"ते समोर चाललेले पर्रिकर साहेब आहेत बहुतेक ' ललित म्हणाला ...
"अरे ते देशाचे मंत्री आहेत , त्यांच्या मागेपुढेच पाच दहा गाड्या असतात ' इति आम्ही .
शास्त्रीजी खरंच ते भाई आहेत भाई , केंद्रीय मंत्री ! ' सोबतच्यानी ललीतची भलावण केली . आम्ही झट झट पावले उचलली , समोरच्या दोघांना क्रॉस केले पाहतो तो खरेच परिकर साहेब होते . पणजीच्या भाजप कार्यालयाच्या पायऱ्या एव्हाना भाईंनी चढलेल्या होत्या . .. साधा हाफ बाह्याचा यु कट शर्ट , पॅन्ट ,चष्मा गळ्यात लटकलेला . ..
एक मंत्री इतका साधा असू शकतो अविश्वसनीय मात्र सत्य होते .
प्रधानमंत्री मोदींजींच्या सभेच्या वेळी आम्ही प्रेक्षकांमध्ये उभे होतो तोच थोड्या वेळात गलका ऐकू आला पाहतो तो थेट पर्रिकरजी जनतेत उभे . सगळ्यांच्या हातात हात घेत , सुरक्षा रक्षकांना दूर ठेवत , एकदम अलगद जनसामान्यांच्यात मिसळलेले भाई ! मी त्यांचे जवळ गेलो एक सेल्फी काढण्यासाठी . तेही थांबले क्षणभर , सेल्फी मला काढता आला नाही ... गेला चान्स !
सभा संपवून पणजी भाजप कार्यालयाकडे निघालो .रस्त्यात भाई कुणा कार्यकर्त्याबरोबर बोलत उभे होते , मला आवाज देऊन " आता मोकळेपणाने सेल्फी ट्राय करा म्हणाले ,मी पुन्हा प्रयत्न केला .सेल्फी घेणे जमले नाही, जसा फोटो आला तसाच सही मानून , परत मात्र त्यांचा जास्त वेळ घेणे मला संयुक्तिक वाटले नाही .त्यांचे आभार मानून तेथून काढता पाय घेतला .... मनावर " आमच्या नेत्यांना भेटणे इतके सोप्पे आहे तर ' हि भावना कोरली गेली .अधिक जोमाने माझ्यातला कार्यकर्ता कामाला लागला .
फोंडयाच्या डॉ साठ्यांना भाई सकाळी पाच वाजता सफाई कर्मचाऱ्यांना निर्देश देतांना , स्कुटर वर फिरतांना दिसतात आणि राजकारणापासून दुरी राखणाऱ्या साठ्यांना नंतर या विषयात कसा इंटरेस्ट तयार झाला हे ऐकले की आमच्या इकडच्या नगरसेवकांचा तिथे गोव्यात वर्क शॉप ठेवला पाहिजे असे वाटते . एक मुख्यमंत्री इतका ...
वाळपोई मतदार संघात प्रभारी म्हणून जबाबदारी निभावताना भाईंचे सादगीचे अनेक किस्से ऐकायला मिळायचे .स्वतः आम्हा कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले वरचे किस्से आज त्यांच्या जाण्याने पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर उभे राहतात, डोळ्यांच्या कडा ओल्या करतात .
भाई तुम्ही गेलात , राजकारण्यांसाठी संस्कार मागे ठेवत निघून गेलात , राष्ट्र तुमचे हे ऋण कदापि विसरणार नाही .
श्री गुरुजींनी दाखवलेला पथ आपण जीवनभर एक स्वयंसेवक या नात्याने सांभाळला त्यामुळेच मग ...
शत्रु को भी जीतता था आपका चारित्र्य उज्वल
निन्दकोंपर मात करता आपका व्यवहार निर्मल
...... असे जीवन आपण जगलात ! नुसते गोवाच नाही तर संपूर्ण देश "पोरकं होणं ' अनुभवतय .
शत शत नमन - मंगलमुर्ती शास्त्री औरंगाबाद .