवित्र कर्तव्य असून आपले आपल्या कुटुंबियांचे , नातेवाईक मित्र परिवाराचे मतदान आग्रहाने करून घ्यावे व शत प्रतिशत मतदानाचे उद्दीष्टय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत ' .
     आपल्या भागाचा विकास करू शकणाऱ्या ,राष्ट्रभक्त विचारांशी बांधीलकी मानून त्या विचारांशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहणाऱ्या  योग्य व सक्षम राष्ट्रीय पक्षाच्याच पाठीशी आपण उभे राहावे व् दिल्ली पासून गल्लीपर्यंत होत असलेल्या सकारात्मक परिवर्तनाचा हिस्सा बनत , मतदान करून  विकासयात्रा शेवटपर्यंत  पोहोचवावी .
   काही लोक भाषा ,जाती , प्रांत यांच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्याचा उपद्वयाप करात आहेत . त्यांच्या भूल थापान्ना बळी न पड़ता निर्भिड पणे मतदान करावे


        

वाढ दिवस अतुलजीचा

यथाचित्तम तथा वाचो ,
यथा वाचस्तथा क्रिया ।

जसे मनात तसे बोलणे , जसे बोलणे तसे करणे

राजकारणात हे चालत नाही ,किंबहुणा राजकारणी तो असू शकत नाही . आलेल्या प्रत्येकाला चॉकलेट , आइस कांडया द्याव्या लागतात कुणाला "नाही 'म्हणता येत नाही ...

             राजकारणात नाही म्हणायला शिकलं पाहिजे म्हणतात . मात्र फार क्वचित अस घडतांना दिसते . ... निवडणुका असतांना जर चंद्र मागितला तर त्यालाही देण्याचे आश्वासन नेते देतील ही आजची अवस्था !! 
                     आ अतुल सावे म्हणूनच एक वेगळा राजकारणी ठरतो ! तसे पाहिले तर अण्णांनी व्यवसाय आखुन दिलेले मात्र स्वतंत्र वेगळा विचार करत उद्योग उभारले आणी बहरवले .. राजकारणाचे तंत्र मात्र अण्णांच्या पायावर पाय ठेवुनच क्रमित झालेले . ...
          राजकारण हा पैसा कमविन्याचा व्यवसाय नाही त्यासाठी आपापले व्यवसाय सांभाळलेच पाहिजेत याविषयी आमचे अतुलजी आग्रही असतात . प्रसंगी  शास्त्रीजी दुकानात चक्कर झांली का नाही हे विचारायला ते चुकत नाहीत .

वेळेचे महत्व , TIME Management , अतुलजीकडुन शिकावं ! कुठल्याही कार्यक्रमाला , छोट्या बैठकीला " अर्धा तास आधीच पोहचा' असा निरोप मिळतो  कारण आमदार सावे साहेब येताहेत ...

   वाढ दिवस साजराच करायचा तर सामाजिक उपक्रम करू या , उगिच केक कापून डीजे बड़वुन वेळ आणी पैशाचा अपव्यय नको म्हणणारे अतुलजी असतात आणि त्यातून कार्यकर्ते भव्य अतुल्य आरोग्य शिबिरा ची तैयारी करतात, हे पूर्व औरंगाबादचे नाशिबच म्हणायचे !
          "अतुलजी मोंढा नाका पुलाचे कामासाठी रस्ता बंद करणार आहेत  तेव्हा पर्यायी कैलास स्मशान भूमि समोरच्या रस्त्याला जरा जेसीबी लावून सुरळीत करता येईल का ? '
      माझा sms वाचून पुण्याला तातडीच्या वैयक्तिक कामासाठी निघालेले अतुलजी माघारी येतात आधी पाहणी करतात अधिकाऱ्या ना सुचना करून पुढे निघतात ! रस्त्याच्या निधीसाठी मुंबईत प्रयत्नरत होतात !  सार्वजनिक कामासाठीची तत्परता अनुभवायला मिळते . निवडून आल्यावर पहिली भेट वैदुवाड़ीची घेतल्या जाते ....
                  दीन हीन सेवा ही परमेष्टि अर्चना ,
                                     केवल उपदेश नही कर्मरूप भावना !

