पानं

Wednesday, March 31, 2010

चि रसिका
शुभाशिर्वाद
रसिका आजोबांच्या पाया पड !नमस्कार कर ...आजीनी केलेल्या सूचनेचा अनादर रसिका कशी करणार ?रसिकाने पटापट सगळ्यांच्या पायावर माथा टेकवला अन वडिलधारया मंडळींचे कौतुक जमा केले !मलाही लहानपणापासून ते आजतागायत भाउंकडून अशीच आज्ञा केली जाते !तेही डोळे मोठ्ठे करून !!!!
लहानपणी मी आलेल्या पैपाहुन्यांच्या पाया का पडायचं ?हे मला कुणी समजाविल्याच आठवत नाही .त्यामुळे पाहुणे [मोठाले !]घरी आले कि ,मला उगीचच नकोसं व्हायचं त्यांच्यासमोर जायला ...आता करा नमस्कार !नमस्कार का करायचा ?याचा शोध घेण्याचा मी लहानपणी कधी प्रयत्नही केला नाही .कुणी मला विचारले असते (त्यावेळी ),का पाया पडायचं मोठ्यांच्या.... तर उत्तर ''भाऊ म्हणतात म्हणून '' असेच मी दिले असते !!नमस्कार का करायचा ?नमस्काराचा मला काय फायदा ?याचा विचार तू कधी केला आहेस ,रसिका ? आजीनी कदाचित काही सांगितले असेल ! आजीनी ,आजोबांनी या पत्रापुर्वी तुला काय विवेचन नमस्कार संबधी केले हे तू मला पत्रानेच कळव
....तर पत्र लिहिण्याचे कारण कि ,[आता तुझ्या लक्षात आलेच असेल ] नमस्काराचे फायदे काय ?तोटे काय? का करावा शीर साष्टांग नमस्कार !...अगस्ती काकाला रिकामपण फार !!असे तुला कदाचित वाटून जाईल ,पण तूझ्या या काकाचा नाईलाज आहे !!तुला वाचावेच लागेल !चुकीचे वाटले तर काकाला सुधाराव लागेल !!पत्रोत्तर द्यावे लागेल !!!
सर्वप्रथम नमस्कार हा संस्कार आहे काय ?नमस्कार करायचे म्हणजे काय करायचे ?आपण काय करतो ,माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही हात जोडून नाकाच्या शेंड्यापर्यंत नेणे हे अभिवादन ,तर दोन्ही हात जोडून खाली वाकून शीर [ माथा ] टेकवून करायचा तो शीर साष्टांग ....कशाही प्रकारे केले तरी यामध्ये आपल्या शरीराच्या हालचाली होतात अन उगीचच का होईना आपल्याला हसावही लागतं! ............मला असं वाटत,हाच माझ्या दृष्टिन पहिला फायदा !शरीराला आवश्यक असलेला व्यायाम !मुद्दाम करताघडणारा !अन तेही प्रसन्न(हास्य मुद्रेत )मुद्रेत !! तब्येत खुश !रोज किमान दहा जणांच्या पाया तब्येतीसाठी पडायचीसवय लहानपानापासून ठेवावी ,का रोज सकाळ संध्याकाळ वडील धारयांच्या पाया पडलो तर फायदाच फायदानुकसान मात्र होईल ....रसिकाचा आवडता आळस मात्र दूर जाईल !भूकहि लागेल !अन्न जास्त लागेल !!!आईचे स्वयंपाकाचे कष्ट वाढतील ...........
नमस्कार आपण कुणाकुणाला करतो ?देवाला ,संताना ,साधूंना ,सज्जनांना ,सर्व वडिलधारयांना ,आदरार्थींना,अन समवयस्क मित्रमैत्रिणींना .
हि सर्व मंडळी नमस्काराच्या बदल्यात आपल्याला काय देतात ? तर स्नेह प्रेम देतात .कसा देतात तर ...आपण नमस्कार केल्याने नम्रता दिसते ,लीनता दिसते अहंकार कमी झाल्यामुळे दुरावा कमी होतो,जवळीक प्रेम वाढते ,मोठी चूक केलेली असली अन शीर साष्टांग नमस्कार घातला अन चूक कबूल केली कि काम फत्ते !दुसऱ्याच्या मनातला बेबनाव म्हणा ,किल्मिष म्हणा दूर होऊन प्रेम पूर्ववत होते .या सगळ्या गोष्टींसाठी भांडवल ते काय ,फक्त नमस्कार !!!
नमस्काराने आपले अवगुण कमी होतात ,मोठ्या चुकांना क्षमा मिळते ,ज्याला आपण दंडवत घालतो त्याच्या मनात आपल्या विषयी भाव बदलतात ,कृपा उचंबळते,अंतकरणात दया भरून येते ,तो प्रसन्न होतो अन अनपेक्षितपणे तो आपली जबाबदारी घेतो .आपल्या संवर्धनाची ,रक्षणाची जबाबदारी नमस्कार घेणारयावर जाते .अन हे सर्व फुकटात !विना खर्चात ,विना कष्टात ,कुठल्याही साधन सामग्रीशिवाय..अगदी फुकटात .....चकटफू !!!!
रसिका ,जर का मी आलेल्या व्यक्तीला पटकन नमस्कार करीत असेन तर त्यांचा आणखी एक फायदा ...मला कुणी गैर समजानेही 'शिष्ट 'म्हणणार नाही .मी लाजरा असतो ,बुजरा असतो .समोर आलेल्यांशी काय बोलावे कळत नाही ,सुचत नाही ,अशा वेळी चटकन नमस्कार केला कि काम खल्लास !!काळजी वाहण्याची जबाबदारी त्यांची ...नमस्कार केल्यावर केवढी जिम्मेदारी !!
आता तू म्हणशील ,सगळेच नमस्कार करून घेणारे काही माझ्याकडे लक्ष देत नाहीत !काहीच काळजी वाहतात .खरे आहे ते ,पण या काळजी ,जबाबदारी घेणाऱ्यांची पारख आपण कशी करणार ?त्यापेक्षा सगळ्याच मोठ्यांना नमस्कार करून निदान बंधन तर घालू त्यांच्यावर ! काही मंडळी नमस्कार केला नाही म्हणून रागावणारीहि असतात .नमस्कार करून घेतल्यावर भलेही नंतर जिम्मेदारी टाळतात ,अशा कर्म दरिद्री लोकांची आपण मनातल्या मनात कीव करूया !नमस्कार हा व्हायलाच पाहिजे ,असे मला वाटते .त्या ठिकाणी आपला फायदा ..व्यायामाचा !!फायदा क्र. एक ......वर उल्लेखिल्याप्रमाणे !
आता चौथे पण जास्त लिहित नाही,फक्त तीन तिघाडा काम बिघाडा होऊ नये म्हणून लांबवतो ...नसता उद्या काका कित्ती कित्ती बोअर आहे म्हणून कुजबुज करशील !!
नमस्काराचे मला फायदेच जास्त सुचले अन तोटे कमी .तू तोटे शोधून काढ अन चार पानी पत्र लिही आणि माझ्याकडून बक्षीस मिळव ..चार पानिपुरया चाटवाल्याकडच्या .Iकाही लिहिता नाही आले तर माझ्या वतीने रोज आई बाबा आजी तात्या यांना सकाळ संध्याकाळ शीर साष्टांग नमस्कार घाल ...कळावे लोभ राहू द्यावा !!!
तुझाच
अगस्तीकाका





