पानं

Tuesday, October 29, 2019

नलु ताई 30 ऑक्टोम्बर2019

साधारणता नव्वदची गोष्ट असावी मी भुसावळला जात असे. जळगावला हेडक्वार्टर (घर ) होते . रोजचाच दीडशे किमी चा टूर असायचा ... छान चार रूमचा ऐस पैस ब्लॉक भाड़याने घेतलेला ! टूर वरून आल्यावर फ्रेश झाल्यावर गाडीला किक मारायची अन उशिरा पण भुसावळ गाठायचे .... पंचायत वाड्या तल्या त्या घरी मुक्काम पडायचा ! सहा बाय दहाच्या त्या छोट्या  खोल्यात जीव रमायचा .. आडवे उभे का होईना निवांत झोप व्हायची , तब्येतीने , आग्रहाने वास्तपुस्त व्हायची ओलावा अलौकिक होता , सकाळी दहाबाय दहाच्या खोलीत ..वन रूम .. किचन, बेडरूम ,लिविंग रूम , सर्व काही एकाच खोलीत,  बालाजी मंदिराच्या आणि वर माझ्या सारखा पाहुणा कलाकार हजेरी लावणारच !!
       दोन खोल्या शालूताईच्या अन एक खोली नलू ताइची ! या दोघींची श्रीमंती उम्बरठया बाहेरच्या खेटरांवरच  मोजावी . स्व भाऊ साठी शाली नली म्हणजे फारच कौतुकाचा विषय !
    
      सकाळीच गुड्डीला " मिठाई वा चमचमित खायला दयायचेच तर काही तरी वेगळे दे जसे  लाल भोपळयाच्या वड्या शीरे दोडक्याच्या शीरांपासून बनवलेले पदार्थ '' असा सल्ला देवून झाला . भाऊबिजेला या जेष्ठ ताई लोकांची आठवण काढ़ने सहज आहे ...त्यांनी दिलेले निर्व्याज प्रेम ! मी भटका अन विमुक्त असल्याने मला जास्तच मिळाले !!

       या तायांची पुढची पिढीहि हा ठेवा  जपण्याचा प्रयत्न करतेय,  आनंद आहे .या सगळ्या आठवणीचे कारण आज नलू ताईनी देह ठेवला .अतुलनी अगस्ती मामाला कळवा म्हणून सांगितले .आणि लगेच  दूसरी सूचना रात्री दहापर्यंत कुणाला कळवू नको . आपल्या मुळे कुणाला त्रास होता कामा नए सगळ्याची भाऊ बीज होऊन जाऊ देत .... ! आजची भाऊ बीज खरेच किती दुर्दैवी आहे आमच्या या बहिनीला बीजेच्या कोरीपासून दूर तर नेलेच अन या दुःखद वार्तेला सुद्धा , अर्थात इतरांच्या आनंदासाठी !! अक्का आत्याचे संस्कार ...

        सौ नलुताईचे कष्टप्रद आयुष्य सुफळ पूर्णत्वाकड़े गेले . सर्व मुलं चांगली निघाली , अतुलनी आईची खुप सेवा केली  . हे दुःख पेलण्याची अतुल ,प्रशांत,सौ  वर्षाला, एकूणच  डोखले परिवाराला ताकद देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !!

          

Tuesday, October 15, 2019

बालाजी मुंढे जयभावणींनगर

कधी स्टेजवर राहाण्यासाठी धड़पडणार नाही ,
नेत्यांच्या समोर समोर उगीचच करणार नाही ,
उगीच  धुंडघूस घालत फोटोसाठी "मरमर'णार नाही ,
उगीच अनावश्यक " बडबड' णार नाही ,
उगीच नेतागिरिचा आव आणणार नाही ,
मात्र प्रत्येक नेत्याला दखल घ्यायलाच लागेल ,

कारण कार्यक्षेत्रतल्या

प्रत्येक गल्लीत संपर्क
प्रत्येक घरात संपर्क
प्रत्येक प्रश्न स्वतःचा
प्रत्येक कार्यकर्ता दोस्त
प्रत्येक अभियान राबवणार
प्रत्येकाच्या हाकेला " ओ ' देणार
प्रत्येकाच्या सुखदुःखात धावणार
प्रत्येकाच्या मनात जागा करणार असा हा

प्रत्येकाचा आपला माणूस ,
दिलदार दोस्त ,
मितभाषी
स्मितभाषी
हसतमुख ,
जयभवानीनगरचा
सच्चा प्रतिनिधि ,
नेता

