पानं

Monday, December 31, 2018

लहानपणी चे जिगरी दोस्त

लहानपणापासून मला खूप जिगरी दोस्त मिळत आलेत .यवतमाळला माँटेसरी बालक मंदिरात चौथी पर्यंत कस्तुरे नावाचा मित्र होता .तो बुटका , त्याच्याघरी चिकूच्या झाडावर मला चढवायचा ,माझे हाताला चिकू लागायचे सतत सोबत असायचा, उंचीत फरक असुनही  आमचे चांगले ट्युनिंग होते

जायकवाडीला संत्या अन धन्या चोवीस तास सोबत असायचे .वर्गात एकत्र तसे शेजारी तेच मित्र ! मी लंबुटांग ते गुटबैंगंण (देवेंद्रला म्हणायची)आईच्या भाषेत .
        
   परवा शेगावला जातांना मुन्ना कस्तुरे गाडी ओळखून फास्ट पळत समोर बाईक उभी केली .ड्रायव्हर ने त्याला ओळखले तुमच्या मित्राची गाडी आहे ती,  म्हणताच उतरलो .त्याने कडाडून मिठी मारली ....उंचीत फरक तरीही !!
            मित्र हिच या अगस्तीची मिळकत या आयुष्याची ....

        अगस्ती दोस्त मित्रांच्या बाबतीत समृद्ध आहे पूर्वीपासून ! "मंगलमुर्ती 'नावाचं आकर्षण असेल .नावामुळे हुशार असल्याचा त्यांचा गैरसमजही होता !मी ही त्यांना आजतागायत पोसू दिला !!
त्यामुळे ते मला चिटकून असत !!

     असाच परवा मला बीडच्या आमच्या मल्टिपरपज हायस्कूल च्या एका क्लासमेंटचा फोन आला .जुन्या आठवणी ताज्या करण्याच्या प्रयत्नात मला विचारता झाला "अरे तुझ्या सोबत दोघे ठेंगणे, समोरच्या टेबलावर तुम्ही बसायचे , maths चे काळे सर बसवायचे त्यांच नाव काय तुझा काही संपर्क ?'
          दोघेही माझ्या पेक्षा खूप हुशार ,थोडे वेंधळे , गडबडे, अभ्यासात प्रचंड हुशार . दोघेही उंचीच्या बाबतीत माझ्यापेक्षा फूटभर कमीच ! त्यामुळे बुटकेच .

   वास्तविक त्या मुंसीपालटी च्या शाळेतला त्यापैकी एक मित्र माझ्या संपर्कात राहिलेला ! त्या शाळेत मी ऑगस्ट ते मार्च एवढाच कालावधी काढलेला , फार कुणी आठवणीतही नव्हते .हा मात्र पुन्हा संपर्कात आला . इंजिनिअर झाल्यावर माझा मेव्हणा म्हणून त्याचा संपर्क झाला . आहे तसाच आहे अजून काही बदल नाही  .
        मला अजिबात गती नसलेल्या प्रांतात अध्यात्म, ज्योतिष शास्त्रात गतिमान असणाऱ्या या मित्राला कठीण विषय आवडतात . काल फोन केला त्यानं उचलला नाही दत्त जयंती निमित्त पारायण केले त्यानी ! कठीण असते ते ,अच्छे अच्छे लोक दत्त महाराजांच्या नादी लागत नाहीत कडक सोवळे असते ..हा लीलया पेलतो .
          साधा सरळ माणूस , कुठलेही आढेवेढे याच्या जवळ नाहीत ! मध्यंतरी दुर्धर आजाराला धोबीपछाड दिली  . आज टकाटक पारायणं करणाऱ्या या गणेश पदे ला टकाटक रहात , माझ्याशी दोस्ती आणि नातं निभवू दे आई जगदंबे , हिच त्याच्या प्रकटदिनी प्रार्थना .
     
