पानं

Thursday, May 24, 2018

मनिषदादा मानसी वहिनी

हमने अक्सर तुम्हारी

राहो मे

रुक कर

अपनाही

इंतजार किया... 

अशा भावनांनी बार्शीटाकळीला टक लावून बसलेला मनीष दादाचे  कष्ट  आजच्याच दिवशी मलकापूरला चांडक हाय स्कूल  फळाला आल्याला आज 29 वर्ष पूर्ण होताहेत .
        वर्षावहिणींनी अशी समर्थ साथ दिली कि त्याला आज त्या निवडीचे समाधान निश्चित असेल .
             
           तुमसे मिली जो जिंदगी
                     हमने अभि बोई नही
             तेरे सिवा कोई न था,
                       तेरे सीवा कोई नही ... अशा गुल गुलझार भावना त्याच्या असतील  .

          सहज बोलता बोलता शुभेच्छा देतांना , आज तिघांच्या लग्नतिथी आहेत पैकी संजय शास्त्रींना विनाकष्ट बबडी मिळाली असं हसत बोललो तो मनिषदादा " चिरंजीव कुत्सित , हसताय का असूयेने का आणखी काही ' बोलते झाले .
               त्यानंतर अर्धा तास टाकळी ते मलकापूर , आक्काची मदत , वगैरे झाले . प्रवास कसा खडतर होता , यजुर्वेद ऋग्वेद चर्चा झाल्या . एकतर्फी प्रवास किती वाईट असतो हे अस्मादिकांसह सर्व सामान्यांना चांगले ठाऊक असते !  ती सर्व सामान्य मंडळी स्टेशन बदलत अखेर ठेपा गाठतात .
                     पण  दादासारखा स्टेशन पक्के ठरवत प्रवास पूर्ण करतो त्याचा आम्हास अभिमान असणे स्वाभाविक आहे . त्यामुळे कुत्सित वगैरे भाव आमच्या बोलण्यात येणं शक्य नाही . ते स्वभावात नाही .  असूया म्हणाल तर नक्कीच आहे .
            दादा त्या काळातल्या चर्चा गॉसिप बद्दल बोलले . वर्षा वहिनीशी साक्षगंधाअगोदर कधीच बोलणे न होताही उगीचच ..
            दादा याचीच असूया आहे ! शास्त्रींची अख्खी पिढी निष्क्रिय निघाली . अकराच्या अकरा भावंड ... ! आरजू अन इंतजार शिवाय कुणाच्याच हाती काही लागले नाही , कुणाचीच चर्चा नाही .गॉसिपचा विषय होणे तो दूरच !! आम्हाला तुमचा अभिमान असावा पण कोत्या मनाचे नं, म्हणून असूया !!! तसेही तुम्हाला आम्ही शास्त्रीच मानतो ...पण हे समाधान आहे . चर्चेत तर तात्यानंतर मनिषदादाच !
         
     *" चर्चे उन्हीं के होते है, जिनके मिजाज कुछ अलग से होते है '*

इथेच महत्व "मनीष' असण्याचे आहे दादा . आपण जे मिळवलं ते अथांग आहे वर्षा वहिनीच्या रूपाने ! !  " सहन करणे ' याची परिभाषा   जीने  "सहज करणे ' अशी केली  , सगळे आनंदाने निभवले , सांभाळले !!  तुम्हाला नक्कीच निवडीचे समाधान असेल . आणी "  रुक कर अपनाही इंतजार किया ...' या गुलजार   भावना मनी असतील .

                  आजच्या   सर्व *(सौ मानसी(वर्षा)-मनिषदादा , सौ विनोदिता(बबडी)- संजय शास्त्री , सौ  रश्मी (नूतन alias छोटी )- रविकांत दिक्षित)* उत्सवमूर्तींना   लग्न तिथीच्या अनगिणत   शुभेच्छा -अगस्ती

Wednesday, May 2, 2018

आई पुण्यस्मरण 1 मे 2018

पुण्यस्मरण

आज आईच्या पुण्यस्मरणाचा दिवस .
शेवटच्या पाच वर्षांचा संपूर्ण  कार्यकाळ तिने माझ्या नावे लिहिला होता .घरात मोठा म्हणून जन्माला येण्याचं भाग्य ते असे असते . आई वडिलांच सानिध्य ,प्रेम ,माया जनरली मोठ्यांच्या वाट्याला येत असते, मी भाग्यवान आहे . मालमत्तेत मोठयांनी वाटा मागुच नये खरंतर !
         
