पानं

Monday, November 25, 2019

रवी दीक्षित

श्री दिक्षित यांनी मागील आठवड्यात 34 वर्ष पूर्ण झाल्याची पोस्ट टाकली होती नी काल रवी दिक्षित AGM झाल्याची पोस्ट आली  . दोघांचेही खुप खुप अभिनंदन !
       दोघांनी स्टेट बैंक ऑफ हैदराबाद त्या वेळी जॉइन केली होती . पुण्य नगरीतून थेट अम्बड़ ,लासुर सारख्या कोरडया, शुष्क जागी आनंदाने जॉब स्वीकारते झाले . आणि बैंकेला समर्पित झाले . ऑफिस मध्ये दोन चार दिवस मुक्कामी राहणारा बैंकर रवि ..आज या मुक्कामी पोहोचला!!! याचा आंनद त्यांच्या बँकेतील मित्रांना अधिक असेल . रवि दिक्षित म्हणजे बैंकेसाठीचा वेडा माणुस अस त्यांचे औरंगाबादकर मित्र म्हणतात .अन त्यात चूक नाही. आमच्या छोटी नी है वेडेपण भोगलय आनंदाने !
      या दोघांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे .SBH चे SBI मध्ये विलीनीकरण झाल्यावर बहुतांश SBH कर्मचारी  निवृत्ती मार्गाला गेले VRS घेते झाले  , मात्र (श्री + रवि )कांत दिक्षित SBI मध्येही स्वत:ला फिट करवते झाले .
      रवींचा बैंक कंप्यूटर प्रोग्रामिंग क्षेत्रातील, त्यांच्या समर्पित कामाबद्दल मागे राष्ट्रीय स्तरावर गौरव झालेला .
ज्या ठिकाणी त्यांना बँकेने पाठवले त्या त्या जबाबदरयांना त्यांनी न्याय दिला . मागे अठरा वर्षपूर्वी  ग्रामीण भागात अडुळ ला पोस्टिंग असताना त्यांनी काही तासात कर्ज मिळू शकते हे अडुळकरांना दाखवून दिले होते .आज कंप्यूटर युगात हे शक्य आहे, त्याकाळी कठिन होते .
       एकूणच दीक्षित परिवारामध्ये एक उद्योजक लपलेला आहे. अन त्याचा फायदा यांच्या बैंक ग्राहकाना मिळाला नसता तर नवल .ज्या ज्या ठिकाणी यांची पोस्टिंग झाली तेथील उद्योजक व्यापारी खुश .
        "एक उद्योजक लपलेला 'अस मी का म्हणू शकतो .. बैंकेची स्टेटस वाली नोकरी असताना सुद्धा यांनी आपापल्या " सौ 'ना स्क्रीन प्रिंटिंग असेल, ब्यूटी पार्लर असेल, कार्यरत केलेले मी पहिले !
      रवीकांत दिक्षित आज आज AGM झाले आम्ही आनंदलो . कामधेनु पशुऔषधालय,आज अक्षय तृतीयेला 24व्या वर्षपुर्ती करत आहे,   आधी स्थानिक देवगिरी बैंकेकड़े होती ,  रविंमुळे SBH मध्ये गेलो .आणि जी काही भरभराट कामधेनु नी केली त्याला SBH साक्षीदार राहिली . श्री दीक्षित ,रवि दीक्षितांच्या नुसत्या नामस्मरणाने काम फत्ते होत असे,  बँक स्टाफला मी कामाला लावत असे !!! अर्थात सगळी बँक माझी मित्र झाली होती रविमुळेच  ..... उद्या आमचे  मित्रवर्य,  वडील बंधु संगारेड्डीकर रागवतील, त्यानीही तितकेच प्रेम दिले  !
        या दीक्षित परिवारतील सर्व कांत (श्यामकांत पासून निशिकांत पर्यन्त ) लळा लावणारे  आहेत . यांच्यात कुणीही सिंघम मधला  जयकांत शिकरे  नाही...  सर्वाना या निमित्ते नमस्कार !
     पुन्हा एकदा रविकांत दीक्षित यांचे अनेकानेक अभिनंदन  आणि छोटी चेही कारण घर तिनीच सम्भाळलेले....
            - सौ  मिनल , अगस्ती

