पानं

Tuesday, January 31, 2017

वाळपयी मतदारसंघ वचननामा

                    श्री सत्यविजय सुब्रॉय नाईक
वाळपोई मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार

प्रिय मतदार बंधू भगिनींनो

गोवा विधानसभेच्या या निवडणुकीत 4 फेब्रुवारी 2017 एक इतिहास घडनार आहे . वाळपोई मतदार संघ "जाएंट किल्लर ' ठरणार आहे .गेल्या 50 वर्षापासून एकाच घराण्याने मुद्दाम विकासवंचित ठेवलेल्या या मतदारसंघाला नवं नेतृत्व लाभणार .
        प्रधानमन्त्री नरेंद्र  मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्तुत्ववान ,धाडसी, वेगवान विकासाकड़े नेण्यासाठी खंबीर पावले उचलली . त्यांनी साथीला श्री मनोहर पर्रिकर व श्री श्रीपादभाऊ नाईक यांना घेवून दोन केंद्रीय मंत्रिपद गोव्याला देवुन गोमंतकांचा सन्मान केला आहे . संरक्षण मंत्री श्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली , मार्गदर्शनाखाली व आपल्या आशीर्वादाने गोव्यात भाजपचे कमळ च फुलणार यात शंका नाही .व केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्यामुळे केंद्रीय धोरणं  व योजनां चा लाभ गोव्याला मिळणार आहे .   

        देशाला भ्रष्टाचार मुक्त ,विकसित, सक्षम बनवण्याच्या मोदिजींच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरावण्या साठी वाळपोई तील मतदारांनी विकासाच्या राष्ट्रीय प्रवाहात सामिल व्हावे .

मी सत्यविजय सुब्रॉय नाईक, वाळपोइच्या सर्वांगीण विकासा साठी अहोरात्र झटण्याचा निर्धार व्यक्त करून खालील योजनां राबवण्याचे वचन देत  आहे . ...


                             साधन सुविधा विकास

विविध क्षेत्रातील जानकारांचे मार्गदर्शनाखाली सत्तारिचा विकास 

वाळपई मतदार आवाहन

प्रिय राष्ट्रभक्त माता बंधू भगिनीनो
मागील कशी महिन्यां पासुन आपल्या देशात एक आश्वासक कणखर देशभक्त सामान्यतल्या सामान्य माणसाच्या विचार करणारे आपल्या हिन्दुस्थानच्या प्राचीन परंपरा , संस्कृती,विचारधारा जपणारे एक समर्थ नेतृत्व मा नरेंद्र मोदी यांच्या रूपाने कार्यरत झालेले आहे . "मेक इन इंडिया ' मार्फ़त नाव तरुणांना होणार असलेल्या व्यवसाय संधी असोत , कि " स्टार्ट अप इंडिया ' स्टैंड अप इंडिया  द्वारे नाव उद्योजकांसाठी मिळणार पाठबळ असो , महिला दलित वंचित सनाजासाठी उद्योग सुरु करू पहाणाऱ्यासाथी मुद्रा सारख्या योजनां असोत , जनधन सारख्या योजनाद्वारे गरीबातल्या गरीबासाठी उघडली गेलेली बँकांची दवारे असो , एक विकास गंगाच आपल्या दारी आल्याचे आपन रोजच्या द्रुक- श्राव्य माध्यमात वर्तमान पत्रात वाचत असतो .
            वरील परिस्थिती निर्माण होण्यामागे अनेक देशभक्त नागरिकांचे अथक परिश्रम , त्यांचा राष्ट्रहितैषी दृष्टिकोण , त्यासाठी करावा लागलेला असीम त्याग व् बलिदान आहे .
          वरील परिस्थिति खालच्या राज्याच्या पातळीवर आणण्याचे महत्वपूर्ण कार्य गोवा राज्य सरकार रूपाने मा मनोहर पार्रिकर यांच्या दूर दृष्टिकोनातून साकारले आहे . महिला सबलीकरण सशक्ति करन या क्षेत्रात गोवा राज्य संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर नेण्याचा काम या सुपुत्रांनी करून ठेवल आहे .
          आपल्या सर्वांसाठी अजुन एक संधि विधानसभा निवाडणुकी निमित्ताने आपल्या समोर चालून आलेली आहे . या निमित्ताने विनम्रतापूर्वक आवाहन करतो की " मतदान करणे हे आपले पवित्र कर्तव्य असून आपले आपल्या कुटुंबियांचे , नातेवाईक मित्र परिवाराचे मतदान आग्रहाने करून घ्यावे व शत प्रतिशत मतदानाचे उद्दीष्टय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत ' .
     आपल्या भागाचा विकास करू शकणाऱ्या ,राष्ट्रभक्त विचारांशी बांधीलकी मानून त्या विचारांशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहणाऱ्या  योग्य व सक्षम राष्ट्रीय पक्षाच्याच पाठीशी आपण उभे राहावे व् दिल्ली पासून गल्लीपर्यंत होत असलेल्या सकारात्मक परिवर्तनाचा हिस्सा बनत , मतदान करून  विकासयात्रा शेवटपर्यंत  पोहोचवावी .
   काही लोक भाषा ,जाती , प्रांत यांच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्याचा उपद्वयाप करात आहेत . त्यांच्या भूल थापान्ना बळी न पड़ता निर्भिड पणे मतदान करावे


