सहा जुलै सकाळी शाखेत प्रार्थना झाली , तेरा तारखेच्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या चर्चा सुरू झाल्या . प्रमुख वक्ते कुणाला बोलवायचे ?
माझ्या समोर एकच नाव होत "यावेळी दिलीपजी धारूरकर यांना बोलावू या का ? '
सगळ्यांनी एकदम माना डोलवल्या. खणाळे काका म्हणाले तुम्ही त्यांच्या आज बोलून घ्या ! मी आत्ताच बोलतो म्हणत मोबाईल काढला ... इतक्या सकाळी नका करू त्यांची तब्येत ... वगैरे काकांनी म्हणेस्तोवर माझा फोन दिलीपजीनी उचललाही !!
अन् तेव्हा त्यांची तब्येत त्यांना बाहेर पडू देत नाही हे कळले ! ! आपण भेटायला जाऊ वगैरे शाखेत बोलणे झाले .. प्रत्यक्षात आज अखेरचं फोनवरच बोलणं ठरेल असे वाटले नाही ! जे घडले . दिलीपजी खूप मोठ्ठं व्यक्तित्व .
सिंचन विभागात अभियंता असणारे दीलीपजी एक दिवस ती आश्र्वासित नोकरी सोडून देतात ... राष्ट्र निर्माण साठी , तरुण भारत साठी ! मला प्रचंड आदर होता त्यासाठीच .
तरुण भारत एक कठीण काम ! निव्वळ ध्येयासाठी समर्पण म्हणावे ! जिथे तूट पंजी आमदनी , ती ही बे भरवशाची ...अन् त्याकरिता शासकीय नोकरीचा त्याग .
तरुण भारत नंतरचा त्यांचा कठीण काळ.घर गृहस्थी चालवायला बाल मासिक सुरू करणे अन् फिरणे वगैरे ..
आज सगळ आठवतंय . माझ्या साठी दिलीप जी हक्काचा माणूस . शाखेत ऐनवेळी वक्ता हवा मग करा फोन , वेळ असला तर नक्कीच देणार !कुठलेही कारण कधी सांगितले नाही ... पहिल्यांदा कारण सांगितले " करोना आफ्टर एफेक्ट्स ' वगैरे म्हणाले . मात्र ते एफेक्ट्स इतके गंभीर असतील असे वाटले नाही .
दिलीपजी माहिती आयुक्त पदावर असताना बरेचदा भेटलो . कधी कामा निमित्त तर कधी उगाच ! त्यांनी पद स्वतः मध्ये शिरू दिले नाही .. या गप्पासाठी . अन् वहिनी ही भजे वगैरे तयार ठेवणाऱ्या अशा !
" कर्म करे हम निरलस पल पल , दिनकर सम हम सदा जले ' आपल्या कृतीतून उतरवणाऱ्या , निष्ठावान स्वयंसेवक दिलीपजीना आमच्या अभिमन्यू प्रभात शाखेतर्फे विनम्र श्रद्धांजली .
-मंगलमूर्ती शास्त्री
No comments:
Post a Comment