Monday, November 18, 2019

18 नोव्हेंबर 2019 अंनिव्हर्सरी

सर्व मामामामी  , मावश्या काकालोक ज्यांनी मन लावून माझे लग्न जुळवून दिले अन इथं पर्यंत निभावण्यासाठी मदत केली . दर वर्षी न चुकता आशीर्वाद पाठीशी ठेवतात अन मला उर्मी देतात पुढच्या लगीन गाठी दिनाच्या उत्सवासाठी त्या सगळ्यांना मनापासून शीर साष्टांग नमस्कार !

दैव योग ते किती ?

मी देवेन्द्र आई जबलपूर ला जाणार होतो मावशीकडे चार दिवस राहायला .देवेन्द्र काही कारणाने रद्द झाला , आईचे जाणे रद्द झाले .मी मंथ क्लोजिंग साठी नागपुरला ..अचानक बॉसने पाठवले .तिथून मित्र सौदागर मला घेऊन त्याच्या गावी म्हणजे जबलपूरला चल म्हणाला ....

मावशी कडे आनंद मनवत होतो . बाबासाहेबांना भाजी महत्वाची होती आम्ही भाजी बाजार पहात निघालो ...

      मनमोहनसिंग आपला पहिला अर्थ संकल्प सादर करणार होते ...मिनूच्या गढा मधल्या घरी ! बाबासाहेब आपल्या भाजीच्या शोधात तिथं पर्यंत पोहोचले अन मी मनमोहनसिंग यांचा अर्थ संकल्प मनापासून पहिला ... अनर्थ मनानी केला.. .मनानं मिनूकडेच लक्ष दिलं ! ! !
       
         मोठ्यामामीनी मनानी मिनूला माझ्यासाठी पाहून ठेवले होते ....

     नानामामा त्यावेळी मिनूचा औट घटकेचा सख्खा मामा झाला अन मिनूच्या आईबाबांचा त्यांनी मामा केला 😜 संध्यामामी या कार्यात पुढे न येणेच नवल .

नानामामाला AG ऑफिसात नागपुरात काम निघाले पण तो नागपूरची गाडी चुकवून जबळपुरात गेला ...

   हेरंब तातडीने मला घेऊन दर्यापूरला गेला . मला उंचीचे वैषम्य होते , हेरंबनी आता मागे नाही हटायचे म्हणत बरीच उंची गाठली होती ...मिनूनी त्याकाळी त्याला बरेच चांगले चुंगले पदार्थ खाऊ घातलेले  .तो हि मनोमन तिला वहिनी मानत होता ...(आता लग्नानंतर ते पदार्थ अन त्याची नावं मिनू विसरली बहुदा ) .. अनिलमामा,  दादामामा, बारिकमामी (त्याकाळची) , जयामामी (ईच्याबद्दल काही कमेंट टाकली तर हिचा नवरा मिल्टरया  लई डेंजर )  , जितू सगळे सपोर्टिंग ऍक्टर चे काम करत होते !! आताही सगळे मिनूच्याच पाठीशी असतात त्यामुळं मला निभवावे लागते मुकाट्यानं 😄

अन आता मेन रोल ....क्या करे मौसीजी मेरा तो दिल ही कुछ ऐसा है ... मावशी ,  बाबासाहेब , पदी ,  वैभव !! मिनूच्या बाबांकडून होकार मिळवणं , अजुन तिच्या आईलाही कुठल्याही विषयासाठी , इतक्या वेळात शक्य होत नाही ..इतक्या तत्परतेने मावशीनी कार्य सिद्धीस नेलं कि बाबानी आज आशीर्वाद दिले ,केक आणला , ओवाळणे झाले ... जावई माझा भला ? याविषयी आजही ते सांशक असावेत नव्हे आहेतच  !!!😄  केवढी शिला बाबासाहेबांची गडबड !!!
     मला मात्र मिनूच्या आई बाबांच्या बाबतीत नशीब मिळाले .सर्व गोष्टी ते दोघं सांभाळून घेतात ..पदरी पडलं पवित्र केलं त्यांनी मला !!!