        

वेलिंगकर सरांना अनावृत्त पत्र

सर
      "पूर्ण होंगे शूल सारे, मित्र होंगे सब विरोधक ' या आशेने राष्ट्रभू की अर्चना करणारे आम्ही , वेद मंत्रा हूँ आम्हा वंद्य वंदे मातरम समजनारे आम्ही आज कुठे पोहोचलो आपण मागे वळून पहातांना यांचा विचार केला ? " परम वैभवं ' राष्ट्र निर्माण करणार होतो आपण अशा राजकारणाने होईल राष्ट्र निर्मिती ?

मातृभाषेतुन प्राथमिक शिक्षण ही संघाची भूमिका आहे परंतु टोकाचा आग्रह "समाज मन तयार न  करता हे कार्य तडिस न्या 'अस कधी संघांन म्हटले असेल ऐसे मला वाटत नाही . आज गोरक्षण , स्वदेशीचे , सौर तारीख  प्रचार प्रसार ऐसे किती तरी विषय संघाचे स्वयंसेवकाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. राम मंदिर निर्माण  हां ही अत्यन्त जिव्हाळ्याचा स्वाभिमानाचा विषय , लाठ्या आम्ही खालेल्या त्यासाठी . मात्र जोपर्यंत समाज मन आपण तयार करत नाही तोपर्यंत आम्ही कार्यरत राहु !
    संघ "मी' सुरु केला , मी  आणला , आम्ही आणला वगैरे ऐकायला मिळते इथे ! सर माझ्यातला "मी ' काढायाला संघात शिकवले जाते . ... अशी माझी धारणा आहे अन या " मी ' ने संघ मोडित काढन्याचे मनसुबे हिच मंडळी ईच्छितात तेव्हा माझ्यातला स्वयंसेवक उद्विग्न होतो . परिवारातील मार्गदर्शकानी भरकटल्या सारखे करायचे तर कुटुंब कुठल्या दिशेने जाईल ? अन संघ येथ पर्यन्त आणायला असंख्य प्रचारकांनी ,पूर्ण वेळ कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनाची होळी केली हे तुम्हीही मान्य कराल !

 पथ का अंतीम लक्ष्य नही है,
                    सिंहासन चढते जाना।
सब समाज को लिये साथ मे,
                       आगे है बढ ते जाना।।


     त्याग संघांन शिकविला " या अन द्या ' कुठल्याही अपेक्षेशिवाय हे संघानी आपल्यात ओतलं ! संघ कार्य हे ईश्वरी कार्य आहे हे पुढे जाणारच आहे त्यासाठी तुम्ही किंवा आम्ही थांबलो तर ते थांबेल ऐसे नाही . कुणी नविन प्रेरणा घेईल अन काम पुढे नेईल , मात्र तुमचे नाव संघ  इतिहासात कुठल्या पानावर असेल ?