बालाजी मुंडे

आपणास उदंड निरामय आयुष्य लाभो

प्रार्थना - मंगलमुर्ती शास्त्री







आईचा स्व सुलभा आजीचा वाढदिवस

 शुभांगीनी आठवण दिली 7 ऑक्टोबर आजीचा स्व सुलभाआजीचा सुध्दा वाढदिवस आहे .
       आई चा वाढ दिवस कधी साजरा झाल्याचे आठवत नाही . त्यामुळे असेल कदाचित तारीख ही आठवणीत नव्हती . दादामामानी दुजोरा दिला अन आई च्या आठवणीत रंगलो . आई ती आईच ! आमच्या साठी आई म्हणजे भाऊं पासूनचे प्रोटेकशन होते .अर्थात सगळ्यांची तीच कहाणी असते , आईच्या पदराखाली लपणे अन गुन्हे लपवणे यात गैर काही नाही . सांभाळून घेणे हे आईचे कामच त्या प्रेमापोटीहि क्रित्येक मुलं बिघडलेली असतात ! आई वर्गाची लोकप्रियता बाबा वर्गापेक्षा जास्त असते ते यामुळेच असावी
        वाढदिवसानिमित्त स्व आईला नमस्कार ! तिच्या आठवणी आठवायचा प्रयत्न करावा तो चकल्या , धपाटे , खायचे पदार्थच आठवतात . खादाड सुद्धा तिनीच बनवलं न ! स्व भाऊंची  आवड , चव तिनीच निभवावी . तिचं रूप आठवावे तो स्वयंपाक घरातलेच आठवते . दुसरे ते पत्ते टाकतानाचे ! हा गुण अस्मादिकांनी मनापासून सांभाळला . वेळ मिळो न मिळो एक डाव झालाच पाहिजे !!
          नोकरी लागल्यावर आई साठी बंगलोर हुन साडी आणल्याचे स्मरते आजही रंग आठवतो . बाकी तिच्यासाठी आम्ही काही केल्याचं आठवत नाही . रोज एक पत्र अडीच वर्षे सांगलीतून पाठवत असे ख्याल खुशाली कळवण्यासाठी . आजच्या मोबाईल युगात तो पत्रानंद गायब झाला . आजच्या पिढीला असे आनंदी क्षण दुर्मिळ झाले आता !
       शुभांगी आजी शिवाय राहात नव्हती .आम्ही जितूच्या साखरपुड्याला वडोद्याला घेऊन गेलो तर लवकर परतावे लागले होते . ती आजी जवळ आमच्याशिवाय चांगली रहायची .. आजही तिलाच आठवण आली !
       आईचं सुखं आम्हा चौघात मलाच जास्त मिळाल ! मी खरच नशीब घेऊन जन्माला आलो . हेरंब देवेन्द्र बाबी घराबाहेर जास्त असल्याने मलाच जास्त लाभ झाला आईभाऊंचा  .
      अवघ पंचावन्न वर्षाचं आयुष्य तिला मिळालं . जरा लवकरच गेली , चटका आजही जाणवतो . अजून पाच वर्षे मिळते तो बरे झाले असते . अगस्ती सेटल झाल्याचे तिला पाहायला मिळाले असते ! ! योग नव्हते आणिक काय . लक्ष ठेव ,  आनंदी ठेव , आशीर्वाद असू दे या लेकरांवर एवढंच मागणं तिच्याकडे 7 ऑक्टोबर निमित्त ! साष्टांग दंडवत .

Monday, October 7, 2019

शुभांगी वाढ दिवस 2019 ऑक्टोबर 7

आज चि शुभांगी
" अब तक छब्बीस ' होणार ! एवढीशी छकुली इतकी मोठी झाली ...
       लहानपणी छकुली आजोबांच्याच पालकत्वात वाढली .आधी आजीशिवाय जमायचे नाही ..आजी नी साथ सोडली नी आजोबांनी बोट पकडले .
      तिच्या कडे लक्ष देण्याच्या काळात आम्ही दोघं "कामधेनु' कडे लक्ष द्यायचो ते ही बाळच होते ! अन आवडो न आवडो त्याचे लाड करणेच होते . तेव्हा जबाबदारी ती स्व भाऊंनी झेलली .आणि आजी आजोबा आई वडील सगळ्या भूमिका निभावल्या .
        त्यामुळे संस्कार वगैरे आजोबांनीच केलेले ....शुभांगीला मन मिळावू बनवण्याचे महत्वाचे  काम आजोबांनी केले त्यावेळी मला सुचलेले .... वास्तविक  टोटल क्रेडिट गोज टू भाऊ ! पण ...