Sunday, March 28, 2010

मैत्री

मैत्री
एक शब्द ..जग ज्याच्याशिवाय स्तब्द..
एक जाणीव ..ज्यात नसते कुठली उणीव .
एक गरज ..वाटते किती सहज
एक क्षण ..ज्यात गुंतले अनेक मन ..
एक खेळ.. ज्यास नाही कुठलीही वेळ
एक सुवास ..हवा हवासा वाटणारा सहवास .
एक प्रवास ..ज्यात प्रत्येक क्षण वाटतो स्वास ..
एक गाव .. ज्यात असतो प्रत्येकाचा ठाव
एक खोडी..शांत तलावात एक सुंदरशी होडी
एक आठवण ..असंख्य विचारांची साठवण
एक हासु..त्याच्या सोबतीला थोड़े आसु
एक स्पर्श .. टिकुन राहतो वर्षानु वर्ष
एक आशा .. आयुष्याला एक नवी दिशा .....


Thursday, March 25, 2010

तो आला नाही

मी त्याची येण्याची खुप वाट पाहिली ..
त्याने माझ्याकडे यायला पाहिजे ...
तो आला नाही ,तो परस्पर गेला !
मी त्याच्या येण्याची वाट पाहणार ,
मी त्याच्या घराचा उंबरठा का म्हणून ओलांडू ,
का म्हणून मी त्याच्याकडे जायचे ?
मी वाट पहिली ,
तो आला नाही ,मी गेलो नाही
जिंदगीची वाट लागली तरीही ..
आमची भेट व्हायचीच राहिली
मी का नसान कोंबडा? त्याला काहीच वाटू नये का?
त्याने माझ्याकडे दुर्लक्ष का कराव?
आता भेट होणे नाही ,
पुढच्या जन्मी तरी....... ?
मी स्वत:ला विसरू शकलो तर !!!!!

Wednesday, March 24, 2010

छकुली

एक एकुली माझी छकुली
गुण बापाचे तारीफ कसली ?