        
    
     

    

   

       
        

कृतज्ञ आम्ही कृतार्थ आम्ही


कृतज्ञ आम्ही कृतार्थ आम्ही

मा देवेन्द्रजी

      आम्ही संभाजीनगर वासीय आपले आभारी आहोत .आपण राज्य सरकारचे दायित्व आपल्या  खांद्यावर घेतल्यापासुन शहर विकासासाठी  मा आ अतुल सावे यांचे पाठीशी उभे राहिलात !
अतुलजींनी मागणी करावी आणि आपण पूर्तता .
      सर्व प्रथम रस्त्यांसाठी 25 कोटी दिलेत, ते पूर्ण झाल्यावर  आणखी देण्याचे वचन दिले . श्रेयासाठीच झगडणाऱ्या  महापालिकेने रस्ते पूर्ण करण्यास वेळ घेतला !
     त्यानंतर 100 कोटींची बेगमी आपण करून दिलीत . त्या रस्ताकामाच्या उदघाटनाला महापालिकेला 19च्या जानेवारीचा  मुहूर्त मिळाला . या रस्त्यांची कामे लवकर पूर्ण होवो व  आणखी निधी देण्याचा आपला मनोदय पूर्ण होवो !
      गुंठेवारी भागात विकास कामासाठी परवानगी देण्याबाबत  मा अतुलजींनी पाठपुरावा करताच आपण परवानगी दिली .त्याचे फळ सर्व गुंठेवारी भागातील रस्त्यांच्या व अन्य कामात बघायला मिळते !
          कचऱ्याचा प्रश्न आपणाकडे पोहोचला आपण तत्परतेने 90 कोटी दिले . कचऱ्यावर प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी आपण त्याचा फालो अप घेतलयाचे कळते .
        सिडको भागातील नागरिकांना नुकताच आपण मालकीहक्क प्रदान करण्याचा निर्णय घेतला .आणि सिडकोवासींयांच्या आनंदाला उधाण आलाय ! नुसते श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला मात्र आपल्याशिवाय कुणी हा प्रश्न मार्गी लावू शकणार नाही हे आम्हाला ठाऊक होते .मा अतुलजींचा  पाठपुरावा कार्यरत झाला ! सिडको वासीय कृतकृत्य झाले .
      स्मार्ट सिटी प्रकल्पात संभाजीनगर यावे यासाठी आपले योगदान आणि त्यानंतर सिटीबस त्या प्रकल्पात अंतर्भूत करण्यासाठीची आपली भूमिका आपल्या दूरदृष्टीची साक्ष देते !

आम्ही मंदिर प्रश्न आपणा कडे पोहोचवला आपण मार्ग काढण्यात उत्तर शोधण्यात जी तत्परता दाखवली आमच्या भावना जपल्या सर्व संभाजीनगरकर आपले कृतज्ञ आहोत .

              या शहरावर मा अतुलजी सावे यांच्या सह आम्हा कार्यकर्त्यांच्या सर्व मागण्यांबाबत आपण नेहमी सकारात्मक राहिलात ! शेवटी एवढेच ...

कृतज्ञ आम्ही ! कृतार्थ आम्ही !!!
  
               देवेन्द्रजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है
                         
                           - मंगलमुर्ती शास्त्री भाजपा मंडळ अध्यक्ष
      

 
    










