कधी आई ,कधी ताई ,
….. कधी सुजाण पत्नी
सो..स..त सारं काही
झटली एकांगी..
सभोवती हसु
निर्माण करण्यासाठी ..
वडिलोपार्जित सुसंस्कृत,
हसतमुख,
मृदु भाषी ,
मवाळ पण …
झगडली कुटुंब कल्याणासाठी !
उंबरठा ओलांडला तेव्हा
कुठं माहीत होतं
का आकाशाशी भिडायचं आहे !
सगळी त्रेधा तिरपट लिहिलेली..
अश्रुंच्या महापुरात
स्वतःची नाव सावरायची आहे !
स्व कर्तृत्वाने नवी ओळख घडवायची आहे
प्रेमळ पतीच्या संगतीने …
प्रतिकूलतेला शांत करायचंय !
अनुकूलतेनं नुकतच कुठे कवेत घेतलं ..
तिनं यशस्वी मात दिलीचं अन
स्वभाव आता आयता झगडालू झालाय तर..
झगडू या उर्वरीत आयुष्यातही !
मात्र यशस्वी होण्यासाठीच …
यश रेखाटलेय तिच्या भाळी
सुरेखा नावाने !
प्रार्थयामहे भव शतायुषी,
ईश्वरः सदा त्वां च रक्षतु
वहिनी मनापासून शुभेच्छा !
- मिनल , अगस्ती

No comments:
Post a Comment