शाली, बुके वर खर्च कर नका , तेवढया पैशात आपण एखाद्या विद्यार्थयाचा वह्या पुस्तकाचा इंतजाम करु शकतो हे प्रत्येक कार्यक्रमात अतुलजी एकवतात .
      विकास कामाबाबत सतत मुम्बई, दिल्लीतुन काही मिळवता येईल का , याबाबत प्रयत्नशील असतात . आमदार झाल्याबरोबर शहराला 25 कोटीचा निधि मिळविला त्यातून बरेच रस्ते चकाचक होतील आता जालना रस्त्यासोबत बीड बाय पाससाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न .त्यावेळी फ़क्त मतदारसंघाचा विचार न करता शहराच्या विचार करणारे अतुलजी म्हणूनच मग वेगळे वाटतात .

      वागण्या बोलण्यातली डिसेंसी हे संपूर्ण सावे कुटुंबियांची खासियत !  मुलांमध्ये ती अतुलजिंनी अलगद उतरवलेली ! सत्ताधारी आमदाराचे पुत्र  कुठेही चौकात उभे राहुन ,  चार दोन पिलांटु सोबत घेवून , आडवे उभे गंध माथ्यावर लावून , गचाळ अशा सोन्याच्या साखळया, हातात कड़े घातलेले ,  गळ्यात वेगवेगळ्या रंगाची  छापी घालुन पान, सिगरेटी हाती घेवून उभे आहेत , ट्रैफिक पोलिसाशी हुज्जत घालताहेत असे आढळले  नाही . मुलां मधील विनयशीलता कार्यकर्त्यांमध्ये उतरावण्यासाठी अतुलजी प्रयत्नरत असतात .

            सतत मतदार संघ समस्या सोडवण्यात व्यस्त असणारे , स्वतःचा विचार न करता रात्री उशीरा पर्यन्त कार्यरत राहाणारे अतुलजी आज वाढ दिवस साजरा करताहेत एका वेगळ्या पद्धतीने ! अतुल्य आरोग्य शिबिर आयोजित करून ! त्यांना उदंड , निरामय आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
                                  