  आज आठवण भाऊसाहेबांची होणे साहजिक आहे . आईभाऊंचे म्हणणे मुलीचे आधी ठरलेलं असतांना आम्ही हा उपद्व्याप करू नये . त्यांच्यावर भाऊसाहेबच प्रभावी उतारा होता बहुदा त्यांनीच आई भाऊंना पटविले .कारण मी तर फार दूर होतो औरंगाबादला ! अन आई भाऊ 1 बाबी 2 भाऊसाहेबांचाच सल्ला अण्णा आजोबांच्या पश्चात घेत असत मुख्यतः .
   
      मिनूच्या बाबांचे पुन्हा विशेष आभार ! त्यांनी लग्न नोव्हेंबरमध्ये काढले .त्यामुळे मी पत्र लेखनात प्राविण्य मिळवले .आधी फक्त आईला पत्र टाकायचो रोज . ती जागा मिनूनी घेतली .एकही दिवस चुकला नाही !  अजूनही पत्र जपून ठेवली तिनी पण वाचायला कंटाळवाणे वाटतात बहुदा  ! कधीच काढत नाही ...

मिनूनी काहीतरी लिहा म्हणून सांगितले .न ऐकून कसे चालेल निभावायचे तर आहे ना ...

मामा मावाश्यां प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यकच ! म्हणून सगळ्यांना त्रास दिला ."अहो झोपा आता बंद करा तो मोबाईल ' असा आदेश मिळण्यापूर्वी संपवलेलं बरं !! आजच घरी आणली ब्यांनवात तेव्हा मुकाट होती !!!

        -  साठा उत्तरी ही कहाणी इथेच थांबवतो . खूप खूप धन्यवाद
                  - अगस्ती

Wednesday, November 13, 2019

सचिन करोडे



"सर आज चहा पिल्याशिवाय जायचे नाही '
मी चहाला घाबरून आणखीनच वेगानं पळ काढला महालक्ष्मी चौकातून .
" सर चहा' म्हणत सचिन नी हात घट्ट पकडला खरा मी सोडवत निघालो गाडीकडे !
" सर आज माझा वाढदिवस आहे !' मला खरे वाटले नाही
" मला चहावर कटवतो का ? संध्याकाळी वाढदिवसाच सेलेब्रेशन सचिनला कापल्या शिवाय करणार नाही , कुठल्या हॉटेलला टेबल बुक करतो सांग '  म्हणत मी पसार झालो .आज एकच ध्यास होता मतदार नोंदणीचा !
रात्री नवाला फेसबुक उघडले तो सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होता !  मला सचिनचा गुन्हेगार झाल्यासारखे वाटले . फेसबुक वर किती अवलंबून असतो आपण ..
        शुभेच्छा दिल्या " आता सचिनला बाहेर जाऊ माझ्या खर्चाने म्हटले ' . त्याने सौ सोबत प्लॅनिंग सांगितले ...
     
         सचिन करोडे .. एक स्वयंसेवक , हुरहुन्नरी वॉर्ड अध्यक्ष ! त्याच्या तोंडी नाही हा शब्द नाही .  सचिन कुठल्याही वर्गात सहज वावरणारा ,  पटकन जिवाभावाचा कसा होतो कुणाचाही कळत नाही  ! मैत्र जपणे त्याला छान जमते .

