पानं

Friday, May 22, 2020

नरदेह स्तवन

अत्यंत सुंदर असे वर्णन समर्थानी नरदेहाचे केलेले , पहिल्या दशकात दहाव्या समासात ! *नरदेहस्तवन*
   
*धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो* ..
 अशी सुरवात करत खूप छान गुणवर्णन नरदेहाचे करतानाच , नरदेह श्रेष्ठ का आहे हे हळूच विशद करतात समर्थ . सारासार विचार करण्याची जी ताकद या देहात आहे ती प्राण्यांमध्ये नाही .
 विचाराने चालणारे ते सिद्धी प्राप्त करतात वेगवेगळ्या विषयात तज्ञता मिळवतात .

 येक मनोसिद्ध,येक वाचासिद्ध।
      *येक अल्पसिद्ध, येक सर्व सिद्ध*

या सिद्धि प्राप्त लोकांचं छान वर्णन समर्थ करतात .आपण हे सतत अनुभवत असतोही 
        आम्ही पहिले तर चांगले काही करण्याचं  मनातच काही आणत नाही .मग घडणार काय ? मनोसिद्ध होण्याचं तर दूरच राहिले .

        मी स्वतः असं बरेचदा अनुभवतो कि काही लोक मनात काही आणतात अन त्याप्रमाणे घडत जाते  , काही जे बोलतात ते घडत जाते .काहींना लहानसहान गोष्टीत सिद्धि प्राप्त असते तर काही सर्व बाबतीत ! त्यांना आपण  सिद्धि प्राप्त म्हणतो ते संत सज्जन असतात .

आता माई रागे भरेल मी देत असलेल्या उदाहरणाने ...आम्ही पत्ते खेळतो दीपक दादा ...आणि हा जोक्कर म्हणत पत्त उचलतो अन जोकर काढतो मी त्याला वाचासिद्ध म्हणतो !!!
      गमतीचा भाग जाऊ देत , असे लोकं आपण अनुभवत असतो रोजच्या जीवनात !

*म्हणौनी नरदेह श्रेष्ठ । नाना देहां मध्ये वरीष्ठ* । *जयाचेनि चुके अरिष्टय।यमयातनेचे...*

अस वर्णन करता करता समर्थ अहंकाराने पीडित माणसाची गुर्मी उतरवतात अगदी सहजपणे !  उदाहरण देत याच समासात .

श्रेष्ठ आहे म्हणून कसेही वागले तरी चालेल असे नाही

तैसा नव्हे नरदेहो । इच्छा जावं अथवा राहो।
     .....याला कोणी पकडू शकत नाही असे नाही . नरदेह जपणे आवश्यकच आहे .मूर्ख माणूस उत्तम निर्व्यंग ( इतुके हे नसता वेंग।) देह मिळालेला असताना परमार्थ विसरून , मायेच्या जाळ्यात अडकून माजतो , त्याच्यात भ्रम पैदा होतो अन मी मी सुरू होते ते खूप छान वर्णिले समर्थांनी ... काय म्हणतात समर्थ ?

*मृत्तिका खाणोन घर केले* । *ते माझे ऐसें दृढ कल्पिले* ।
*परी ते बहुतांचे ,हे कळले* । *नाहीच तयाला ....*

माती खणून बंगला बांधला अन माझे घर माझे घर म्हणून फुशारक्या मारनाऱ्याना ते घर त्याचे नाही हे कळतच नाही !!

म्युषक म्हणती घर आमुचे ..आणखी कोण कोण ? पाली, मक्षिका, कातीनी, मुंगळे मुंग्या सॅप, विंचू, मांजरी कुत्रे,  वाळवी , पिसवा ....पशु घरचे नोकर दासी इतर माणसे , मित्र, चोर अन सरकार सुद्धा !

असे सगळे जण घर माझे म्हणतात हा मूर्खही बरळतो घर माझे , अखेर घर जड होते सोडून दुसरीकडे जातो ...

ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचिती ।
     *जन्म दो दिसांची वस्ती । कोठे तरी करावी ।*

जस घर आपले नाही तसे देह सुद्धा आपला नाही ! तो ही बहुतां कारणे निर्मिले ...कसे ! माणसाच्या डोक्यात उवा , एखादे गळु झाले का त्यात किडे, पोटात जंत , दाताला कीड कानाला कीड लागली का मग गोमाशा .... अशा बहुतासाठी ही तर हाच देह आहे ...अन मग मी पणा कशासाठी !