     तशी आईनी फार लवकर आमच्या पासून दूर होऊन आमच्यावर अन्यायच केला . 1946- 98 हा तिच्या आयुष्याचा छोटा काळ कुणालाही व्यथित करणारा असाच होता .

     आम्हाला सौ बाबीताई लाभली जिने आईची जागा निभावली . आठवण येऊ दिली नाही . धपाटे , चकल्या आजही बाबीताईंनी कराव्या अन आईच्या हाताची चव द्यावी . आईवरचे हक्काचे  चिडणे ,ओरडणे  आता बाबीताई वरच होत असते ... 

        आईची अशात रोज आठवण येत आहे. पत्ते कुणी काढले कि सगळ्यांना ताई अलायस आई आठवते . आईच्या वाट्याला सुख फार कमी आले , रांधा , वाढा, उष्टी काढा यातच तिचं माझ्या आठवणीतलं सगळं आयुष्य गेलेलं !

       भाऊंच्या स्वभावानुसार पै पाहुणे , मित्रांच्या राबत्या मुळे आणि आईच्या समर्थ साथीने घर भरलेले असायचे जे आजकाल दुर्मिळ चित्र आहे . त्यामुळे या " साहेबींन ' बाईचा मॅक्सिमम वेळ स्वयंपाक खोलीत जायचा . तिलाही खाऊ पिऊ घालण्याची आवडच होती . कोथिंबिरीच्या वड्या , गुलाबजामुन आईच्याच हाताचे ,व्वा !

         अगस्तीला सांभाळून घेण्याचं अवघड काम ती लीलया निभावत होती . आईच्या पदराआडचं लेकरुच  म्हणांव .  भाऊं समोर जाण्याची त्यापूर्वी हिम्मत नव्हती . आईच्या जाण्या नंतर भाऊंनीच घरी दोन्ही रोल केले , त्यांनी स्वभावातही बदल केल्याचं स्मरते.

       आज सर्व मावश्यांना फोन करणे  हिच तिला आठवण्याची , तिच्यावर श्रद्धा दाखवण्याची रित  मी टाकली . बंडू , चंदू,  शिला वर तिचे विशेष प्रेम दिसायचे . दादामामाशी वेगळं गु-फत-गु असायचंच ! तेव्हा या सर्व समस्त  मामकुळाला आजचा  नमस्कार "आई ' निमित्त .

स्व सौ  सुलभा प्रभाकर शास्त्री 1मे 1998

बाबुराव उपाख्य मा गो वैद्य

 12March 2018


           "बाबुराव तुमचे वय क़ाय? ' विचारले तर " मला शंभरीला इतके वर्ष इतके दिवस बाकी आहेत ' असं उत्तर आत्मविश्वासाने देणारे व्रतस्थ ऋषितुल्य , व्यक्तिविशेष ,आमच्यावर ज्यांचे लेखन संस्कारते झालेले,  असे मा श्री बाबुराव उपाख्य माधव गो .वैद्य यांचे चरणस्पर्श करीत मिळालेले आशीर्वाद  हि आजच्या आमच्या  दिवसाची जमेची बाजु .
           "मागो 'या शब्दाला आयाम ते किती असावे , तरुण भारतचे अनेक वर्ष संपादन व नन्तर प्रबंधन करणारे , तरुण भारतचे " दिशा 'कार , रा स्व संघाचे प्रवक्ते , विधानपरिषद सदस्य , हिस्लाप कॉलेजचे संस्कृतचे प्राध्यापक म्हणुन सूरवातीचा प्रवास...
            तुझ्यासाठी " भाष्य ' ची  पानं जमा करून ठेवलेत  हो,असं आईच्या पत्रात वाचुन सुखानुभुती अस्मादिकांनी नोकरीच्या गावी  अनेकदा  घेतलेली ! आई किती माझी काळजी घेते हा आईविषयीचा आदर वाढ करणारा आनंद ज्यांच्या "भाष्य' मुळे मिळायचा त्यांची आज प्रत्यक्ष भेट तेही त्यांच्या 95 व्या वाढदिवशी . चार पाच महिन्यांची " भाष्य ' एकदमच वाचायचो तेव्हा . ... 
         " संघीष्टयाशी संसार करायचा म्हणजे  मागच्या जन्मीचे पापच हो ' अशा काळात  सौ सुनंदा माधवांना हया कडव्या संघीष्टयाचा संसार सांभाळायचा म्हणजे किती पापड़ बेलावे लागले असतील नाही ! आपल्या दोन मुलांसह किती समर्पण या माऊलीनं केल असेल तिलाच ठाऊक . हिस्लोपची अर्थसुरक्षा तरुण भारताने कशी निभवली असेल  ? आणीबाणी तर पाचवीलाच पूजलेली .
         ....तरीही कृतकृत्यतेचे तेज आजही आजींच्या चेहऱ्यावर झळकताना पाहुन आनंद तर होतोच मात्र आदर द्विगुणीत तेव्हा होतो जेव्हा घरासमोर नेमप्लेट वर सौ सुनंदा माधव वैद्य MA संस्कृत वाचायला मिळते .... आदर पटीत वाढतो जेव्हा हे ऐकायला मिळते कि हि पदवी वयाच्या पासष्टाव्या वर्षी मिळवलेली आहे !       प
        "  प्रार्थयामहे भव शतायु:
                  ईश्वर सदा त्वाम् च रक्षतु ' म्हणतांना जीभ अड़खळते . फक्त शतायु म्हणावे ? राष्ट्रकार्याला समर्पित यज्ञकुंडाला आपल्या अनेक शतायुंच्या समिधांची आवश्यक्ता हा आमचा स्वार्थ . निरामय सुद्धा आमच्यासाठीच .. म्हणुन दिर्घ निरामय आयुष्यासाठी ईश्वराकडे मागणं .
                                   -मंगलमुर्ती प्र . शास्त्री औरंगाबाद