Sunday, December 16, 2018

संजय गोसावी वाढ दिवस शुभेच्छा 2017

सांगा कस जगायच
कण्हत कण्हत
का गाणे म्हणत ?
संजय नारायण गोसावी यांना विचारा
ते बरोबर तुम्हाला गाणे म्हणतच जगायला मदत करतील .
उल्हास, दिलीप, अरुण,गजानन आणि बडनेरा  हिच यांची दिल दोस्ती अन दुनियादारी !
परवा अरुण दादा परांजपे आलेले
सगळे संजू संजू चाललेले .
दोस्ती जगावी,पेलावी, निभवावी, ती संजुनीच !
हेच जर अनुष्काला विचाराव तर उत्तर
संजुमामानीच ! ते तिचेही अलगद दोस्त बनून राहातात ,
अनं शुभांगीला विचारल तर संजुमामानीच !
अगदी श्रीनकुल सोबतही  दोस्त बनून राहाणारे संजयराव ,
हसत खेळत जगायला शिकवणारे !!!
त्यामुळेच ते जसे गोसावी परिवारात प्रिय असतात
तसे शास्त्री परिवारातही .
आम्ही शालक मंडळी जराशी ऐदी , आळशात रमनारी
त्यासापेक्ष संजयराव न कंटाळता (आम्हाला) ,
आजही साठीत पदार्पण करतांना ,
आठवातात तेव्हापासून चंटुकडेच आहेत .
हा गुण श्रीनकुलकड़ेही देण्याचा स्वार्थ त्यांनी साधला नाही !
स्वतः एकदम अनुशाशित जीवन जगणारे संजयराव आमच्यकड़ून कधीच अपेक्षा करत नाहीत .
 याचा आनंद अनं दुःखहि आहे .
कुठे आम्ही " जिजाजी' चा ग़ैरफायदा तर घेत नाही ?
संजयरावांची एकषष्ठी साजरी कराविच लागेल
किमान त्यांना तुम्ही साठी ओलांडली हे सांगण्यासाठी तरी !
तेव्हा देवेन्द्रा भारतात ये
रमी चा डाव रंगवुत ,
संजयराव आहेतच मधुन मधुन डब्बे समोर ठेवायला !
(चकल्या , शेव, काजू , बदाम कम चकना म्हणुन )
स्वतः जिम फिट राहातात ,
आम्ही कष्टाने उरळीकांचनला घटवतो ...
ते आमच्या पोटावर "घट' बसवतात ! पुन्हा U K ..
 तर असे आमचे जिजाजी संजयराव यांना साठीपुर्ती निमित्त
शिर साष्टांग नमस्कार . त्यांच्या असेच टकाटक,  जिम्फिट , निरामय आयुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना -अगस्ती

शुभांगी साखरपुडा निमित्त

*ये माय बैस थोडं माझ्या जवळ !*/
*लेकीचा साखरपुडा !*
*कवी : प्रा. विजय पोहनेरकर*
---------------------------------------------------

ये माय बैस थोडं माझ्या जवळ
कळालच नाही माझी लाडाची लेक
एवढी मोठी कधी झाली ते !
सहज कुणीतरी स्थळ सुचवलं
म्हणून विचारून पाहिलं
आणि बघता बघता पुढच्या सगळ्याच गोष्टी
इतक्या फास्ट आणि सुरळीत झाल्या
की आज एकदम
*साखरपुड्याचाच दिवस उगवला !*

माझ्या चिमणीचे दोनाचे चार हात होत आहेत
तिच्या अंगाला हळद लागणार आहे
याचा आनंद नक्कीच आहे
पण एक अनामिक हुरहूर वाटत आहे !

आज साखरपुडा होईल
येत्या तीन चार महिन्यात लग्न होऊन
लेक सासरी निघूनही जाईल !

लग्न होऊन प्रत्येक मुलगीच सासरी नांदायला जाते ही जगरहाटीच आहे
तरीही
तू या घरात नसणार या कल्पनेनंच कसं तरी होतंय
हुरहूर , धडधड , काळजाचा तुकडा पडणे
या सगळ्या शब्दांचे खरे अर्थ मला आज कळतायत !
आता माझीच ही परिस्थिती आहे तर तुझ्या आईचे हाल काय असतील ?
या विषयावर एकमेकाला बोलायची आमची हिंमतच नाही !
समोरा समोर आलं की
मी ही अबोल असतो आणि हल्ली ती ही अबोल असते
पसंती आल्या पासून तुझ्याशी खूप खूप बोला वाटतं
पण शब्दच फुटत नाहीत
म्हणून म्हणलं .........
*ये माय बैस थोडं माझ्या जवळ !*

