Monday, October 26, 2020
बाबीताई @57
Friday, October 23, 2020
अजयदादा शुक्ल @65
आज अजयदादा आपला वाढदिवस साजरा करत आहे .
अजय दादा एव्हाना आपल्या ग्रुपला चांगलाच परिचयाचा झालाय !
मी ग्रुपमध्ये इन्ट्रोड्यूस करतांना त्याच्याबद्दल लिहिलेलं !त्यानंतर दादाला भेटून आल्यावर पल्लविने लिहिलेले .....
*अजूदादा,नमस्कार,तुला भेटून आनंद झाला,तुझी दैनंदिनी ऐकून फार आनंद झाला,सकाळी 3 वाजता उठून वेदांचे अध्ययन करतोस,कुळ कुळाचाराचे वैभव वृद्धिंगत करत असून यातून मिळणारा आनंद हाच जीवनात यश देणारा आहे,वेदस्वराच्या कंप नांमुळेजडत्वाला चैतन्य प्राप्त होते,निवृत्ती चे आयुष्य पैश्याना न वाहून देता पुन्हा नव्याने आयुष्याचा अर्थ शोधू लागला हे भूषणावह आहे,या काळात स्वतः मध्ये डोकावण्याची सवय लागली तर पुढील आयुष्य सुखावह होते,तुझ्याकडून ही गोष्ट प्रेरणादायी असून अमच्यामध्येही असेच बदल होवोत यासाठी तुला मनोमन नमस्कार.*
एकूणच अजयदादा हे बहू आयामी व्यक्तिमत्व ! लहानपणी अमरावतीला जाताना त्याच्या क्रिकेट चे आम्हाला आकर्षण होते ....
खरे तर दादा ट्युशन क्लासेस चालवायचा ! आज तोच व्यवसाय continue केला असता तर ....
दादाला दुर्दैवानं बँकेत नोकरी लागली ...अन आनंदी आंनद झाला !एक मोठा व्यवसायी/बिझिनेसमन म्हणून आज दादा आपल्यात असते .कारण शिकवणे हा आजचा रोरिंग बिझिनेस आहे . दादांनी त्या काळात स्वतःचे नाव केले होते अमरावतीत .
अर्थात दादांनी निवृत्ती नन्तर शेती खात्यात अन पल्लवीने उद्घृत केल्यानुसार वेदभ्यासात वगैरे स्वतःला गुंतवले !
" मित्र जोडण्याच्या बाबतीत तर अजू प्रभावर गेलाय ' अस त्याच कौतुक आत्या सांगायची . खरेच , भाऊ मित्रांच्या बाबतीत नशीबवान होते , खूप मित्र त्यांनी जोडले तसे अजयदादानी सुद्धा !
असे आमचे अजय दादा आज 65 पूर्ण होताहेत कुणाला सांगितले तर मला वेड्यात काढतील पण हे खरं आहे . दादांनी असेच निरामय आयुष्य सेंच्युरी साजरी करतांनासुद्धा अनुभवाव यासाठी शुभकामना - अगस्ती
Sunday, October 11, 2020
सुमन आत्या @87
आज सुमन आत्याचा वाढ दिवस ! डोक्यात आत्या या नात्याविषयी काही आठवायचा प्रयत्न केला तर ......
बहिणाबाई या थोर कवियत्रीची रचना सहज आठवली . त्यांनी लिहिले मात्र ...
माय म्हनता म्हनता
ओट ओटालागी भिडे
आत्या म्हनता म्हनता
केवडे *अंतर* पडे
खरचं मी नात्यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा आत्या किंचित दुर्लक्षित नात वाटलं .बहिणाबाईंच्या नातं उलघडणारी जी कविता त्यातही त्यांना आलेले अनुभव असतील कदाचित , पण त्यांनी काका आत्या वगैरेंना दुर ढकललं .आई मामा मावशी जवळ च्या तर ..बाप काका आत्या ....दूरच्या
कदाचित रचना लिहिणाऱ्या बहिणाबाई सासुरवाशींनीच्या नजरेतून लिहित्या झाल्या असतील .....असो !
खर तर विषय सुमन आत्याच्या वाढदिवस अभिष्टचिंतनाचा ! सुमन आत्या नी मात्र *अंतर* पडू दिले नाही . तिच्या लहान भावाचे मुलांना तिनं भारीच लळा लावला . लहानपणापासून आम्ही सुट्या लागल्या की आत्याच्या घरी त्या गोवर्धनचाळीत जायचो . अन तिथून पुढे आजोळी . स्वतः उपाशी तापाशी राहत आपली ड्युटी बजावत घरी आम्हा सगळ्यांचे लाड करायला तयार !
बर झालं आम्ही वर्षातले काहीच दिवस तिच्या कडे असायचो .... नसता सगळेच " *बबड्या'* चे अवतार झालो असते . अमर्याद लाड करणे तिचा जन्म सिद्ध हक्क आहे .
तर अशी हि आमची आत्या . कष्ट तिच्या पत्रिकेत लिहिलेले जन्मापासून . सुखाचे दिवस कशाशी खातात तिला माहीत नाही . अर्थात तिची इच्छा ही नाही! पार पायानं लंगडत का होईना तुमची आवभागत झालीच पाहिजे यातच तिला सुख .... अगस्ती माझ्याकडे खातच नाही म्हणत ती खाऊ पिऊ घातल्या शिवाय राहत नाही .