        एक कलासक्त माणूस ,  कलाकार . सामाजिक कार्याची तळमळ असलेला ! " जाणिवा ' जपणारा ! स्वस्त धान्य दुकानदार  कसे असावे तर सचिन सारखे .
           शासकीय अन्न सुरक्षा समाजाच्या शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचव सचीन खूप शुभेच्छा मिळवशील . खूप मोठा हो , खूप यश मिळव . सगळ्यांना मित्र बनव .
           "  फूल होंगे शूल सारे,
              मित्र होंगे सब विरोधक '  आदर्श स्थिती आण !
हेच मागणं मातृभूच्या वेदना कमी करण्यासाठी !
            आईची तर तू चॅन सेवा करतोस ! तिला काही कमी पडता कामा नाही याची काळजी घे !
                 अनगीनत शुभेच्छांसह -मंगलमुर्ती शास्त्री

       

कामधेनु


        दुकान टाकल्या वर मराठवाड़ा विदर्भ फिरतांना ती. भाऊनी (आमच्या पिताश्रीनीं) खुप सोबत देवुन मोठेच काम केले . सुरुवातीला मारुती ओमनी घेऊन हिंडत असे . गाडीत माझ्यासोबत यायला शक्यतो कुणी तयार नसायचे फक्त भाऊ एकट्याला जाऊ देत नसत , कुठेतरी मंदिर पहायचे शिदोरी काढायाची अन मजा करायची . घरून निघातांना शिदोरी मात्र सोबतच असायची . भाऊंनी बहुदा सर्व भाग पायाखालून घातलेला , त्यामुळे  भौगोलिक राजकीय माहिती खुप द्यायचे . भूगोलाच्या त्यांच्याईतका अभ्यास जवळपास कुणाचाच नसावा !!!
       आईला कामधेनु ची फळं चाखायला मिळाली नाहीत है दुर्दैव ! अजुन पाचेक वर्ष तिने द्यायला हावी होती !  माऊलीच्या नशीबात हा जन्म कष्ट खाती लिहलेला असावा ! फक्त कष्ट उपसले तिनी मुलाच्या हट्टा पायी ! नोकरी केली असती तर ...पगार चांगला होता , वेळ ही खुप असायचा . ....
      बंधुद्वय देवेन्द्र , डॉ हेरंब यांची चिड़चिड़त का होईना प्रामाणिक अन  मनापासून साथ मिळाली . दोघानाही आर्थिक दृष्टया अगस्तीला झेलावेच लागले  , माझी किती त्यांना मदत झांली हा संशोधनाचा विषय . परवा हैशटैग मैन्स वेअर गुलमंडी वर सुरु केले तेव्हाचे देवेन्द्र चे वाक्य " आपण हे करायचे राहुनच गेले असे वैषम्य जीवनाच्या अंताला राहु नए ' त्या त्या सर्व गोष्टी करून टाक म्हणाला !!  उद्वेगाने निश्चित म्हणाला नाही कारण त्याला पैसे मागितले नाहीत !!!!!

            मागे वळून पहातांना , आज नाही म्हणता कामधेनु 14 कुटुंबियांचे संसार खेचत आहे हा आनंद आहे . औरंगाबाद सारख्या अनोळखी गावात "मंगलमुर्ती शास्त्री 'ला ओळख दिली . शहरभर नव्हे तो मराठवाड़ा भर  स्नेही मिळवून दिले !
               22 व्या वर्धापनाला ईश्वर चरणी कामधेनु शी निगडित प्रत्येकाची, ग्राहकांची, कर्मचारयाची , स्नेही जनांची सर्वांगीण  भरभराट होऊ दे हिच प्रार्थना !
                   आतापर्यंत सर्व जेष्ठ श्रेष्ठ मंडळीनी  जे आशिष वर्षवले   ते वाढते राहो या मागणी सह आपला               - मंगलमुर्ती शास्त्री , में कामधेनु पशु औषधालय खड़केश्वर औरंगाबाद
        

 पशुपक्ष्यांशी नाते जुळवी ..........................................कामधेनु !