ता क : श्री दत्ताजी जोशी यांच्यामुळे आम्हाला हा आनंद मिळाला त्यांना शिर साष्टांग दंडवत .




         
    
             












 मनमोहन
राम
धनंजय
श्रीनिवास
माधव गोविंद वैद्य

83 ला 

केळवण

26मार्च 2018

         आजच्या दिवसाचा समारोप एका नितांत  सूंदर भावोत्कट  केळवनाच्या कार्यक्रमाने झाली . मन भरून येणे ,कंठ दाटने, तेही एका हसत खेळत चाललेल्या कार्यक्रमात . डोळ्यात पाणी अनं बोलणे अवघड व्हावे असा .
      आम्ही खरच नशीबावान आहोत .गजानन महाराजा च्या आशिर्वादाने इतके छान शेजारी मिळावेत . सोहोनी,नारखेड़े ,कस्तूरे, पोहनेरकर, गोसावी, कुलकर्णी, देशमुख, देसाई ,शास्त्री एक भलमोठं कुटुंबच !
      आजच्या कार्यक्रमातील प्रत्येकाचा औपचारिकता विरहित सहभाग आनंद देणारा मात्र माझ्यासाठी आजच " घेवू कसा निरोप ,तूटतात आत धागे ' असा डोळे भरून आणणारा !
       सरांची साखरपुडयाची कविता अनं आजची कविता सतत जाणीव देणाऱ्या ! ! खरच मुलीचा बाप हा   छळभावनांचा पसारा असतो . आवरणे उत्तरोत्तर  कठीण व्हावे ...
         वासंती मामींचे कार्यक्रमास एक सूत्रात बांधने ,आणी कस्तूरमामानी मेनू सांभाळने आणी आम्ही एन्जॉय करणे हे नित्याचेच झाले . या वेळी  मुलांच्या सहभागाने प्रोग्राम "खेळ' कर झाला .
      हया अशा कार्यक्रमाचे पूर्वीचे महत्व कदाचित ,ज्यांच्याकडे शुभकार्ये आहेत त्यांना मदत वगैरे असावे ! मात्र आजच्या सापेक्ष महत्व तेव्हा अधोरेखित होते जेव्हा ..
                 आमची रंजुताई त्याचा आस्वाद घेते , व्यस्त शेड्यूल मध्ये वेळ काढत  , डॉ रंजना देशमुख मैडम रुग्णालयात सकाळपासुन रात्री पर्यन्त असंख्यांचे शुगर बीपी हार्ट नार्मल करत , घरी सोवळेओवळे ,स्वयंपाक सांभाळत देशमुखांचे बीपी कंट्रोल करत (!!) ,सकाळी लवकर उठुन पक्वान्न म्हणुन करंज्या करते , मिनु तुला आवडतात " चल खा ' सुद्धा होते. गोविंद सरांशी किती एकरूप आहे ते पेपर मधल्या मार्कात पहिला नंबर घेत सिद्धही करते !
              वर स्वागताच्या पायघड्या रंजुताईच्याच! सगळे ग्रेट !
सौ रसिका वहिनींची महालक्ष्मी आराधना वातावरण मंगलमय  झालेले . सतीश काकांची फोटोग्राफी बहरुन आलेली !
         चि शुभांगी च्या केळवनाला आपणा सर्वांच्या उत्साहाने रंगत आली . आपण सर्वांचे अनेक आभार