चुलत चुलती ,सर्व ती असती
सर्वांसाठी ही, सख्खी सोबती !

मिळून मिळून राही ती कशी ,
'इकलौती ' ची असे मागणी!

मनी मोठे पण, प्रगल्भ असता .....
सख्ख्यांची नसे आवश्यकता !

आभाळ मनाची , मन मिलावू
एवढासा खाऊ , मिळून मिळून खाऊ !

जिवापाड जरी आई जपते
बाबांना ही माया लावते!!!

चकुली बहुली ,एकटी तानुली
आईबाबांचा विश्वास जागली!!!

Saturday, March 20, 2010

गुरुकिल्ली

पप्पी माझी हुशार ......................
पण अभ्यास करवत नाही!
पप्पी गोड गळ्याची ...........
पण रियाझ करवत नाही!
पप्पी सशक्त स्मरणाची
पण वाचण्या आवड नाही!
पप्पी सांगतो शिडी यशाची
कधी आळस उभारत नाही!
लोखंडा गुण ते मोठे ,
वापरता गंजत नाही!
मेहनती सार यशाचे
कुणी थांबवू शकत नाही!!
गुरुकिल्ली हि यशाची
कुणी चोरू शकत नाही !!!!

Friday, March 19, 2010

वानवा आयांचाच !

आई..........
एक आर्त किंकाळी .....
"वैरीणीलाच आई म्हणू का ?"
भ्रूण सरणावर चढत होते !
गर्भजकाच्या भेसूर विज्ञानाने
तिचा खुन केला होता,
...............तिच्या मातेनेच!!
भृण्खुनाचे पातक मस्तकी घेऊन
जगण्याचा निर्धार केला होता
................तिच्या मातेनेच!!
लिंगभेदाचे गुढ रहस्य
खुनी केले होते ................
. .............तिच्या मातेनेच !!
जन्मापूर्वीच तिला सरणावर चढवले होते
..............तिच्या मातेनेच !!
"अगं आई मुलगा असती तर नाव
तुझं का चालणार होतं? " भ्रुण म्हणालं,
"अन त्या नवऱ्याच्या नावासाठी भ्रुण हत्येच पाप
तू मात्र आपल्या खांद्यावर मिरवणार !!
'माता न तु वैरिणी ' बनू नकोस !
गर्भजलाने लिंगभेद करू नकोस !
आई हे ईश्वरी स्वरूप आहे ....
राक्षशी वैरीण तू बनू नकोस !
नाहीतर
उद्या 'आई' चाच वानवा असेल !!!

Thursday, March 18, 2010

'मी '

मी,मी करत
मी मलाच मारले
मी माझ्यात रमत
मी मलाच कुरतडले !

काय'मी' अन मी असा हा , दंभात'मी' ला मिरविले ,
दर्पाने मग 'मी'पणाच्या, इतरे जनांस पळविले !

कि पहावे इतरांत 'मी 'ला,
आरशात रमविले स्वतःला ,
मी मला अन मलाच मी ,
सोबत संगत 'मी'च मला !

माझे गाणे ,माझे तुणतुणे , ऐकणेही माझेच मला
माझे रुसणे, माझे फुगणे , जाणीवही ती नसे कुणाला !!

हाय जिंदगी ! घात झाला,
जिंदा दिलीचा निपा:त केला !
माझे 'मी'पण काळ झाला,
मारून मजला शांत झाला ....

मारूनच आम्हाला शांत झाला !!!!!!!!

Wednesday, March 17, 2010

वैभव केर कचऱ्याचे

केर म्हणे केरसुणीला
का रोज रोज फटकारते?
सकाळ ,दुपार ,अन संध्याकाळ
तिन्ही त्रिकाळ का रागे भरते !

'केर कचरा' आमचे असणे
महत्व तुझेच ते वाढते ,
नसता आम्ही ,उभी राहाते
गर्दन झुकवून ताठा जाते !

कधी टाकते मान कोपऱ्यात
कधी दारा पल्याड लपते
इंच वितभर जागा काय ती मिळते...
गरूर ताठा तू सर्व विसरते !!

आता वैभव ऐक आमुचे
जागेची न आम्हा उणीव असते
वाट्टेल तिथे ,वाट्टेल तेव्हा
उकिरडे बनविणे हा हक्क असते !!

अस्ताव्यस्त हि आमची महती
अजागळता हा गुण महान तो
आळशी लोक आमचे दैवत
पुजतो आम्ही त्यांना गुरुवत !!!

Tuesday, March 16, 2010

रेशीम बंध

रेशीम बंध

त्या रेशमी किड्यांना
रेशीम घालतांना ....
जाणीव ती तरी का ?
रेशमी मनांची !