गोवा निवडणूक प्रभारी बैठक मा संतोषकुमारजी

प्रदेश कार्यालय गोवा प्रदेश

प्रमुख उपस्थिति : मा संतोष कुमारजी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री
मा डॉ राजेंद्र फडके , मा मनोहर पर्रिकर केंद्रीय मंत्री ,

37 मतदार संघ
उत्तरगोवा
Total 20 लढवतोय
प्रिपरेशन-
मंडल समिति तैयार आहे 35 महामेळावे विजय संकल्प रैली
बूथ सशक्तिकरण अभियान 37 मतदार संघ
वोटर लिस्ट वाचन झालेले आहे ELECTION Management Committy .
Independent social media karyakarta .
Everyday press briefing by party
Door to door campaigning
Booklet of earlier schemes
Yuwa team mahila team
Booth jito . 16 to 22 nomination date local leaders corner meeting 100 to 200 voters
Booth पालक
20 घर संपर्क




हर बूथ कमिटी को घर घर जाना कम्पलसरी ।
बूथ लेवल कॉन्फ्लिक्ट क्लियर करना
Conduct resolvation

Karyalay Active rakhana

Office में 2 घंटा बिताना

राज्याबाहेर के लोग ढूंढना कोणसे एरिया देखना

नॉन official hours  कमिटी की बैठक daily



बूथ वर करावयाची कामे

1) बूथ कमिटी तयार करणे . बूथ पालक,बूथ प्रमुख व 10 सदस्यांची कमिटी असावी . कमिटी मध्ये के कमी 3 महिला 3 युवक असतील असे पहाणे .
2) कमिटी कडून मतदार यादी वाचन करून घेणे
3) घर संख्या निश्चित करणे .
4)  कमिटी सदस्यांना संख्येनुसार मतदार विभागुन देणे.
5) बूथ कमिटी चे उमेद्वारासह , तसेच उमेदवाराविना डोअर टू डोअर प्रचार किमान तीन वेळा करून घेणें
6) वैयक्तिक बूथ सदस्यांनी स्वतः चे मतदाराना one to one भेट घेणें पक्षासंबंधी जनते पर्यन्त माहिती देवुन मत मागण्यास सांगणे
7) बूथ लेवल मतभेद दूर करणे , कार्यकर्ते सांभाळून त्यांना प्रोत्साहन देणे
8) कोपरा बैठका आयोजित करणे
9) बाहेरगावी तसेच मृत असणारे मतदार लिस्ट तयार करने
10) जास्तीत जास्त मतदान करून घेणे .
11) अपेक्षित forms भरून कार्यालयात तत्परतेने जमा करणे .

       वेळोवेळी दिलेल्या सूचने नुसार कार्यरत रहाणे .

सत्यविजय सुब्राय नाईक जाहीरनामा

मतदार बंधुभागिनिंनो
   
       मी सत्यविजय तुमचा सत्तू गेल्या सात वर्षापासून मी आपल्या सेवेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहे . कुठलीही संवैधानिक पदावर नसतांना मी जनसेवेत वेळ दिला . भाजपा च्या माध्यमातून समाजकारण करतांना कुठलेही  राजकारण मी केले नाही .
      मागच्या निवडनुकीनंतर पुन्हा हां खेळ मला मानवणारा नाही निदान  या मतदारसंघात तरी , असे वाटून मी बाजूला राहायचे ठरवले मात्र कार्यकर्त्यांच्या एकमुखी आग्रहानंतर पक्षाच्या पाठबळावर पुन्हा एकवार आपल्या दारी मत मागायला आलो .
     मी कुठल्याही "खाशे  वा सरदार ' घरान्यातुन आलेला नसून , एक टाकीज वर तिकीट फाड़नारा मी अत्यन्त गरीबी तुन वर आलेला असल्याने गरीबांचे प्रश्न मला नवीन नाहीत .
                      खरतर    या मतदारसंघात धनशक्ति विरुद्ध उभे राहणे हे एक आव्हान आहे हे माझ्यासारख्या सामान्यासाठी , मात्र सहाशे कार्यकर्त्यांच्या बळावर मी हे अवघड शिवधनुष्य उचलले . भाजपा एकमात्र पक्ष आहे जेथे कार्यकर्ते कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रचार करतात .
     मी आपणाला आश्वस्त करतो क़ी मला भेटान्यासाठी उसगावात माझे घर , तिस्क येथे तसेच वाळपई येथे भाजपा कार्यालयात उपलब्ध असेन . माझ्याकडे पोहचन्यासाठी आपणाला कुठल्याही मध्यस्था कड़े जाण्याची आवशक्ता नसेल .
            फक्त पैशाच्या बळावर निवडणुका जिंकता येतात असे समजणाऱ्या धनदांडग्या , शौक म्हणून आमदारकी मिरवाणाऱ्या , निवडून आल्यानंतर मतदारसंघ सोडुन दुबई लंडन फिरणाऱ्या विरोधी उमेदवारांना त्यांची जागा दाखवुन मला निवडून द्यावे
                आवाहन करतो की चार तारखेला कमळ बटन दाबुन सत्याचा विजय करन आपल्या सत्तुला विधानसभेत पाठवावे .


