ताई तुम्ही अगदी सहज निघून गेल्या .एक झंझावात विसावला .इथे चार दिवस मुक्कामी यायची त्यांची इच्छा तशीच राहिली . मार्च च्या सुरवातीला मिनल ला फोन आला होता ..."मला यायचंय ,मला आता वेणी सुध्दा घालता येत नाही , तुलाच माझ्या वेनिफनी पासून सगळं करावं लागेल '' असं मीनल कडून चारदा कबूल करून घेतले मात्र सेवेची संधी न देताच निघून गेल्या .सौ मीनल शुभांगी वर निरतिशय प्रेम वर्षावणारया ताई , शुभुच्या लग्नाला येऊ शकल्या नव्हत्या त्यांनी जालण्याला जाऊन अजित शुभागींला आशीर्वाद देऊन आल्या होत्या .मंगळागौरीला दोन दिवस राहून लग्नातल्या अनुपस्थितीची त्यांनी भर काढली होती .
अपर्णा ताई परंपरा वादी होत्या . माझे त्यांचे काही विचार पटायचे नाही खूप चर्चा व्हायची अन त्या विचार बदलायला लावायच्या . त्या घरी आल्या की चैतन्य असायचं ! आईची उणीव त्या घालवायच्या . त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्त्व , विचार , वाणी नतमस्तक करायची . कुटुंब कल्याण कुटुंब संस्था टिकण्यासाठी चे त्यांचे कष्ट अविरत होते . घरी पती स्व अरुण जीचे आजारपण सांभाळत त्यांचे दौरे अव्याहत चालू होते .
लव्ह जिहाद मध्ये धर्म सोडून गेलेल्या अनेक मुलींना त्यांनी पुन्हा परत आणले .त्याबाबतीत त्यांचे डेअरिंग अद्भुत होते . मालेगावच्या पळून नेलेली मुलगी त्यांनी स्वतः जाऊन सोडवून आणली होती !!
पारधी समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांचे काम खूप होते !!
एक हाऊसवाईफ स्त्री वयाच्या चाळिसाव्या वर्षी शाळेत दाखल होते अन कायद्याची पदवी मिळवत वकील होते . सगळेच अनोखे !! वकिलीला सुरवात करताना लक्षात येत की कुटुंब तुटणे चुकीचे आहे जोडले पाहिजे ...घटस्फोट कमी व्हायला पाहिजे , त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढते अन रूढी परंपराच हे काम करू शकतात ,पाश्चिमात्य विचारांचा आचारांचा , राहणीमानाचा पगडा दूर झाल्या शिवाय लग्न संस्था बळकट होणे नाही , हे लक्षात घेऊन देशभर एकट्या बळावर कार्यरत होते ...अन सगळ्या फुरोगाम्यांना टक्कर देत लोकप्रियता मिळवते हे एऱ्यागैरयाचे काम नव्हे .
अपर्णा ताई तुम्ही सहज निघून गेल्यात पोरकं केलंत अख्ख्या महाराष्ट्राला !
- मंगलमुर्ती शास्त्री
अपर्णा ताई परंपरा वादी होत्या . माझे त्यांचे काही विचार पटायचे नाही खूप चर्चा व्हायची अन त्या विचार बदलायला लावायच्या . त्या घरी आल्या की चैतन्य असायचं ! आईची उणीव त्या घालवायच्या . त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्त्व , विचार , वाणी नतमस्तक करायची . कुटुंब कल्याण कुटुंब संस्था टिकण्यासाठी चे त्यांचे कष्ट अविरत होते . घरी पती स्व अरुण जीचे आजारपण सांभाळत त्यांचे दौरे अव्याहत चालू होते .
लव्ह जिहाद मध्ये धर्म सोडून गेलेल्या अनेक मुलींना त्यांनी पुन्हा परत आणले .त्याबाबतीत त्यांचे डेअरिंग अद्भुत होते . मालेगावच्या पळून नेलेली मुलगी त्यांनी स्वतः जाऊन सोडवून आणली होती !!
पारधी समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांचे काम खूप होते !!
एक हाऊसवाईफ स्त्री वयाच्या चाळिसाव्या वर्षी शाळेत दाखल होते अन कायद्याची पदवी मिळवत वकील होते . सगळेच अनोखे !! वकिलीला सुरवात करताना लक्षात येत की कुटुंब तुटणे चुकीचे आहे जोडले पाहिजे ...घटस्फोट कमी व्हायला पाहिजे , त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढते अन रूढी परंपराच हे काम करू शकतात ,पाश्चिमात्य विचारांचा आचारांचा , राहणीमानाचा पगडा दूर झाल्या शिवाय लग्न संस्था बळकट होणे नाही , हे लक्षात घेऊन देशभर एकट्या बळावर कार्यरत होते ...अन सगळ्या फुरोगाम्यांना टक्कर देत लोकप्रियता मिळवते हे एऱ्यागैरयाचे काम नव्हे .
अपर्णा ताई तुम्ही सहज निघून गेल्यात पोरकं केलंत अख्ख्या महाराष्ट्राला !
- मंगलमुर्ती शास्त्री