*ऐसें शरीर बहुतांचे । मूर्ख म्हणे आमुचे ।....*

मग देह कारणी लागायचा असेल तर परमार्थ महत्वाचा नाही तर आला तसा गेला ...

देह परमार्थी लाविले । तरीच याचे सार्थक जालें ।
 नाही तरी हे वैर्थ चि गेले । नाना आघाते मृत्यू पंथे ।।

               बाकी या मूर्ख नरदेहाचे वर्णन पुढे समर्थ करणारच आहेत .... मी पाहिले दशक संपवले वाचून .दासबोधाची वाचनात सुद्धा एक लय आहे त्या लयीत वाचले तर पटकन घुसते डोसक्यात ! मग होऊन जाऊ द्या  दासबोध पारायण ..बघा काही घुसते का  डोसक्यात !!

समर्थांच समग्र वाङ्मय एका अँप वर उपलब्ध आहे सगळ्यांनी  आपल्या मोबाईल मध्ये उतरवून वाचायला सोयीस्कर आहे .samagra Ramdas या नावाचे अँप

चला हा लॉक डाऊन सुफळ संपुर्ण होऊ देत....

जय जय रघुवीर समर्थ .

दासबोध ग्रंथ कैसा ?

दासबोध ग्रंथ कैसा ? सांगण्यासाठी समास पहिला ग्रंथारंभलक्षण समर्थांनी लिहिला आहे  . त्यात काय काय आहे ,थोडक्यात प्रस्तावनाच या समासात समर्थानी लिहिली आहे .
दासबोध हा गुरू शिष्य संवाद असून भक्तिमार्ग दाखवणे हा तर उद्देशच आहे .शुद्ध आत्मस्वरूप कसे, विदेहस्थिती कोणती , आणि अलिप्तता म्हणजे काय हे सांगत असतानाच उपासना कशी करावी, वेगवेगळ्या काव्यांची लक्षणे कोणती, चातुर्याची लक्षणे , प्रेमाच्या उत्पत्तीची लक्षणे , पंच महाभूतांची लक्षणे ,सृष्टीचा कर्ता धरता कोण यावर समर्थानी प्रकाश टाकला आहे .
           दासबोध 20 दशकात विभागलेला असून प्रत्येक दशकात 10 समास आहेत . प्रत्येक समास तुम्हांला समाधानाने  जगण्याची नवी दृष्टी देतो . दासबोध लिहिताना जे आधार ग्रंथ (referances) समर्थांनी अभ्यासले त्याचा उल्लेख या ग्रंथारंभ समासात उल्लेखिले आहेत . दासबोध प्रत्येकाने वाचलाच पाहिजे असा आहे . उगाच टीका करणाऱ्या बाबतीत समर्थ लिहितात

पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण ।उगा ठेवी जो दूषणं ।
                तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरे करी

दासबोधातून मिळणार काय आहे ? - माणसाचे वागणे बदलते ,संशयाचे भूत माणगुटीवरून उतरते , अहंकार , क्रोध दूर होतात .अज्ञान, दुःख , खोट्या समजुती दूर होतात .शिस्त लागते , माणसाला उत्तम गती लाभते , व्यावहारिक चातुर्य सुद्धा समर्थांनी दासबोधात शिकविले आहे .

नाना धोके देहबुद्धीचे। नाना किंत संदेहा चे ।
नाना उद्वेग संसाराचे ।नासती श्रवणे ।

इतके सगळे छान छान समर्थानी लिहिलेले आपण जन्मभर वाचलेच नाही तर ... श्रवणे चुके अधोगती । ऐसी याच्या जन्माची फलश्रुती ।

अर्थात समर्थ समास शेवटी समारोप करतात ....

जयाचा भावार्थ जैसा ।तयास लाभे तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । तयास तेचि प्राप्त ।।

तुमच्या डोक्यात मत्सर असेल तर तुम्हाला तेच मिळेल !

तुमच्या डोसक्यात पिरम आसल तर लोक तुमाले पिरम दावतील ....नाही का गडे हो !

दासबोध वाचलाच पाहिजे त्यांनी ज्यांना आयुष्यात उन्नती हवी आहे . सगळे विषय त्यांनी त्याकाळी हाताळले ते आजही उपयुक्तच आहेत .समर्थ दिव्य दृष्टीचे होते ...


