'अए अंजू " नंतर सर्वात जास्त कविवर्यानी उच्चारलेले काही शब्द असतील तर " अए सत्या किंवा अए सतीश !!! दोघांना अए अए करत सरांच्या खास टोनिंग मध्ये , (कस्तुरे मामी या टोनिंगची नक्कल अगदी अस्सल पेक्षा चांगली करतात म्हणे) , कामाला लावणारे सर या दोघांना किती मदत करत असतील देव जाणे ! पुन्हा वा व्वा करत झोडायला...अए तो भुरका आन की ग इकडं, वगैरे ...
सकाळी सकाळी सत्याला घरी हरभऱ्यच्या झाडावर बहुदा चढवत दोघंही मधुघट मध्ये आले ... आपसूकच सत्या आंब्याच्या झाडावर अन् अरे जरा हिरवे कंच पानं काढ की रे ...म्हणत तोरणाची सोय झाली ! अन् सत्यकृपेने
आंssबामाssय्य प्रसन्न झाली !!
सरांचा हा कॉलेजमेट आमच्या साठीही कसा जिगरी झाला कळलेच नाही . सतीश नारखेडे खरेच जिगरी झाले . दिवसात उगाच का होईना फोन तरी व्हायलाच पाहिजे .. राहणीमान एकदम टापोटाप !
आम्हाला सतीश सर म्हणजे आधारस्तंभ ! घरी मलाच नाही तर शुभांगी ,मिनलला माझ्यापेक्षा आश्वासक नक्कीच . शुभुनी कंपनीतल्या पहिल्या पगारात या काकासाठी अख्खा पगार खर्चून मोबाइल घेतला होता अन् हा काका सुध्दा शुभूच्या वरातीला ओक्साबोक्शी रडला होता कदाचित माझ्यापेक्षा जास्त ....
असा लळा जिव्हाळा वाटणारे सतीश सर .तुमचा लोभ असाच अखंड उदंड मिळत राहो हि रेणुकेचराणी प्रार्थना !
अगस्ती
सौ मिनल
No comments:
Post a Comment