                                                          - मंगलमुर्ती शास्त्री
           













कामधेनु

 अक्षत तृतीया, 1 में 1995  !
बरोबर 22 वर्षपूर्वीची अक्षत तृतीया आमच्या साठी एक नवीन आव्हान घेवून आली होती .
      मी नोकरी सोडुन स्वतंत्र व्यवसाय करायचा निर्णय घेतला होता . लग्न होऊन चार वर्ष झालेली शुभांगी मात्र दिडेक वर्षाची असेल . आईभाऊचा किंचित साहजिक विरोध होता ! मात्र आम्ही निर्णय घेतला होता. क्रान्तिचौक पोलिस स्टेशन रोडवर  120 फुटाच्या रेंटेड जागेवर पाटी लावली " कामधेनु पशुऔषधालय ' अक्षत तृतीया / 1में 1995 ला सकाळी सत्यनारायण पुजा करून सायंकाळी उद्घाटनाचे 125 लोकांचे जेवण ठेवलेले . सकाळी स्व दादा उर्फ गोपालकृष्ण शास्त्री लासुर (आमचे सर्वात जेष्ठ काका)   जातीने उपस्थित राहुन आशीर्वाद दिल्याचे स्मरते . इतर सर्व मंडळी चि वैशालीच्या , (बहीनबाईच्या ) साखरपुडयात व्यस्त होते .स्व  देवीदास कुलकर्णी नावाचे केटरर होते . अपेक्षित ग्राहका पेक्षा जवळील "बिन बुलाए मेहमान ' संसारनगरातील उपेक्षित मंडळीच जास्त जेवली . त्यांचे आशीर्वाद खरेच कामाला आले म्हणायचे . आज "कामधेनु ' नावरूपाला आलेले प्रतिष्ठाण आहे .
     पशु पक्षांशी नाते जुळवी...... कामधेनु ! या टॅग लाइन वर कार्यरत
कामधेनु पशुशी संबधित  जास्तीत जास्त प्रश्नांची उकल करण्यात यशस्वी ठरली आहे !
      कामधेनु पशुऔषधालय चालवातांना " एथिक्स' वर चालवले जावे याबाबत मी आग्रही होतो,  आजही आहे .आम्हाला अनभिज्ञ , अशिक्षित  शेतकऱ्यांच्या मुक़्या जनावराची सेवा करायची आहे हे प्रत्येक कर्मचारयांवर बिम्बवत आलोय . त्याचाही फायदा कामधेनुच्या विश्वासार्हतेसाठी झाला .
            एकच उदाहरण द्यायचे तर गांधेलीला एका पिसाळ लेल्या कुत्र्याने अनेक जनावरांना चावले . त्यासाठी आवश्यक लस आम्ही पुरवली , मात्र फक्त पहिल्या दोन डोस पुरती आमच्या कड़े होती . पुण्याहुन तातडीने मागवली मात्र कूरियरवाल्याणी कोल्ड चैन , शीत पेटी   मेंटेन केलेली नव्हती . समोर ग्राहकांची रांग असतांना , त्यांना लस आल्याचे माहित असताना , आम्ही ती लस डिस्ट्रॉय केली .... विकतो तर भरपूर पैसे मिळाले असते मात्र आम्ही आमच्या नुकसाणीचा पर्याय निवडला अन पुन्हा आर्डर केली लस मागवली !       
            कामधेनुचे वैशिष्ट्य आणखी एक म्हणजे इथले कर्मचारी ! सर्वानी,  इथे आले अन इथलेच झाले अशा पद्धतीने ,  15 -20 वर्ष एकाच फर्म मध्ये काढली, अशी  मंडळी आजकाल दुरापास्त आहेत .
         मध्यन्तरी " बर्ड फ्लू ' मुळे पगार देणे मुश्किल होते तेव्हा बाहेर सहा आठ महीने काढले व परत कामधेनु वर रूजु झाले .
       मी नोकरी जास्त दिवस करणार नाही , स्वतंत्र व्यावसायिक बनेल हया माझ्या दुराग्रहाचे शिकारी ठरलेल्या दोघीन्चा मी निश्चित  गुन्हेगार आहे . आई भाऊना त्रास देणे है माझा जन्मत: अधिकारच होता .मात्र पत्नी  सौ मिनल आणी चि शुभांगी यांनाही भोगावे लागले याची मला पूर्ण जाणीव आहे . कुटुंबिया व्यतिरिक्त मित्र परिवाराने वेळोवेळी धावून येत आम्हाला सांभाळले .
       आजचे प्रसिद्ध उद्योगपती श्री राघवेन्द्र जोशी यांचे प्रोत्साहन त्याकाळात अत्यन्त मोलाचे होते . भागिदारीत व्यवसाय करतो म्हणता त्यातल्या प्रश्नांची जाणिव करून देत , स्वतःच सुरु करा मी आहेच हा विश्वास त्यांनी दिला .
             ज्यांच्या प्रोत्साहना चा उल्लेख टाळने गैर होईल असे आम्हाला वडीलबंधु समान असलेले  ,  मित्रत्वाने ज्यानी आम्हाला वागविले असे , पशु पालकांमध्ये पॉपुलर असलेले,शासनातून पशु संवर्धन खात्यातून निवृत्त जॉइंट कमिश्नर डॉ ज म डोईफोड़े  यांचा ! खड़केश्वर ला दुकान शिफ्ट करा हा डोईफोड़े साहेबांचा आदेश ! सर माझ्याजवळ ईसार द्यायलाही पैसे नाहीत म्हणता " मी व्यवस्था करतो'  म्हणायला ते कचरले नाहीत . दैवयोगाने बँकां पाठीशी असल्याने पैसे घ्यायचे काम पडले नाही ... मात्र हिम्मत देणारा असावा लागतो !
         डॉक्टर - केमिस्ट या नात्या पलीकडे डॉ डोईफोड़ेनी आमचे नाते जपले , कामधेनु सदैव त्यांची ऋणी असेल .  आमच्या उत्कर्षा चाच त्यांनी विचार करावा !
          "कामधेनु 'वरच्या  अनेक पशु वैद्यकांच्या प्रेमाला तोड़ नाही . उल्लेख करायचा झाला तर दोनशे पानाचे पुस्तक भरेल पण संख्या संपणार नाही .
        पशुधन पर्यवेक्षक म्हणुन निवृत्त श्री बोंडे , भारम्बे, डॉ पाठक   यांचे ही उल्लेख कामधेनुवर प्रेमवर्षाव करणारी  निरपेक्ष प्रेम करणारी असाच असणार  !
            व्यावसायिक हिम्मत करतांना सर्वात महत्वाचे भग भांडवल ! माझेकडे Eskayef नोकरी सोडुन मिळालेले कॉम्पैनसशन अडीच लक्ष आणी देवेंद्रचे 2 लक्ष असे ठोक औषध दुकानासाठी अत्यंत तूट पंजे भांडवल होते . देवगिरी बैंकेने 2 लक्ष कैश क्रेडिट देवुन गाडी रूळावर ढककली . त्यावर जमा केलेला विश्वास स्टेट बैंक ऑफ हैदराबाद मुळे वृध्दिंगत झाला . श्री  रवि दिक्षीत यांच्ये बँकेत असलेले "नाव ' आमच्या कामी आले .
           
