पानं

Friday, February 19, 2016

ती अपघातात गेली
तीनं फार मोठा आघात दिला
तीनं खुप समस्या निर्माण केल्या
तिच्या तरी काय हातात होत
तिच्याच नाही तर कुणाच्या हातात होत
चुक कुणाची ?
ताई जीजाजी स्वत:ला दोषी मानतात ?
आनंदात वाटेकरी नको ?
गाडी देणारा दोषी ?
ड्रायव्हर ?
का समोरून विमनस्क अवस्थेतील दुचाकिस्वार ?
सत्य नियती आहे !
नियतिचे गणित तू मी सोडवू शकत नाही
भोग वगैरे नियातिचेच शिल्लक अवशेष !!
आयुष्य हेच भोग आहेत जन्मल्यापासुनचे !
कसे झेलायचे हे ज्याचे त्याने ठरवायाचे ,
रडत रडत का हसत खेळत !
काळ हाच सापेक्ष आहे जसा जाईल तसा बदलेल
कालचे हसणे आज रडणे उद्याचा " बदल ' निरपेक्ष आहे

तु जसा वर्तमानात जगतो तसाच राहिलास तर उत्तर आपोआप मिळतिल स्वभावानुसार स्वाभाविक !

तुझा धीर हाच कुटुम्बाचा आजचा  आधार आहे .

सगळे भाऊ भावंड आत्तापर्यंत साम्भाळलेस आता त्यांचीच आठवण ठेव सगळे निभेल !!

शेवटी एकेकट्यांनीच यायचे ,जगायचे अन जायचे आहे !
शिल्लक रहायचय कुणाला ..

तु तर कुल दिपक आहेस ग्रेट !!  

AGASTI