  आपला विनम्र
   सत्यविजय सुब्राय नाईक 

वळपोई मतदारसंघ प्रभारी

" आपली सीट निघणे कठीण आहे '
" वालपै मतदारसंघ भाजप दृष्टया "c' ग्रेड आहे  '
इथपासून ते "कार्यकर्ते नाराज आहेत कामच करणार नाहीत , सत्तुचे नातेवाईकच काम करणार नाहीत ' इथपर्यंत !
"पैसा फेकल्याशिवाय कार्यकर्ते काम करणार नाहीत ' हे ही ऐकले !!!


सर सीट निघाली '
मुनिसिपलिटीत 1800 वार पल्ला गाठु '
रात्री 12 वाजता  देमु गावकर बोल्ले " सीट प्राथमिक अंदाजानुसार निघाली 600 च्या फरकान '
" आमची पंचायत 100 + लीड घेईल ' प्रेमानंद सर
" आमची पंचायत चांगली लीड देईल ' राजेश गावकर
" उसगाव 2000 वर लीड देईल यावेळी ' नरेश म्हणाला !  ( नरेश सर्वाधिक निराश होते मात्र कामाला लागले की  ... )

निकाल लागेल तो लागेल ,आता पेटीबंद झालाय . मात्र अमेय,  जुबेन, अॅशला, सोमनाथला मिळालेला विश्वास आज आनंद दायीं आहे .  घरचे खावुन कामाला झटणारे कार्यकर्ते हीच भाजपची श्रीमंती आहे .
       प्रदेशाकडूनही मतदार संघ निघतो अशा संभावना व्यक्त होताना दिसतात तेव्हा आनंद होतो . कदाचित संपूर्ण गौयात कुठल्याही मतदारसंघात  एवढी मोठी सक्रीय कार्यकर्त्यांची फ़ौज नसेल अशी फ़ौज  वाळपै   मतदार संघात आहे . दोन शब्द नेत्यांनी बोलावे इतक्याच माफक अपेक्षेत आपले कार्यकर्ते कामाला लागतात ! तुम्हा सर्वांचे करावे तितके कौतुक कमीच आहे ! !
              दत्ताकाका बर्वे , अनिरुद्धजी जोशी या वयात  काम करतांना पाहिले की स्फूर्ति मिळते .

      अमेय कोपरा बैठकांत चांगला बोलला . ऋषि ,गोविन्द, सर्वेश , उगम  गौरव ...  मेहनती आहेत , राजेश गावकारांकड़ून संघटन कौशल्य घ्यावे तर देमु ,बाळा सखाराम , लक्ष्मण  यांनी पक्षासाठी  दिलेला वेळ ! सुनील,  जितु काटकर , अतुल , प्रसाद ,शाबा, रमेश , यांची पक्षासाठीची तळमळ सुख देवुन जाते ! "उसगाव' कर मंडळीचे हे घरचेच कार्य होते , चंद्रलेखा ताईचे  महिला मंडल , सेल्फ हेल्प ग्रुप खूपच कामाचे आहे . केळुस्कर ताई चे आशीर्वाद वाया जाणार नाहीत !