          
        दुकान टाकल्या वर मराठवाड़ा विदर्भ फिरतांना ती. भाऊनी (आमच्या पिताश्रीनीं) खुप सोबत देवुन मोठेच काम केले . सुरुवातीला मारुती ओमनी घेऊन हिंडत असे . गाडीत माझ्यासोबत यायला शक्यतो कुणी तयार नसायचे फक्त भाऊ एकट्याला जाऊ देत नसत , कुठेतरी मंदिर पहायचे शिदोरी काढायाची अन मजा करायची . घरून निघातांना शिदोरी मात्र सोबतच असायची . भाऊंनी बहुदा सर्व भाग पायाखालून घातलेला , त्यामुळे  भौगोलिक राजकीय माहिती खुप द्यायचे . भूगोलाच्या त्यांच्याईतका अभ्यास जवळपास कुणाचाच नसावा !!!
       आईला कामधेनु ची फळं चाखायला मिळाली नाहीत है दुर्दैव ! अजुन पाचेक वर्ष तिने द्यायला हावी होती !  माऊलीच्या नशीबात हा जन्म कष्ट खाती लिहलेला असावा ! फक्त कष्ट उपसले तिनी मुलाच्या हट्टा पायी ! नोकरी केली असती तर ...पगार चांगला होता , वेळ ही खुप असायचा . ....
      बंधुद्वय देवेन्द्र , डॉ हेरंब यांची चिड़चिड़त का होईना प्रामाणिक अन  मनापासून साथ मिळाली . दोघानाही आर्थिक दृष्टया अगस्तीला झेलावेच लागले  , माझी किती त्यांना मदत झांली हा संशोधनाचा विषय . परवा हैशटैग मैन्स वेअर गुलमंडी वर सुरु केले तेव्हाचे देवेन्द्र चे वाक्य " आपण हे करायचे राहुनच गेले असे वैषम्य जीवनाच्या अंताला राहु नए ' त्या त्या सर्व गोष्टी करून टाक म्हणाला !!  उद्वेगाने निश्चित म्हणाला नाही कारण त्याला पैसे मागितले नाहीत !!!!!

            मागे वळून पहातांना , आज नाही म्हणता कामधेनु 14 कुटुंबियांचे संसार खेचत आहे हा आनंद आहे . औरंगाबाद सारख्या अनोळखी गावात "मंगलमुर्ती शास्त्री 'ला ओळख दिली . शहरभर नव्हे तो मराठवाड़ा भर  स्नेही मिळवून दिले !
               22 व्या वर्धापनाला ईश्वर चरणी कामधेनु शी निगडित प्रत्येकाची, ग्राहकांची, कर्मचारयाची , स्नेही जनांची सर्वांगीण  भरभराट होऊ दे हिच प्रार्थना !
                   आतापर्यंत सर्व जेष्ठ श्रेष्ठ मंडळीनी  जे आशिष वर्षवले   ते वाढते राहो या मागणी सह आपला               - मंगलमुर्ती शास्त्री , में कामधेनु पशु औषधालय खड़केश्वर औरंगाबाद
        

 पशुपक्ष्यांशी नाते जुळवी ..........................................कामधेनु !

दिपकदादा

आज दिवसाच्या राशिचे वैशिष्ट्य जाणून घेण्याच्या नादात मला खालील Zodiac sign मिळाली . इंग्रजीची माझी दुश्मनी म्हणुन google ला ट्रांसलेट करायला लावले . गम्मत पहा


July 29th Zodiac

Being a Leo born on July 29th, you are well known for being a confident people person. While others try to avoid the spotlight at all cost, you love being the center of attention. You make an effort to maintain a loving and warm personality, but you cannot help but take control of situations as you are most comfortable in the leadership role. Though you may be a bit dramatic at times, you are well liked by your peers, co-workers and friends.