हळुवार त्या स्पर्शांची ,
व्याकुळल्या मनांची
मलमली तारुण्याची
गलबल्या मनांची

त्यानेच घातलेल्या
रेशमी धाग्यांची
अनुभवली तरी का ?
सळसळ रेशमाची!

'घायाळ' क्रित्येकांना ,
वेडावले वेड्यांना ....
पाहावली तरी का?
बेहोशी दिवन्यांयांची !!

बांधून ठेवतांना ,
बंध रेशामांनी
मस्ती जिरावितांना
काही न वाटले का?

धत जिंदगी तुझी ती ,
रेशमी किड्या तू ...
घालून रेशीम परंतु
निष्ठुर तू किती रे !!

जाणीव त्या मनांची
तुला ठेवणेच आहे ,
किंमत तुझ्या त्यागाची
त्या धुंदतेवर आहे!!!

Monday, March 15, 2010

SEND OFF FROM SCHOOL BY ADITI SOHONI

SEND OFF POEM




THIS IS THE MOMENT ,
TO SAY GOOD BYE TO THE SCHOOL
TO THE TEACHERS,
WHO MADE US WISE FROM THE FOOL.

THERE ARE TEARS IN ONE
AND SMILE IN OTHER EYE,
SADNESS IN HALF HEART ,
AND REST OF IS IN JOY.

BEHIND THE SAFE WALL,
OF TEACHERS CARE,
THE INFINITE AND
UNLIMITED WORLD IS THERE

THIS WORLD MAY NOT
TAKE CARE OF US
BUT TEACHERS SUPPORTING WORDS
WILL ALWAYS HELP US


THEY GAVE THE STRENGTH
TO OUR WINGS
TO SOAR AND SURVIVE IN THE WORLD
AND TO BE GENTLE BEINGS

WITH GIVING KNOWLEDGE
THEY TAUGHT US MANY THINGS
THEY MADE THE SCULPTURE
FROM CLAY WITH MANY MOULDINGS

THE TEARS ON THE FACE MAY BE FAKE
BUT THE TEARS IN THE HEART ARE GENUINE EVER
THIS SCHOOL AND DEAR TEACHERS,
HAD A PLACE IN OUR HEART FOREVER




- ADITI SOHONI{SELFMADE}

गणित प्रेमाचे !!

तू असे पहा
कि मी तू आहे
अन तू मी आहे ...

तू वजा मी कर
किंवा माझ्यातून तू दूर हो
शून्य उरते का ते पहा !

तुझ्यात मी वा
माझ्यात तू मिळव
बरोबर दोन होतात का ते पहा!!

तुला गुणिले मी
अथवा मला तुझ्याशी गुणिले
तू भागिले मी अन
मला भागिले तू
एकच उत्तर मिळते का ते पहा !!!

या सगळ्या घोळाचे कारण माहिताय
तू अन मी 'एक' आहोत !!!!

माय मारो....परी जगो मावशी !

मावशी

का महत्व असे ते
मावशी असण्या इतुके
माय मरो तरी चाले ...
आम्ही नसू पोरके!

विना आईचे पोर म्हणवता
डोळे हे पाणावती !
मावशी'च हे रूप असे ते
विश्वास जागविती !

दूर दूर जाताना सोडून
फुटला पाझर मायेला नसे!
हाच असे का तो विश्वास
मायेला या बहिणीमध्ये दिसे !!

माये सांगतो! आस असता ..
जाणीव तव स्पर्शाची
'मावशी'च ती भरून काढी
उणीव त्या कुशीची !

एकुलात्यांचे जग या पुढे
दुर्मिळ मामा मावशी
आम्ही वैभवी मिळे मावशी
समृद्धी प्रेमाची!!

म्हणून म्हण ती ,माय मारो
परी जगो मावशी !

धन्य धन्य हि बाल बापुडी
दचकता गाढ निद्रेतही ती
आये माये न येता तोंडी
मावशी मावशी ओरडती !!!

परिवाराचे कुळगीत

असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील
गोत्रांची किर्ती सातासमुद्रा जावो
कुलवंत घडविणे हीच मनीषा राहो
संस्कार टिकविणे हेच आमचे ध्येय
असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील

'एकी'च आमुची व्हावी जनाविशेष
सर्वोच्च परंपरा ,राहाव्या कायम खास
औदार्य निभाविणे हेच आमचे व्रत
असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील

गंगेचे सुपुत्र अम्ही ,शुद्धातच मनी भावो
पावित्र्य जपाविणे हेच आमुच्या ठावो
पूजा अर्चना.. असावा स्थायीभाव .
असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील

सद्भाव मान्यता वाड वडीलान प्रती राहो
आशिष जमविणे हीच आमुची आस .
असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील.!!!

Saturday, March 13, 2010