Sunday, May 3, 2020

ये वादा रहा स्टोरी

विक्रम (ऋषिकपूर )राखीचा एकुलता एक पोरगा असतो राखी मोठ्या उद्योग घराण्याची चेअरमन असते.  विक्रम गायक कलाकार असतो तो एका सुनीता नावाच्या गायिकेच्या प्रेमात पडतो

    ती गरीब घरची असल्याने कहाणीला ट्विस्ट येतो .राखीला हे लग्न मान्य नसते , राखी काही वेगळेच ठरवते,  मात्र दोघे पळून जाऊन मंदिरात जाऊन , लग्न करायच्या आणाभाका घेतात ये वादा रहा !
             सुनीता ( पूनम ढिल्लो ) ऋषी मंदिरात येताना त्यांचा अपघात होतो . दोघे दवाखान्यात .सुनिताच्या चेहऱ्यात गाडीच्या  खिडकीच्या काचा  घुसल्याने ,  सुनीताचा  चेहरा खराब होतो .
राखी याचा फायदा घेत दोघांना दूर करण्याचा प्रयत्न करते .ती विक्रमला सुनीता अपघातात गेल्याचे सांगते तर सुनीताला विक्रम पासून त्याच्या जीवनातून  दूर व्हायला सांगते कारण तिचा खराब  चेहरा ! सुनीता याला तयार होते .

  नन्तर डॉक्टर तिला मुंबईला पाठवतात .सुनीताची तिची प्लास्टिक सर्जरी करतात

 तिची प्लास्टिक सर्जरी करणारे डॉक्टर मेहेरा (शम्मी कपूर ) तिला दुरुस्त करतो तिला नवीन चेहरा देतो नवीन सुनीता (टीना मुनीम) हि पुन्हा विक्रम च्या नावाने रडते . मात्र विक्रमच्या घरी जाताच त्याचे एनगेजमेंट राखी दुसऱ्याच उद्योगपतींच्या  मुलीशी (सारिका)  करत असते . डॉक्टर मेहेरा आणी  सुनीता त्यांच्या घरी परत जातात . विक्रमला सुनिता नी विसरावे म्हणून तिला नवीन नावाने कुसुम या नावाने नवीन जिंदगी सुरू करायला प्रवृत्त करतात .
          विक्रम आजूनही सुनीताच्याच प्रेमात असतो त्या चक्कर मध्ये तो सारिकेला टाळत असतो  .

  विक्रम आपले गाण्याचे कार्यक्रम थिएटर मध्ये लावतो त्या कार्यक्रमात सुनीता डॉक्टर मेहेरा सोबत जाते .न राहवून ती विक्रमला गाणं संपल्यानंतर स्टेज वर जाऊन गाणं म्हणते . विक्रम सुनीताला ओळखत नाही मात्र आवाज त्याच्या कानात भिनत असतो . त्याच्या मित्राला गोगा ला शोध घ्यायला सांगतो

तो बरोबर कुसुमला शोधतो .मग विक्रम कुसुमच्या मागे स्टेज शो करायला मागे लागतो ... कुसुम पहिले नकार देते .मात्र विक्रम मागेच असतो तो गेट बाहेर रात्रभर गाडीत वाट पहात बसतो . सकाळी कुसुम बाहेर पडते तो तिला गाडीत बसायचा आग्रह करतो ती नकार देत चालू लागते .तो एक सायकल वाला तिला सायकलवर लिफ्ट द्यायचे बोलतो मग विक्रम एक फाईट मारतो .....कुसुम विक्रमच्या गाडीत बसते .
        विक्रम कुसुमला गाण्यासाठी बोलतो तर ती नकार देते .मात्र विक्रम गावभर कार्यक्रमाचे मोठाले बॅनर लावतो .
कुसुम त्याचा जाब विचारायला घरी  जाते .
     ते बॅनर पाहून सारिका च्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात .ती या दोघांना एकत्र आणण्यासाठी राखीला बोलते .तिकडे डॉ मेहेरा राखीला बोलतात . कुसुम हीच सुनीता असल्याचे सांगतात शेवटी राखी विक्रमला कुसुम कडे म्हणजेच सुनीता कडे पाठवते
  तिकडे कुसुम पळून जाऊन त्यांनी जिथे शपथ घेतलेली असते तिथे शपथ मोडण्यासाठी गेलेली असते
              विक्रम तिथे पोहोचतो अन गोड शेवट होतो .

" मग काय होते ?' एक बालिश प्रश्न

काय होते काय ? ऋषिकपूर टीना मुनीम गळ्यात गळे घालून नाचतात ..... इति आई !!!

ऋषिकपूरचा " ये वादा रहा ' ची स्टोरी ! आजच TVवर पाहिला त्याची शीला मावशी किंवा स्व आई नी कशी स्टोरी सांगितली असती .....

एक प्रयत्न अगस्तीचाही ! एन्जॉय