, MARCH 24, 2003

छकुली

एक एकुली माझी छकुली
गुण बापाचे तारीफ कसली ?

चुलत चुलती ,सर्व ती असती
सर्वांसाठी ही, सख्खी सोबती !

मिळून मिळून राही ती कशी ,
'इकलौती ' ची असे मागणी!

मनी मोठे पण, प्रगल्भ असता .....
सख्ख्यांची नसे आवश्यकता !

आभाळ मनाची , मन मिलावू
एवढासा खाऊ , मिळून मिळून खाऊ !

जिवापाड जरी आई जपते
बाबांना ही माया लावते!!!

चकुली बहुली ,एकटी तानुली
आईबाबांचा विश्वास जागली!!!

पप्पी खूप मोठी हो ...खूप माणसं जमव आता जालन्यात का होईना !

वाढदिवस शुभ शुभ !

आईचा वाढदिवस 7 oct1943

 शुभांगीनी आठवण दिली 7 ऑक्टोबर आजीचा स्व सुलभाआजीचा सुध्दा वाढदिवस आहे .
       आई चा वाढ दिवस कधी साजरा झाल्याचे आठवत नाही . त्यामुळे असेल कदाचित तारीख ही आठवणीत नव्हती . दादामामानी दुजोरा दिला अन आई च्या आठवणीत रंगलो . आई ती आईच ! आमच्या साठी आई म्हणजे भाऊं पासूनचे प्रोटेकशन होते .अर्थात सगळ्यांची तीच कहाणी असते , आईच्या पदराखाली लपणे अन गुन्हे लपवणे यात गैर काही नाही . सांभाळून घेणे हे आईचे कामच त्या प्रेमापोटीहि क्रित्येक मुलं बिघडलेली असतात ! आई वर्गाची लोकप्रियता बाबा वर्गापेक्षा जास्त असते ते यामुळेच असावी
        वाढदिवसानिमित्त स्व आईला नमस्कार ! तिच्या आठवणी आठवायचा प्रयत्न करावा तो चकल्या , धपाटे , खायचे पदार्थच आठवतात . खादाड सुद्धा तिनीच बनवलं न ! स्व भाऊंची  आवड , चव तिनीच निभवावी . तिचं रूप आठवावे तो स्वयंपाक घरातलेच आठवते . दुसरे ते पत्ते टाकतानाचे ! हा गुण अस्मादिकांनी मनापासून सांभाळला . वेळ मिळो न मिळो एक डाव झालाच पाहिजे !!
          नोकरी लागल्यावर आई साठी बंगलोर हुन साडी आणल्याचे स्मरते आजही रंग आठवतो . बाकी तिच्यासाठी आम्ही काही केल्याचं आठवत नाही . रोज एक पत्र अडीच वर्षे सांगलीतून पाठवत असे ख्याल खुशाली कळवण्यासाठी . आजच्या मोबाईल युगात तो पत्रानंद गायब झाला . आजच्या पिढीला असे आनंदी क्षण दुर्मिळ झाले आता !
       शुभांगी आजी शिवाय राहात नव्हती .आम्ही जितूच्या साखरपुड्याला वडोद्याला घेऊन गेलो तर लवकर परतावे लागले होते . ती आजी जवळ आमच्याशिवाय चांगली रहायची .. आजही तिलाच आठवण आली !
       आईचं सुखं आम्हा चौघात मलाच जास्त मिळाल ! मी खरच नशीब घेऊन जन्माला आलो . हेरंब देवेन्द्र बाबी घराबाहेर जास्त असल्याने मलाच जास्त लाभ झाला आईभाऊंचा  .
      अवघ पंचावन्न वर्षाचं आयुष्य तिला मिळालं . जरा लवकरच गेली , चटका आजही जाणवतो . अजून पाच वर्षे मिळते तो बरे झाले असते . अगस्ती सेटल झाल्याचे तिला पाहायला मिळाले असते ! ! योग नव्हते आणिक काय . लक्ष ठेव ,  आनंदी ठेव , आशीर्वाद असू दे या लेकरांवर एवढंच मागणं तिच्याकडे 7 ऑक्टोबर निमित्त ! साष्टांग दंडवत .