 जुलै 2 9 राशि

2 9 जुलै रोजी जन्मलेल्या लेओ या नात्याने तुम्ही *आत्मविश्वासी* व्यक्ती म्हणून ओळखले जाता. इतरांना सर्व किमतीवर स्पॉटलाइट टाळण्याचा प्रयत्न करताना आपणाकडे लक्ष देण्याच्या केंद्रस्थानी आहात आपण *प्रेमळ आणि उबदार व्यक्तिमत्त्व* राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकता, परंतु आपण लीडरशिप वर्गात सर्वात सोयीस्कर असलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकत नाही. काहीवेळा आपण काही *नाट्यमय* (गोडबोले)असू शकता, तरी *आपण आपल्या समवयस्क, सहकारी आणि मित्रांद्वारे चांगले पसंत (पॉपुलर) आहात*.

       एव्हढे सूंदर विवेचन गूगल ने करावे !!  गूगलला दिपकदादा चा स्वभाव , कार्य कारण भाव माहिती व्हावा !!! ग्रेट काही का असेना आमचा दादा पॉपुलर तर आहेच वाढदिवशी पार्टी ठेवली तर आणखी पॉपुलर नक्की होशील दादा ! Keep it up !! 

       वाढ दिवस चिरायु होणारच आहे त्यावर तुमचा हक्कच आहे . नातव


            

गुड्डी

गुड्डी कुठे आहे तु ?
"अरे नानांकडुन येत आहे गजानन महाराज मंदिराजवळ रोपं पहात आहे  तुझ्या घराजवळ '
"तर मग लवकर घरी ये , इथे तूझी गाड़ी पार्क कर , '
 गुड्डी अनं मेघना यांची  गाड़ी मधुघट समोर पार्क ... आमच्यासोबत बाहेरगावी निघाली गंगापुरला ! !

शुभु सिनेमाची तीन टिकीट जास्त बुक कर
"कुणाची ? अहो आता अर्धा तासच आहे पिक्चरला !! '
अग गुड्डी आत्याला निरोप दे, टिकिट बुक केली म्हणुन , 15 मिनिट अगोदर या म्हणाव DINSHAW icecream साठी ...

" गुड्डी ते राखीला रिटर्न गिफ्ट वगैरे पद्धत नसते , तुझा खूपच आग्रह असेल तर महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्या गरजु विद्यार्थ्यांच्या नावे चेक दे ...'
"अरे ह्यांनी आधीच दिले असेल नसता मी द्यायला लावते .... '

गुड्डी विद्यापीठ सिनेट साठी मला 50 पदवीधर मतदार दे बरं
" अरे आज मी बाहेर आहे उद्या संध्याकाळपर्यन्त चालेल ? ...'
दुसरया दिवशी 24 फॉर्म whatapp वर देणारी आमची सगळयात जवळची बहिण !

मैत्रीण मोना अकस्मात निवर्तली नक्कीच " निवांत' पणे !!!  मुलाची काळजी घ्यायला गुड्डी आहे ना !!  तिच्या प्रॉपर्टी डिपॉजिट्सची अज्ञान मुलाची आईपश्चात  काळजी त्याची ही शेजारची  मावशीच घेवू शकते न की मोनाचे रक्ताचे नातेवाईक !! हा भरवसा गुड्डीच देवू शकते !

माझ्या अनेक उचापती, ...  रुग्णसेवा केंद्र असेल ,रुग्णालयातील  अन्नप्रसाद केंद्र असेल, बालिकाश्रमाच्या मुलांसोबतची भाऊबीज , संघाच्या शिबिरासाठी तिळगुळाच्या पोळया जमा करने असो का सकाळीच एखादा कार्यक्रमास हजेरी लावणे असो विना तक्रार  सहभाग नोंदवावा तो गुड्डीनीच . सगळी सेवाकार्य गुड्डीच्या माथी,  स्टेजवर मिरवायला अगस्ती दादा आहेच ... निःस्पृह सेवा देणारी गुड्डी !!!

