सगळी नावं घरकुल मधली आली अन अगस्ती त्यात नाही ! शुभेच्छा दे म्हणून हेरंब नी आठवण करून दिली मात्र राहूनच गेले ! आज 1 जुलैला 7 वाढदिवस अन एक साखरपुडा अटेंड केला ! वाढदिवसांनी नाकात दम आणलेला ! सगळ्यांना 1 जुलैच मिळावा ...
पु लं च्या भाषेत अर्धा महाराष्ट्र 1जूनला जन्माला आलाय ! सगळ्या शाळा मास्तरांनी 1जूनला अर्ध्या अधिक महाराष्ट्राला जन्माला घातलंय ... तसे 1 जुलैचे झाले नसेल ना ? आज खूप birthday होते हे मात्र खरे अन सुनीलमामा नी प्रूफच जोडलेले ! त्याला तर शुभ शुभ म्हणायलाच हवं . ..
कारण ? तसं पाहिलं तर तो अधला मधलाच आहे , जेष्ठ कनिष्ठ महत्वाचे !! तर तो *एकमात्र* आहे .अन त्याच्यावर लिहिले नाही तर देशावर , राष्ट्राप्रती अन्याय्य होईल !
आपल्या मध्ये एकमात्र *सैनिक* असलेल्या सुनील मामाला शी सा नमस्कार ! अन मनःपूर्वक शुभेच्छा .
एका सैनिकाची खंत मी वाचली होती ,सुनीलमामा सुद्धा त्याला अपवाद नव्हता .ऐन तारुण्यात घाम गाळत सीमा सांभाळत त्यालाही कष्ट उपसावे लागलेले .त्याला सलाम ! जय हिंद . मा अटलजी- मोदींजींच्या कार्य काळात सैनिकांना सन्मान मिळायला सुरवात झालीय आनंद आहे .
कविता मा तरुण विजय यांनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये उदघृत केली होती त्याचे स्वैर भाषांतर नेट वर मायबोली वर उपलब्ध आहे ते मी माजी सैनिक सत्कार प्रसंगी भाषणात ऐकवली होती , सोबत देतोय *प्रत्येकाने वाचावी* अन मग सगळ्या अमरावतीकर लहानग्यांनी माजी सैनिक सुनील पांडे यांना साष्टांग दंडवत घालावे . मोठ्यांनी मनापासून आशिष ......
*भारतमाते, मी तुझी अजूनही सेवा कां करतो?*(एका सैनिकाची खंत!)
तू आमच्याशी कशी खेळतेस ते कधी पाहिले आहेस?
सातव्या वर्षी मी ठरविले होते...
कीं मी तुझी शेवटपर्यंत सेवा करेन
तुझ्या सार्या सीमांचे रक्षण करेन
अन् आता मी मूर्खासारखा आहे हे दाखवितेस
सतरा वर्षांचा झालो आणि शाळेबाहेर पडलो
’मुलांना पुरूष’ बनविणार्या शाळेत गेलो
खडतर आयुष्य जगलो अनेक सुखांना मुकलो
तेंव्हां मी माझ्या मुलकी मित्रांना भेटायचो
कॉलेजकुमारांच्या सोनेरी दिवसात
ते छानछोकीत रहायचे, मजा करायचे आणि
मी उन्हात आणि धुक्यात घाम अन् रक्त गाळायचो,
पण मी कधीही "कां, कुठे आणि काय" विचारले नाहीं
वेळ आली कीं मरायला सिद्ध एवढेच मला माहीत होते
एकवीस झालो आणि मला कमीशन मिळाले
बँडच्या तालात आणि परेड करत
जमीनीवर, हवेत आणि समुद्रात रक्षण करायची
वेळ येताच अंतिम त्याग करायची शपथ घेतली
मी तिथे ऐटीत उभा होतो पण
त्यादिवशी धोक्याची घंटी ऐकायला नाहीं मिळाली.
कारण जेंव्हां मी प्राणर्पण करेन
तेंव्हां तूच म्हणशील, "त्यात काय मोठा तीर मारलास?"
खूप पूर्वी तू मला आरामशीर आयुष्याची खात्री दिली होतीस
मी आसपास नसताना माझ्या कुटुंबाची काळजी घेणार होतीस
तू येऊन आमच्या अडचणी पाहिल्या होत्यास
आणि मी तुला डायरीत लिहितानाही पाहिले
आशा होती कीं तुला माझी किंमत कळली असेल
आता मला कळले आहे कीं तुला कधीच दिसणार नाहींय्
कारण तुला आमचे दैदिप्यमान रूपच दिसते
तुला कधी मरण टपून बसलेले दिसले आहे?
तुला कधी हिमवृष्टीत पहारा करणारा दिसलाय्?
त्याने अद्याप न पाहिलेल्या त्याच्या अर्भकाचे नाव माहीत आहे?
विशाल समुद्रावर गस्त घालताना ज्याचे
वडील वारले त्या नौसैनिकाला तू भेटली आहेस?
तू जाणतेस कीं मी कधी आवाज चढवणार नाहीं
मी खडा राहीन आणि सगळीकडे तुझे रक्षण करेन
आणि तुझ्यासाठी मीच आहे उन्हातान्हात उभा!
आणि आता चोविसाव्या वर्षी मी नवा विचार करतोय्
माझ्या सात वर्षापूर्वीच्या जुन्या निर्णयांचा
मी दुसरे कुठले कार्यक्षेत्र निवडायला हवे होते?
माझ्या मुलाला मी सैन्यात घालेन?
त्याला सांगेन की सैन्यात सार्या गरजा भागतात?
या देशाची सेवा तू करशील आणि हा देश
तुला त्या (उच्च) योग्यतेनुसार सारे कांही देईल?
"भारत चमकतोय्" असे जगाला सांगितलेले मी ऐकले
मग मी जवानांना सांगितले की आपला देश महान होतोय्
य़ाच महान देशाचे आपण रक्षण करणार आहोत
पण माते हे सांग कीं कधीपर्यंत हे सोंग मी वठवू शकेन?
तू तुझ्या मनात येतील ती सारी आश्वासने देत रहा
पण तू तुझ्याच सैनिकांच्या आत्म्याशी प्रतारणा करतेस
आपले कांहीं यशस्वी नागरिक आमच्याबद्दल कसे
तुच्छतेने लिहितात आणि टर उडवतात ते ऐकलेस?
तू ये इथे आणि पहा मी काय करतोय् ते
ये इथे आणि मी काय-काय सोसतो आहे ते पहा
एक दिवस माझे आयुष्य तू जगून पहा
मग कदाचित् तुझ्या तोंडून कांहीं बरे बाहेर पडेल?
मी अजूनही माझे प्राण पणाला लावीन
कारण तुझा ध्वज दिमाखात फडकला पाहिजे
पण तरी आता मनात येतच रहाते.....
हे भारतमाते, मी तुझी सेवा अजून कां करतोय्?