विशेष उल्लेख करावा तो म्हाळशेकर वाहिनीचे बेळगावी आतिथ्याचा , सौ गावकर वाहिनींचा , बर्वे काकू (ऋषीची आई ) , केळकर आजी (संजय विद्याधर यांच्या मातोश्री ), सौ जोशी काकू (कार्यालयावरच्या) या अज्ञात असलेल्या भाजपच्या मातृशक्तिचा ! सौ दिपा सत्यविजय नाईक यांनाही अनुल्लेखुन कैसे चालेल . त्यांच्या कष्टाला सैलूट ! 
       

     मिलिंद गाडगीळ,वामनराव यांचे शिस्तबद्ध कार्यक्रम , आम्हाला शिस्तित कार्यरत करातात !  यश प्रामाणिक प्रयत्नांना कधी हुलकावणी देत नाही ! तेव्हा श्री भालचंद्र  भाव्यान्च्या महागणपतीवर श्रद्धा अन आपल्या असंख्य ज्ञातअज्ञात कार्यकर्त्यांच्या यत्नाना यश मिळेलच या आशावादासह - 
                                                         -आपला मंगलमुर्ती शास्त्री

मानिषदादा चिरायू होवो

एक "उम्र" के बाद "उस उम्र" की बातें "उम्र भर" याद आती हैं..
                           पर "वह उम्र"  फिर "उम्र भर"  नहीं आती..।

इतके सगळे "उम्र ' डोक्याला तापच ,नाही ?
सकाळी सकाळी एका " उम्रा' रलेल्या , वयस्कर झाल्याचा साक्षात्कार झालेल्या मित्राने मला ताप दिला आणि मी " मधुघट 'ला !!

" आता रिटायरमेंट चे दिवस जवळ आले चिरंजीव ! ' इति " अब तक पचपन ' आजच गाठलेल्या आमच्या आदरणीय मनिषदादानी म्हणाव ? ..

     दादांना खुप खुप शुभेच्छया द्यायला फोन केला तर आत्ताच त्यांनीही
" उम्र ' ची जाणीव करून दिली !
         दादा तसा फार नशीबावान , नाही तर आम्ही " उम्ने दराज मांग कर लाये थे चार दिन , दो आरजू में कट गए , दो इंतज़ार में '  अशी समस्त समवयस्क भावांची कथा असतांना ..." वर्षा 'नी मानसी बनत दादाला इंतजार वगैरे करू न देता समर्थ अशी साथ दिली !!

     तसे पाहिले तर मनीषदादा " देशपांडे ' कमी शास्त्रीच जास्त , इतके एकरूप झालेले !  आत्ये भाऊ वगैरे नाते आमच्या साठी,समस्त शास्त्री भावां साठी प्रसंगी अतिशय दुरचे वाटावे  ,  आमच्या सर्व प्रकारच्या सुखः दुःखात आपल्या स्वतःच्या वेदना प्रसंगी बाजूला ठेवून सहभागी होणे सगळ्यानाच जमेल असे नाही . दादांनी 55 वर्ष आम्हाला झेललं . आणी आमचा स्वभाव बघता त्यांना पुढेही झेलावच लागेल .

         घरातील वडीलधारयान्चे सर्वाधिक आशीर्वाद सर्व नातेवाईकांमध्ये  मनीष दादांनाच जाणार . त्याबाबातीत त्यांचा हात कुणी पकड़ू शकणार नाही  .

आपल्या ग्रुप वर

        स्वा सावरकर प्रेमी दादा  सामाजिक कामात  नेहमी अग्रेसर
 असतात . चार लोकांमध्ये मिळुन राहणे , त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे , आणी घराच्या कटकटी सांभाळत हि दादांची आतापर्यंतची कहाणी अशीच वर्षोनुवर्षे चालत राहो !!  त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होवो !! उदंड , निरामय आयुष्य लाभो या प्रार्थनेसह
                                                              - अगस्ती