मागे आम्ही भावानी बहिनी वाटून घेतल्या होत्या राखी भाऊबीजेसाठी !
मी माझ्या कड़े तिघिंची जबाबदारी घेतली होती ... माई , बाबीताई , अनं गुड्डी . तिघिंच्या माहेरा कडुन दोन्ही सणांना साड़ी चोळी माझ्याकड़ून  व्हावी हे अपेक्षित होते /  आहे . स्व अण्णा आजोबानी आमच्या मामां कड़े हा शिरस्ता घालुन दिला त्यांचे अनुकरण आपणही करावे हि भावना मनात होती ... ...  (आता या   माहेरच्या वार्षिक साडीचे महत्व तितकेसे राहीले नाही आर्थिक सुदृढ़ते मुळे असेल कदाचित.. )
  
   ....... तर बाबिताई माई यांनी लहान भाऊ म्हणुन माझी काळजी घेणे बदल्यात मी साड़ी देणे (रिटर्न गिफ्ट ) समजू शकतो मग यात गुड्डी कशी आली असेल .... ?
      
           प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच असे नाही मात्र उत्तर शोधन्याचा प्रयत्न व्हायला हवा तो फटाफट गुड्डीच करू शकते अनं उत्तर मिळवतेहि !फ़ास्ट डिसीजन मेकर गुड्डीच . तिच्याजवळ "काकुबाई ' टाइप प्रश्न नसतात नन्तर पाहू ,बघते ,सांगते ,ह्यांना विचारावे लागेल ...  अ ह ! ( आणी हो "ह्यांच्या ' विचाराबाहेर ही ती जात नाही )


           तर अशा या अत्यंत गुणी , माहेरी तशी सासरी प्रियता मिळावलेली गुड्डी उर्फ सौ मानसी मकरंद देशपांडे हिचा वाढ दिवस 14 ऑगस्ट ला होता मी रेंज बाहेर हिंडत होतो त्यामुळे .... नवनवीन संकल्पासह येते वर्ष , आणी वर्षानुवर्ष,  निरामय निखळ आनन्द दायीं राहो,    सासर बरोबर माहेर (हया भावाला) जपणारे राहो हिच आई रेणुके चरणी प्रार्थना .                    -------------------- अगस्ती










डॉ S P कुलकर्णी

आपल्या मधुघट परिवारातील सदस्य डॉ सुनील प्रकाश कुलकर्णी   आमचे नात्याने मौसोबा सौ अलका मावशीचे  यजमान(सगळ्यात लहान  असल्याने कुणीही तिला आत्या/ मावशी म्हणत नाही ताई आणि म्हणुन सुनील जिजाजी ) !  आपल्य्या ग्रुपमधील एक्टिव सदस्य ! व्यवसायाने पशुचिकित्सक . व्यवसाय सांगण्याचे कारण माझ्यासाठी डबल नाते !
          चेहरयाने अतिशय निष्ठुर वाटणारे डॉक्टर अत्यंत सहृदयी , स्नेहशील . सध्या तरी अमरावती करांना ते "आधारवड' वाटावे, दादामामा पासुन सर्व माझ्याशी सहमत होतील !  अडचणीत असलेल्या प्रत्येकाला संजय (डॉक्टरांचे वडीलबंधु ) अनं सुनील कुलकर्णीच पहिल्यांदा आठवावेत अशी स्वत:ची प्रतिमा यांनी तयार केलीय .
   डॉक्टराकड़ून शिस्त, नियमितता ,कड़क स्वभाव राखत,अन नकळत  प्रेम लावत आपलस कस करावे,लळा कसा लावावा  हे शिकाव .... प्रसंगी भाऊंची आठवण यावी .
      आज डॉक्टर वाढदिवस एन्जॉय करताहेत .त्यांच्या निरामय, चिरायु आयुष्यासाठी, अनेकानेक 18 नोव्हे साठी मनःपूर्वक शुभेच्छा .
            डॉक्टरांच्या शुभेच्छा लिहिण्या पूर्वी कुसुमग्रजांचे वाचलेले अनं मला आवडलेले शब्द .....

      निर्भयता दे मनास च्
भाव सूजन अंतरास
प्रज्ञेचा दीप सतत
उजळ करो जीवनास
     जुलुम अनय यांत वैर
      विफलतेंत अचल धीर
मानवता हीच असो
परमधर्म संहिता.