बघू दे तुझ्याकडे मायेनं
येऊ दे दाटून असंख्य आठवणी
आठउ दे भातुकलीचा खेळ ,
काही गोष्टींसाठी केलेला हट्ट
मी बाहेरून आल्यावर तू मारलेली गच्च मिठी
बाहेर जातांना भरून आलेले तुझे डोळे
आणि आत्ता येतो हे वचन देतांना
तुझा घेतलेला *गोड गोड पापा !*
आणि क्षणार्धात तुझ्या चेहऱ्यावर पसरलेला लाख मोलाचा आनंद !
म्हणून म्हणतो .......
फिरउ दे तुझ्या डोक्यावरून मला हात
लहानपणी सारखा ,
तुला लाख लाख शुभाशीर्वाद देण्यासाठी !
कारण .........
उद्या पासून तुझ्यावर दुसरं कोणीतरी हक्क सांगणार आहे !
*अजून दोन दिवस राहू द्या मुलीला*
ही याचना मला करावी लागणार आहे !
*ते* घर तुझं आणि *हे* घर परकं होणार आहे !
*खरंच तसं होत असतं ?*
होत नाही ......पण मानावं लागतं !

बघ न काय वेडे पणा आहे
तुला समजावायचं सोडून
मीचं हळवा होतोय ,
पोरीचा बाप पोरगी जातांना 
*पालापाचोळा* होतोय !
*पोटचा गोळा देतांना चोळामोळा होतोय !*

बाळ मला खात्री आहे
तू सगळं छान निभाऊन नेशील !
तुझ्या वागण्याने , बोलण्याने , नम्रतेने
सगळ्यांना आपलंसं करून घेशील !
तुझ्या शिवाय *त्या घरात* पानही हलणार नाही
*पण या घराचं आणि आम्हा दोघांचं काय होणार ?* हा प्रश्न कुणीही कुणाला विचारायचा नाही !
कारण ...........
काही काही प्रश्नांची उत्तरं न मिळवण्यातच भलं असतं , तसाच हा एक प्रश्न !

हे झालं आमचं
आणि तुझं ?
बाप रे ! कल्पनाही करवत नाही !
तुझ्या मनाची घालमेल
मी समजू शकतो
प्रत्येक आसवां मागचे भाव
मी जाणू शकतो
पण ..........
पण काही काळजी करू नकोस
सगळं सगळं छान होईल !
लवकरच तुझ्या चेहऱ्यावर
खळखळणार हासू नक्की येईल !

पण का कोण जाणे
पसंती आल्या पासून
तुझ्याकडे पुन्हा पुन्हा पहा वाटतं
आणि मायेनं जवळ घ्यावं वाटतं
म्हणून म्हणलं .....
*ये माय बैस थोडं माझ्या जवळ !*

*प्रा. विजय पोहनेरकर*
*9420929389*
*औरंगाबाद , 11/2 / 2018.*

Saturday, December 8, 2018

सुहासकाकुचा वाढदिवस

आज सुहासकाकुचा हॅपी बर्थ डे !
            सुहास काकु म्हणजे लहानपणीपासून " कर्त्यव्याने घडतो माणूस ' शिकवत आलेली ! कर्त्यव्याकडे कधीही दुर्लक्ष होऊ न दिलेली ...
       दिलीपरावांनी "त्या गावीची 'आठवण दिली .मी ते गीत आत्ता वाचले . गाणं ऐकायला आम्हाला तर काकूंचाच आवाजात ते आठवते जरी ते गजानन वाटवे यांनी फेमस केले . गीताचे बोल वाचल्यावर  डोळ्यापुढे काकू तात्या अन बार्शीटाकळी आणले तर .. एक वेगळा आयाम गीतातुन  आपल्या परिवारासाठी मिळुन जाऊ शकेल !
        मागे टाकळीला गेलो होतो बांधकाम सुरू होते काकू एकटीच तिथे होती . मनात काकू किती हेकड आहे हि सहज भावना  झाली  होती !
         ...आणि गीत वाचण्यात आले काही ओळी गेल्या आयुष्यात घेऊन जाणाऱ्या होत्या ! क्षण जगून झालेले, जुन्या पानांत जपावे ,आणि डोळ्यांतील पाण्यानेच, नवे पान उलटावे!! तसे झाले ..... मग काकूंचे टाकळी प्रेम उलघडलेलं ! तिचा हट्ट चूक का ?  या वयात पूर्वायुष्य , जे सुखाने समृद्ध होते बार्शीटाकळीतच  , तिथेच अडकलेलं !!