 आपली मुळ जीवन निष्ठां , शिस्तितले आयुष्य, माफक आचरण , संघटनात्मक मर्यादा यांची जाणीव ठेवतच सर्व परिवाराची वाटचाल सुरु असते . प्रत्येकाचे अंतिम लक्ष्य , साध्य ठरलेल असत. साधनं वेगवेगळे असू शकतात . राष्ट्र प्रथम ... ही भावना आपल्या या कृतीने भंगली एव्हढे मात्र खरे .
        सर तुम्ही आम्हाला हवेतच मात्र राजकारणातील आरोप प्रत्यारोपां पासून दूर असलेले सर आम्हाला हवेत . पुन्हा तोच शिस्तीचा आग्रह धराणारे ...  शाखेवर ... नमस्ते सदा वत्सले करत ...  !
          आपण भाषा सुरक्षा करुत ,त्यासाठी समाज मन तयार करून ! इंग्रजी शाळांना विद्यार्थी पाठवणाऱ्या पालकांचे प्रबोधन आपण करूत !  शाळां मध्ये विद्यार्थिच नसतील तर अनुदान कसे देता येईल  ?

               शेवटी ज्या लोकां वर तुम्ही विश्वास ठेवताहेत ती तरी " सुदी ' आहेत का ? का आज सरांचा वापर करून उद्या "काम सरो वैद्य मरो ' करणारेच आहेत ! राजकारणात हे सर्व सहज  असते .
       
          100% समाजकारण करणाऱ्या संघाला निहित स्वार्थासाठी राजकारण करत आपण बदनाम तर करत नाही ना . कुण्या व्यक्तीच्या चुकीने संघातील त्या असंख्य जीवनाची आहुति देणाऱ्यांच्या त्यागाला डाग लावू नका . संघाला व्यक्ति सापेक्ष न बनवता त्याच गुरु पुढे भगव्या ध्वजापुढेच नत मस्तक होत ..... !
               
                            - मंगलमुर्ती शास्त्री
         
         
       
      

मामाश्री दादामामा शुभ चिंतन

आज आमचे मामाश्री दादामामा alias प्रकाश पांडे यांचा वाढ दिवस .
       खरतर दादामामाशी आमचं नातं " अरे तुरे 'चे , आमच्या मुळे सगळ्यासाठी ते नातं तसेच झालेलं ! मामानीही ते तसेच जपलेल ! आजही मामा वयस्कर झाला हे मन मानत नाही . दादामामा असाच चिर तरुण राहो ही कोटेश्वर चरणी प्रार्थना !
          ति दादामामांच माझ नात एका गुरु शिष्याचं सुद्धा ! त्यांनी मला गणित शिकवालेलं  . त्यामुळेच मी गणितात पक्का होतो ... त्यांनी डस्टर फेकून मला कधी मारले नाही म्हणुन त्यांचे आभार ही मानायलाच हवे . कारण या " डस्टर ' अटैक चे अनेक शिकारी घरात आहेत !  पण एव्हढया तळमळीनं शिकावन्याच काम केलय . असा आमचा मामा ! आता आक्कानी त्याला एकदम जेष्ठ केल, अर्थात जेष्ठत्वाची भुमिका यथायोग्य मामाश्री निभवतच होते , मात्र अक्काच्या जीवंत आशीर्वादा सह !
     मी सर्वात मोठा भाचा म्हणून advantage मोठ्ठा ,फायदा घेत बरेचदा मामाला दुखावलेही मात्र लहानपणी अंगाखांद्यावार खेळवतांना खाल्लेल्या ताईच्या पोराच्या लाथा , आजही सहन करत मामानी प्रेम कधी आटू दिले नाही !  आणि दिपक दादा , दत्ता ते राणी, पल्ली पर्यन्त सर्व शास्त्री परिवारात मामा म्हटले तर बंडुमामा / दादामामाच डोळ्या समोर यावा . अशी प्रतिमा उभी केली . मामा गोव्यातुनच शीर साष्टांग नमस्कार घालतो . दिर्घ निरामय आयुष्यासाठी प्रार्थना करतो .... लवकरात लवकर मामा सोबत डब्बा - सिंडिकेट- रमी खेळन्याचे भाग्य प्रशांत दीपकदादा देवेंद्रला लाभो ! !

ता क : आता  रमी खेळतांना देवेंद्र 100 टक्के चिड़णार नाही जैसा तो बिजुसेठ सोबत मामा खेळतांना चिड़त होता !!!
     

       मैडई वाईल्ड लाइफ सैंक्चुरीत साट्रे गावात प्रचारात फिरतांना                                       -                                        अगस्ती