           डॉक्टरांना पुनश्च  शुभेच्छा , शिर साष्टांग प्रणिपात -अगस्ती

           
        

"ति'चा वाढदिवस

" असेच हे कसेबसे
  कसेतरी जगायचे,
  कुठेतरी कधीतरी
  असायचे... नसायचे '

       अमान्य असलेला " तो ' असतांना
तिनं त्याला सांभाळणे क्रमप्राप्तच अन मग
" असेच सोससोसता' चा अंक निभवणॆ सुरु ..
" तो 'अन त्याच्या व्हिम्स , सगळे अनाकलनीय !

"ती' मात्र ...

स्वयें मनात जागते, न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते

ती गलितगात्र आहे का ? तर नाही
ती तर सुपरपॉवर आहे मनात आणलं तर .

मग तिने

 "हव्या हव्या क्षणासही
    नको नको म्हणायचे " 

   ........का ?

  "प्रेम योगावर करावं
प्रेम भोगावर करावं
आणि त्याहुनहि अधिक
प्रेम  त्यागावर करावं ..... ''

 शिकवणारा "तो '

प्रेम कुणावर करावं ?
         कुणावरही करावं ....
कारण प्रेम आहे माणसाच्या
संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव !

सांगणार " तो '

कुसुमाग्रज ,शांताबाई, सुरेश भट यांनी ओळवलेल्या शब्दांनी पतिव्रता " ती '  आणि व्रात्य पती "तो '  ची हि कहानी साठा उत्तरी सुफळ अपूर्ण ! 

       प्रश्न अर्पित,
             स्वप्न अर्पित ,
                जीवन का क्षण क्षण समर्पित,
                        अस्मादिकाना करणारी "ती ' alias सौ मिनल आज वाढ दिवस साजरा करण्यास   सज्ज असणार आहे . Let us hope तो काही मनावर घेईल अन शुभेच्छा पर दिवसभर नवीन काही काम मागे लावणार नाही. त्याची अवस्था ...
              
मी काय तुला वाहु ,
            तुझेच अवघे जीवितवैभव ,
                                  काय तुला देवू ?

मनःपूर्वक शुभेच्छा !!
                               - अगस्ती










वडोदा गेट टूगेदर

आज आपल्या गुरुदेवांचे (डॉ राजेन्द्र फडके यांचे)श्रद्धा स्थान श्री भवानी मंदिर सिनफाटा हलखेड़ा( वडोदयाजवळ ) येथे वैराग्यमुर्ती रामधन महाराज तायड़े यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित भंडारयात प्रसादाचा योग आला .
       गोवा कट्टया वरील सर्व मित्रांच्या एकत्रीकरणा चे योग लवकरात लवकर याच तिर्थक्षेत्री यावेत शेवेची/पातोड्याची/मिरचीची भाजी वांग्याचे भरित असा चमचमीत बेत सोबत गोवा कट्टया वरील मराठे जोशींची जुगलबंदी तोंडी लावायला विकास कुलकर्णीचा तड़का! अहाहा .
        बोरसे अन्ना अनं बछाव दादा सध्या  गुजराथीत सु छे , केम छे असं नाकात बोलत्यात म्हणे . त्यांनाही एकणे होईल . गोवा कट्टा अनं गुज्जु चावडी एकत्रच बोलवा  ! अशी गुरुदेवांना प्रार्थना .आई भवानीला साकडं !
      त्या निमित्ते ललितची इच्छापूर्ती होईल , रस्ते पाणी ड्रेनेज मधुन सुनील माळीना मोकळा श्वास घेता येईल . भुसावळ मधुन खुशालजी व्यवस्थेत असतील (म्हणजे सगळे खुशहालच), काहीही झाले तरी कोशिम्बिर अनिलदा चौधरी कडूनच लागेल .
     भुसावळकर अजेय भोळे अनं जळगावकर भोळे अजय
कार्यक्रमाची शोभा असतील . प्रवीण इखनकर सुप्रभातचे मेसेज वाचतील . अमित फोटो काढ़ेल उरलेल्या वेळेत ट्या ट्या करेल अनं उरलेल्या प्रभारींची छळवनुक करेल  . पिंटू , राजेश, किशोर सहित सर्व प्रभारी छळवनुक करू देण्याच्या पलीकडे असतील तेव्हा फक्त अमितला फोटोवरच खुश रहावे लागेल ...
            या तीर्थाटनाला गोवा ग्रुप च्या प्रत्येकाला यावेच लागेल . गुरुदेवांचे इंजेक्शन दीड मिनिटात घेवून शून्य मिनिटात निकाल द्यावा लागेल . तेव्हा दादांना पुन्हा पुन्हा नम्र विनंती कि लवकरात लवकर ....
        वरील लिखाणाचा कुणाला राग आला असल्यास घरी दोन भाकरी जास्त चावाव्या , शास्त्रीचा राग इतर कुणा वर काढु नए आणी प्रत्यक्ष भेटीत कृतीत आणू नए !
                   गेट टूगेदर च्या प्रतिक्षेत ....
                                   -   मंगलमुर्ती शास्त्री