त्या गावी, त्या तिथवर, चल झरझर मना पुन्हा!
ती निरुंद पायवाट
वळत वळत जाय आत
ते शिवार, ती विहीर,
पुढे एक लिंब जुना!

            तात्यांसोबतचे सुखद क्षण तेही तिथलेच ...

ते यौवन ती प्रीती
ती ओळख ती भीती
त्या शपथा ती रुसनी
ते समेट क्षणा क्षणा
    
        शिवाय  तिथेच ...
" रंगविलेले गोड सुख '   आधार असतो  गीताचाही अन काकूंच्या आयुष्याचाही ! नकळत काकूंचे टाकळी प्रेम गोड करावेसे वाटते शहरातील समृद्ध नागरी व्यवस्थेच्या तुलनेत ! 
     काकूंचे आयुष्य निरामय सुखदायी तिथेच होऊ शकते .  तिला शुभेच्छा देताना मागणं एवढंच कि  तिच्या मनाप्रमाणे नीटनेटकं ,टापटीप,  चिरतरुण आयुष्य लाभू देत , सगळ्यांना संपन्न तर तिने केलं आहेच सर्वार्थानं !!
                        - अगस्ती 
            









प्रशांत दिशा ऍनीवरसरी

दोन वर्षांपूर्वी येथील ओंकार बालवाडीत
एक मुलगी मुलाखतीला आली . मतिमंद ,मानसिक विकलांग मुलांना (ऑटिझम ) सांभाळण्यासाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी नेमणूक व्हायची होती .
     मुलीला विचारण्यात आले .नाव , गाव, वय शेवटी आणि ... शिक्षण ?
तिने उत्तर दिले , शिक्षण काय सांगणार ..." या व्यक्तीचा नवरा म्हणून 20 वर्ष सांभाळ केला  , लग्न झाल्यापासून चकार शब्द कधी काढला नाही ,स्वतः मूक होत  त्याला बधिर ठेवले , तो मुकाट्याने स्वतः ची भाजी स्वतः शिजवायचा मलाही खाऊ घालायचा !माहेरी कधी गेली नाही जायचा विचारही केला नाही , हा बिघडला तर कुठे जाईल नेम नाही ..... '
       आणि तिचे सिलेक्शन झाले ... qualification काय ते विचारलेच गेले नाही . सगळ्या गोष्टी नवऱ्याच्या वर्तनातून शिकल्याचे ...अन मग सगळा आनंदी आनंद !

 आता तिला दोन वर्षातच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणार म्हणे ! अशा त्या नवऱ्याचे नाव सांगून तिने जी नोकरी मिळवली ते नाव होते ....


प्रशांत अन उमेदवार होती दिशा !

आत्ताच प्रशांत नी ही भावभिनी कहाणी मला सांगितली फोनवर ! बायकोला कसे हुशार केले म्हणे !!!
मलाही त्याचे कौतुक वाटले अन दिशाचेही ! कारण त्याच्या लग्नाचा आज 23 वा वाढदिवस अत्यंत आनंदात जशे दोघे आहेत तशेच घालवतात ! कुठेही कुरबुर नाही किरकिर नाही !

तो राग आला की बाहेर कोंबड्यामागे फिरतो अन ती घरी कांदा लसूण अद्रक मसाले काढून ठेवते.... समेवर दिपकदादां सगळे धाक बाजूला काढुन  wish करायला पोहोचतो ! अस्मादिकांना अस्मान ठेंगणे होते कारण रमिचा डाव आज प्रशांतच्या नावे करायचा असातो ....जय जगदंब !

