मित्र कुणास म्हणावं ?
ज्याच्याजवळ व्यक्त होताना संकोच होत नाही,
खोटं बोलावसं वाटत नाही फसवणे तर दूरचे.
मनातली पाप पुण्य आपोआप बाहेर पडतात .
त्याच्याजवळ आपले आंनद आणि दुःख , शल्य पटकन मोकळे करता येतात तो मित्र !
मित्राजवळ आपण मोकळे-ढाकळे असतोत .
एव्हढे मित्र पुराण ऐकवण्याचे कारण ....परवा मित्रवर्य विश्वासचा फोन आला ."आमदार साहेबांना भेटायचे आहे .तू वेळ घेऊन दे ' मी सुचवले "अरे तूच फोन कर त्यांना '
अरे शास्त्री तुझे त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत ... विश्वास बोलला .
विश्वास तूच फोन कर , वेळ घे you will feel friendly ,nothing less !
सायंकाळी त्याचा फोन आला , "अतुलदादाचं कामच वेगळे आहे रे '' बोलला , एव्हाना तो फ्रेंडली झाला होता त्याची भेट झाल्याचे त्यानं सांगितले . त्याचे प्रॉब्लेम सुटण्याची चिन्ह त्याला दिसली . हेच वैशिष्ट्य अतुलजी सावे या व्यक्तीविशेषाचे ! लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सगळ्यांना " दोस्त ' बनवण्यात हातखंडा असलेले अतुलजी !
आमदार म्हणून दमदार कामगिरी करायला ,मला नाही वाटत अतुलजींनी कुण्या अधिकाऱ्याला , कर्मचाऱ्याला उगीच सूनावत कामं करवली असतील .सगळे आनंदाने कार्यरत करत, दोस्त बनवत उद्दिष्ट्य साध्य केलेली !
मी अनेक पदाधिकारी , लोकनेते उगीचच कार्यकर्त्यांसमोर अधवातध्वा बोलतांना पाहिले , इम्प्रेशन मारायला ! अतुलजीना असं इम्प्रेस करावं लागतं नाही . त्यांना चिडून बोलतांना एकदोनदा पाहिले त्यावेळी खरेच डोक्यात तिडीक उत्पन्न करणारी स्थिती होती .
" असं आहे शास्त्रीजी त्याचा पक्ष विरोधात , तो " विरोधी ' निवडणुकीच्या पंधरवड्यात ! त्याच्यापासून सावध राहा पण शत्रु समजू नका ' असे इतर पक्षातल्या लोकांबद्दलचे विचार मला कवी संदीप खरेच्या ओळी आठवून जातात
"चालती माझ्याविरोधी माझि ही संगनमते
शत्रू माझे जे , तयांचे मित्र व्हावे वाटते ! '
अतुलजी एक " जाणिवा ' जपणारा माणूस म्हणूनही मला आवडतात . पुलवामा हल्ला झाल्यावर स्वागत पुष्प नाकारणारा , आपल्या वाढदिवसाचे सगळे उत्सवी कार्यक्रम रद्द करत फक्त सामाजिक उपक्रमांना परवानगी देणारे अतुलजी आम्हा कार्यकर्त्यांना संस्कारित करत असतात .
आज अभिष्ट्यचिंतन करताना दीर्घायुष्य चिंतीताना इतकंच मागणं ,अतुलजींच्या प्रिय दैवत श्री गणेशाकडे, अजुन खूप मोठ्ठ्या जबाबदाऱ्या पार पाडू दे , जन-सेवारत राहू दे .
पुण्य कर्मणा कीर्तिमार्जय
जीवनम् तव भवतु सार्थकम्
" अतुलजी ' नावाच्या लोकमित्रास मनःपूर्वक शुभेच्छा -मंगलमुर्ती शास्त्री .
ज्याच्याजवळ व्यक्त होताना संकोच होत नाही,
खोटं बोलावसं वाटत नाही फसवणे तर दूरचे.
मनातली पाप पुण्य आपोआप बाहेर पडतात .
त्याच्याजवळ आपले आंनद आणि दुःख , शल्य पटकन मोकळे करता येतात तो मित्र !
मित्राजवळ आपण मोकळे-ढाकळे असतोत .
एव्हढे मित्र पुराण ऐकवण्याचे कारण ....परवा मित्रवर्य विश्वासचा फोन आला ."आमदार साहेबांना भेटायचे आहे .तू वेळ घेऊन दे ' मी सुचवले "अरे तूच फोन कर त्यांना '
अरे शास्त्री तुझे त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत ... विश्वास बोलला .
विश्वास तूच फोन कर , वेळ घे you will feel friendly ,nothing less !
सायंकाळी त्याचा फोन आला , "अतुलदादाचं कामच वेगळे आहे रे '' बोलला , एव्हाना तो फ्रेंडली झाला होता त्याची भेट झाल्याचे त्यानं सांगितले . त्याचे प्रॉब्लेम सुटण्याची चिन्ह त्याला दिसली . हेच वैशिष्ट्य अतुलजी सावे या व्यक्तीविशेषाचे ! लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सगळ्यांना " दोस्त ' बनवण्यात हातखंडा असलेले अतुलजी !
आमदार म्हणून दमदार कामगिरी करायला ,मला नाही वाटत अतुलजींनी कुण्या अधिकाऱ्याला , कर्मचाऱ्याला उगीच सूनावत कामं करवली असतील .सगळे आनंदाने कार्यरत करत, दोस्त बनवत उद्दिष्ट्य साध्य केलेली !
मी अनेक पदाधिकारी , लोकनेते उगीचच कार्यकर्त्यांसमोर अधवातध्वा बोलतांना पाहिले , इम्प्रेशन मारायला ! अतुलजीना असं इम्प्रेस करावं लागतं नाही . त्यांना चिडून बोलतांना एकदोनदा पाहिले त्यावेळी खरेच डोक्यात तिडीक उत्पन्न करणारी स्थिती होती .
" असं आहे शास्त्रीजी त्याचा पक्ष विरोधात , तो " विरोधी ' निवडणुकीच्या पंधरवड्यात ! त्याच्यापासून सावध राहा पण शत्रु समजू नका ' असे इतर पक्षातल्या लोकांबद्दलचे विचार मला कवी संदीप खरेच्या ओळी आठवून जातात
"चालती माझ्याविरोधी माझि ही संगनमते
शत्रू माझे जे , तयांचे मित्र व्हावे वाटते ! '
अतुलजी एक " जाणिवा ' जपणारा माणूस म्हणूनही मला आवडतात . पुलवामा हल्ला झाल्यावर स्वागत पुष्प नाकारणारा , आपल्या वाढदिवसाचे सगळे उत्सवी कार्यक्रम रद्द करत फक्त सामाजिक उपक्रमांना परवानगी देणारे अतुलजी आम्हा कार्यकर्त्यांना संस्कारित करत असतात .
आज अभिष्ट्यचिंतन करताना दीर्घायुष्य चिंतीताना इतकंच मागणं ,अतुलजींच्या प्रिय दैवत श्री गणेशाकडे, अजुन खूप मोठ्ठ्या जबाबदाऱ्या पार पाडू दे , जन-सेवारत राहू दे .
पुण्य कर्मणा कीर्तिमार्जय
जीवनम् तव भवतु सार्थकम्
" अतुलजी ' नावाच्या लोकमित्रास मनःपूर्वक शुभेच्छा -मंगलमुर्ती शास्त्री .