तिनं स्वतःच्या बहीण भावाना जसं जपलं तसेच दीर नन्दाना सुद्धा ! त्यामुळे घरी पाहुण्यांचा राबता नेहमीचाच . तरीही तिची तक्रार असतेच "तो येत नाही , ती येत नाही '
अस्मादिकांना अत्याशी भांडताना भल्ली मजा येते !
तिच्या कष्टाची आठवण झाली तरी अंगावर शहारे यावे इतके ! सगळे स्वतः हुन ओढवून घेतलेले . नोकरीत तिनं यवतमाळ चांदुर बाजार तळेगाव दशासर ते अंजनगाव बारी असे अपडाऊन झेलले ..... आता तुम्ही म्हणाल त्यात काय मोठे !
मी शेवटच्या तिच्या अंजनगाव बारी च्या ड्युटीचा साक्षीदार आहे . यशोदा नगर ते राजपेठ शेअर रिक्षा तिथून बडनेरा शेअर रिक्षा तिथून अंजनगाव शेअर रिक्षा किंवा बस सकाळी जाणे दुपारी निघणे ..... त्यात काय मोठे असंही तुम्हाला वाटू शकते ! पण हे सुमन आत्याने करणे यात कष्ट दडलेले आहेत . इतरांनी करणे अन सुमनआत्या ने करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे . तिचे सोवळे ओवळे तिला बाहेर च पाणी सुद्धा निषिद्ध करत असे अन मग अक्षरशः शब्दशः उपाशी राहत ती ड्युटी . याला खूप मोठा निग्रह लागतो . घरून पाणी पिऊन निघाल्यावर घरीच पाणी पिणार . हि आहे सुमन आत्या !
सुखाचे दिवस दिसणार आता , शेवटचा पूर्ण पगार घेऊन घरी जातच होती का रिक्षां नी अपघात केला , तिला जायबंदी केले . हे सगळे असेच तिला सतत झेलावे लागले . सिलेंडर अपघात तर भीषणच होता .
सासुरवशींनीच्या सर्व कथा बहुदा तिच्या नशिबी आलेल्या ! कायम दबलेल्या स्वरात जीवन गेलं . (हा माझा अंदाज ) तिनी आजपर्यंत कधी सासरच्या मंडळी बद्दल काहो सांगितल्याचे मला आठवत नाही . सुमनचे प्रतिनाव *सहन* ठेवावे .... आजच्या मुलींनी शिकावं !
आमच्या नशिबाने स्व बाळासाहेब (आत्याचे यजमान) प्रभाकररावांच्या मुलांचे "लाड 'च करायचे . त्यांनीही खूप प्रेम आम्हा चौघा भावंडांवर केले . साळ्याच्या मुलांकडे विशेष लक्ष द्यायचे . या सगळया गोष्टींमुळे कधीही सुमनआत्याला चुकवून अमरावती ओलांडवत नाही .
" *आणि घरी गेल्यावर खोट खोटं रागावणे मग हळूच जवळ घेणे . निघताना डोळ्यात पाणी आणणं . अस निर्व्याज प्रेम ! खरच आपण किती नशीबवान ''* मिनल म्हणतेय अन ते शत प्रतिशत खरंय .शुभांगी साठी इतक्या व्याधीं घरी ठेवून आत्या लग्नाला हजेरी लावती झाली . बोलण्याची सुरवात " माझी नात कशी आहे ? ' अशीच होणार . मी आलो न माझ्याविषयी विचार म्हणत आमची भांडणाला सुरवात !!
अशी आमची आत्या *सुमनताई देशपांडे* ,यशोदानगर अमरावती , आज 87 पूर्ण करत आहे . तिच्या शतकी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना टकाटक, निरामय , आंनदी आयुष्य दे *माय अंबाबाई* इतकंच मागणं .
या निमित्तानं तिचे गुरू *सद्गुरू नारायण गुरू* महाराजांना साष्टांग दंडवत . छान सुखाचे आयुष्य वाटेला येऊ द्या , गुरू चरणी विंनती .
- अगस्ती
Friday, October 2, 2020
शिला मावशी
माय सांगतो
आस असता
जाणीव
तव स्पर्शाची
मावशीच ती
भरून काढी
उणीव त्या
कुशीची
अशी आमची मावशी सौ शिला भास्करराव कुलकर्णी अर्थात शिलामावशीचा आज वाढदिवस ...मावशी बद्दल खूप काही खूप जणांना लिहिता येईल .असं हे नातं त्यातही आई च्या पश्चात या नात्याने महत्व अधिकच !
आम्ही वैभवी मिळे मावशी ... (आज एकुलत्यांच्या जगात दुर्मिळ होत चाललेले मामा मावशी ) असही आजच्या परिपेक्ष म्हणावे लागेल .
हेरंब देवेंद्र अगस्ती बाबी साठी शिलामावशी हे " दैवत ' कारण कळायला लागल्या पासून किंबहुना पहिला घास भरवण्यापासून असेल कदाचित शिला मावशीनंच आम्हाला वाढवलं आई असताना अन नसताना सुद्धा !
पक्षी उडालं आकाशी तिचं लक्ष घरट्या पाशी तसं मावशी भारताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरते मात्र बाबी अगस्ती *हेरंब* दिवू कडे लक्ष ठेवूनच असते ....हेरंब कडे जरा पार्सलिटी 😄
हे प्रेम सतत बरसत राहो हिच रेणुके चरणी मागणं - अगस्ती