ता क : आमचे मा दिलीपजी थोरात यांचे नाव न घेतल्याने त्यांना राग येण्याची शक्यता आहे . ते माननीय चेयरमन  असल्याने त्यांना कट्टया वरच्या मित्रांसारखे वागतां येत नाही त्यांना मोजूनमापुन हसावे, बोलावे अनं चालावे लागत असल्याने उल्लेख टाळला (मार्गदर्शन :नाट्यशास्त्रतज्ञ विकास कुल . )
          एकतर ते अशा फालतू गोष्टिसाठी वेळ देणार नाहीत ! वेळ दिलाच तर त्यांच्या गाडीत मला आणनार नाहीत !! दिलीपजी दया शिव्या .... !

संजय गोसावी... चंटूकडे

सांगा कस जगायच
 कण्हत कण्हत
का गाणे म्हणत ?
संजय नारायण गोसावी यांना विचारा
ते बरोबर तुम्हाला गाणे म्हणतच जगायला मदत करतील .
उल्हास, दिलीप, अरुण,गजानन आणि बडनेरा  हिच यांची दिल दोस्ती अन दुनियादारी ! 
परवा अरुण दादा परांजपे आलेले
सगळे संजू संजू चाललेले .
दोस्ती जगावी,पेलावी, निभवावी, ती संजुनीच !
हेच जर अनुष्काला विचाराव तर उत्तर
संजुमामानीच ! ते तिचेही अलगद दोस्त बनून राहातात ,
अनं शुभांगीला विचारल तर संजुमामानीच !
अगदी श्रीनकुल सोबतही  दोस्त बनून राहाणारे संजयराव ,
हसत खेळत जगायला शिकवणारे !!!
त्यामुळेच ते जसे गोसावी परिवारात प्रिय असतात
तसे शास्त्री परिवारातही .
आम्ही शालक मंडळी जराशी ऐदी , आळशात रमनारी
त्यासापेक्ष संजयराव न कंटाळता (आम्हाला) ,
आजही साठीत पदार्पण करतांना ,
आठवातात तेव्हापासून चंटुकडेच आहेत .
हा गुण श्रीनकुलकड़ेही देण्याचा स्वार्थ त्यांनी साधला नाही !
स्वतः एकदम अनुशाशित जीवन जगणारे संजयराव आमच्यकड़ून कधीच अपेक्षा करत नाहीत .
 याचा आनंद अनं दुःखहि आहे .
कुठे आम्ही " जिजाजी' चा ग़ैरफायदा तर घेत नाही ?
संजयरावांची एकषष्ठी साजरी कराविच लागेल
किमान त्यांना तुम्ही साठी ओलांडली हे सांगण्यासाठी तरी !
तेव्हा देवेन्द्रा भारतात ये
रमी चा डाव रंगवुत ,
संजयराव आहेतच मधुन मधुन डब्बे समोर ठेवायला !
(चकल्या , शेव, काजू , बदाम कम चकना म्हणुन )
स्वतः जिम फिट राहातात ,
आम्ही कष्टाने उरळीकांचनला घटवतो ...
ते आमच्या पोटावर "घट' बसवतात ! पुन्हा U K ..
 तर असे आमचे जिजाजी संजयराव यांना साठीपुर्ती निमित्त
शिर साष्टांग नमस्कार . त्यांच्या असेच टकाटक,  जिम्फिट , निरामय आयुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना -अगस्ती