बोलते मी ,
बोलणेच सुख मला..
बोलघेवडी मी ,
"बोल ' चिकटले मला !
मीच भोळी बोलते ,
न मनात काही ठेवते ,
विशुद्ध या मनास
कुणी "अबोली ' हि चिडवते !
सून तेव्हा नवनवीन ,
बोलणेच विसरले ..
गडबड ,धडपड, बडबड
सर्व काही थांबले !
मितभाषी साथ मिळता ,
बोलणेच टाळले ,
माहेराचे वागणे अन ..
सासरास जपणे.
दोन तऱ्हा , रित भात
मी स्वतःस जिरवले !
आई , सखी ,सून , वहिनी
भूमिकांच जगले !
सांभाळणे अन निभावणे
जगणे हेच मानले
अन जगायचेच राहिले ...
प्रसन्न स्वागतास सज्ज सदा ..
मी स्वतःस हरवले ...
मी मलाच हरवले ..
मी मात्र हरवले !
अनवरत बोलघेवडी माई लग्न झाल्यावर एकदम शांत शांत अस्मादिकांनी अनुभवलेली, रेल्वे क्वार्टर अमरावतीला !!
आज शुभेच्छा वाढदिवसाच्या देतांना , संजयरावांच्या अबोली अक्कडसासुला पुण्यनगरीतून प्रणाम !
मायटा तुला दीर्घ आयुष्य , तू पूर्वाश्रमीची शास्त्री असल्यामुळे नशिबात लिहिलेलं .. ते निरामय लाहो हिच सद्गुरू नारायणगुरूचरणी प्रार्थना
अगस्ती
सौ मीनल
No comments:
Post a Comment