अंनिवरसरीच्या मनःपुर्वक शुभेच्छा !- अगस्ती 

Saturday, December 1, 2018

2 डिसेंबर वाढदिवस दोन स्वयंसेवकांचा

आज आपल्या परिवारातील  दोन स्वयंसेवकांचे वाढदिवस !
         दत्ता शास्त्री नगर कार्यवाह अकोला , डॉ हेरंब शास्त्री जिल्हा व्यवस्थाप्रमुख परभणी !
         दोघांची देहबोली वेगवेगळी . अनोटॉमी वेगवेगळी !  दत्ता प्रचंड कष्टीक तर तुलनेने हेरंब किंचित सुस्त . (किंचित शब्दाला अनेकांचे आक्षेप येतील, मात्र आज त्याचा वाढ दिवस आहे !)
         मात्र संघकार्य करतांना दोघेही समर्पित भावनेने ताकदीने करताना दिसतात . दत्ता कुठल्याही कार्यात अग्रेसर असणारा मात्र हेरंबचे तसे नाही ,  तरी संघ कार्यात तो प्रचंड कष्टीक असतो . आज परभणी शहर व ग्रामीण जिल्ह्यात त्याने खूप नाव मिळवले .
      कुणाहीकडे परिवारातील काही कार्य असल्यास दत्ता शास्त्री पाहिले आठवल्या जातात , अन तेही समर्पित भावाने कार्यरत होतात . मी समर्पित यासाठी लिहितो की कुणी माझें नाव घ्यावे ही अपेक्षाही नसते !  सगळ्यांची आवभगत, वास्तपुस्त करावी ती दत्तानीच .
        आई तात्यांचे संस्कार आणि तीन बहीनिंच्या  आशीर्वादाने ,  दत्ताला घरात एकुलता असूनही "आळशी' बनू दिले  नाही ! (Thanks to माई आक्की राणी ) त्याचे फार लाड झाल्याचे कधी दिसले नाही .
          कार्यक्रमात  स्वयंपाकाकडे लक्ष देण्यापासून भाज्या , किराणा आणण्यापासून ते आग्रहाने  वाढण्यापर्यंत , आणि कार्य पूर्तता झाल्यावर रात्री आमच्या सारख्या (कार्यात खायला काळ अन भुईला भार असणाऱ्या ) कार्यकर्त्यांच्या मनोरंजनासाठी पत्त्यांसह तत्पर असणाऱ्या  शास्त्री परिवारात दोघांचे स्थान अभेद्य आहे एक दत्ता शास्त्री , दीपक शास्त्री   ! श्यामदादा  , दिपकदादां या दोन दादांमुळेच  मुळे शुभागींचे लग्न सुखकर झालेले , अस्मादिक निश्चिन्त होते .
        हेरंब शास्त्री घरात शेंडेफळ , त्यात परभणीला,  अबोल, सुस्त त्यामुळे नातेवाईकांकडून काहीसा दुर्लक्षित ! व्यवसाय निमित्ताने परभणीला अनोळखी गावात .
         "कितीक जन परभणीतून जातात मात्र माझ्याकडे येत नाहीत , तुझ्या शी संपर्कात राहतात ,मला साधा फोन करत नाहीत ' असे तक्रारवजा  तुणतुणे काहि वर्षांपूर्वी  वाजवायचा ! बाबीताईला , मला घरात मोठे असल्याचा फायदा होता ....तो शेवटचा .
           म्हटले " याचा दोष तुझाच ! ' आणि त्याने स्वतः चे विश्व उभे केले परभणीत .  "अरे वो काम डॉक्टरसाब देख लेंगे ' असे जेव्हा इतर लोक बोलू लागतात तेव्हा उर अभिमानाने भरून येतो . 
       या दोन्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "अधिकारी ' व्यक्तींना वाढदिवस शुभ शुभ ! सुदीनं सुदिनम जन्मदिनम तव म्हणताना त्यांच्या समर्थ साथीदार सौ लीना आणि सुषमा यांना जन्मदिनम मधुरं मधुरं करण्याचे सुचो यासाठी जगदंबे कडे प्रार्थना !


चरैवेति चरैवेति
                 यही तो मंत्र है अपना
नहीं रूकना नहीं थकना,
          सतत् चलना सतत् चलना
यही तो मंत्र है अपना,
            शुभंकर मंत्र है अपना ।


   दोघांच्याही राष्ट्र कार्यास मनःपुर्वक शुभेच्छा ! यज्ञेन यज्ञ मयंत देव: ....