बापूं विषयी काय वाटतं तुला
प्रश्नावर उत्तर आलं " आता खूप सौम्य झाले, मंजूच्या लग्नात त्यांच्यासमोर जायची हिंमत नव्हती ! तसं ते मला कधी रागावले नाही किंवा काही बोलले नाही. पण.. आपल्याला नेहमी प्रेमच दिलं त्यांनी ... घरी गेलं की टरबुज चिरून दे पेरू पपई खायला देत त्यांनी प्रेमाने खायला घातलं.... असं नाही रागावले कधी पण भीती वाटायची , आता कळत त्यांचा स्वभाव तापट आहे पण मनातून प्रेमळ आहेत ... फणसासारखे 'बापु समजून घेताना... मिनल नी छान सुरवात करून दिली . मागच्या पिढीतल एकमात्र " कला ' जोपासणारा कुणी असेल तर ते बापू ! त्यांनी काढलेले मधुबाला चे चित्र माझ्या संग्रही होते , आई सांगायची बापूंच्या चित्रकलेची महती !
सगळे कलाकार वागण्यात बोलण्यात मनस्वी असतात . त्यांना व्यक्त व्हायला त्यांची कलाच असते . ती बापूंच्या बोटातून कधीच सटकली अन् महसूल खात्याच्या रुक्ष वातावरणात रमली . ..
बापू कुणाला बेफिकीर , बिनधास्त , कुणाची भीडभाड न ठेवणारे वाटतीलही. मला हाच त्यांचा भाव आवडतो . पण खरंच ते तसे आहेत का ? बेफिकीर?
तिकडे अमेरिकेत इयान चक्री वादळ धडकल्याच्या बातम्या आल्या तर पहिला फोन बापूंचा . "त्या पोराची काय हाल हवाल? सगळे ठीकठाक आहे ना ' विचारणार! भलाई मग प्रभ्याच तिकडचा पोऱ्या त्यांची विचारपूस करत असेल वा नसेल . ..
वडीलबंधू मिलिंद फार चिडतो ... खुद की तरफ ध्यान नाही देते और और.... अनंताकडे मंजुकडे जास्त चित्त असतं त्यांचं ! ज्याच्याकडे जेव्हा आवश्यकता असते त्याच्याकडेच बापाचं लक्ष असतं बाबा ! ते बेफिकीर राहू शकत नाहीत .
उगा नाटक त्यांना जमत नाही जे मनात ते ओठावर. मनात एक ओठावर दुसरे त्यांना जमत नाही "भल्ला नाटकी आहे न तो' म्हणायला ते मागेपुढे पहात नाही ! मी स्वतः बेफिकर बिनधास्त जगण्याच्या प्रयत्नात असतो पण जगू शकत नाही .
त्यांच्या स्पष्टवक्तेपणा मुळे लवकर जवळ कुणी होत नाही .मात्र जवळ झालेले नंतर कधी दूरही होत नाहीत .
बापू किती वर्ष विचारता 88 झाले सांगतात . बापू पोट्ट्या सोट्ट्यायची आता फिकर सोडा .तुमचे पोट्टे आता साठीत पोहोचले . आपल्याला शंभरी टकाटक पुरी कराची आहे .
... दिर्घ निरामय आयुष्याच्या मनापासून शुभकामना .
अगस्ती
No comments:
Post a Comment